Quote1.25 लाखांपेक्षा जास्त पीएम किसान समृद्धी केंद्रांचे केले लोकार्पण
Quoteपीएम-किसान अंतर्गत 17,000 कोटी रुपयांचा 14वा हप्ता केला जारी
Quote1600 कृषी उत्पादन संघटनांच्या ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स(ओएनडीसी) वर ऑनबोर्डिंग प्रक्रियेचा केला प्रारंभ
Quoteसल्फरचा थर असलेल्या युरिया गोल्ड या नव्या खत प्रकाराचे केले उद्घाटन
Quoteनवीन 5 वैद्यकीय महाविद्यालयांचे केले उद्घाटन आणि 7 वैद्यकीय महाविद्यालयांची केली पायाभरणी
Quote“केंद्रातील सरकारला शेतकऱ्यांच्या वेदना आणि गरजा यांची जाण आहे”
Quote“सरकार कधीही शेतकऱ्याला युरियाच्या दरांमुळे चिंताग्रस्त होऊ देणार नाही. जेव्हा शेतकरी युरिया खरेदी करायला जातो, तेव्हा त्याच्या मनात ही मोदींची हमी असल्याचा विश्वास असतो”
Quote“भारत हा विकसित गावांसोबतच विकसित बनू शकतो”
Quote“राजस्थानमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याला आमचे प्राधान्य आहे”
Quote“आपण सर्व राजस्थानचा अभिमान आणि वारसा यांना जगात एक नवी ओळख देऊ”

राजस्थानचे राज्यपाल श्रीमान कलराज मिश्र जी, केंद्रीय मंत्री श्री नरेंद्र सिंहजी तोमर, अन्‍य सर्व मंत्री, संसदेतील माझे सहकारी, आमदार आणि अन्य सर्व मान्यवर, तसेच आज या कार्यक्रमात देशातील लाखो ठिकाणांहून कोट्यवधी शेतकरी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. मी राजस्थानच्या भूमीतून देशातील त्या कोट्यवधी शेतकऱ्यांनाही नमन करतो. राजस्थानातील माझे प्रिय बंधू-भगीनीही आज या महत्वपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत.   

खाटू श्यामजी यांची ही भूमी देशभरातील त्या श्रद्धाळुंना विश्वास देते, एक उमेद देते. माझे सौभाग्य आहे की आज मला शूरवीरांची भूमी शेखावाटी येथून, देशासाठी अनेक विकास प्रकल्प सुरु करण्याची संधी मिळाली आहे. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आज येथून  पीएम किसान सन्मान निधीचे सुमारे 18 हजार कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. थेट त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.

देशात आज सव्वा लाख पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्रांची सुरुवात करण्यात आली आहे. गाव आणि ब्लॉक पातळीवर तयार केलेल्या या पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्रांमुळे कोट्यवधी शेतकऱ्यांना थेट लाभ होईल. आज दीड हजारापेक्षा अधिक FPO करिता, आपल्या शेतकर्‍यांसाठी ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’ अर्थात ONDC चे लोकार्पणही झाले आहे. यामुळे देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील शेतकऱ्याला आपले उत्पादन बाजारापर्यंत पोहचवणे आणखी सुलभ होईल.  

आजच देशातील शेतकऱ्यांकरिता एक नवीन ‘यूरिया गोल्ड’ देखील सुरु करण्यात आले आहे. याशिवाय, राजस्थानातील वेगवेगळ्या शहरांना नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि एकलव्य शाळांची भेट देखील मिळाली आहे. मी देशातील जनतेला, राजस्थानातील जनतेला आणि विशेषतः माझ्या शेतकरी बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप अभिनंदन करतो.

 

|

मित्रांनो,

राजस्थानातील सीकर आणि शेखावाटीचा भाग एकप्रकारे शेतकऱ्यांचा गड आहे. येथील शेतकऱ्यांनी हे नेहमी सिद्ध केले आहे की त्यांच्या परिश्रमापुढे काहीच अवघड नाही. पाण्याची कमतरता असूनही येथील शेतकऱ्यांनी या मातीतून मोठ्या प्रमाणावर पीक घेतले आहे. शेतकऱ्यांचे सामर्थ्य, शेतकऱ्यांचे परिश्रम हे मातीतूनही सोने पिकवून दाखवते. आणि म्हणूनच आमचे सरकार देशातील शेतकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून उभे आहे.

