Quote“काशीला ज्ञान, कर्तव्य आणि सत्य यांचा खजिना मानले जाते आणि खरोखरच ती भारताची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक राजधानी आहे”
Quote“आम्हा भारतीयांना आमच्या चिरंतन आणि विविधतेच्या वारशाचा अभिमान आहे. आमच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाला देखील अतिशय जास्त महत्त्व देतो.”
Quote“युगे युगीन भारत’ हे राष्ट्रीय संग्रहालय पूर्ण झाल्यावर भारताचा 5000 वर्षांचा इतिहास आणि संस्कृती उलगडून दाखवणारे जगातील सर्वात मोठे संग्रहालय ठरेल”
Quote“अमूर्त वारसा हा केवळ भौतिक मूल्यापुरता मर्यादित नाही तर तो देशाचा इतिहास आणि ओळख आहे”
Quote“आर्थिक वृद्धी आणि विविधतेसाठी वारसा ही एक बहुमोल मालमत्ता आहे आणि भारताच्या ‘विकास भी विरासत भी’ या मंत्रातून तो ध्वनित होत आहे.
Quote“भारताचा राष्ट्रीय डिजिटल जिल्हा संग्रह, स्वातंत्र्य संग्रामातील गाथांचा नव्याने शोध घेण्यासाठी मदत करत आहे”
Quote“सांस्कृतिक कार्यगट ‘कल्चर, क्रिएटिव्हिटी, कॉमर्स आणि कोलॅबोरेशन’ या चार ‘सी’ चे महत्त्व प्रतिबिंबित करत आहे”

नमस्कार!

काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाराणसीमध्ये आपले स्वागत आहे. माझा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये तुमची बैठक होत आहे याचा मला आनंद होत आहे. काशी हे केवळ जगातील सर्वात जुने जिवंत शहर नाही. येथून सारनाथ फार दूर नाही, जिथे भगवान बुद्धांनी पहिला उपदेश केला होता.काशीला ‘विज्ञान, धर्म आणि सत्यराशि’चे शहर असे म्हटले जाते. ज्ञान, कर्तव्य आणि सत्याचा खजिना. ही खरोखरच भारताची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक राजधानी आहे.मला आशा आहे की, तुम्ही तुमच्या कार्यक्रमातून गंगा आरती पाहण्यासाठी, सारनाथला भेट देण्यासाठी आणि काशीच्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी थोडा वेळ ठेवला असेल.

 

महामहिम,

संस्कृतीत एकत्र येण्याची उपजत क्षमता असते. हे आपल्याला विविध पार्श्वभूमी आणि दृष्टीकोन समजून घेण्यास सक्षम करते. आणि म्हणूनच, तुमचे कार्य संपूर्ण मानवतेसाठी खूप महत्त्वाचे आहे. आम्हाला भारतातील आमच्या शाश्वत आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अभिमान आहे. आम्ही आमच्या अमूर्त सांस्कृतिक वारशालाही खूप महत्त्व देतो. आम्ही आमच्या वारसास्थळांचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत. केवळ राष्ट्रीय स्तरावरच नाही तर भारतातील सर्व गावांच्या स्तरावरही आम्ही आमच्या सांस्कृतिक संपदा आणि कलाकारांचे मॅपिंग केले आहे. आम्ही आमची संस्कृती अधोरेखित करण्यासाठी अनेक केंद्रे देखील तयार करत आहोत. त्यातील प्रमुख म्हणजे देशाच्या विविध भागांतील आदिवासी संग्रहालये. नवी दिल्लीत आमच्याकडे पंतप्रधानांचे संग्रहालय आहे. भारताचा लोकशाही वारसा दाखवणारा हा एक प्रकारचा प्रयत्न आहे. आम्ही ‘युगे युगीन भारत’ राष्ट्रीय संग्रहालयही बांधत आहोत. एकदा पूर्ण झाल्यानंतर, ते जगातील सर्वात मोठे संग्रहालय म्हणून उभे राहील. यात भारताचा 5000 वर्षांचा इतिहास आणि संस्कृती प्रदर्शित केली जाईल.

 

महामहिम,

सांस्कृतिक संपदेला पूर्वस्थितीत आणणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि, या संदर्भात तुमच्या प्रयत्नांचे मी स्वागत करतो. शेवटी, मूर्त वारसा केवळ भौतिक मूल्याचा नाही. तर हा राष्ट्राचा इतिहास आणि ओळखही आहे. प्रत्येकाला त्यांच्या सांस्कृतिक वारशापर्यंत पोहोचण्याचा आणि त्याचा आनंद घेण्याचा अधिकार आहे. 2014 पासून, भारताने अशा शेकडो कलाकृती परत आणल्या आहेत ज्या आपल्या प्राचीन संस्कृतीचे वैभव दर्शवतात.

‘जिवंत वारसा’ आणि ‘जीवनासाठी ’ यामधील तुमच्या योगदानाचीही मी प्रशंसा करतो. शेवटी, सांस्कृतिक वारसा म्हणजे केवळ दगडात बांधलेली गोष्ट नाही तर पिढ्यानपिढ्या सुपूर्द केलेल्या परंपरा, चालीरीती आणि सणही आहेत. मला विश्वास आहे की तुमचे प्रयत्न शाश्वत पद्धती आणि जीवनशैलीला चालना देतील.

