QuotePM releases a compilation of best essays written by participants on the ten themes
QuoteIndia's Yuva Shakti is driving remarkable transformations, the Viksit Bharat Young Leaders Dialogue serves as an inspiring platform, uniting the energy and innovative spirit of our youth to shape a developed India: PM
QuoteThe strength of India's Yuva Shakti will make India a developed nation: PM
QuoteIndia is accomplishing its goals in numerous sectors well ahead of time: PM
QuoteAchieving ambitious goals requires the active participation and collective effort of every citizen of the nation: PM
QuoteThe scope of ideas of the youth of India is immense: PM
QuoteA developed India will be one that is empowered economically, strategically, socially and culturally: PM
QuoteThe youth power of India will definitely make the dream of Viksit Bharat come true: PM

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, मनसुख मांडवीय, धर्मेंद्र प्रधान, जयंत चौधरी, रक्षा खडसे, खासदार, इतर मान्यवर आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या युवा मित्रांनो!

भारताच्या युवाशक्तीच्या ऊर्जेमुळेच आज हा भारत मंडपमही ऊर्जेने व्यापून गेला आहे आणि ऊर्जामय झाला आहे. आज संपूर्ण देश स्वामी विवेकानंद यांचे स्मरण करत आहे, त्यांना अभिवादन करत आहे. स्वामी विवेकानंदांचा देशातील तरुणांवर प्रचंड विश्वास होता. स्वामीजी म्हणत, की माझा तरुण पिढीवर, नव्या पिढीवर विश्वास आहे. स्वामीजी म्हणत की, माझे कार्यकर्ते तरुण पिढीतून येतील, सिंहाप्रमाणे ते प्रत्येक समस्येवर तोडगा काढतील. विवेकानंदजींचा जसा तुमच्यावर विश्वास होता, तसाच माझा विवेकानंदजींवर विश्वास आहे, त्यांच्या प्रत्येक शब्दावर माझा विश्वास आहे. त्यांनी भारतातील तरुणांसाठी जे काही विचार केले आणि सांगितले, त्यावर माझी अंधश्रद्धा आहे. खरोखरच, आज स्वामी विवेकानंद असते, आणि त्यांनी एकविसाव्या शतकातील तरुणांमधील ही ऊर्जा, त्यांचे सक्रीय प्रयत्न पहिले असते, तर त्यांनी भारतासाठी नवा विश्वास, नवी ऊर्जा, आणि नव्या स्वप्नांचे बीज पेरले असते.

मित्रहो,

तुम्ही आज ज्या भारत मंडपम मध्ये एकत्र आले आहात, याच भारत मंडपम मध्ये जगभरातील दिग्गज एकत्र आले होते, आणि जगाचे भविष्य काय असावे, यावर त्यांनी चर्चा केली होती. माझे हे भाग्य आहे, की त्याच भारत मंडपम मध्ये माझ्या देशातील तरुण, भारताची पुढील 25 वर्षे कशी असतील, याचा रोडमॅप तयार करत आहेत.

मित्रहो,

काही महिन्यांपूर्वी मी माझ्या निवासस्थानी काही युवा खेळाडूंना भेटलो होतो आणि मी त्यांच्याशी गप्पा मारत होतो, तर एक खेळाडू उभा राहिला आणि म्हणाला की, मोदीजी, जगासाठी तुम्ही पंतप्रधान असाल, पीएम असाल, पण आमच्यासाठी पीएम म्हणजे - परम मित्र.

 

|

मित्रहो,

माझ्यासाठी माझ्या देशातील तरुणांशी माझे तेच मित्रत्वाचे नाते आहे, तेच नाते आहे. आणि मैत्रीचा सर्वात मोठा दुवा असतो, विश्वास. माझाही तुमच्यावर खूप विश्वास आहे. याच विश्वासामुळे मला मेरा युवा भारत, म्हणजेच MYBharat ची निर्मिती करण्याची प्रेरणा मिळाली. याच विश्वासाने विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग चा पाया रचला. माझा विश्वास सांगतो  की, भारताच्या युवा शक्तीची ताकद भारताला लवकरात लवकर विकसित राष्ट्र बनवेल.

मित्रहो,

केवळ आकडेवारीमध्येच गुंतलेल्यांना असे वाटेल,की हे सर्व खूप अवघड आहे. मात्र माझे मन सांगते, तुमच्या सर्वांवरील विश्वासामुळे असे सांगते की, हे सर्व नक्कीच कठीण आहे, पण अशक्य नाही. कोट्यवधी तरुणांचे हात विकासरथाची चाके फिरवत असतील, तर आपण निश्चितच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू.

मित्रहो,

असे म्हणतात की, आपण इतिहासातून शिकतो, प्रेरणाही घेतो. जगात अशीही अनेक उदाहरणे आहेत, की एखाद्या देशाने, समुदायाने, मोठी स्वप्ने, मोठे संकल्प घेऊन एकत्र येऊन एकाच दिशेने वाटचाल सुरु केली, एकीने वाटचाल सुरु केली, आणि आपल्या ध्येयाचा कधीच विसर पडू दिला नाही, आणि चालतच राहण्याचा निर्धार केला आणि इतिहास साक्षीदार आहे, की त्यांनी आपली स्वप्ने पूर्ण केली, आपले ध्येय गाठले. आपल्यापैकी अनेकांना माहित असेल की 1930 च्या दशकात, म्हणजे सुमारे 100 वर्षांपूर्वी अमेरिका गंभीर आर्थिक संकटात सापडली होती. मग अमेरिकन जनतेने ठरवले की आपल्याला यातून बाहेर पडायचे आहे आणि वेगाने पुढे जायचे आहे. त्यांनी न्यू डीलचा मार्ग निवडला आणि अमेरिका त्या संकटातून बाहेर तर आलीच, पण आपली विकासाची गती अनेक पटींनी वाढवून दाखवली, जास्त नाही, 100 वर्षे. एक वेळ अशी होती, जेव्हा सिंगापूरची अवस्था बिकट होती, ते एक मच्छिमार समुदायाचे गाव होते.  त्या ठिकाणी जीवनावश्यक मुलभूत सुविधांची देखील चणचण होती. सिंगापूरला योग्य नेतृत्व मिळाले, आणि लोकांनी एकत्र येऊन ठरवले की आपण आपल्या देशाला विकसित राष्ट्र बनवायचे. त्यांनी नियमांचे पालन केले, कायद्यांचे पालन केले, समूह भावाने एकत्र वाटचाल केली, आणि काही वर्षांतच सिंगापूरने एक जागतिक आर्थिक आणि व्यापारी केंद्र बनून जगावर आपली छाप सोडली. जगात असे अनेक देश, घटना, समाज, गट आहेत. आपल्या देशातही अशी अनेक उदाहरणे आहेत, भारतातील जनतेने स्वातंत्र्याचा संकल्प ठेवला. ब्रिटीश साम्राज्याची ताकद केवढी होती, त्यांच्याकडे काय नव्हते, पण संपूर्ण देश एकजुटीने उभा राहिला, स्वातंत्र्याचे स्वप्न जगू लागला, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झगडू लागला, जीवनाची आहुती देण्यासाठी निघाला आणि भारताच्या जनतेने स्वातंत्र्य मिळवून दाखवले. 

