QuoteLaunches Pradhan Mantri Samajik Utthan evam Rozgar Adharit Jankalyan (PM-SURAJ) portal
QuoteSanctions credit support to 1 lakh entrepreneurs of disadvantaged sections
QuoteDistributes Ayushman Health Cards and PPE kits to Safai Mitras under NAMASTE scheme
Quote“Today’s occasion provides a glimpse of the government’s commitment to prioritize the underprivileged”
Quote“Seeing the benefits reaching the deprived makes me emotional as I am not separate from them and you are my family”
Quote“Goal of Viksit Bharat by 2047 can not be achieved without the development of the deprived segments”
Quote“Modi gives you guarantee that this campaign of development and respect of the deprived class will intensify in the coming 5 years. With your development, we will fulfill the dream of Viksit Bharat”

नमस्‍कार,

सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमारजी, देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेले विविध सरकारी योजनांचे लाभार्थी, स्वच्छता कर्मचारी बंधू भगिनी, इतर मान्यवर, सभ्य स्त्री-पुरुषहो, देशातील 470 जिल्ह्यांतून जवळजवळ 3 लाख लोक आज या कार्यक्रमाशी थेट जोडले गेले आहेत. मी सर्वांचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

आज दलित, मागासलेले आणि वंचित समाजाच्या कल्याणाच्या संदर्भात देश आज आणखी एका मोठ्या संधीचा साक्षीदार होतो आहे. जेव्हा वंचितांमध्ये प्राधान्याची जाणीव असेल तर कसे कार्य होते ते या कार्यक्रमाच्या आयोजनातून दिसून येते आहे. आज वंचित वर्गातील एक लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 720 कोटी रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत. हे लाभार्थी 500 हून अधिक जिल्ह्यांतील आहेत.

आधीच्या सरकारांमध्ये कोणी असा विचारच करू शकत नसेल की इकडे एक बटण दाबले आणि तिकडे गरिबांच्या बँक खात्यांमध्ये पैसे पोहोचले. मात्र हे मोदींचे सरकार आहे. गरिबांच्या हक्काचे पैसे थेट त्यांच्या खात्यामध्ये पोहोचतात! मी आत्ताच सूरज पोर्टल देखील सुरु केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून वंचित समाजाच्या लोकांना आता थेट आर्थिक मदत देता येऊ शकते. म्हणजेच, भारत सरकारच्या इतर योजनांप्रमाणेच वेगवेगळ्या योजनांचे पैसे देखील थेट तुमच्या खात्यांमध्ये पोहोचतील. त्यामधे न कोणी मध्यस्थ, ना कट, ना कमिशन आणि ना कोणाच्या शिफारसीसाठी फेऱ्या मारण्याची गरज!

अत्यंत कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या, गटारे आणि सेप्टिक टाकी साफ करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट्स आणि आयुष्मान हेल्थ कार्डे दिली जात आहेत. या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आता 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळण्याची सुनिश्चिती झाली आहे.या कल्याणकारी योजना म्हणजे आमचे सरकार 10 वर्षांपासून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय तसेच वंचित समाजासाठी जी मोहीम चालवत आहे त्याच मोहिमेचा विस्तार आहे. या योजनांबद्दल मी तुम्हा सर्वांचे आणि देशातील सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन करतो.

 

|

मित्रांनो,

काही वेळापूर्वी मला काही लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी देखील मिळाली. सरकारच्या योजना कशा प्रकारे दलित, वंचित आणि मागासलेल्या समाजापर्यंत पोहोचत आहेत, या योजनांमुळे त्यांच्या जीवनात कशा प्रकारे बदल घडून येत आहे, ते पाहून, त्या सकारात्मक बदलामुळे मनाला देखील समाधान वाटते आणि व्यक्तिगत पातळीवर मी भावूक देखील होतो. मी तुम्हा सर्वांपेक्षा वेगळा नाही, तुम्हां सर्वांतच मी माझे कुटुंब पाहतो. म्हणूनच जेव्हा विरोधी पक्षातील लोक मला दूषणे देतात, जेव्हा ते लोक म्हणतात की मोदींना कुटुंबच नाहीये तेव्हा सर्वप्रथम मला तुमचीच आठवण येते. ज्याच्या जवळ तुमच्यासारखे बंधू-भगिनी आहेत त्याला कोणी कुटुंब नसलेला कसे म्हणू शकते.माझ्यापाशी तर तुम्हां सर्वांच्या रुपात कोट्यवधी दलित, वंचित आणि देशवासीयांचे कुटुंब आहे. तुम्ही जेव्हा म्हणता की, ‘मी आहे मोदींचा परिवार’ तेव्हा मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो.  

