Quote"देशाची क्रीडा परंपरा पुढे नेण्यात ईशान्येकडची राज्ये आणि मणिपूरचे महत्त्वपूर्ण योगदान"
Quote"देशाच्या सांस्कृतिक विविधतेमध्ये "ईशान्य क्षेत्र नवीन रंग भरते आणि देशाच्या क्रीडा विविधतेला नवीन आयाम प्रदान करते"
Quote“कोणत्याही चिंतन शिबिराची सुरुवात चिंतनातून होते, मननातून त्याला गती मिळते आणि क्रियान्वयनातून पूर्णत्वास जाते"
Quote“तुम्हाला प्रत्येक स्पर्धेनुसार क्रीडा पायाभूत सुविधा आणि क्रीडा प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करावे लागेल.तुम्हाला अल्प-मुदतीची,मध्यम-मुदतीची आणि दीर्घकालीन उद्दिष्टेही ठरवावी लागतील”
Quote“क्रीडा पायाभूत सुविधांशी संबंधित 400 कोटींहून अधिक किमतीचे प्रकल्प आज ईशान्य क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देत आहेत”

कार्यक्रमात सहभागी होत असलेले केंद्रीय मंत्रिमडळातील माझे सहकारी अनुराग ठाकूरजी, सर्व राज्यांचे युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री, इतर मान्यवर आणि स्त्री-पुरषहो,

देशाच्या क्रीडामंत्र्यांची ही परिषद, हे चिंतन शिबिर मणीपूरच्या भूमीवर होत आहे याचा मला अतिशय आनंद होत आहे. ईशान्येमधून उदयाला आलेल्या कित्येक खेळाडूंनी तिरंग्याचा मान वाढवला आहे, देशासाठी पदके जिंकली आहेत. देशाची क्रीडा परंपरा पुढे नेण्यामध्ये ईशान्य भागाचे आणि मणीपूरचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. येथील सगोल कांगजई, थांग-ता, युबी लाक्पी, मुक्ना आणि हियांग तान्नबा सारखे स्वदेशी खेळ, जे स्वतःच खूपच आकर्षक आहेत. म्हणजे जेव्हा आपण मणीपूरचा ऊ-लावबी पाहतो त्यावेळी आपल्याला त्यामध्ये कबड्डीची झलक दिसते. येथील हियांग तान्नबा केरळच्या बोट रेसची आठवण करून देतो आणि पोलो या खेळाशी देखील मणीपूरचा ऐतिहासिक संबंध राहिला आहे. म्हणजेच, ज्या प्रकारे ईशान्य भाग देशाच्या सांस्कृतिक विविधतेमध्ये नवे रंग भरत असतो, त्याच प्रकारे देशाच्या क्रीडा विविधतेला देखील नवे आयाम देत आहे.  देशभरातून आलेले क्रीडामंत्री मणीपूरकडून बरेच काही शिकून जातील अशी मला अपेक्षा आहे आणि मणीपूरच्या लोकांचे प्रेम, त्यांचा पाहुणचार, तुमच्या प्रवासाला आणखी आनंददायी बनवेल, अशी मला खात्री आहे. मी या चिंतन शिबिरात सहभागी होत असलेल्या सर्व क्रीडामंत्र्यांचे, इतर मान्यवरांचे स्वागत करतो, अभिनंदन करतो.

मित्रहो,

कोणतेही चिंतन शिबिर, चिंतनाने सुरू होते, मननासह पुढे जाते आणि क्रियान्वयनावर पूर्ण होते. म्हणजेच, first comes reflection, then realisation and then implementation and action. म्हणूनच, या चिंतन शिबिरात तुम्हाला भविष्यातील उद्दिष्टांवर विचारविनिमय करायचा आहेच, त्याचबरोबर यापूर्वी झालेल्या परिषदेचा आढावा देखील घ्यायचा आहे. तुम्हाला सर्वांना आठवत असेलच यापूर्वी आपण जेव्हा 2022 मध्ये केवडिया येथे भेटलो होतो, त्यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली होती. भविष्याला विचारात घेऊन एक आराखडा तयार करण्याबाबत आणि खेळांच्या कल्याणासाठी एक पोषक व्यवस्था निर्माण करण्याबाबत सहमती व्यक्त केली होती. क्रीडा क्षेत्रामध्ये केंद्र सरकार आणि राज्यांदरम्यान सहभाग वाढवण्याबाबत बोललो होतो. आता इंफाळ मध्ये तुम्ही सर्व नक्कीच या गोष्टीचा आढावा घ्या की या दिशेने आपण किती प्रगती केली आहे. आणि मी तुम्हाला हे सांगेन की हा आढावा केवळ धोरण आणि कार्यक्रमांच्या पातळीवरच होता कामा नये. तर हा आढावा पायाभूत सुविधा विकासावर असला पाहिजे, गेल्या एका वर्षातील क्रीडाविषयक कामगिरीसंदर्भात देखील असला पाहिजे.