 

|

स्वातंत्र्यानंतर देशात अन्न संकट उभे राहिले. देशाच्या कृषक समुदायाने संकल्प केला आणि भारताला अन्न तुटवड्यामधून मुक्त केले. तुमचा जन्मही झाला नव्हता, त्यावेळी PL 480 नावाच्या गव्हाची आपण आयात करत होतो, आपल्यापर्यंत तो पोहोचायला बराच वेळ  लागायचा. आपण त्या संकटातून बाहेर पडलो. मोठी स्वप्ने पाहणे, मोठे संकल्प ठेवणे आणि ते वेळेवर पूर्ण करणे अशक्य नाही. कोणत्याही देशाला पुढे जायचे असेल, तर मोठी उद्दिष्टे ठेवावीच लागतात. जे असा विचार करतात, जाऊदे, असेच असते, काय गरज आहे, लोक उपाशी तर मरत नाहीत ना, असेच चालते, चालुदे, काही बदलण्याची काय गरज आहे, कशाला काळजी करायची. जे असा विचार करतात, ते हिंडत फिरत असतात, पण एखाद्या मृत व्यक्तीहून वेगळे नसतात. मित्रांनो, ध्येयाशिवाय जीवन नाही. कधीकधी मला असे वाटते, जीवनात एखादी जडी-बुटी असेल, तर तेच लक्ष्य असते, जे जीवन जगण्याची ताकदही देते. जेव्हा समोर एखादे मोठे लक्ष्य असते, तेव्हा आपण ते प्राप्त करण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावतो. आणि आजचा भारत हेच सांगत आहे.

मित्रहो,

गेल्या 10 वर्षांत आपण संकल्पामधून सिद्धीची अनेक उदाहरणे पहिली आहेत. आपण भारतीयांनी ठरवले की, उघड्यावरील शौचापासून आपल्याला मुक्त व्हायचे आहे. केवळ 60 महिन्यांत 60 कोटी देशवासीयांनी स्वतःला उघड्यावरील शौचापासून मुक्त केले. भारताने प्रत्येक कुटुंबाला बँक खात्याशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. आज भारतातील जवळजवळ प्रत्येक कुटुंब बँकिंग सेवेशी जोडले गेले आहे. भारताने गरीब महिलांना स्वयंपाक घरातील धुरापासून मुक्त करण्याचा संकल्प ठेवला होता, आज 10 कोटींहून अधिक गॅस कनेक्शन देऊन आम्ही हा संकल्पही पूर्ण केला आहे.

 

|

आज अनेक क्षेत्रांत भारत निर्धारित वेळेपूर्वीच आपली उद्दिष्टे पूर्ण करून दाखवत आहे. तुम्हाला कोरोनाचा काळ आठवत असेल, जगाला लसीची चिंता होती, कोरोनाची लस तयार व्हायला अनेक वर्षे लागतील असं म्हटलं जात होतं, पण भारताच्या शास्त्रज्ञांनी वेळेआधीच लस बनवून दाखवली.

काही लोक म्हणत होते, भारतात सर्वांना कोरोनाची लस मिळायला 3 वर्ष, 4 वर्षे, 5 वर्षे लागतील, पण आम्ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली आणि विक्रमी वेळेत सर्वांचे लसीकरण केले. आज जग भारताचा हा वेग पाहत आहे.

आम्ही हरित ऊर्जा याविषयी जी -20 मध्ये एक मोठा संकल्प करून कटिबध्दता निश्चित केली होती. पॅरिस आघाडीमध्पे निश्चित केल्याप्रमाणे ध्येयपूर्ती करणारा भारत हा पहिला देश आहे. हे ध्येय आपण ठरवलेल्या कालावधीपेक्षा नऊ वर्ष आधी पूर्ण  केले आहे.

आता भारताने वर्ष 2030पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रीत पेट्रोल वापराचे ध्येय ठेवले आहे. हे ध्येयसुद्धा आपण अगदी कमी कालावधीमध्ये म्हणजे आगामी काही वर्षामध्येच पूर्ण करणार आहोत. भारताने मिळवलेले असे प्रत्येक यश ,सिद्ध केलेल्या संकल्पाचे उदाहरण आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा आहे. असे यश आपल्याला विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गाजवळ नेत आहे. तसेच ध्येयपूर्तीजवळ जाण्याची गती अधिक वेगवान करीत आहे.

मित्रांनो,

विकासाच्या या प्रवासामध्ये एक गोष्ट आपण कधीही विसरून चालणार नाही. आपल्याला मोठे लक्ष्य निश्चित करायचे आहे आणि ही लक्ष्यपूर्ती करणे हे काही फक्त सरकारी यंत्रणेचे काम आहे , असे नाही.मोठे लक्ष्य प्राप्तीसाठी समाजातल्या प्रत्येक स्तरावरच्या नागरिकाने कार्यरत राहिले पाहिजे. आणि त्यासाठी मंथन केले पाहिजे. कार्यदिशा नक्की केली पाहिजे. आज सकाळी तुम्हां मंडळींनी केलेले सादरीकरण मी पहात होतो, तसेच यामध्ये  सर्वांबरोबर होणारी चर्चा  करताना मी बोललोही होतो की,  या सर्व प्रक्रियेत लक्षावधी लोक सहभागी झाले आहेत, याचाच अर्थ विकसित भारत या संकल्पनेची मालकी काही फक्त मोदी यांची नाही. तुम्हां सर्वांचे दायित्व याविषयी आहेच. विकसित भारत:  " हे मंथन म्हणजे या प्रक्रियेचे एक उत्तम उदारण आहे. आणि एकूणच त्याचे नेतृत्व तुम्ही युवामंडळी करीत आहात. ज्या युवकांनी प्रश्नमंजूषा कार्यक्रमामध्ये भाग घेतला, जी मंडळी निबंध स्पर्धेत सहमागी झाली, ज्यांनी या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष भाग घेतला, त्या सर्वांनी विकसित भारत निर्माण करण्याचे लक्ष्य साध्य करणाची  जबाबदारी , जणू मालकी  स्वीकारली आहे. युवकांनी घेतलेली ही लक्ष्याची मालकी आहे. याची एक झलक आज प्रकाशित केलेल्या निबंध पुस्तिकेमध्ये दिसून येते. तसेच त्याची झलक आज दाखवण्यात आलेल्या दहा सादरीकरणामध्येही दिसून आली. ही सर्वच सादरीकरणे अद्भूत म्हणावीत अशी होती. ती पाहून मला तुमच्याविषयी अभिमान वाटला. माझ्या देशातील युवावर्ग किती वेगवान विचार करतो, याचे दर्शन या सादरीकरणांतून झाले. देशापुढे असलेल्या समस्या, देशापुढील आव्हाने याविषयी आजचा युवक किती व्यापक विचार करतो, त्यांच्या विचाराचा परीघ किती विस्तृत आहे, हेही त्यावरून दिसून आले. तुम्ही सांगितलेल्या उत्तरांमध्ये, दिलेल्या पर्यायांमध्ये  जमिनी स्तराचा विचार केला आहे. तुम्ही घेतलेल्या अनुभवांचे दर्शन त्यातून होते. तुमच्या प्रत्येक विचाराला, बोलण्याला   अस्सलपणाचा एक गंध जाणवतो. भारतातला युवक बंद ए.सी. कक्षात बसून विचार करीत नाही. भारतातील युवकांची विचार क्षमता गगनासारखी उंच आहे.