मित्रांनो, 

आम्ही 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा संकल्प केला आहे, उद्दिष्ट निश्चित केले आहे. जो वर्ग गेली अनेक दशके वंचित राहिला त्याच्या विकासाशिवाय भारत देश विकसित होऊ शकत नाही. काँग्रेसच्या सरकारांनी देशाच्या विकासामध्ये वंचित वर्गाला असलेले महत्त्व कधी समजूनच घेतले नव्हते, त्यांना त्याची पर्वाच नव्हती. या लोकांना काँग्रेसने नेहमीच सोयीसुविधांपासून वंचित ठेवले. देशातील कोट्यवधी लोकांना त्यांच्या नशिबाच्या हवाल्यावर सोडून दिले. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की देशात वातावरण असे निर्माण झाले की या लोकांना वाटायचे की या योजना, त्यांचे लाभ, हे जीवन तर इतर लोकांसाठी आहे. आम्हाला तर असेच अडचणी सहन करत जीवन जगायचे आहे. अशीच मानसिकता तयार झाली आणि त्यामुळे तत्कालीन सरकारांच्या विरोधात कोणतीही तक्रारच कोणी केली नाही. मी ती मानसिक भिंतच उध्वस्त केली. आज जर सुस्थितीतील नागरिकांकडे गॅसची शेगडी असेल तर वंचित माणसाच्या घरात देखील गॅसची शेगडी असेल. आर्थिक पातळीवर चांगल्या-चांगल्या कुटुंबांची बँकांमध्ये खाती असतील तर गरीब, दलित, मागासलेले आणि आदिवासी अशा सर्वांचे देखील बँकेत खाते असेल.  

मित्रांनो,

या वर्गांतील कित्येक पिढ्यांनी त्यांचे जीवन मुलभूत सोयी मिळवण्यातच खर्च केले. 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या आमच्या सरकारने सबका साथ, सबका विकास या संकल्पनेसह काम सुरु केले. ज्या लोकांनी सरकारकडून काही मिळेल अशी आशाच सोडून दिली होती त्यांच्यापर्यंत सरकार पोहोचले आणि देशाच्या विकासात त्यांना सहभागी करून घेतले.

तुम्ही आठवण करून बघा, पूर्वी रेशनच्या दुकानातून अन्नधान्य मिळताना किती त्रास होत असे. आणि हा त्रास कोणाला होत होता, ते कोण होते ज्यांना सर्वात जास्त अडचणी येत असत? हा त्रास सहन करणारे आपले दलित वर्गातील बंधू- भगिनी होते, किंवा आपले मागासलेल्या समुदायातील बंधू भगिनी होते, इतर मागासवर्गीय समाजातील बंधू- भगिनी होते किंवा आदिवासी वर्गातील बंधू- भगिनी होते. आज आम्ही ज्या 80 कोटी गरजूंना मोफत अन्नधान्य देतो, त्याचा सर्वाधिक लाभ जे टंचाईच्या परिस्थितीत जीवन कंठत आहेत, जो वंचित समाज आहे त्यांनाच मिळतो आहे.

आज जेव्हा आम्ही 5 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाचे उपचार मोफत करून देण्याची हमी देतो तेव्हा याच बंधू-भगिनींचा जीव मोठ्या संख्येने वाचतो, त्यांना आजारी असताना ही मदत कामी येते. पत्र्याच्या घरांत, झोपड्यांमध्ये आणि उघड्यावर आयुष्य कंठण्याचा नाईलाज झालेले आमचे दलित, आदिवासी मागासलेल्या कुटुंबांची संख्या आज देशात सर्वाधिक आहे कारण भूतकाळात या लोकांची कोणी पर्वाच केली नाही.