मित्रहो,

ही गोष्ट खरी आहे की गेल्या एका वर्षात भारतीय ऍथलीट्स आणि खेळाडूंनी अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये अभूतपूर्व कामगिरी केली आहे. आपल्याला या कामगिरींचा आनंद साजरा करतानाच याचा देखील विचार केला पाहिजे की आपल्याला आपल्या खेळाडूंची जास्तीत जास्त मदत कशा प्रकारे करता येऊ शकते. येणाऱ्या काळात, स्क्वाश विश्व चषक, हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी, आशियायी युवा आणि कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धा, अशा स्पर्धांच्या आयोजनामध्ये तुमची मंत्रालये आणि तुमच्या विभागाच्या तयारीचा कस लागणार आहे. ठीक आहे, खेळाडू आपली तयार करत आहेत, पण आता क्रीडा स्पर्धांबाबत आपल्या मंत्रालयांना देखील वेगळा दृष्टीकोन ठेवून काम करावे लागणार आहे. म्हणजे ज्या प्रकारे फूटबॉल आणि हॉकी सारख्या खेळांमध्ये man to man marking करण्यात येते, त्या प्रकारे तुम्ही सर्वांनी देखील  Match to Match मार्किंग केली पाहिजे. प्रत्येक स्पर्धेसाठी वेगळी रणनीती बनवली पाहिजे. तुम्ही प्रत्येक स्पर्धेच्या हिशोबाने क्रीडा पायाभूत सुविधा, क्रीडा प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुम्ही short term, medium term आणि long term goals देखील निर्धारित केले पाहिजेत.

मित्रहो,

खेळांचे आणखी एक वैशिष्ट्य असते. एकट्याने कोणताही खेळाडू सतत सराव करून तंदुरुस्ती तर प्राप्त करू शकतो, पण चांगल्या कामगिरीसाठी सातत्याने त्याने खेळत राहणे देखील गरजेचे आहे. यासाठीच स्थानिक पातळीवर खेळाडूंमध्ये जास्तीत जास्त स्पर्धा असली पाहिजे, क्रीडा स्पर्धा असल्या पाहिजेत. यामुळे खेळाडूंना बरेच काही शिकायला मिऴेल. क्रीडामंत्री म्हणून तुम्ही हे सुनिश्चित केले पाहिजे की कोणतीही क्रीडा गुणवत्ता दुर्लक्षित राहणार नाही.

मित्रहो,

आपल्या देशातील प्रत्येक प्रतिभावंत खेळाडूला दर्जेदार क्रीडा पायाभूत सुविधा देणे आपल्या सर्वांचे दायित्व आहे. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एकत्र काम केले पाहिजे. खेलो इंडिया योजनेने जिल्हा स्तरावर क्रीडा पायाभूत सुविधांसंदर्भात नक्कीच काहीतरी चांगले काम केले आहे. पण आता या प्रयत्नांना आपल्याला तालुका स्तरावर घेऊन जायचे आहे. यामध्ये खाजगी क्षेत्रासहित सर्व हितधारकांची भागीदारी महत्त्वाची आहे. एक विषय राष्ट्रीय युवा महोत्सवाचा देखील आहे. याला जास्त प्रभावी बनवण्यासाठी नव्याने विचार केला गेला पाहिजे. राज्यांमध्ये जे अशा प्रकारचे कार्यक्रम होतात, ती केवळ औपचारिकता बनणार नाही, याकडे नक्कीच लक्ष दिले पाहिजे. ज्यावेळी चारी बाजूंनी अशा प्रकारचे प्रयत्न  होतील, तेव्हाच भारत क्रीडा क्षेत्रातील एक आघाडीचा देश म्हणून प्रस्थापित होऊ शकेल.