 

|

काल रात्री मी, तुम्ही पाठवलेल्या दृष्यफिती पहात होतो. तसेच तुमच्यासोबत आलेल्या  वेगवेगळ्या तज्ज्ञांबरोबर चर्चाही करीत होतो.त्यांचे तुमच्याबद्दलचे मत जाणून घेत होतो. मंत्र्यांबरोबर केलेल्या चर्चेमध्ये,तसेच धोरण निश्चिती प्रक्रियेतील संबंधितांबरोबर केलेल्या चर्चेमध्ये विकसित मारताविषयी तुमचा दृष्टिकोन,तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती,मला जाणवत होती.युवा नेतृत्व संवाद कार्यक्रमाच्या  प्रक्रियेतून आणि संपूर्ण  मंथनातून ज्या शिफारशी पुढे येतील, भारतातील युवकांच्या कल्पना आता देशाच्या धोरणांचा हिस्सा बनतील. विकसित भारताला प्रवासाला दिशा देतील. यासाठी मी देशातील युवावर्गाचे खूप खूप अभिनंदन करतो.

मित्रांनो,

लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात मी,एक लाख नवीन युवकांना राजकारणात आणण्याविषयी बोललो होतो.आपल्या शिफारसी प्रत्यक्षात याव्यात,यासाठी राजकारण हे खूप सशक्त , उत्तम  माध्यम असू शकते. मला विश्वास आहे की, आपल्यापैकी अनेक नवयुवक सक्रिय  राजकारणामध्ये कार्यरत होण्यासाठी पुढे येतील.

मित्रांनो,

आज तुमच्याबरोबर संवाद साधताना,विकसित भारताची एक भव्य दृश्य माझ्या नजरेसमोर येत आहे.विकसित भारतामध्ये आपल्याला काय दिसायला हवे, भारत कसा पाहू इच्छितो. विकसित भारत म्हणजे जो आर्थिक, सामरिक, सामाजिक   आणि सांस्कृतिक रूपाने सशक्त असेल.या भारताची अर्थव्यवस्थाही मजबूत असेल आणि पर्यावरणही समृद्ध असेल चांगले शिक्षण,चांगल्या उत्पन्नासाठी रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी असतील. जिथे जगातील सर्वाधिक कशुल युवा मनुष्पबळ असेल. जिथे युवकांना आपली स्वप्ने करण्यासाठी मुक्त आकाश असेल.

परंतु मित्रांनो,

आपण असे फक्त बोलण्यामुळे भारत विकसित होईल का? याविषयी काय वाटते? घरी जावून "विकसित भारत विकसित भारत, विकसित भारत" असा जप करायला प्रारंभ करणार का? आपल्या प्रत्येक निर्णयाची एकच कसोटी असली पाहिजे - ती म्हणजे, विकसित भारत!! ज्यावेळी आपली प्रत्येक पावले, एकाच दिशेने पडतील, ती दिशा असेल - विकसित भारताची असेल ना? आपल्या नीती धोरणामागची भावना विकसित भारत हीच असेल का? अशीच केवळ विकसित भारताची भावना, धोरणे असतील त्यावेळी जगातील कोणतीही शक्ती आपल्याला विकसित भारत होण्यापासून रोखू शकणार नाही. प्रत्येक देशाच्या इतिहासामध्ये एक काळ असा येतो की,  त्यावेळी तो देश सर्व  क्षेत्रामध्ये अगदी गरूड झेप घेत असतो.भारतासाठी ही संधी आत्ता मिळाली आहे.

 

|

आणि मी खूप आधी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणामध्ये माझ्या मनातला आवाज बोलून दाखवला होता. आणि मी म्हणालो हातो की, ‘हीच योग्य वेळ आहे. हीच वेळ आहे.’आज जगामधील अनेक मोठ्या    देशांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या वेगाने वाढत आहे. आणि आगामी अनेक दशकांपर्यंत भारत, जगातला सर्वात जास्त युवकांची संख्या असलेला देश असणार आहे. मोठमोठ्या संस्था असे  म्हणताहेत की, भारताच्या जीडीपीमधील वृद्धी ही इथली युवाशक्ती सुनिश्चित करेल. या युवाशक्तीवर देशाच्या महान संत-महंतांनी, तत्वज्ञानी मंडळींनी   खूप मोठा विश्वास दाखवला आहे. महर्षी अरविंदो यांनी म्हटले होते की -भविष्याचे सामर्थ्य , आज नवयुवकांच्या हातामध्ये आहे. गुरूदेव टागोर यांनी म्हटले होते की,युवावर्गाने जरूर स्वप्ने पहावीत आणि त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करावे. होमी जहांगीर भाभा म्हणत होते, ‘‘ युवकांनी नवनवीन प्रयोग केले पाहिजेत.  कारण युवकांच्या हातूनच नवोन्मेषी कल्पना प्रत्यक्षात येणार आहेत. आज आपण पहावे, जगातल्या कितीतरी मोठ-मोठ्या कंपन्यांचे कामकाज भारतीय युवक चालवत आहेत. भारतीय युवकाच्या सामर्थ्यावर संपूर्ण जगाचा विश्वास आहे. आपल्या समोर 25 वर्षांचा सुवर्ण काळ आहे. अमृतकाळ आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, भारताची युवाशक्ती विकसित भारताचे स्वप्न जरूर पूर्ण करेल. फक्त 10 वर्षांमध्ये तुम्ही युवामंडळींनी भारताला स्टार्टअप च्या विश्वात भारताला पहिल्या तीन राष्ट्रामध्ये आणले आहे. गेल्या 10 वर्षत तुम्हा युवकांनी भारताला उत्पादनाच्या क्षेत्रामये खूप पुढे नेले आहे. फक्त 10 वर्षामध्ये तुम्ही युवकांनी भारताला क्रीडा क्षेत्रामध्ये कुठल्या कुठे पोहोचवले आहे. माझ्या भारताचा युवक , ज्यावेळी प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतो, त्यावेळी विकसित भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणणेही शक्य करून दाखवेल.

मित्रांनो,आमचे सरकारही आजच्या युवकांचे सामर्थ्य वाढविण्यासाठी संपूर्ण शक्तीने कार्यरत आहे. आज भारतामध्ये प्रत्येक सप्ताहाला नवीन विद्यापीठ तयार होत आहे.आज भारतामध्ये प्रत्येक दिवशी एका नवीन आयटीआयची स्थापना होत आहे. आज भारतामध्ये प्रत्येक तिस-या दिवशी एक अटल टिंकरिंग लॅब सुरू केली जात आहे. आज भारतामध्ये प्रत्येक दिवशी दोन नवीन महाविद्यालये सुरू होत आहेत. आज देशामध्ये 23 आयआयटी आहेत.देशामध्ये फक्त दशकापूर्वीचा विचार केला तर देशात ट्रिपल आयआयटीची संख्या 9 वरून 25 झाली आहे. आयआयएमची संख्या 13 वरून वाढून ती आता 21 झाली आहे.

10 वर्षांमध्ये एम्सची संख्या तिपटीने वाढली आहे. तर 10 वर्षांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची संख्या जवळ-जवळ दुप्पट झाली आहे. आज आमच्या शाळा असो,महाविद्यालये असो,अथवा विद्यापीठे असो, गुणात्मक असो अथवा दर्जात्मक स्तरावर अतिशय उत्कृष्ट परिणाम पहायला मिळत आहेत.