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या इतक्या दशकांनंतर आज देशात असे सरकार आले आहे, जे शेतकऱ्यांचे दुःख-वेदना जाणते, शेतकऱ्यांना असलेली चिंता जाणते. यामुळेच गेल्या नऊ वर्षात केंद्र सरकारने सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. आम्ही शेतकऱ्यांकरिता बियाण्यांपासून ते बाजारापर्यंत, नवी व्यवस्था उभारली आहे. मला आठवतंय, राजस्थानातील सुरतगडमधूनच आम्ही 2015 मध्ये मृदा आरोग्य पत्राची योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून आम्ही देशातील शेतकर्‍यांना कोट्यवधी मृदा आरोग्य पत्र दिले आहेत. या मृदा आरोग्य पत्रांमुळे आज शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्याची माहिती मिळत आहे, त्यानुसार ते खतांचा वापर करत आहेत.

मला आनंद आहे की आज पुन्हा एकदा राजस्थानच्या भूमीतून शेतकऱ्यांसाठी आणखी एका मोठ्या योजनेची सुरूवात होत आहे. आज देशभरात सव्वा लाखाहून अधिक पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्रं राष्ट्राला समर्पित करण्यात आली आहेत. या सर्व केंद्रांमुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त होणार आहे. ही एक प्रकारे शेतकर्‍यांसाठी सर्वकाही एकाच ठिकाणी उपलब्ध होणारी केन्द्रं आहेत.

तुम्हा शेतकरी बंधू-भगिनींना शेतीशी निगडीत मालासाठी आणि इतर गरजांसाठी अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. आता तुम्हाला अशा अडचणींचा सामना करावा लागणार नाही. आता पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्रातून, शेतकऱ्यांना बी-बियाणे देखील मिळेल आणि खतेही मिळतील. याशिवाय, शेतीशी संबंधित अवजारे आणि इतर यंत्रेही या केंद्रात मिळणार आहेत. ही केंद्रं शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित प्रत्येक आधुनिक माहिती देणार आहेत. मी पाहिले आहे की, माझ्या शेतकरी बंधू-भगिनींना योजनेची योग्य माहिती नसल्याने खूप त्रास सहन करावा लागतो. ही पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्रं आता शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेची वेळेवर माहिती देणारे माध्यम बनतील.

 

|

मित्रांनो,

ही तर फक्त सुरूवात आहे. आणि मी माझ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की, तुम्हीही ही सवय लावून घ्या, भलेही तुम्हाला येथून काहीही खरेदी करायचे नसेल, पण तुम्ही बाजारात गेला असाल, त्या शहरात शेतकरी समृद्धी केंद्र असेल, तर काहीही खरेदी करायचे नसेल, तरीही तिकडे एक फेरी नक्की मारा. अशी कित्येक कामे आज देशात होत आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठे बदल होत आहेत.

मित्रांनो,

भारताचा विकास तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा भारतातील गावांचा विकास होईल.  भारत तेव्हाच विकसित देखील बनू शकतो, जेव्हा भारतातील गाव विकसित होतील. आज आमचे सरकार भारतातील गावांमध्ये ती प्रत्येक सुविधा पोहोचवण्याचे काम करत आहे जी शहरांमध्ये मिळू शकते. तुम्हा सर्वांना हे माहीत आहेच की एक काळ असा होता जेव्हा देशाच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग आरोग्य सेवांपासून वंचित होता. म्हणजेच कोटी कोटी लोक नेहमीच आपल्या दैवाच्या भरवशावर आपला जीव पणाला लावून जगत होते. असे ठरवून टाकले होते की चांगली रुग्णालये तर फक्त दिल्ली-जयपूरमध्ये किंवा मोठ्या शहरातच मिळतात. आम्ही ही स्थिती देखील बदलत आहोत. आज देशाच्या प्रत्येक भागात नवीन एम्स (AIIMS) सुरू होत आहेत, नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू होत आहेत. आमच्या या प्रयत्नांचा परिणाम आहे की आज देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढून 700 च्या वर पोहोचली आहे. 8-9 वर्षांपूर्वी राजस्थानमध्येही केवळ 10 वैद्यकीय महाविद्यालये होती, आज राजस्थानमध्ये देखील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 35 झाली आहे. यामुळे तुमच्याच जिल्ह्यांच्या आजूबाजूला चांगल्या उपचारांच्या सुविधा तर तयार होत आहेतच, यामधून शिक्षण घेऊन मोठ्या संख्येने डॉक्टर देखील बाहेर पडत आहेत. हे डॉक्टर लहान वाडी-वस्त्या आणि गावांमध्ये चांगल्या आरोग्य व्यवस्थेचा आधार बनत आहेत.

