सन्माननीय मान्यवर,

जगातील दक्षिणेकडील देशांचे नेते, नमस्कार! या शिखर परिषदेत तुमचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. जगाच्या विविध भागातून आमच्या सोबत जोडले गेल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. नवीन वर्षाच्या पहाटेच्या रुपात आपण भेटत आहोत, ती नवीन आशा आणि नवीन ऊर्जा घेऊन येत आहे.  2023 हे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या देशांना आनंदाचे तसेच परिपूर्णतेचे जावो अशा शुभेच्छा मी 1.3 अब्ज भारतीयांच्या वतीने देतो.

आपण काळाच्या प्रवासात आणखी एक कठीण वर्षाचे पान उलटले आहे, यात आपण पाहिले: युद्ध, संघर्ष, दहशतवाद आणि भू-राजकीय तणाव: अन्न, खते आणि इंधनाच्या वाढत्या किमती; हवामान-बदलामुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि कोविड महामारीचा दीर्घकालीन आर्थिक प्रभाव. हे स्पष्ट आहे की जग संकटात आहे. ही अस्थिरता किती काळ टिकेल हे सांगणे कठीण आहे.

सन्माननीय मान्यवर,

जगातील दक्षिणेकडील भागात, अर्थात आपल्यावर भविष्याच्या नजरा टिकून आहेत. तीन चतुर्थांश मानवी लोकसंख्या आपल्या देशात राहते. आपलाही आवाज बरोबरीचा असायला हवा. म्हणूनच, जागतिक प्रशासनाचे आठ दशके जुने प्रारुप हळूहळू बदलत असताना, आपण नव्याने विकसित व्यवस्थेला आकार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

सन्माननीय मान्यवर,

बहुतेक जागतिक आव्हाने जगातील दक्षिणेकडील भागामुळे निर्माण झालेली नाहीत. पण त्याचा परिणाम मात्र आपल्यावर जास्त होतो. कोविड महामारी, हवामान बदल, दहशतवाद आणि अगदी युक्रेन संघर्षाच्या प्रभावांमध्ये आपण हे पाहिले आहे. यावरील उपाय शोधण्यात देखील आपली भूमिका किंवा आपले म्हणणे याचे फार महत्व नाही.

सन्माननीय मान्यवर,

भारताने नेहमीच आपला विकासाचा अनुभव जगातील दक्षिणेकडील आपल्या बांधवांशी सामायिक केला आहे. आमची विकास भागीदारी सर्व भौगोलिक आणि विविध क्षेत्रांना सामावून घेते. महामारीच्या काळात आम्ही 100 हून अधिक देशांना औषधे आणि लसींचा पुरवठा केला. आपले समान भविष्य ठरवण्यासाठी भारताने नेहमीच विकसनशील देशांच्या पाठीशी ठामपणे उभी राहाण्याची भूमिका बजावली आहे.

सन्माननीय मान्यवर,

भारताच्या जी20 अध्यक्षपद कार्यकाळाला या वर्षी सुरुवात होत असल्यामुळे, जगातील दक्षिणेकडील देशांच्या आवाजाला महत्व देणे हे आमचे उद्दिष्ट स्वाभाविक आहे. आमच्या जी-20 अध्यक्षपदासाठी, आम्ही - "एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य" ही संकल्पना निवडली आहे. हे आमच्या सभ्यतेच्या आचारसंहितेशी सुसंगत आहे. 'एकता' साकारण्याचा मार्ग मानव-केंद्रित विकासाद्वारेच आहे यावर आमचा विश्वास आहे. जगातील दक्षिणेकडील लोकांना यापुढे विकासाच्या फळांपासून वगळले जाऊ नये. आपण एकत्रितपणे जागतिक राजकीय आणि आर्थिक प्रशासनाची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे असमानता दूर करू शकते, संधी वाढवू शकते, वाढीस पाठब देऊ शकते तसेच प्रगती आणि समृद्धी पसरवू शकते.