 

महामहिम,

आमचा विश्वास आहे की ,आर्थिक वृद्धी आणि विविधतेसाठी वारसा ही एक महत्त्वाची संपत्ती आहे. ‘विकास भी विरासत भी’- विकासही आणि वारसाही या आमच्या मंत्रातही हे प्रतिबिंबित होत आहे. भारताला त्याच्या 2,000 वर्ष जुन्या हस्तकला वारशाचा अभिमान आहे, जवळजवळ 3,000 अद्वितीय कला आणि हस्तकला आहेत. आमचा ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ उपक्रम आत्मनिर्भरता वाढवताना भारतीय कलाकुसरीचे वेगळेपण दाखवतो. सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योगांना चालना देण्यासाठी तुमचे प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत. हे सर्वसमावेशक आर्थिक विकास सुलभ करेल तसेच सर्जनशीलता आणि नवोन्मेषला पाठबळ देईल. येत्या महिन्याभरात भारतात पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे. 1.8 अब्ज डॉलर्सच्या प्रारंभिक खर्चासह, ही योजना पारंपरिक कारागिरांना सहाय्यकारी ठरणारी व्यवस्था तयार करेल. हे त्यांना त्यांची कलाकुसर समृद्ध करण्यास सक्षम करेल आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यात योगदान देईल.

 

मित्रांनो,

संस्कृती साजरी करण्यासाठी तंत्रज्ञान हे महत्त्वाचे सहयोगी आहे. भारतात, आमच्याकडे राष्ट्रीय डिजिटल जिल्हा भांडार आहे. आमच्या स्वातंत्र्यलढ्याच्या कथा पुन्हा शोधण्यासाठी मदत होत आहे. आमच्या सांस्कृतिक खुणा चांगल्या प्रकारे जतन करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. आमची सांस्कृतिक ठिकाणे अधिक पर्यटक स्नेही बनवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत.

 

महामहिम,

तुमच्या समूहाने ‘कल्चर युनिट्स ऑल’ ही मोहीम सुरू केली याचा मला आनंद आहे. हे वसुधैव कुटुंबकम - एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या भावनेशी सुसंगत आहे.

मूर्त परिणामांसह जी20 कृती आराखड्याला आकार देण्यासाठी तुम्ही बजावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची मी प्रशंसा करतो. संस्कृती (Culture), सर्जनशीलता (Creativity), वाणिज्य (Commerce),आणि सहयोग (Collaboration) या चार 'सी'चे महत्त्व तुमचे कार्य प्रतिबिंबित करते. हे आपल्याला करुणामय, सर्वसमावेशक आणि शांततापूर्ण भविष्य निर्माण करण्यासाठी संस्कृतीच्या सामर्थ्याचा उपयोग करण्यास सक्षम करेल.अत्यंत फलदायी आणि यशस्वी बैठकीसाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.

धन्यवाद!

 

  • Jitendra Kumar May 27, 2025

    🙏🙏🙏
  • कृष्ण सिंह राजपुरोहित भाजपा विधान सभा गुड़ामा लानी November 21, 2024

    जय श्री राम 🚩 वन्दे मातरम् जय भाजपा विजय भाजपा
  • Devendra Kunwar October 08, 2024