जसे आज जी नवीन वैद्यकीय महाविद्यालये मिळाली आहेत, त्यामुळे बारां, बुंदी, टोंक, सवाई माधोपूर, करौली, झुनझुनु, जेसलमेर, धौलपूर, चितोडगड, सिरोही आणि सीकरसह अनेक भागांना लाभ मिळतील. उपचारांसाठी लोकांना आता जयपूर आणि दिल्लीच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. आता तुमच्या घराच्या जवळच चांगली रुग्णालये देखील असतील आणि गरीबाचा मुलगा आणि मुलगी या रुग्णालयांमध्ये शिक्षण घेऊन डॉक्टर बनू शकतील. आणि मित्रांनो, तुम्हाला ठाऊक आहे का, आमच्या सरकारने वैद्यकीय शिक्षण देखील मातृभाषेतून घेण्याचा मार्ग तयार केला आहे. आता असे होणार नाही की इंग्रजी येत नसल्याने गरीबाचा मुलगा-मुलगी डॉक्टर बनू शकले नाहीत आणि ही देखील मोदी यांची हमी आहे.

बंधू आणि भगिनींनो,

अनेक दशके आपली गावे आणि गरीब यामुळे देखील मागे राहिले कारण गावांमध्ये शिकण्यासाठी चांगल्या शाळा नव्हत्या. मागास आणि आदिवासी समाजातील बालके स्वप्ने तर पाहात होते, मात्र ही स्वप्ने पूर्ण करण्याचा कोणताही मार्ग त्यांच्याकडे नव्हता. आम्ही शिक्षणासाठीचे बजेट खूप मोठ्या प्रमाणात वाढवले, संसाधनांमध्ये वाढ केली, एकलव्य आदिवासी शाळा सुरू केल्या. याचा आदिवासी युवकांना खूप मोठ्या प्रमाणावर लाभ झाला आहे. 

 

|

मित्रांनो,

जेव्हा स्वप्ने मोठी असतात तेव्हाच यश देखील मोठे असते. राजस्थान तर देशातील असे राज्य आहे ज्याच्या वैभवामुळे अनेक शतके जगाला चकित केले आहे. आपल्याला या वारशाचे संरक्षण करायचे आहे आणि राजस्थान आधुनिक विकासाच्या शिखरावर देखील पोहोचवायचे आहे. म्हणूनच राजस्थानमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा तयार करण्याला आमचे प्राधान्य आहे. राजस्थानमध्य गेल्या काही महिन्यात दोन-दोन अत्याधुनिक द्रुतगती मार्गांचे लोकार्पण झाले आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा एक प्रमुख भाग आणि अमृतसर-जामनगर द्रुतगती मार्गाच्या माध्यमातून राजस्थान विकासाची नवी गाथा लिहीत आहे.  राजस्थानच्या लोकांना वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे.

 

|

भारत सरकार आज पायाभूत सुविधांमध्ये जी गुंतवणूक करत आहे, पर्यटनाशी संबंधित सुविधांचा विकास करत आहे, त्यामुळे राजस्थानमध्ये नव्या संधींमध्येही वाढ होईल. जेव्हा तुम्ही ‘पधारो म्हारे देश’ म्हणून पर्यटकांना साद घालाल तेव्हा एक्सप्रेस वे आणि उत्तम रेल्वे सुविधा त्यांचे स्वागत करतील.

आपल्या सरकारने स्वदेस दर्शन योजने अंतर्गत खाटू श्याम जी मंदिरात सुविधांचा विस्तार केला आहे. श्री खाटू श्यामजींच्या आशीर्वादाने राजस्थानच्या विकासाला आणखी जास्त गती मिळेल. आपण सर्व राजस्थानचा गौरव आणि वारशाला संपूर्ण जगात ओळख मिळवून देऊ.

 

 

|

मित्रांनो,

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत जी काही दिवसांपासून आजारी आहेत, त्यांच्या पायामध्ये काही तरी समस्या आहे. ते आज या कार्यक्रमात येणार होते. मात्र या समस्येमुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि संपूर्ण राजस्थानचे या अनेकविध भेटींबद्दल, देशाच्या शेतकऱ्यांना या महत्त्वाच्या व्यवस्था विकसित करण्यापासून त्या समर्पित करण्याबद्दल मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देत माझ्या भाषणाचा समारोप करतो.