 

|

वर्ष 2014 पर्यंत भारताने नऊ- फक्त 9 उच्च शिक्षण संस्थांना ‘क्यूएस‘ श्रेणी मिळाली होती. आज हा आकडा 46 झाला आहे. भारतातील शैक्षणिक संस्थांचे वाढते सामर्थ्य , हे विकसित भारताचा खूप मोठा- महत्वाचा आधार आहे.

मित्रांनो,

काही लोकांना वाटू शकते की 2047 तर आता खूपपच दूर आहे, यासाठी आताच काय काम करायचे, पण आपल्याला या विचारातून बाहेर पडायचे आहे, विकसित भारताच्या या प्रवासात आपल्या दररोज नवीन लक्ष्ये निर्धारित करायची आहेत, ती साध्य करायची आहेत. तो दिवस आता दूर नाही ज्यावेळी भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य साध्य करेल. गेल्या 10 वर्षात देशातील 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले. ज्या वेगाने आपण चालत आहोत, त्यामुळे तो दिवस देखील आता दूर नाही, ज्यावेळी संपूर्ण भारत गरिबीतून मुक्त होईल. या दशकाच्या अखेरपर्यंत भारताने 500 गिगावॉट नवीकरणी ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. आपली रेल्वे नेट झिरो कार्बन एमिटर प्राप्त करण्याच्या दिशेने 2030 पर्यंत साध्य करायचे आहे.

मित्रांनो,

आपल्या समोर एक खूप मोठे लक्ष्य आगामी दशकात ऑलिंपिकच्या आयोजनाचे देखील आहे. यासाठी देश देखील संपूर्ण समर्पिततेने यामध्ये गुंतलेला आहे. अंतराळ शक्तीच्या रुपात देखील भारत वेगाने आपली पावले पुढे टाकत आहेत. आपल्याला 2035 पर्यंत अंतराळात आपले स्थानक स्थापित करायचे आहे.  जगाने चांद्रयानाचे यश पाहिलेले आहे. आता गगनयान मोहिमेची तयारी जोरात सुरू आहे. पण आपल्याला त्यापुढे जाऊन विचार करायचा आहे, आपल्याला आपल्या चांद्रयानात प्रवास करून चंद्रावर एखाद्या भारतीयाला उतरवायचे आहे. अशा अनेक लक्ष्यांना साध्य करतच आपल्याला 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करता येईल.  

मित्रांनो,

ज्यावेळी आपण वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या आकडेवारीविषयी बोलतो, तेव्हा काही लोक असा विचार करतात, आपल्या आयुष्यावर याचा कोणता परिणाम होणार आहे? वस्तुस्थिती ही आहे की ज्यावेळी अर्थव्यवस्थेत वाढ होते, त्यावेळी जीवनाच्या प्रत्येक स्तरावर त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो. या शतकाच्या पहिल्या दशकात भारत एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनला. मी 21 व्या शतकातील पहिल्या कालखंडाविषयी बोलत आहे. त्यावेळी अर्थव्यवस्थेचे आकारमान लहान होते. त्यामुळे त्यावेळी भारताच्या शेतीसाठी अर्थसंकल्पीय तरतूद काही हजार कोटी रुपये होती. भारताच्या पायाभूत सुविधांची तरतूद देखील एक लाख कोटी रुपयांपेक्षा कमी होती. आणि त्यावेळी  देशाची स्थिती काय होती? त्यावेळी बहुतेक गावे रस्त्यांपासून वंचित होती, विजेपासून वंचित होती, राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेची स्थिती अतिशय वाईट होती. वीज-पाणी यांसारख्या पायाभूत सुविधांपासून भारताचा खूप मोठा भाग वंचित होता.

 

|

मित्रांनो,

यानंतर काही काळात भारत दोन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनला. तेव्हा भारताच्या पायाभूत सुविधांची अर्थसंकल्पीय तरतूद 2 लाख कोटी रुपयांपेक्षा देखील कमी होती. मात्र, रस्ते, रेल्वे, विमान, कालवे, गरिबांची घरे, शाळा, रुग्णालये, हे सर्व पूर्वीच्या तुलनेत जास्त होऊ लागले. त्यानंतर मग भारत वेगाने तीन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनला. याचा परिणाम हा झाला की विमानतळांची संख्या दुप्पट झाली. देशात वंदे भारत सारख्या आधुनिक ट्रेन धावू लागल्या, बुलेट ट्रेन चे स्वप्न प्रत्यक्षात येऊ लागले. भारताने जगात सर्वात  वेगाने 5जी तंत्रज्ञान सुरू केले. देशातील हजारो ग्रामपंचायतीपर्यंत ब्रॉडबँड इंटरनेट पोहोचू लागले. तीन लाखांपेक्षा जास्त गावांपर्यंत रस्ते पोहोचले, युवकांना 23 लाख कोटी रुपयांची तारण विरहित मुद्रा कर्जे दिली. मोफत उपचार देणारी जगातील सर्वात मोठी योजना ‘आयुष्मान भारत’ सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर वर्षी हजारो कोटी रुपये थेट जमा करण्याची योजना सुरू केली. गरिबांसाठी 4 कोटी पक्की घरे बनवण्यात आली. म्हणजेच अर्थव्यवस्था जितकी मोठी होत गेली, तितकीच जास्त विकास कार्यांनी गती प्राप्त केली, तितक्याच जास्त संधी तयार होऊ लागल्या. प्रत्येक क्षेत्रात, समाजाचा प्रत्येक वर्ग, त्यासाठी खर्च करण्याची क्षमता तितकीच वाढली. 

मित्रांनो,

आज भारत जवळपास 4 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आहे. यामुळे भारताचे सामर्थ्य देखील कैक पटीने वाढले आहे. 2014 मध्ये जितकी पायाभूत सुविधांसाठी संपूर्ण तरतूद होती, जितक्या पैशात रेल्वे-रस्ते-विमानतळ हे सर्व बनवले जात असायचे, आज त्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे भारत केवळ रेल्वेवर खर्च करत आहे. आज भारताच्या पायाभूत सुविधांची अर्थसंकल्पीय तरतूद 10 वर्षांपूर्वीच्या तुलनेत 6 पटीने जास्त आहे, 11 लाख कोटींपेक्षा जास्त  आहे. आणि याचा परिणाम आज तुम्ही भारताचे बदलते परिदृश्य पाहात आहात. हा भारत मंडपम् देखील याचे अतिशय सुंदर उदाहरण आहे.तुमच्यापैकी काही लोक पूर्वी जर या प्रगती मैदानावर आले होते असतील, तर तेव्हा मध्येच जत्रा भरायच्या आणि देशभरातील लोक येथे येत असायचे, तंबू बांधून काम चालायचे. आज हे सर्व शक्य झाले आहे. 

मित्रांनो,

आता आपण येथून अतिशय जलद गतीने 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या टप्प्याच्या दिशेने आगेकूच करत आहोत. जेव्हा आपण 5 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचू, तेव्हा विकासाचे प्रमाण किती मोठे असेल, सुविधांचा विस्तार किती जास्त असेल. भारत आता एवढ्यावरच थांबणार नाही. आगामी दशक संपेपर्यंत भारत 10 ट्रिलियन डॉलरचा टप्पा देखील ओलांडेल. तुम्ही कल्पना करा, यामुळे वाढत जाणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे, जेव्हा तुमची करियर पुढे जाईल, तेव्हा तुमच्यासाठी किती जास्त संधी होतील. तुम्ही जरा कल्पना करा, 2047 मध्ये तुमचे वय किती असेल, तुमच्या कुटुंबातील कोणत्या व्यवस्थांची तुम्हाला चिंता असेल. तुम्ही कल्पना करा, 2047 मध्ये जेव्हा तुम्ही 40-50 च्या आसपास असाल, जीवनाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर असाल आणि देश विकसित झालेल्या असेल तर त्याचा सर्वात जास्त फायदा कोणाला मिळेल ? कोणाला मिळेल?