    BJP
  • दिग्विजय सिंह राना September 20, 2024

    हर हर महादेव
  • JBL SRIVASTAVA May 27, 2024

    मोदी जी 400 पार
  • Vaishali Tangsale February 12, 2024

    🙏🏻🙏🏻🙏🏻
  • ज्योती चंद्रकांत मारकडे February 11, 2024

    जय हो
  • Uma tyagi bjp January 28, 2024

    जय श्री राम
  • CHANDRA KUMAR September 04, 2023

    G 20 सम्मेलन भारत के नेतृत्वकर्ता को, वैश्विक राजनीति को प्रभावित करने के लिए, विश्व से आए हुए नेताओं के बीच निम्न प्रस्ताव रखना चाहिए : 1. तिब्बत और ताइवान को एक स्वतंत्र देश का मान्यता दिया जाए। 2. तिब्बत रिजर्व बैंक की स्थापना न्यूयॉर्क में किया जाए। 3. चीन ने तिब्बत की सभ्यता संस्कृति को नष्ट करके वहां से प्राकृतिक और मानव संसाधन का दोहन और शोषण किया है। 4. अतः चीन को दंडित करते हुए, चीन के द्वारा अमेरिका में किए गए तीन ट्रिलियन डॉलर के निवेश को, तिब्बत रिजर्व बैंक में स्थानांतरित कर दिया जाए। 5. तिब्बत का नया संविधान और नया प्रतिनिधि लोकतांत्रिक तरीके से चुना जाए, जिसका मुख्यालय भारत में होगा, लेकिन उसका कार्य विश्व के सभी तिब्बतियों को राजनीतिक सुरक्षा, शिक्षा और स्वास्थ्य पहुंचाना होगा। 6. विश्व के सभी देश तिब्बत और ताइवान को राजनीतिक संरक्षण प्रदान करके, स्वतंत्र देश का मान्यता देगा। 7. इससे चीन के आक्रामकता को नियंत्रित करना संभव हो सकेगा। क्योंकि चीन का बड़ा भूभाग उससे अलग राजनीतिक ईकाई बनने की ओर अग्रसर हो जायेगा। तथा चीन का तीन ट्रिलियन डॉलर, निर्वासित तिब्बतियों के हित में इस्तेमाल होने लगेगा। इससे चीन का आर्थिक नुकसान होगा और चीन के आक्रामक सैन्यीकरण को गहरा धक्का लगेगा। 8. विश्व में चीन द्वारा फैलाई जा रही अशांति तथा अस्थिरता को टाला जा सकेगा। 9. भारत एशिया का महाशक्ति बन जायेगा जो चीन को नियंत्रित करने का सोच और सामर्थ्य रखता है। 10. देश के नागरिकों में यह संदेश जायेगा की मोदीजी चीन को नियंत्रित कर सकता है और विश्व के सभी देश मोदीजी को अपना नेतृत्व कर्ता मानता है। चीन और रूस G20 सम्मेलन में नहीं आ रहा है, इसका राजनीतिक फायदा भारतीय राजनेताओं को अवश्य उठाना चाहिए और अपना राजनीतिक कद बढ़ाना चाहिए।
  • Mintu Kumar September 01, 2023

    नमस्कार सर, मैं कुलदीप पिता का नाम स्वर्गीय श्री शेरसिंह हरियाणा जिला महेंद्रगढ़ का रहने वाला हूं। मैं जून 2023 में मुम्बई बांद्रा टर्मिनस रेलवे स्टेशन पर लिनेन (LILEN) में काम करने के लिए गया था। मेरी ज्वाइनिंग 19 को बांद्रा टर्मिनस रेलवे स्टेशन पर हुई थी, मेरा काम ट्रेन में चदर और कंबल देने का था। वहां पर हमारे ग्रुप 10 लोग थे। वहां पर हमारे लिए रहने की भी कोई व्यवस्था नहीं थी, हम बांद्रा टर्मिनस रेलवे स्टेशन पर ही प्लेटफार्म पर ही सोते थे। वहां पर मैं 8 हजार रूपए लेकर गया था। परंतु दोनों समय का खुद के पैसों से खाना पड़ता था इसलिए सभी पैसै खत्म हो गऍ और फिर मैं 19 जुलाई को बांद्रा टर्मिनस से घर पर आ गया। लेकिन मेरी सैलरी उन्होंने अभी तक नहीं दी है। जब मैं मेरी सैलरी के लिए उनको फोन करता हूं तो बोलते हैं 2 दिन बाद आयेगी 5 दिन बाद आयेगी। ऐसा बोलते हुए उनको दो महीने हो गए हैं। लेकिन मेरी सैलरी अभी तक नहीं दी गई है। मैंने वहां पर 19 जून से 19 जुलाई तक काम किया है। मेरे साथ में जो लोग थे मेरे ग्रुप के उन सभी की सैलरी आ गई है। जो मेरे से पहले छोड़ कर चले गए थे उनकी भी सैलरी आ गई है लेकिन मेरी सैलरी अभी तक नहीं आई है। सर घर में कमाने वाला सिर्फ मैं ही हूं मेरे मम्मी बीमार रहती है जैसे तैसे घर का खर्च चला रहा हूं। सर मैंने मेरे UAN नम्बर से EPFO की साइट पर अपनी डिटेल्स भी चैक की थी। वहां पर मेरी ज्वाइनिंग 1 जून से दिखा रखी है। सर आपसे निवेदन है कि मुझे मेरी सैलरी दिलवा दीजिए। सर मैं बहुत गरीब हूं। मेरे पास घर का खर्च चलाने के लिए भी पैसे नहीं हैं। वहां के accountant का नम्बर (8291027127) भी है मेरे पास लेकिन वह मेरी सैलरी नहीं भेज रहे हैं। वहां पर LILEN में कंपनी का नाम THARU AND SONS है। मैंने अपने सारे कागज - आधार कार्ड, पैन कार्ड, बैंक की कॉपी भी दी हुई है। सर 2 महीने हो गए हैं मेरी सैलरी अभी तक नहीं आई है। सर आपसे हाथ जोड़कर विनती है कि मुझे मेरी सैलरी दिलवा दीजिए आपकी बहुत मेहरबानी होगी नाम - कुलदीप पिता - स्वर्गीय श्री शेरसिंह तहसील - कनीना जिला - महेंद्रगढ़ राज्य - हरियाणा पिनकोड - 123027
Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
270 million pulled out of poverty! How Modi government achieved a remarkable dip in extreme poverty & what’s the road ahead? Explained

Media Coverage

270 million pulled out of poverty! How Modi government achieved a remarkable dip in extreme poverty & what’s the road ahead? Explained
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 10 जून 2025
June 10, 2025

Citizens Appreciate India’s Growth as Defence Exports Through Reforms under leadership of PM Modi