मोदींनी दहा वर्षांत गरिबांसाठी कोट्यवधी पक्की घरे बांधली आहेत.मोदींनी कोट्यवधी घरांमध्ये शौचालये तयार केली. ज्यांच्या माता भगिनींना शौचासाठी उघड्यावर जावे लागत होते ती कुटुंबे होती तरी कोण? हेच समाज सर्वाधिक त्रास सहन करत असत. आमचे दलित, आदिवासी बांधव, इतर मागासवर्गीय, वंचित कुटुंबे यांच्याच घरातील महिलांना त्रास सहन करावा लागत होता. आज त्यांना इज्जतघर मिळाले आहे, त्यांना त्यांचे सन्मानाचे जगणे मिळाले आहे.

 

|

मित्रांनो,

तुम्हाला माहीत आहे की पूर्वी कोणत्या घरांमध्ये गॅसची शेगडी असायची! गॅसची शेगडी कुणाकडे  नसायची,  सगळ्यांना माहीत आहे. मोदींनी उज्ज्वला योजना राबवून मोफत गॅस जोडणी दिली.  मोदींनी आणलेली ही मोफत गॅस जोडणी कुणाला मिळाली? माझ्या सर्व वंचित बंधू भगिनींना ती मिळाली आहे.  आज माझ्या वंचित वर्गातील माता भगिनींनाही लाकडाच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे.  आता आम्ही या योजना सर्वांपर्यंत पोहोचवायच्या (सॅच्युरेशन)  लक्ष्यावर काम करत आहोत, अगदी 100%! जर 100 लोक योजनेच्या लाभासाठी पात्र असतील, तर  100 पैकी सर्व 100 लोकांना तो लाभ मिळायला हवा.

देशात भटक्या-विमुक्त समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांच्या कल्याणासाठी अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. नमस्ते योजनेच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे जीवन सुधारत आहे. मैला वाहून नेण्याची अमानुष प्रथा संपवण्यातही आम्ही यशस्वी होत आहोत.  या डंखामुळे त्रस्त झालेल्या लोकांसाठी सन्मानाने जगण्याची व्यवस्थाही आम्ही करत आहोत.  या प्रयत्नां अंतर्गत सुमारे 60 हजार लोकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.

मित्रांनो

अनुसूचित जाती-जमाती (एससी-एसटी), इतर मागासवर्गीय (ओबीसी) वंचित घटकांना पुढे आणण्यासाठी आमचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.  विविध संस्थांकडून वंचित घटकांना मिळणारी मदत, या 10 वर्षात आम्ही दुप्पट केली आहे.  यावर्षी सरकारने एससी समाजाच्या कल्याणासाठी सुमारे 1 लाख 60 हजार कोटी रुपये दिले आहेत.  मागील सरकारमध्ये लाखो कोटी रुपयांचा गाजावाजा फक्त घोटाळ्यांच्या नावावरच होत असे.  आमचे सरकार दलित आणि वंचितांच्या कल्याणासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी  हा पैसा खर्च करत आहे.

एससी-एसटी आणि ओबीसी समाजातील तरुण-तरुणींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीतही वाढ करण्यात आली आहे.  आमच्या सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये ओबीसींसाठी अखिल भारतीय कोट्यात 27 टक्के आरक्षण लागू केले. आम्ही एन ई ई टी परीक्षेतही ओबीसीं साठी मार्ग काढला.  पदव्युत्तर आणि पीएचडी पदवी घेण्यासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या वंचित समाजातील मुलांना नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिपची (राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्ती) मदत मिळत आहे.

विज्ञानाशी संबंधित विषयात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी नॅशनल फेलोशिपची (राष्ट्रीय छात्र वृत्ती) रक्कमही वाढवण्यात आली आहे.  आमच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा मिळाला आहे, याचे आम्हाला समाधान आहे.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत पंचतीर्थांचा विकास करण्याची संधी मिळाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो.

 

|

मित्रांनो,

भाजपा सरकार वंचित वर्गातील तरुण-तरुणींच्या रोजगार आणि स्वयंरोजगारालाही प्राधान्य देत आहे.  आमच्या सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत गरिबांना सुमारे 30 लाख कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.  ही मदत मिळालेले बहुतांश तरुण-तरुणी हे एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील आहेत.  स्टँडअप इंडिया योजनेने एससी आणि एसटी वर्गांमध्ये उद्योजकतेला चालना दिली आहे.  या वर्गांना  आमच्या व्हेंचर कॅपिटल फंड योजनेचीही मदत मिळाली आहे.  दलितांमधील उद्योजकता लक्षात घेऊन आमच्या सरकारने आंबेडकर सोशल इनोव्हेशन आणि इनक्युबेशन मिशनही (सामाजिक नवोन्मेष आणि उद्भवन उपक्रम) सुरू केले आहे.