खूप-खूप धन्यवाद !

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
PM’s address to the nation on Operation Sindoor: Path of peace, path of strength

Media Coverage

PM’s address to the nation on Operation Sindoor: Path of peace, path of strength
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi's address to the nation
May 12, 2025
QuoteToday, every terrorist knows the consequences of wiping Sindoor from the foreheads of our sisters and daughters: PM
QuoteOperation Sindoor is an unwavering pledge for justice: PM
QuoteTerrorists dared to wipe the Sindoor from the foreheads of our sisters; that's why India destroyed the very headquarters of terror: PM
QuotePakistan had prepared to strike at our borders,but India hit them right at their core: PM
QuoteOperation Sindoor has redefined the fight against terror, setting a new benchmark, a new normal: PM
QuoteThis is not an era of war, but it is not an era of terrorism either: PM
QuoteZero tolerance against terrorism is the guarantee of a better world: PM
QuoteAny talks with Pakistan will focus on terrorism and PoK: PM

प्रिय देशवासीयांनो

नमस्कार!

आपण सर्वांनी गेल्या काही दिवसांत देशाचं सामर्थ्य आणि त्याचा संयम दोन्ही पाहिलं आहे. मी सर्वप्रथम भारताच्या पराक्रमी सैन्यदलांना, सशस्त्र दलांना, आपल्या गुप्तहेर संस्थांना, आपल्या वैज्ञानिकांना प्रत्येक भारतीयाच्या वतीनं सॅल्यूट करतो. आपल्या शूर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या लक्ष्यप्राप्तीसाठी असीम शौर्य गाजवलं.

मी त्यांचं शौर्य, त्यांचं साहस, त्यांचा पराक्रम आज समर्पित करतो आहे. आपल्या देशाच्या प्रत्येक मातेला, देशाच्या प्रत्येक भगिनीला आणि देशाच्या प्रत्येक कन्येला हा पराक्रम समर्पित करतो आहे.

मित्रहो,

२२ एप्रिलला पहेलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या क्रौर्याचं प्रदर्शन मांडलं, त्यानं देशाला आणि जगालाही हादरवून टाकलं होतं. सुट्टीचा आनंद घेणाऱ्या निर्दोष निरपराध नागरिकांना धर्म विचारून...त्यांचा कुटुंबासमोर, त्यांच्या मुलांसमोर निर्घृणपणे मारून टाकणं. हा दहशतीचा अतिशय बीभत्स चेहरा होता, क्रौर्य होतं. देशातला एकोपा आणि सुसंवाद भंग करण्याचाही हा किळसवाणा प्रयत्न होता. मला व्यक्तिशः याचा फार त्रास झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर सारा देश, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, प्रत्येक राजकीय पक्ष‌ एकमुखाने दहशतवादाविरोधात कठोर कारवाईसाठी उभा राहिला. आम्ही दहशतवाद्यांना धूळ चारण्यासाठी भारताच्या सैन्यदलांना पूर्ण मुभा दिली. आणि आज प्रत्येक दहशतवाद्याला, प्रत्येक दहशतवादी संघटनेला हे पुरेपूर समजलंय की आमच्या बहिणींच्या आणि मुलींच्या कपाळावरचं कुंकू- सिंदूर पुसण्याचा परिणाम काय होतो.

मित्रहो,

ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाही. देशातल्या कोट्यवधी लोकांच्या भावनांचं हे प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे च्या रात्री उशिरा ७ मे च्या सकाळी साऱ्या जगानं ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात येताना पाहिली आहे. भारताच्या सैन्यदलांनी पाकिस्तानात दहशतवादाच्या तळांवर त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर अचूक प्रहार केला. दहशतवाद्यांना स्वप्नातही वाटलं नसेल, की भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल. पण जेव्हा देशाची एकजूट होते. 'राष्ट्र प्रथम' या भावनेने देश भारून जातो. राष्ट्र सर्वोपरि असतं...तेव्हा पोलादी निर्णय घेतले जातात. अपेक्षित परिणाम घडवून दाखवले जातात. जेव्हा पाकिस्तानात दहशतीच्या अड्ड्यांवर भारताच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. भारताच्या ड्रोन्सनी हल्ला केला...तेव्हा दहशतवादी संघटनांच्या केवळ इमारतीच नाही, तर त्यांचं धैर्यही डळमळीत झालं. बहावलपूर आणि मुरीदके यासारखे दहशतवाद्यांचे तळ, एक प्रकारे जागतिक दहशतवादाची विद्यापीठं बनली होती. जगात कुठेही जे मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत...मग तो नाइन इलेव्हन असो. कींवा लंडन ट्यूब बॉंबिंग्स असोत किंवा भारतात अनेक दशकांत जे मोठमोठे दहशतवादी हल्ले झाले. त्यांचे धागेदोरे दहशतीच्या या तळांशी कुठे ना कुठे जोडलेले दिसत आले आहेत. दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींच्या कपाळीचं कुंकू पुसलं म्हणून भारताने दहशतीची ही मुख्यालयं पुसून टाकली. भारताच्या या हल्ल्यांमध्ये शंभराहून अधिक क्रूरकर्मा दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलं. दहशतवाद्यांचे कित्येक म्होरके आश्रयदाते गेल्या अडीच तीन दशकांपासून पाकिस्तानात राजरोस फिरत होते, जे भारताविरुद्ध कारस्थानं करत होते त्यांना भारतानं एका झटक्यात संपवलं आहे.