 मित्रहो,

खेळांसंदर्भात आज ईशान्येच्या राज्यांमध्ये जे काम होत आहे ते देखील तुमच्यासाठी एक मोठी प्रेरणा आहे. क्रीडा पायाभूत सुविधांशी संबंधित 400 कोटीपेक्षा जास्त प्रकल्प आज ईशान्येच्या विकासाला नवी दिशा देत आहेत.

इंफाळचे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आगामी काळात देशभरातील युवा वर्गाला नव्या संधी देईल. ‘खेलो इंडिया योजना’ आणि ‘टॉप्स’ सारख्या प्रयत्नांनी यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे. ईशान्येच्या प्रत्येक जिल्हयात कमीत कमी 2 खेलो इंडिया केंद्रे आणि प्रत्येक राज्यात खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. हे प्रयत्न क्रीडा विश्वात एका नव्या भारताचा पाया बनतील, देशाला एक वेगळी ओळख देतील. तुम्हाला आपापल्या राज्यांमध्ये देखील अशा प्रकारच्या कामांना गती द्यायची आहे. हे चिंतन शिबिर या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावेल, असा मला विश्वास आहे. याच विश्वासाने तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार!

 

  • कृष्ण सिंह राजपुरोहित भाजपा विधान सभा गुड़ामा लानी November 21, 2024

    जय श्री राम 🚩 वन्दे मातरम् जय भाजपा विजय भाजपा
  • दिग्विजय सिंह राना September 20, 2024

    हर हर महादेव
  • JBL SRIVASTAVA May 27, 2024

    मोदी जी 400 पार
  • Vaishali Tangsale February 12, 2024

    🙏🏻🙏🏻
  • ज्योती चंद्रकांत मारकडे February 11, 2024

    जय हो
  • B.Lakshmana April 25, 2023

    It is said average age of youth in INDIAis ten years younger than CHINA.INDIA is bubbling with young and energetic youths.Their strength should be properly tapped and utilised to make MADE IN INDIA a grand success.
  • Bibekananda Mahanta April 25, 2023