मित्रांनो,

आमच्या सरकारच्या गरीब कल्याणकारी योजनांचा सर्वाधिक लाभ दलित, आदिवासी, ओबीसी किंवा आमच्या उपेक्षित आणि वंचित समुदायांना मिळाला आहे.  पण मोदी जेव्हा दलित, वंचित समाजाच्या सेवेसाठी काहीही करतात तेव्हा या इंडी आघाडीच्या लोकांना सर्वात जास्त चीड येते.  दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचे जीवन सुसह्य व्हावे असे काँग्रेसवाल्यांना कधीच वाटत नाही.  त्यांना फक्त तुम्हाला तळमळत ठेवायचे असते.

तुम्ही कुठलीही योजना बघा, तुमच्यासाठी शौचालये बांधण्याची यांनी खिल्ली उडवली.  जन धन योजना आणि उज्ज्वला योजनेला त्यांनी विरोध केला.  ज्या राज्यांमध्ये यांची सरकारे आहेत, त्यांनी आजपर्यंत अनेक योजना राबवू दिल्या नाहीत.  सर्व दलित, वंचित मागास समाज आणि त्यांच्यातील युवावर्ग  पुढे आला तर त्यांच्या घराणेशाहीच्या राजकारणाची दुकानदारी बंद होईल, हे त्यांना माहीत आहे.

 

|

हे लोक सामाजिक न्यायाचा नारा देऊन समाजाला जाती-जातींमध्ये विभागण्याचे काम करतात, पण खऱ्या सामाजिक न्यायाला विरोध करतात.  तुम्ही त्यांचा मागील इतिहास पहा, याच काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला होता.  लोहिया आणि बीपी मंडल यांनाही त्यांनी विरोध केला. या लोकांनी  कर्पूरी ठाकूरजींचाही नेहमी अनादरच केला.  आणि जेव्हा आम्ही त्यांना भारतरत्न सन्मान दिला तेव्हा इंडी आघाडीच्या लोकांनी त्यालाही विरोध केला.  हे लोक स्वतः त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच भारतरत्न देत असत.  पण, त्यांनी अनेक दशके बाबासाहेबांना भारतरत्न मिळू दिला नाही.  भाजपा समर्थित सरकारने त्यांना हा सन्मान दिला.

दलित समाजातून आलेले रामनाथ कोविंदजी आणि आदिवासी समाजातील भगिनी द्रौपदी मुर्मूजी यांनी राष्ट्रपती व्हावे, असे या लोकांना कधीच वाटले नाही.  त्यांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी इंडी आघाडीच्या लोकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. वंचित वर्गातील लोक उच्च पदावर पोहोचावेत यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरूच राहतील.  वंचितांना सन्मान आणि न्याय देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा हा पुरावा आहे.

वंचित वर्गाच्या विकासाची आणि सन्मानाची ही मोहीम येत्या 5 वर्षांत अधिक तीव्र होईल, ही हमी मोदी तुम्हाला देतो.  तुमच्या विकासाने आम्ही विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करू.  पुन्हा एकदा, इतक्या मोठ्या संख्येने अनेक ठिकाणांहून तुम्हा सर्वांचे एकत्र येणे आणि दूरदृष्य प्रणाली द्वारे तुमचे दर्शन घेण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.  मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.

खूप खूप आभार!

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
'Operation Sindoor on, if they fire, we fire': India's big message to Pakistan

Media Coverage

'Operation Sindoor on, if they fire, we fire': India's big message to Pakistan
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi's address to the nation
May 12, 2025
QuoteToday, every terrorist knows the consequences of wiping Sindoor from the foreheads of our sisters and daughters: PM
QuoteOperation Sindoor is an unwavering pledge for justice: PM
QuoteTerrorists dared to wipe the Sindoor from the foreheads of our sisters; that's why India destroyed the very headquarters of terror: PM
QuotePakistan had prepared to strike at our borders,but India hit them right at their core: PM
QuoteOperation Sindoor has redefined the fight against terror, setting a new benchmark, a new normal: PM
QuoteThis is not an era of war, but it is not an era of terrorism either: PM
QuoteZero tolerance against terrorism is the guarantee of a better world: PM
QuoteAny talks with Pakistan will focus on terrorism and PoK: PM

प्रिय देशवासीयांनो

नमस्कार!