सन्माननीय मान्यवर,

जगात पुन्हा उत्साह भरण्यासाठी, आपण एकत्रितपणे ‘प्रतिसाद, मान्यता, आदर आणि सुधारणा’ या जागतिक जाहिरनाम्याची मागणी केली पाहिजे: एक समावेशक आणि संतुलित आंतरराष्ट्रीय जाहिरनामा तयार करून जगातील दक्षिणेकडील देशांच्या प्राधान्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. ‘सामान्य पण भिन्न जबाबदाऱ्या’ हे तत्त्व सर्व जागतिक आव्हानांना लागू होते हे मान्य करायला हवे. सर्व राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा आदर, कायद्याचे राज्य आणि मतभेद आणि विवादांचे शांततापूर्ण निराकरण; तसेच संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा करणे, त्यांना अधिक प्रासंगिक बनवणे यावर लक्ष दिले पहिजे.

सन्माननीय मान्यवर,

विकसनशील देश आव्हानांचा सामना करत असतानाही, येणारा काळ आपलाच आहे याबद्दल मी सकारात्मक आहे. आपला समाज आणि अर्थव्यवस्थेत क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणणाऱ्या सोप्या, व्यापक आणि शाश्वत उपयांचा शोध घेणे ही काळाची गरज आहे. असा दृष्टीकोन ठेवला तर गरीबी असो, जागतिक आरोग्य किंवा मानवी क्षमता बांधणी असो आपण कितीही कठीण आव्हानांवर मात करु शकतो. गेल्या शतकात परकीय सत्तेविरुद्धच्या आपल्या लढ्यात आपण परस्परांना पाठिंबा दिला होता. आपल्या नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करेल अशी नवी जागतिक व्यवस्था उभारण्यासाठी आपण या शतकातही हे पुन्हा करु शकतो.  

भारताच्या भूमिकेबद्दल सांगायचेच तर तुमचा आवाज हा भारताचा आवाज आहे. तुमची प्राथमिकता ही भारताची प्राथमिकता आहे. व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ समिटमधे येत्या दोन दिवसात प्राधान्याच्या आठ क्षेत्रांवर चर्चा होणार आहे. एकत्र मिळून जगातील दक्षिणेकडील देश नवीन आणि सृजनात्मक संकल्पना पुढे आणतील असा मला आत्मविश्वास आहे. या संकल्पना, जी -20 आणि इतर मंचावर आपल्या आवाजाचा आधार बनू शकतील. 

भारतात आम्ही प्रार्थना करतो- आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः. अर्थात, ब्रह्मांडातून सर्व दिशांनी उदात्त विचार आमच्यात येऊ देत. व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिट म्हणजे आपल्या सामूहिक भविष्यासाठी उदात्त विचार प्राप्त करण्याचा सामूहिक प्रयत्न आहे.

सन्माननीय मान्यवर,

तुमच्या कल्पना आणि विचार ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. सहभागी झाल्याबद्दल तुमचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.

धन्यवाद.

 

 

 

 

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Home-Cooked Vegetarian, Non-Vegetarian Thali Costs Drop In June: Report

Media Coverage

Home-Cooked Vegetarian, Non-Vegetarian Thali Costs Drop In June: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आलेले सर्वोच्च नागरी पुरस्कार
July 09, 2025

अनेक देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला आहे. त्यांच्या या गौरवात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे आणि दूरदृष्टीचे प्रतिबिंब दिसून येते. या पुरस्कारांमुळे जागतिक स्तरावर होत असलेल्या भारताच्या उदयाला अधिक बळ मिळाले आहे. जगभरातील देशांबरोबर भारताचे वृद्धिंगत होत असलेले संबंधही त्यातून प्रतीत होतात.