आज जो तरुण आहे त्यांनाच सर्वाधिक फायदा मिळणार आहे. आणि म्हणूनच आज मी संपूर्ण विश्वासाने सांगत आहे, तुमची पिढी केळ देशाच्या इतिहासातीलच सर्वात मोठे परिवर्तन घडवणार नाही आहे तर त्या परिवर्तनाची सर्वात मोठी लाभार्थी देखील असेल. आपल्याला या प्रवासात केवळ एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपल्याला निवांत अवस्थेत राहण्याच्या सवयीपासून सावध रहायचे आहे. ही स्थिती अतिशय धोकादायक असते. पुढे जाण्यासाठी आपल्या निवांतपणाच्या स्थितीतून बाहेर येऊन जोखीम उचलणे देखील गरजेचे आहे. या यंग लीडर्स डायलॉगमध्येही युवा आपल्या निवांत स्थितीतून बाहेर पडले तेव्हाच इथपर्यंत पोहोचले. हाच जीवनमंत्र तुम्हाला यशाच्या नव्या उंचीवर नेईल.

मित्रांनो,

भारताच्या भविष्याचा आऱाखडा तयार करण्यात, आजचे हे आयोजन, विकसित भारत, यंग लीडर्स डायलॉग खूप मोठी भूमिका बजावेल. जी ऊर्जा, जो उत्साह, ज्या समर्पिततेने तुम्ही या संकल्पाचा अंगिकार केला आहे, ते खरोखरच अद्भुत आहे. विकसित भारतासाठी तुमचे विचार, निश्चितच बहुमूल्य आहेत, उत्तम आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत. आता तुम्हाला या विचारांना देशाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत घेऊन जायचे आहे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात-गल्लीबोळात, विकसित भारताच्या या विचारांसोबत इतर तरुणांना देखील जोडायचे आहे, या भावनेने जायचे आहे. आपल्याला 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचेच आहे, या संकल्पासोबत आपल्याला जगायचे आहे, स्वतःला झोकून द्यायचे आहे.

मित्रांनो,

पुन्हा एकदा भारताच्या सर्व युवांना मी राष्ट्रीय युवा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या संकल्पाला सिद्धीमध्ये बदलण्यासाठी, तुम्हा सर्वांच्या अविरत पुरुषार्थासाठी, सिद्धी प्राप्त करेपर्यंत  स्वस्थ बसणार नाही, ही मह्त्त्वाची शपथ घेऊन तुम्ही प्रगती करा, माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. माझ्या सोबत बोला..

भारत माता की जय.

भारत माता की जय.

भारत माता की जय.

वंदे मातरम,वंदे मातरम.

वंदे मातरम,वंदे मातरम.

वंदे मातरम,वंदे मातरम.

वंदे मातरम,वंदे मातरम.

वंदे मातरम,वंदे मातरम.

खूप खूप आभार.

 

  • Jitendra Kumar March 28, 2025

    🙏🇮🇳
  • Preetam Gupta Raja March 26, 2025

    जय श्री राम
  • Prasanth reddi March 21, 2025

    జై బీజేపీ జై మోడీజీ 🪷🪷🙏
  • கார்த்திக் March 17, 2025

    Jai Shree Ram🙏🏾Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🚩
  • krishangopal sharma Bjp March 06, 2025

    मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹🙏🌹🙏🌷🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
  • krishangopal sharma Bjp March 06, 2025

    मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹🙏🌹🙏🌷🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
  • krishangopal sharma Bjp March 06, 2025

    मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹🙏🌹🙏🌷🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
  • krishangopal sharma Bjp March 06, 2025

    मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹🙏🌹🙏🌷🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
  • krishangopal sharma Bjp March 06, 2025

    मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹🙏🌹🙏🌷🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
  • अमित प्रेमजी | Amit Premji March 03, 2025

    nice👍
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

Media Coverage

"Huge opportunity": Japan delegation meets PM Modi, expressing their eagerness to invest in India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Today, India is not just a Nation of Dreams but also a Nation That Delivers: PM Modi in TV9 Summit
March 28, 2025
QuoteToday, the world's eyes are on India: PM
QuoteIndia's youth is rapidly becoming skilled and driving innovation forward: PM
Quote"India First" has become the mantra of India's foreign policy: PM
QuoteToday, India is not just participating in the world order but also contributing to shaping and securing the future: PM
QuoteIndia has given Priority to humanity over monopoly: PM
QuoteToday, India is not just a Nation of Dreams but also a Nation That Delivers: PM

श्रीमान रामेश्वर गारु जी, रामू जी, बरुन दास जी, TV9 की पूरी टीम, मैं आपके नेटवर्क के सभी दर्शकों का, यहां उपस्थित सभी महानुभावों का अभिनंदन करता हूं, इस समिट के लिए बधाई देता हूं।

TV9 नेटवर्क का विशाल रीजनल ऑडियंस है। और अब तो TV9 का एक ग्लोबल ऑडियंस भी तैयार हो रहा है। इस समिट में अनेक देशों से इंडियन डायस्पोरा के लोग विशेष तौर पर लाइव जुड़े हुए हैं। कई देशों के लोगों को मैं यहां से देख भी रहा हूं, वे लोग वहां से वेव कर रहे हैं, हो सकता है, मैं सभी को शुभकामनाएं देता हूं। मैं यहां नीचे स्क्रीन पर हिंदुस्तान के अनेक शहरों में बैठे हुए सब दर्शकों को भी उतने ही उत्साह, उमंग से देख रहा हूं, मेरी तरफ से उनका भी स्वागत है।

साथियों,

आज विश्व की दृष्टि भारत पर है, हमारे देश पर है। दुनिया में आप किसी भी देश में जाएं, वहां के लोग भारत को लेकर एक नई जिज्ञासा से भरे हुए हैं। आखिर ऐसा क्या हुआ कि जो देश 70 साल में ग्यारहवें नंबर की इकोनॉमी बना, वो महज 7-8 साल में पांचवे नंबर की इकोनॉमी बन गया? अभी IMF के नए आंकड़े सामने आए हैं। वो आंकड़े कहते हैं कि भारत, दुनिया की एकमात्र मेजर इकोनॉमी है, जिसने 10 वर्षों में अपने GDP को डबल किया है। बीते दशक में भारत ने दो लाख करोड़ डॉलर, अपनी इकोनॉमी में जोड़े हैं। GDP का डबल होना सिर्फ आंकड़ों का बदलना मात्र नहीं है। इसका impact देखिए, 25 करोड़ लोग गरीबी से बाहर निकले हैं, और ये 25 करोड़ लोग एक नियो मिडिल क्लास का हिस्सा बने हैं। ये नियो मिडिल क्लास, एक प्रकार से नई ज़िंदगी शुरु कर रहा है। ये नए सपनों के साथ आगे बढ़ रहा है, हमारी इकोनॉमी में कंट्रीब्यूट कर रहा है, और उसको वाइब्रेंट बना रहा है। आज दुनिया की सबसे बड़ी युवा आबादी हमारे भारत में है। ये युवा, तेज़ी से स्किल्ड हो रहा है, इनोवेशन को गति दे रहा है। और इन सबके बीच, भारत की फॉरेन पॉलिसी का मंत्र बन गया है- India First, एक जमाने में भारत की पॉलिसी थी, सबसे समान रूप से दूरी बनाकर चलो, Equi-Distance की पॉलिसी, आज के भारत की पॉलिसी है, सबके समान रूप से करीब होकर चलो, Equi-Closeness की पॉलिसी। दुनिया के देश भारत की ओपिनियन को, भारत के इनोवेशन को, भारत के एफर्ट्स को, जैसा महत्व आज दे रहे हैं, वैसा पहले कभी नहीं हुआ। आज दुनिया की नजर भारत पर है, आज दुनिया जानना चाहती है, What India Thinks Today.