आपण सर्वांनी गेल्या काही दिवसांत देशाचं सामर्थ्य आणि त्याचा संयम दोन्ही पाहिलं आहे. मी सर्वप्रथम भारताच्या पराक्रमी सैन्यदलांना, सशस्त्र दलांना, आपल्या गुप्तहेर संस्थांना, आपल्या वैज्ञानिकांना प्रत्येक भारतीयाच्या वतीनं सॅल्यूट करतो. आपल्या शूर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या लक्ष्यप्राप्तीसाठी असीम शौर्य गाजवलं.

मी त्यांचं शौर्य, त्यांचं साहस, त्यांचा पराक्रम आज समर्पित करतो आहे. आपल्या देशाच्या प्रत्येक मातेला, देशाच्या प्रत्येक भगिनीला आणि देशाच्या प्रत्येक कन्येला हा पराक्रम समर्पित करतो आहे.

मित्रहो,

२२ एप्रिलला पहेलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या क्रौर्याचं प्रदर्शन मांडलं, त्यानं देशाला आणि जगालाही हादरवून टाकलं होतं. सुट्टीचा आनंद घेणाऱ्या निर्दोष निरपराध नागरिकांना धर्म विचारून...त्यांचा कुटुंबासमोर, त्यांच्या मुलांसमोर निर्घृणपणे मारून टाकणं. हा दहशतीचा अतिशय बीभत्स चेहरा होता, क्रौर्य होतं. देशातला एकोपा आणि सुसंवाद भंग करण्याचाही हा किळसवाणा प्रयत्न होता. मला व्यक्तिशः याचा फार त्रास झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर सारा देश, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, प्रत्येक राजकीय पक्ष‌ एकमुखाने दहशतवादाविरोधात कठोर कारवाईसाठी उभा राहिला. आम्ही दहशतवाद्यांना धूळ चारण्यासाठी भारताच्या सैन्यदलांना पूर्ण मुभा दिली. आणि आज प्रत्येक दहशतवाद्याला, प्रत्येक दहशतवादी संघटनेला हे पुरेपूर समजलंय की आमच्या बहिणींच्या आणि मुलींच्या कपाळावरचं कुंकू- सिंदूर पुसण्याचा परिणाम काय होतो.

मित्रहो,

ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाही. देशातल्या कोट्यवधी लोकांच्या भावनांचं हे प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे च्या रात्री उशिरा ७ मे च्या सकाळी साऱ्या जगानं ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात येताना पाहिली आहे. भारताच्या सैन्यदलांनी पाकिस्तानात दहशतवादाच्या तळांवर त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर अचूक प्रहार केला. दहशतवाद्यांना स्वप्नातही वाटलं नसेल, की भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल. पण जेव्हा देशाची एकजूट होते. 'राष्ट्र प्रथम' या भावनेने देश भारून जातो. राष्ट्र सर्वोपरि असतं...तेव्हा पोलादी निर्णय घेतले जातात. अपेक्षित परिणाम घडवून दाखवले जातात. जेव्हा पाकिस्तानात दहशतीच्या अड्ड्यांवर भारताच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. भारताच्या ड्रोन्सनी हल्ला केला...तेव्हा दहशतवादी संघटनांच्या केवळ इमारतीच नाही, तर त्यांचं धैर्यही डळमळीत झालं. बहावलपूर आणि मुरीदके यासारखे दहशतवाद्यांचे तळ, एक प्रकारे जागतिक दहशतवादाची विद्यापीठं बनली होती. जगात कुठेही जे मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत...मग तो नाइन इलेव्हन असो. कींवा लंडन ट्यूब बॉंबिंग्स असोत किंवा भारतात अनेक दशकांत जे मोठमोठे दहशतवादी हल्ले झाले. त्यांचे धागेदोरे दहशतीच्या या तळांशी कुठे ना कुठे जोडलेले दिसत आले आहेत. दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींच्या कपाळीचं कुंकू पुसलं म्हणून भारताने दहशतीची ही मुख्यालयं पुसून टाकली. भारताच्या या हल्ल्यांमध्ये शंभराहून अधिक क्रूरकर्मा दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलं. दहशतवाद्यांचे कित्येक म्होरके आश्रयदाते गेल्या अडीच तीन दशकांपासून पाकिस्तानात राजरोस फिरत होते, जे भारताविरुद्ध कारस्थानं करत होते त्यांना भारतानं एका झटक्यात संपवलं आहे.