पंतप्रधान मोदींना गेल्या सात वर्षात प्रदान करण्यात आलेल्या विविध पुरस्कारांवर एक नजर टाकूया

विविध देशांनी दिलेले पुरस्कार

1. एप्रिल 2016 मध्येत्यांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यातपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किंग अब्दुलअझीझ सश- हा सौदी अरेबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. राजे सलमान बिन अब्दुलअजीज यांच्या हस्ते पंतप्रधानांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

|

2. त्याच वर्षीपंतप्रधान मोदींना स्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्ला खान – हा  अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविण्यात आले.

|

3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2018 मध्येपॅलेस्टाईनला ऐतिहासिक भेट दिली तेव्हा त्यांना ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परदेशातील मान्यवरांना दिला जाणारा हा पॅलेस्टाईनचा सर्वोच्च सन्मान आहे.

|

4. 2019 मध्येपंतप्रधानांना ऑर्डर ऑफ झायेद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

|

5. रशियाने पंतप्रधान मोदींना 2019 मध्ये त्यांचा - ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू पुरस्कार हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.

6. ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रुल ऑफ निशान इज्जुद्दीन- हा परदेशी मान्यवरांना देण्यात येणारा मालदीवचा सर्वोच्च सन्मान पंतप्रधान मोदींना 2019 मध्ये प्रदान करण्यात आला.

|

7. ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रुल ऑफ निशान इज्जुद्दीन- हा परदेशी मान्यवरांना देण्यात येणारा मालदीवचा सर्वोच्च सन्मान पंतप्रधान मोदींना 2019 मध्ये प्रदान करण्यात आला.

|

8. उत्कृष्ट सेवा आणि उल्लेखनीय कामगिरीतील यश तसेच गुणवत्तापूर्ण वर्तनासाठी अमेरिकेच्या सरकारद्वारे दिला जाणारा लीजन ऑफ मेरिट, हा अमेरिकेच्या सशस्त्र दलाचा पुरस्कार 2020 मध्ये पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आला.

9. भूतानने डिसेंबर 2021 मध्ये पंतप्रधान मोदींना ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो या  त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे.

अनेक देशांच्या सर्वोच्च नागरी सन्मानांव्यतिरिक्तजगभरातील अनेक प्रतिष्ठित संस्थांनीही पंतप्रधान मोदींचा विविध पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.

1. सोल शांतता पुरस्कार: मानवजातीमध्ये सुसंवादविविध राष्ट्रांमध्ये सलोखा निर्माण करण्यात तसेच जागतिक शांततेसाठी योगदान देऊन आपला ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींना सोल पीस प्राइज कल्चरल फाऊंडेशनच्यावतीने हा द्विवार्षिक पुरस्कार प्रदान केला जातो. 2018 मध्ये पंतप्रधान मोदींना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

|

2. युनायटेड नेशन्स चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार: हा संयुक्त राष्ट्रसंघाचा सर्वोच्च पर्यावरण सन्मान असून, UN ने 2018 मध्ये पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देऊन त्यांच्या धाडसी पर्यावरण नेतृत्वाला जागतिक मंचावरून कौतुकाची थाप दिली.

|

3. पंतप्रधान मोदींना 2019 मध्ये पहिला-वहिला फिलिप कोटलर राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरवर्षी एखाद्या देशाच्या नेत्याला हा पुरस्कार दिला जातो. “देशाचे उत्कृष्टरीत्या नेतृत्व” केल्याबद्दल पंतप्रधान मोदींची या पुरस्कारासाठी निवड झाली असल्याचे त्यांना पुरस्कारासोबत देण्यात आलेल्या मानपत्रात म्हटले होते.

|

4. ‘2019 मध्ये, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनतर्फे  पंतप्रधान मोदींना स्वच्छ भारत अभियानासाठी ग्लोबल गोलकीपर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. स्वच्छ भारत मोहिमेचे “लोक चळवळी”त रूपांतर करून दैनंदिन जीवनात स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या भारतीयांना पंतप्रधान मोदींनी हा पुरस्कार समर्पित केला होता. 

|

5. ‘2021 मध्ये, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनतर्फे  पंतप्रधान मोदींना स्वच्छ भारत अभियानासाठी ग्लोबल गोलकीपर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. स्वच्छ भारत मोहिमेचे “लोक चळवळी”त रूपांतर करून दैनंदिन जीवनात स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या भारतीयांना पंतप्रधान मोदींनी हा पुरस्कार समर्पित केला होता.