मित्रहो,

भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान घोर निराशेच्या खाईत ढकलला गेला होता. कमालीचा हताश झाला होता. बिथरला होता आणि याच बिथरलेपणाच्या भावनेतून त्यानं आणखी एक दुःसाहस केलं. दहशतवादाविरोधात भारताच्या कारवाईला साथ देण्याऐवजी पाकिस्ताननं भारतावरच हल्ला करायला सुरुवात केली. पाकिस्ताननं आपल्या शाळा-महाविद्यालयांना गुरुद्वारांना मंदिरांना सामान्य नागरिकांच्या घरांना लक्ष्य केलं. पाकिस्ताननं आपल्या सैनिकी तळांना लक्ष्य केलं. पण यातही पाकिस्तानचा बुरखा गळून पडला. जगानं हे पाहिलं की पाकिस्तानचे ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रं भारतासमोर काड्या काटक्यांसारखी कशी उधळली गेली. भारताचा सशक्त हवाई संरक्षण प्रणालीनं त्यांना आकाशातच नष्ट करून टाकलं. पाकिस्ताननं सीमेवर वार करण्याची तयारी केली होती. पण भारताने पाकिस्तानच्या छातीवरच प्रहार केला. भारताचे ड्रोन्स भारताच्या क्षेपणास्त्रांनी अतिशय अचूक हल्ला केला. पाकिस्तानी वायुदलाच्या त्याच हवाई तळांची हानी केली, ज्यांच्याबद्दल पाकिस्तानला फारच घमेंड होती. भारताने पहिल्या तीन दिवसांतच पाकिस्तानला इतकं उध्वस्त केलं ज्याचा त्याला अंदाजही नव्हता. म्हणूनच तर भारताच्या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्ताननं सुटकेचे मार्ग शोधायला सुरुवात केली. पाकिस्तान जगाकडे तणाव कमी करण्यासाठी विनंतीची याचना करत होता आणि जबरदस्त मार खाल्ल्यानंतर, १० मे रोजी दुपारी, पाकिस्तानी सैन्यानं आपल्या डीजीएमओ शी संपर्क साधला. तोपर्यंत आपण दहशतवादाला पोसणाऱ्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात नष्ट केल्या होत्या. दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलं होतं, पाकिस्तानने अगदी हृदयाशी बाळगलेल्या दहशतवादी तळांना आपण उध्वस्त केलं होतं. म्हणूनच जेव्हा पाकिस्तानकडून विनंतीची याचना करण्यात आली. जेव्हा पाकिस्तानकडून हे सांगण्यात आलं की त्यांच्याकडून यापुढे दहशतवादी कारवाया आणि लष्करी दुःसाहस होणार नाही. तेव्हा भारतानही त्यावर विचार केला. आणि मी पुन्हा सांगतो. आपण पाकिस्तानमधील दहशतवादी आणि लष्करी तळांविरुद्धची आपली प्रत्युत्तरात्मक कारवाई सध्या फक्त स्थगित केली आहे. येत्या काळात आम्ही पाकिस्तानचे प्रत्येक पाऊल या निकषावर पारखू...की तो नेमका कोणता दृष्टिकोन स्वीकारतो?