मित्रहो,

भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान घोर निराशेच्या खाईत ढकलला गेला होता. कमालीचा हताश झाला होता. बिथरला होता आणि याच बिथरलेपणाच्या भावनेतून त्यानं आणखी एक दुःसाहस केलं. दहशतवादाविरोधात भारताच्या कारवाईला साथ देण्याऐवजी पाकिस्ताननं भारतावरच हल्ला करायला सुरुवात केली. पाकिस्ताननं आपल्या शाळा-महाविद्यालयांना गुरुद्वारांना मंदिरांना सामान्य नागरिकांच्या घरांना लक्ष्य केलं. पाकिस्ताननं आपल्या सैनिकी तळांना लक्ष्य केलं. पण यातही पाकिस्तानचा बुरखा गळून पडला. जगानं हे पाहिलं की पाकिस्तानचे ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रं भारतासमोर काड्या काटक्यांसारखी कशी उधळली गेली. भारताचा सशक्त हवाई संरक्षण प्रणालीनं त्यांना आकाशातच नष्ट करून टाकलं. पाकिस्ताननं सीमेवर वार करण्याची तयारी केली होती. पण भारताने पाकिस्तानच्या छातीवरच प्रहार केला. भारताचे ड्रोन्स भारताच्या क्षेपणास्त्रांनी अतिशय अचूक हल्ला केला. पाकिस्तानी वायुदलाच्या त्याच हवाई तळांची हानी केली, ज्यांच्याबद्दल पाकिस्तानला फारच घमेंड होती. भारताने पहिल्या तीन दिवसांतच पाकिस्तानला इतकं उध्वस्त केलं ज्याचा त्याला अंदाजही नव्हता. म्हणूनच तर भारताच्या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्ताननं सुटकेचे मार्ग शोधायला सुरुवात केली. पाकिस्तान जगाकडे तणाव कमी करण्यासाठी विनंतीची याचना करत होता आणि जबरदस्त मार खाल्ल्यानंतर, १० मे रोजी दुपारी, पाकिस्तानी सैन्यानं आपल्या डीजीएमओ शी संपर्क साधला. तोपर्यंत आपण दहशतवादाला पोसणाऱ्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात नष्ट केल्या होत्या. दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलं होतं, पाकिस्तानने अगदी हृदयाशी बाळगलेल्या दहशतवादी तळांना आपण उध्वस्त केलं होतं. म्हणूनच जेव्हा पाकिस्तानकडून विनंतीची याचना करण्यात आली. जेव्हा पाकिस्तानकडून हे सांगण्यात आलं की त्यांच्याकडून यापुढे दहशतवादी कारवाया आणि लष्करी दुःसाहस होणार नाही. तेव्हा भारतानही त्यावर विचार केला. आणि मी पुन्हा सांगतो. आपण पाकिस्तानमधील दहशतवादी आणि लष्करी तळांविरुद्धची आपली प्रत्युत्तरात्मक कारवाई सध्या फक्त स्थगित केली आहे. येत्या काळात आम्ही पाकिस्तानचे प्रत्येक पाऊल या निकषावर पारखू...की तो नेमका कोणता दृष्टिकोन स्वीकारतो?