|

साथियों,

भारत आज, वर्ल्ड ऑर्डर में सिर्फ पार्टिसिपेट ही नहीं कर रहा, बल्कि फ्यूचर को शेप और सेक्योर करने में योगदान दे रहा है। दुनिया ने ये कोरोना काल में अच्छे से अनुभव किया है। दुनिया को लगता था कि हर भारतीय तक वैक्सीन पहुंचने में ही, कई-कई साल लग जाएंगे। लेकिन भारत ने हर आशंका को गलत साबित किया। हमने अपनी वैक्सीन बनाई, हमने अपने नागरिकों का तेज़ी से वैक्सीनेशन कराया, और दुनिया के 150 से अधिक देशों तक दवाएं और वैक्सीन्स भी पहुंचाईं। आज दुनिया, और जब दुनिया संकट में थी, तब भारत की ये भावना दुनिया के कोने-कोने तक पहुंची कि हमारे संस्कार क्या हैं, हमारा तौर-तरीका क्या है।

साथियों,

अतीत में दुनिया ने देखा है कि दूसरे विश्व युद्ध के बाद जब भी कोई वैश्विक संगठन बना, उसमें कुछ देशों की ही मोनोपोली रही। भारत ने मोनोपोली नहीं बल्कि मानवता को सर्वोपरि रखा। भारत ने, 21वीं सदी के ग्लोबल इंस्टीट्यूशन्स के गठन का रास्ता बनाया, और हमने ये ध्यान रखा कि सबकी भागीदारी हो, सबका योगदान हो। जैसे प्राकृतिक आपदाओं की चुनौती है। देश कोई भी हो, इन आपदाओं से इंफ्रास्ट्रक्चर को भारी नुकसान होता है। आज ही म्यांमार में जो भूकंप आया है, आप टीवी पर देखें तो बहुत बड़ी-बड़ी इमारतें ध्वस्त हो रही हैं, ब्रिज टूट रहे हैं। और इसलिए भारत ने Coalition for Disaster Resilient Infrastructure - CDRI नाम से एक वैश्विक नया संगठन बनाने की पहल की। ये सिर्फ एक संगठन नहीं, बल्कि दुनिया को प्राकृतिक आपदाओं के लिए तैयार करने का संकल्प है। भारत का प्रयास है, प्राकृतिक आपदा से, पुल, सड़कें, बिल्डिंग्स, पावर ग्रिड, ऐसा हर इंफ्रास्ट्रक्चर सुरक्षित रहे, सुरक्षित निर्माण हो।

साथियों,

भविष्य की चुनौतियों से निपटने के लिए हर देश का मिलकर काम करना बहुत जरूरी है। ऐसी ही एक चुनौती है, हमारे एनर्जी रिसोर्सेस की। इसलिए पूरी दुनिया की चिंता करते हुए भारत ने International Solar Alliance (ISA) का समाधान दिया है। ताकि छोटे से छोटा देश भी सस्टेनबल एनर्जी का लाभ उठा सके। इससे क्लाइमेट पर तो पॉजिटिव असर होगा ही, ये ग्लोबल साउथ के देशों की एनर्जी नीड्स को भी सिक्योर करेगा। और आप सबको ये जानकर गर्व होगा कि भारत के इस प्रयास के साथ, आज दुनिया के सौ से अधिक देश जुड़ चुके हैं।

साथियों,

बीते कुछ समय से दुनिया, ग्लोबल ट्रेड में असंतुलन और लॉजिस्टिक्स से जुड़ी challenges का सामना कर रही है। इन चुनौतियों से निपटने के लिए भी भारत ने दुनिया के साथ मिलकर नए प्रयास शुरु किए हैं। India–Middle East–Europe Economic Corridor (IMEC), ऐसा ही एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट है। ये प्रोजेक्ट, कॉमर्स और कनेक्टिविटी के माध्यम से एशिया, यूरोप और मिडिल ईस्ट को जोड़ेगा। इससे आर्थिक संभावनाएं तो बढ़ेंगी ही, दुनिया को अल्टरनेटिव ट्रेड रूट्स भी मिलेंगे। इससे ग्लोबल सप्लाई चेन भी और मजबूत होगी।

|

साथियों,

ग्लोबल सिस्टम्स को, अधिक पार्टिसिपेटिव, अधिक डेमोक्रेटिक बनाने के लिए भी भारत ने अनेक कदम उठाए हैं। और यहीं, यहीं पर ही भारत मंडपम में जी-20 समिट हुई थी। उसमें अफ्रीकन यूनियन को जी-20 का परमानेंट मेंबर बनाया गया है। ये बहुत बड़ा ऐतिहासिक कदम था। इसकी मांग लंबे समय से हो रही थी, जो भारत की प्रेसीडेंसी में पूरी हुई। आज ग्लोबल डिसीजन मेकिंग इंस्टीट्यूशन्स में भारत, ग्लोबल साउथ के देशों की आवाज़ बन रहा है। International Yoga Day, WHO का ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन, आर्टिफिशियल इंटेलीजेंस के लिए ग्लोबल फ्रेमवर्क, ऐसे कितने ही क्षेत्रों में भारत के प्रयासों ने नए वर्ल्ड ऑर्डर में अपनी मजबूत उपस्थिति दर्ज कराई है, और ये तो अभी शुरूआत है, ग्लोबल प्लेटफॉर्म पर भारत का सामर्थ्य नई ऊंचाई की तरफ बढ़ रहा है।

साथियों,

21वीं सदी के 25 साल बीत चुके हैं। इन 25 सालों में 11 साल हमारी सरकार ने देश की सेवा की है। और जब हम What India Thinks Today उससे जुड़ा सवाल उठाते हैं, तो हमें ये भी देखना होगा कि Past में क्या सवाल थे, क्या जवाब थे। इससे TV9 के विशाल दर्शक समूह को भी अंदाजा होगा कि कैसे हम, निर्भरता से आत्मनिर्भरता तक, Aspirations से Achievement तक, Desperation से Development तक पहुंचे हैं। आप याद करिए, एक दशक पहले, गांव में जब टॉयलेट का सवाल आता था, तो माताओं-बहनों के पास रात ढलने के बाद और भोर होने से पहले का ही जवाब होता था। आज उसी सवाल का जवाब स्वच्छ भारत मिशन से मिलता है। 2013 में जब कोई इलाज की बात करता था, तो महंगे इलाज की चर्चा होती थी। आज उसी सवाल का समाधान आयुष्मान भारत में नजर आता है। 2013 में किसी गरीब की रसोई की बात होती थी, तो धुएं की तस्वीर सामने आती थी। आज उसी समस्या का समाधान उज्ज्वला योजना में दिखता है। 2013 में महिलाओं से बैंक खाते के बारे में पूछा जाता था, तो वो चुप्पी साध लेती थीं। आज जनधन योजना के कारण, 30 करोड़ से ज्यादा बहनों का अपना बैंक अकाउंट है। 2013 में पीने के पानी के लिए कुएं और तालाबों तक जाने की मजबूरी थी। आज उसी मजबूरी का हल हर घर नल से जल योजना में मिल रहा है। यानि सिर्फ दशक नहीं बदला, बल्कि लोगों की ज़िंदगी बदली है। और दुनिया भी इस बात को नोट कर रही है, भारत के डेवलपमेंट मॉडल को स्वीकार रही है। आज भारत सिर्फ Nation of Dreams नहीं, बल्कि Nation That Delivers भी है।