    🚩🙏ଜୟ ଶ୍ରୀ ରାମ 🙏🚩
  • Nagendra Kumar Voruganty April 25, 2023

    JAI BJP and MODIJI
  • Anil Mishra Shyam April 25, 2023

    Ram Ram 🙏🙏 g
  • Kuldeep Yadav April 25, 2023

    આદરણીય પ્રધામંત્રીશ્રી નરેન્દ્ર મોદીજી ને મારા નમસ્કાર મારુ નામ કુલદીપ અરવિંદભાઈ યાદવ છે. મારી ઉંમર ૨૪ વર્ષ ની છે. એક યુવા તરીકે તમને થોડી નાની બાબત વિશે જણાવવા માંગુ છું. ઓબીસી કેટેગરી માંથી આવતા કડીયા કુંભાર જ્ઞાતિના આગેવાન અરવિંદભાઈ બી. યાદવ વિશે. અમારી જ્ઞાતિ પ્યોર બીજેપી છે. છતાં અમારી જ્ઞાતિ ના કાર્યકર્તાને પાર્ટીમાં સ્થાન નથી મળતું. એવા એક કાર્યકર્તા વિશે જણાવું. ગુજરાત રાજ્ય ના અમરેલી જિલ્લામાં આવેલ સાવરકુંડલા શહેર ના દેવળાના ગેઈટે રહેતા અરવિંદભાઈ યાદવ(એ.બી.યાદવ). જન સંઘ વખત ના કાર્યકર્તા છેલ્લાં ૪૦ વર્ષ થી સંગઠનની જવાબદારી સંભાળતા હતા. ગઈ ૩ ટર્મ થી શહેર ભાજપના મહામંત્રી તરીકે જવાબદારી કરેલી. ૪૦ વર્ષ માં ૧ પણ રૂપિયાનો ભ્રષ્ટાચાર નથી કરેલો અને જે કરતા હોય એનો વિરોધ પણ કરેલો. આવા પાયાના કાર્યકર્તાને અહીંના ભ્રષ્ટાચારી નેતાઓ એ ઘરે બેસાડી દીધા છે. કોઈ પણ પાર્ટીના કાર્યકમ હોય કે મિટિંગ એમાં જાણ પણ કરવામાં નથી આવતી. એવા ભ્રષ્ટાચારી નેતા ને શું ખબર હોય કે નરેન્દ્રભાઇ મોદી દિલ્હી સુધી આમ નમ નથી પોચિયા એની પાછળ આવા બિન ભ્રષ્ટાચારી કાર્યકર્તાઓ નો હાથ છે. આવા પાયાના કાર્યકર્તા જો પાર્ટી માંથી નીકળતા જાશે તો ભવિષ્યમાં કોંગ્રેસ જેવો હાલ ભાજપ નો થાશે જ. કારણ કે જો નીચે થી સાચા પાયા ના કાર્યકર્તા નીકળતા જાશે તો ભવિષ્યમાં ભાજપને મત મળવા બોવ મુશ્કેલ છે. આવા ભ્રષ્ટાચારી નેતાને લીધે પાર્ટીને ભવિષ્યમાં બોવ મોટું નુકશાન વેઠવું પડશે. એટલે પ્રધામંત્રીશ્રી નરેન્દ્ર મોદીજી ને મારી નમ્ર અપીલ છે કે આવા પાયા ના અને બિન ભ્રષ્ટાચારી કાર્યકર્તા ને આગળ મૂકો બાકી ભવિષ્યમાં ભાજપ પાર્ટી નો નાશ થઈ જાશે. એક યુવા તરીકે તમને મારી નમ્ર અપીલ છે. આવા કાર્યકર્તાને દિલ્હી સુધી પોચડો. આવા કાર્યકર્તા કોઈ દિવસ ભ્રષ્ટાચાર નઈ કરે અને લોકો ના કામો કરશે. સાથે અતિયારે અમરેલી જિલ્લામાં બેફામ ભ્રષ્ટાચાર થઈ રહીયો છે. રોડ રસ્તા ના કામો સાવ નબળા થઈ રહિયા છે. પ્રજાના પરસેવાના પૈસા પાણીમાં જાય છે. એટલા માટે આવા બિન ભ્રષ્ટાચારી કાર્યકર્તા ને આગળ લાવો. અમરેલી જિલ્લામાં નમો એપ માં સોવ થી વધારે પોઇન્ટ અરવિંદભાઈ બી. યાદવ(એ. બી.યાદવ) ના છે. ૭૩ હજાર પોઇન્ટ સાથે અમરેલી જિલ્લામાં પ્રથમ છે. એટલા એક્ટિવ હોવા છતાં પાર્ટીના નેતાઓ એ અતિયારે ઝીરો કરી દીધા છે. આવા કાર્યકર્તા ને દિલ્હી સુધી લાવો અને પાર્ટીમાં થતો ભ્રષ્ટાચારને અટકાવો. જો ખાલી ભ્રષ્ટાચાર માટે ૩૦ વર્ષ નું બિન ભ્રષ્ટાચારી રાજકારણ મૂકી દેતા હોય તો જો મોકો મળે તો દેશ માટે શું નો કરી શકે એ વિચારી ને મારી નમ્ર અપીલ છે કે રાજ્ય સભા માં આવા નેતા ને મોકો આપવા વિનંતી છે એક યુવા તરીકે. બાકી થોડા જ વર્ષો માં ભાજપ પાર્ટી નું વર્ચસ્વ ભાજપ ના જ ભ્રષ્ટ નેતા ને લીધે ઓછું થતું જાશે. - અરવિંદ બી. યાદવ (એ.બી યાદવ) પૂર્વ શહેર ભાજપ મહામંત્રી જય હિન્દ જય ભારત જય જય ગરવી ગુજરાત આપનો યુવા મિત્ર લી.. કુલદીપ અરવિંદભાઈ યાદવ
Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
FSSAI trained over 3 lakh street food vendors, and 405 hubs received certification

Media Coverage

FSSAI trained over 3 lakh street food vendors, and 405 hubs received certification
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 ऑगस्ट 2025
August 11, 2025

Appreciation by Citizens Celebrating PM Modi’s Vision for New India Powering Progress, Prosperity, and Pride