मित्रांनो,

भारताची तिन्ही सैन्यदलं आपलं हवाई दल आपलं भूदल आणि आपलं नौदल आपलं सीमा सुरक्षा दल – बीएसएफ, भारताची निमलष्करी दलं सातत्यानं सतर्क आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक नंतर आता ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्ध भारताचं धोरण आहे. ऑपरेशन सिंदूरनं दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक नवीन रेषा आखली आहे. एक नवीन मानक, एक नवीन उदाहरण, घालून दिलं आहे. पहिले- जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. आपण आपल्या पद्धतीनं, आपल्या स्वतःच्या अटींनिशी प्रतिसाद देऊ. दहशतवादाची मुळे जिथे जिथे उगम पावत असतील तिथे तिथे जाऊन आम्ही कठोर कारवाई करू. दुसरे - भारत कोणत्याही आण्विक ब्लॅकमेलला भीतीच्या बागुलबुवाला भीक घालणार नाही. आण्विक ब्लॅकमेलच्या आडून फोफावणाऱ्या दहशतवादी अड्ड्यांवर भारत अचूक आणि निर्णायक हल्ला करेल. तिसरे म्हणजे, दहशतवादाला आश्रय देणारं सरकार आणि दहशतवादाचे सूत्रधार, यांना आपण वेगवेगळे घटक समजणार नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगानं पुन्हा एकदा पाकिस्तानचं घृणास्पद सत्य अनुभवलं. जेव्हा मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पाकिस्तानी सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उडाउडी पडली. एखादा देश पुरस्कृत करत असलेल्या दहशतवादाचा…हा जिवंत पुरावा आहे. आपण भारत आणि आपल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी सातत्यानं निर्णायक पावलं उचलत राहू.

मित्रानो,

रणागणांत प्रत्येकवेळी आपण पाकिस्तानवर मात केली आहे आणि यावेळी ऑपरेशन सिंदूरनं नवा आयाम स्थापित केला आहे. आपण वाळवंट आणि पर्वतीय भागातही आपल्या क्षमतेचं शानदार प्रदर्शन केलं आणि सोबतच नव्या पिढीच्या आधुनिक युध्दनीतीतही आपलं श्रेष्‍ठत्व सिध्द केलं. या ऑपरेशन दरम्यान, आपली मेड इन इंडिया शस्त्र प्रमाणांच्या कसोटीवर खरी उतरली. आज जग पाहत आहे, एकविसाव्या शतकाच्या युध्दनीतीत मेड इन इंडिया संरक्षण उत्पादनांची वेळ आली आहे.

मित्रानों,

प्रत्येक प्रकारच्या दहशतवादा विरोधात आपल्या सगळयाची एकजूट आपली सर्वात मोठी शक्ती आहे. निश्चितच हे युग युध्दाचं नाही, परंतु हे युग दहशतवादाचंही नाही. दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णूता ही एका चांगल्या जगाची हमी आहे.

मित्रानों,

पाकिस्तानी सैन्य पाकिस्तानचं सरकार ज्याप्रकारे दहशतवादाला खतपाणी घालत आहे. तो एकदिवस पाकिस्तानलाच संपवून टाकेल. पाकिस्तानला यातून वाचायचं असेल तर, त्याला आपल्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट कराव्या लागतील. याशिवाय, शांततेचा दुसरा मार्ग नाही. भारताचं मत एकदम स्पष्ट आहे. दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाहीत. दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाहीत आणि पाणी आणि रक्त हे देखील एकत्र वाहू शकत नाही. मला आज जागतिक समुदायाला सांगायचं आहे. आमचं जाहीर धोरण राहिलं आहे, पाकिस्तानशी चर्चा होईल तर दहशतवादावर होईल. पाकिस्तानशी चर्चा होईल तर पाकव्याप्त काश्मीरवर होईल.

प्रिय देशवासीयांनो, आज बुध्दपौर्णिमा आहे. भगवान बुध्दांनी आपल्याला शांततेचा मार्ग दाखवला आहे. शांततेचा मार्गही शक्तीमार्गेच जातो. मानवता, शांतता आणि समृध्दीकडे अग्रेसर व्हावं. प्रत्येक भारतीयाला शांततेनं जगता यावं, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करता यावं, यासाठी भारताचं शक्तीशाली होणं गरजेचं आहे आणि आवश्यकता असेल तेव्हा, या शक्तीचा वापरही गरजेचा आहे आणि गेल्या काही दिवसात भारतानं हेच केलं आहे. मी पुन्हा एकदा भारताचं सैन्य आणि सशस्त्रदलांना सलाम करतो. आपण भारतीयांच्या उमेद आणि एकजूटीला वंदन करतो.

धन्यवाद.

भारतमाता की जय.