साथियों,

जब कोई देश, अपने नागरिकों की सुविधा और समय को महत्व देता है, तब उस देश का समय भी बदलता है। यही आज हम भारत में अनुभव कर रहे हैं। मैं आपको एक उदाहरण देता हूं। पहले पासपोर्ट बनवाना कितना बड़ा काम था, ये आप जानते हैं। लंबी वेटिंग, बहुत सारे कॉम्प्लेक्स डॉक्यूमेंटेशन का प्रोसेस, अक्सर राज्यों की राजधानी में ही पासपोर्ट केंद्र होते थे, छोटे शहरों के लोगों को पासपोर्ट बनवाना होता था, तो वो एक-दो दिन कहीं ठहरने का इंतजाम करके चलते थे, अब वो हालात पूरी तरह बदल गया है, एक आंकड़े पर आप ध्यान दीजिए, पहले देश में सिर्फ 77 पासपोर्ट सेवा केंद्र थे, आज इनकी संख्या 550 से ज्यादा हो गई है। पहले पासपोर्ट बनवाने में, और मैं 2013 के पहले की बात कर रहा हूं, मैं पिछले शताब्दी की बात नहीं कर रहा हूं, पासपोर्ट बनवाने में जो वेटिंग टाइम 50 दिन तक होता था, वो अब 5-6 दिन तक सिमट गया है।

साथियों,

ऐसा ही ट्रांसफॉर्मेशन हमने बैंकिंग इंफ्रास्ट्रक्चर में भी देखा है। हमारे देश में 50-60 साल पहले बैंकों का नेशनलाइजेशन किया गया, ये कहकर कि इससे लोगों को बैंकिंग सुविधा सुलभ होगी। इस दावे की सच्चाई हम जानते हैं। हालत ये थी कि लाखों गांवों में बैंकिंग की कोई सुविधा ही नहीं थी। हमने इस स्थिति को भी बदला है। ऑनलाइन बैंकिंग तो हर घर में पहुंचाई है, आज देश के हर 5 किलोमीटर के दायरे में कोई न कोई बैंकिंग टच प्वाइंट जरूर है। और हमने सिर्फ बैंकिंग इंफ्रास्ट्रक्चर का ही दायरा नहीं बढ़ाया, बल्कि बैंकिंग सिस्टम को भी मजबूत किया। आज बैंकों का NPA बहुत कम हो गया है। आज बैंकों का प्रॉफिट, एक लाख 40 हज़ार करोड़ रुपए के नए रिकॉर्ड को पार कर चुका है। और इतना ही नहीं, जिन लोगों ने जनता को लूटा है, उनको भी अब लूटा हुआ धन लौटाना पड़ रहा है। जिस ED को दिन-रात गालियां दी जा रही है, ED ने 22 हज़ार करोड़ रुपए से अधिक वसूले हैं। ये पैसा, कानूनी तरीके से उन पीड़ितों तक वापिस पहुंचाया जा रहा है, जिनसे ये पैसा लूटा गया था।

साथियों,

Efficiency से गवर्नमेंट Effective होती है। कम समय में ज्यादा काम हो, कम रिसोर्सेज़ में अधिक काम हो, फिजूलखर्ची ना हो, रेड टेप के बजाय रेड कार्पेट पर बल हो, जब कोई सरकार ये करती है, तो समझिए कि वो देश के संसाधनों को रिस्पेक्ट दे रही है। और पिछले 11 साल से ये हमारी सरकार की बड़ी प्राथमिकता रहा है। मैं कुछ उदाहरणों के साथ अपनी बात बताऊंगा।

|

साथियों,

अतीत में हमने देखा है कि सरकारें कैसे ज्यादा से ज्यादा लोगों को मिनिस्ट्रीज में accommodate करने की कोशिश करती थीं। लेकिन हमारी सरकार ने अपने पहले कार्यकाल में ही कई मंत्रालयों का विलय कर दिया। आप सोचिए, Urban Development अलग मंत्रालय था और Housing and Urban Poverty Alleviation अलग मंत्रालय था, हमने दोनों को मर्ज करके Housing and Urban Affairs मंत्रालय बना दिया। इसी तरह, मिनिस्ट्री ऑफ ओवरसीज़ अफेयर्स अलग था, विदेश मंत्रालय अलग था, हमने इन दोनों को भी एक साथ जोड़ दिया, पहले जल संसाधन, नदी विकास मंत्रालय अलग था, और पेयजल मंत्रालय अलग था, हमने इन्हें भी जोड़कर जलशक्ति मंत्रालय बना दिया। हमने राजनीतिक मजबूरी के बजाय, देश की priorities और देश के resources को आगे रखा।

साथियों,

हमारी सरकार ने रूल्स और रेगुलेशन्स को भी कम किया, उन्हें आसान बनाया। करीब 1500 ऐसे कानून थे, जो समय के साथ अपना महत्व खो चुके थे। उनको हमारी सरकार ने खत्म किया। करीब 40 हज़ार, compliances को हटाया गया। ऐसे कदमों से दो फायदे हुए, एक तो जनता को harassment से मुक्ति मिली, और दूसरा, सरकारी मशीनरी की एनर्जी भी बची। एक और Example GST का है। 30 से ज्यादा टैक्सेज़ को मिलाकर एक टैक्स बना दिया गया है। इसको process के, documentation के हिसाब से देखें तो कितनी बड़ी बचत हुई है।

साथियों,

सरकारी खरीद में पहले कितनी फिजूलखर्ची होती थी, कितना करप्शन होता था, ये मीडिया के आप लोग आए दिन रिपोर्ट करते थे। हमने, GeM यानि गवर्नमेंट ई-मार्केटप्लेस प्लेटफॉर्म बनाया। अब सरकारी डिपार्टमेंट, इस प्लेटफॉर्म पर अपनी जरूरतें बताते हैं, इसी पर वेंडर बोली लगाते हैं और फिर ऑर्डर दिया जाता है। इसके कारण, भ्रष्टाचार की गुंजाइश कम हुई है, और सरकार को एक लाख करोड़ रुपए से अधिक की बचत भी हुई है। डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर- DBT की जो व्यवस्था भारत ने बनाई है, उसकी तो दुनिया में चर्चा है। DBT की वजह से टैक्स पेयर्स के 3 लाख करोड़ रुपए से ज्यादा, गलत हाथों में जाने से बचे हैं। 10 करोड़ से ज्यादा फर्ज़ी लाभार्थी, जिनका जन्म भी नहीं हुआ था, जो सरकारी योजनाओं का फायदा ले रहे थे, ऐसे फर्जी नामों को भी हमने कागजों से हटाया है।

साथियों,

 