मित्रांनो,

भारताची तिन्ही सैन्यदलं आपलं हवाई दल आपलं भूदल आणि आपलं नौदल आपलं सीमा सुरक्षा दल – बीएसएफ, भारताची निमलष्करी दलं सातत्यानं सतर्क आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक नंतर आता ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्ध भारताचं धोरण आहे. ऑपरेशन सिंदूरनं दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक नवीन रेषा आखली आहे. एक नवीन मानक, एक नवीन उदाहरण, घालून दिलं आहे. पहिले- जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. आपण आपल्या पद्धतीनं, आपल्या स्वतःच्या अटींनिशी प्रतिसाद देऊ. दहशतवादाची मुळे जिथे जिथे उगम पावत असतील तिथे तिथे जाऊन आम्ही कठोर कारवाई करू. दुसरे - भारत कोणत्याही आण्विक ब्लॅकमेलला भीतीच्या बागुलबुवाला भीक घालणार नाही. आण्विक ब्लॅकमेलच्या आडून फोफावणाऱ्या दहशतवादी अड्ड्यांवर भारत अचूक आणि निर्णायक हल्ला करेल. तिसरे म्हणजे, दहशतवादाला आश्रय देणारं सरकार आणि दहशतवादाचे सूत्रधार, यांना आपण वेगवेगळे घटक समजणार नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगानं पुन्हा एकदा पाकिस्तानचं घृणास्पद सत्य अनुभवलं. जेव्हा मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पाकिस्तानी सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उडाउडी पडली. एखादा देश पुरस्कृत करत असलेल्या दहशतवादाचा…हा जिवंत पुरावा आहे. आपण भारत आणि आपल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी सातत्यानं निर्णायक पावलं उचलत राहू.

मित्रानो,

रणागणांत प्रत्येकवेळी आपण पाकिस्तानवर मात केली आहे आणि यावेळी ऑपरेशन सिंदूरनं नवा आयाम स्थापित केला आहे. आपण वाळवंट आणि पर्वतीय भागातही आपल्या क्षमतेचं शानदार प्रदर्शन केलं आणि सोबतच नव्या पिढीच्या आधुनिक युध्दनीतीतही आपलं श्रेष्‍ठत्व सिध्द केलं. या ऑपरेशन दरम्यान, आपली मेड इन इंडिया शस्त्र प्रमाणांच्या कसोटीवर खरी उतरली. आज जग पाहत आहे, एकविसाव्या शतकाच्या युध्दनीतीत मेड इन इंडिया संरक्षण उत्पादनांची वेळ आली आहे.

मित्रानों,

प्रत्येक प्रकारच्या दहशतवादा विरोधात आपल्या सगळयाची एकजूट आपली सर्वात मोठी शक्ती आहे. निश्चितच हे युग युध्दाचं नाही, परंतु हे युग दहशतवादाचंही नाही. दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णूता ही एका चांगल्या जगाची हमी आहे.

मित्रानों,

पाकिस्तानी सैन्य पाकिस्तानचं सरकार ज्याप्रकारे दहशतवादाला खतपाणी घालत आहे. तो एकदिवस पाकिस्तानलाच संपवून टाकेल. पाकिस्तानला यातून वाचायचं असेल तर, त्याला आपल्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट कराव्या लागतील. याशिवाय, शांततेचा दुसरा मार्ग नाही. भारताचं मत एकदम स्पष्ट आहे. दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाहीत. दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाहीत आणि पाणी आणि रक्त हे देखील एकत्र वाहू शकत नाही. मला आज जागतिक समुदायाला सांगायचं आहे. आमचं जाहीर धोरण राहिलं आहे, पाकिस्तानशी चर्चा होईल तर दहशतवादावर होईल. पाकिस्तानशी चर्चा होईल तर पाकव्याप्त काश्मीरवर होईल.

प्रिय देशवासीयांनो, आज बुध्दपौर्णिमा आहे. भगवान बुध्दांनी आपल्याला शांततेचा मार्ग दाखवला आहे. शांततेचा मार्गही शक्तीमार्गेच जातो. मानवता, शांतता आणि समृध्दीकडे अग्रेसर व्हावं. प्रत्येक भारतीयाला शांततेनं जगता यावं, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करता यावं, यासाठी भारताचं शक्तीशाली होणं गरजेचं आहे आणि आवश्यकता असेल तेव्हा, या शक्तीचा वापरही गरजेचा आहे आणि गेल्या काही दिवसात भारतानं हेच केलं आहे. मी पुन्हा एकदा भारताचं सैन्य आणि सशस्त्रदलांना सलाम करतो. आपण भारतीयांच्या उमेद आणि एकजूटीला वंदन करतो.

धन्यवाद.

भारतमाता की जय.