हमारी सरकार टैक्स की पाई-पाई का ईमानदारी से उपयोग करती है, और टैक्सपेयर का भी सम्मान करती है, सरकार ने टैक्स सिस्टम को टैक्सपेयर फ्रेंडली बनाया है। आज ITR फाइलिंग का प्रोसेस पहले से कहीं ज्यादा सरल और तेज़ है। पहले सीए की मदद के बिना, ITR फाइल करना मुश्किल होता था। आज आप कुछ ही समय के भीतर खुद ही ऑनलाइन ITR फाइल कर पा रहे हैं। और रिटर्न फाइल करने के कुछ ही दिनों में रिफंड आपके अकाउंट में भी आ जाता है। फेसलेस असेसमेंट स्कीम भी टैक्सपेयर्स को परेशानियों से बचा रही है। गवर्नेंस में efficiency से जुड़े ऐसे अनेक रिफॉर्म्स ने दुनिया को एक नया गवर्नेंस मॉडल दिया है।

साथियों,

पिछले 10-11 साल में भारत हर सेक्टर में बदला है, हर क्षेत्र में आगे बढ़ा है। और एक बड़ा बदलाव सोच का आया है। आज़ादी के बाद के अनेक दशकों तक, भारत में ऐसी सोच को बढ़ावा दिया गया, जिसमें सिर्फ विदेशी को ही बेहतर माना गया। दुकान में भी कुछ खरीदने जाओ, तो दुकानदार के पहले बोल यही होते थे – भाई साहब लीजिए ना, ये तो इंपोर्टेड है ! आज स्थिति बदल गई है। आज लोग सामने से पूछते हैं- भाई, मेड इन इंडिया है या नहीं है?

साथियों,

आज हम भारत की मैन्युफैक्चरिंग एक्सीलेंस का एक नया रूप देख रहे हैं। अभी 3-4 दिन पहले ही एक न्यूज आई है कि भारत ने अपनी पहली MRI मशीन बना ली है। अब सोचिए, इतने दशकों तक हमारे यहां स्वदेशी MRI मशीन ही नहीं थी। अब मेड इन इंडिया MRI मशीन होगी तो जांच की कीमत भी बहुत कम हो जाएगी।

|

साथियों,

आत्मनिर्भर भारत और मेक इन इंडिया अभियान ने, देश के मैन्युफैक्चरिंग सेक्टर को एक नई ऊर्जा दी है। पहले दुनिया भारत को ग्लोबल मार्केट कहती थी, आज वही दुनिया, भारत को एक बड़े Manufacturing Hub के रूप में देख रही है। ये सक्सेस कितनी बड़ी है, इसके उदाहरण आपको हर सेक्टर में मिलेंगे। जैसे हमारी मोबाइल फोन इंडस्ट्री है। 2014-15 में हमारा एक्सपोर्ट, वन बिलियन डॉलर तक भी नहीं था। लेकिन एक दशक में, हम ट्वेंटी बिलियन डॉलर के फिगर से भी आगे निकल चुके हैं। आज भारत ग्लोबल टेलिकॉम और नेटवर्किंग इंडस्ट्री का एक पावर सेंटर बनता जा रहा है। Automotive Sector की Success से भी आप अच्छी तरह परिचित हैं। इससे जुड़े Components के एक्सपोर्ट में भी भारत एक नई पहचान बना रहा है। पहले हम बहुत बड़ी मात्रा में मोटर-साइकल पार्ट्स इंपोर्ट करते थे। लेकिन आज भारत में बने पार्ट्स UAE और जर्मनी जैसे अनेक देशों तक पहुंच रहे हैं। सोलर एनर्जी सेक्टर ने भी सफलता के नए आयाम गढ़े हैं। हमारे सोलर सेल्स, सोलर मॉड्यूल का इंपोर्ट कम हो रहा है और एक्सपोर्ट्स 23 गुना तक बढ़ गए हैं। बीते एक दशक में हमारा डिफेंस एक्सपोर्ट भी 21 गुना बढ़ा है। ये सारी अचीवमेंट्स, देश की मैन्युफैक्चरिंग इकोनॉमी की ताकत को दिखाती है। ये दिखाती है कि भारत में कैसे हर सेक्टर में नई जॉब्स भी क्रिएट हो रही हैं।

साथियों,

TV9 की इस समिट में, विस्तार से चर्चा होगी, अनेक विषयों पर मंथन होगा। आज हम जो भी सोचेंगे, जिस भी विजन पर आगे बढ़ेंगे, वो हमारे आने वाले कल को, देश के भविष्य को डिजाइन करेगा। पिछली शताब्दी के इसी दशक में, भारत ने एक नई ऊर्जा के साथ आजादी के लिए नई यात्रा शुरू की थी। और हमने 1947 में आजादी हासिल करके भी दिखाई। अब इस दशक में हम विकसित भारत के लक्ष्य के लिए चल रहे हैं। और हमें 2047 तक विकसित भारत का सपना जरूर पूरा करना है। और जैसा मैंने लाल किले से कहा है, इसमें सबका प्रयास आवश्यक है। इस समिट का आयोजन कर, TV9 ने भी अपनी तरफ से एक positive initiative लिया है। एक बार फिर आप सभी को इस समिट की सफलता के लिए मेरी ढेर सारी शुभकामनाएं हैं।

मैं TV9 को विशेष रूप से बधाई दूंगा, क्योंकि पहले भी मीडिया हाउस समिट करते रहे हैं, लेकिन ज्यादातर एक छोटे से फाइव स्टार होटल के कमरे में, वो समिट होती थी और बोलने वाले भी वही, सुनने वाले भी वही, कमरा भी वही। TV9 ने इस परंपरा को तोड़ा और ये जो मॉडल प्लेस किया है, 2 साल के भीतर-भीतर देख लेना, सभी मीडिया हाउस को यही करना पड़ेगा। यानी TV9 Thinks Today वो बाकियों के लिए रास्ता खोल देगा। मैं इस प्रयास के लिए बहुत-बहुत अभिनंदन करता हूं, आपकी पूरी टीम को, और सबसे बड़ी खुशी की बात है कि आपने इस इवेंट को एक मीडिया हाउस की भलाई के लिए नहीं, देश की भलाई के लिए आपने उसकी रचना की। 50,000 से ज्यादा नौजवानों के साथ एक मिशन मोड में बातचीत करना, उनको जोड़ना, उनको मिशन के साथ जोड़ना और उसमें से जो बच्चे सिलेक्ट होकर के आए, उनकी आगे की ट्रेनिंग की चिंता करना, ये अपने आप में बहुत अद्भुत काम है। मैं आपको बहुत बधाई देता हूं। जिन नौजवानों से मुझे यहां फोटो निकलवाने का मौका मिला है, मुझे भी खुशी हुई कि देश के होनहार लोगों के साथ, मैं अपनी फोटो निकलवा पाया। मैं इसे अपना सौभाग्य मानता हूं दोस्तों कि आपके साथ मेरी फोटो आज निकली है। और मुझे पक्का विश्वास है कि सारी युवा पीढ़ी, जो मुझे दिख रही है, 2047 में जब देश विकसित भारत बनेगा, सबसे ज्यादा बेनिफिशियरी आप लोग हैं, क्योंकि आप उम्र के उस पड़ाव पर होंगे, जब भारत विकसित होगा, आपके लिए मौज ही मौज है। आपको बहुत-बहुत शुभकामनाएं।

धन्यवाद।