Quote"आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियासाठी अर्थसंकल्पात अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी"
Quote"तरुण आणि प्रतिभावान लोकसंख्याशास्त्रीय लाभांश, लोकशाही व्यवस्था, नैसर्गिक संसाधने यासारख्या सकारात्मक घटकांमुळे आपल्याला निर्धाराने मेक इन इंडियाकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन मिळायला हवे "
Quote“राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास आत्मनिर्भरता अधिक महत्त्वाची”
Quote"जग भारताकडे उत्पादनाचे केंद्र म्हणून पाहत आहे"
Quote"तुमची कंपनीत तयार होणाऱ्या उत्पादनांचा अभिमान बाळगा आणि तुमच्या भारतीय ग्राहकांमध्येही ही अभिमानाची भावना निर्माण करा"
Quote"तुम्हाला जागतिक दर्जा राखावा लागेल आणि जागतिक स्तरावर स्पर्धा देखील करावी लागेल"

नमस्कार!

या अर्थसंकल्पात ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ बाबत जे निर्णय घेतले गेले आहेत, ते आपल्या उद्योग आणि अर्थव्यवस्था, दोन्हीसाठी फार महत्वपूर्ण आहेत. मेक इन इंडिया मोहीम आज 21व्या शतकातील भारताची गरज देखील आहे आणि यामुळे आपल्याला जगात आपले सामर्थ्य दाखविण्याची संधी देखील मिळते. एखाद्या देशातून कच्चा माल बाहेर जातो आणि त्यापासून बनविलेल्या वस्तू आयात करतो, तर त्या देशासाठी हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरतो. दुसरीकडे, भारतासारखा विशाल देश केवळ एक बाजारपेठ बनून राहिला तर, भारत कधीच प्रगती करू शकणार नाही आणि तरुण पिढीला नव्या संधी देखील देऊ शकणार नाही. जागतिक पुरवठा साखळी कशी कोलमडून पडली, हे या महामारीच्या काळात आपण बघितलं आहे. आणि आता तर आपण खासकरून बघत आहोत, की पुरवठा साखळ्या कोलमडल्याने, संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था मुळापासून हादरून गेली आहे. जेव्हा आपण या सगळ्या नकारात्मक गोष्टी आपल्यासमोर बघतो, तेव्हा याचे दुसरे पैलू बघणे देखील महत्वाचे ठरते. इतकं मोठं संकट समोर उभं ठाकलं, आणि कधी ही परीस्थिती बदलली तर पूर्वी पेक्षा जास्त मेक इन इंडिया ची गरज भासू लागते. दुसरीकडे जर आपण बघितलं, कुठल्या सकारात्मक गोष्टी मेक इन इंडियाला प्रोत्साहन देतात. आपण संधी शोधू शकतो का? तुम्ही बघा, ज्या देशाकडे इतक्या मोठ्या संख्येने तरुण पिढी आहे, तरुण आहेत, ज्या देशातल्या लोकांच्या प्रतिभेबद्दल जगात कुठलेच प्रश्नचिन्ह नाही, गरजेनुसार कुशल मनुष्यबळ विकसित करणे, लोकसंख्याशास्त्रीय लाभांश आणि आज लोकशाही मूल्यांसाठी आग्रही जग डोळे लावून बसले आहे. म्हणजे हा असा एक संयोग आहे, आपल्याकडे अशा सगळ्या गोष्टी आहेत, ज्यांच्या बळावर आपण मोठमोठी स्वप्नं बघू शकतो. या सोबतच, अमर्याद नैसर्गिक साधन संपत्ती आपल्याकडे आहे. मेक इन इंडियासाठी याचा पुरेपूर वापर केलाच गेला पाहिजे.

 

|

मित्रांनो,

आज जग भारताकडे उत्पादन शक्ती केंद्र म्हणून बघत आहे. आपलं उत्पादन क्षेत्र आपल्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 15 टक्के आहे,  मात्र ‘मेक इन इंडिया’ समोर अनंत संधी आहेत. आपण भारतात एक भक्कम उत्पादनाचा पाया तयार करण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी काम केले पाहिजे. केंद्र सरकार असो, की राज्य सरकार, स्थानिक राज्य सरकारचे नियम असोत, खाजगी भागीदारी असो, कॉर्पोरेट हाऊस असो, आपण सगळे मिळून कसे काम करू शकतो. देशाची आज जी गरज आहे, ज्याची आवश्यकता वाढत आहे, त्यासाठी आपल्याला मेक इन इंडियाला प्रोत्साहन द्यायचे आहे. आता दोन गोष्टी आहेत, एक निर्यात डोळ्यापुढे ठेऊन विचार करणे, दुसरी भारताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विचार करणे. चला, समजा, आपण जगात स्पर्धात्मक बनू शकत नाही, मात्र भारताच्या गरजेनुसार आपण तशा गुणवत्तेची उत्पादने द्यावी, जेणेकरून भारताच्या लोकांना बाहेरच्या देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही. हे तर आपण करूच शकतो.

दुसरी गोष्ट आहे, एकदा मी लाल किल्ल्यावरून बोललो होतो, ‘झिरो डिफेक्ट, झिरो ईफेक्ट’ -म्हणजे निर्दोष आणि कशावरही विपरित परिणाम न करणारी उत्पादने. आपल्या उत्पादनांत कणभर देखील दोष नसावा, स्पर्धात्मक जगात गुणवत्तेला अतिशय महत्व असते. आणि दुसरा, जो आपण जगात गुणवत्तेमुळे आणि जागतिक तापमानवाढीमुळे स्वीकारू शकतो. त्याचप्रमाणे, आज ज्या प्रकारे तंत्रज्ञान बदलले आहे, ज्या प्रकारे दूरसंचार जगात क्रांती आली आहे. उदाहरणार्थ सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात आता आपल्याला आत्मनिर्भर बनण्यावाचून काहीच पर्याय नाही. मेक इन इंडियासाठी, मी असं मानतो, एक नवीन क्षेत्र, नव्या शक्यता घेऊन आलं आहे. आपल्याला भविष्याकडे बघायचं आहे. त्याच सोबत आपल्या गरजा देखील आहेत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार केला तर, यावर आपले लक्ष असणे आणखी जास्त गरजेचे आहे. आपण बघत आहोत की विजेवर चालणारी वाहने लोकांचं आकर्षण बनत आहेत, पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने देखील बनत आहेत आणि यांची मागणी देखील वाढत आहे. भारत यात संशोधन करू शकत नाही का? मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादन करू शकत नाही का? भारतातले उत्पादक यात मुख्य भूमिका निभावू शकत नाहीत का? मला असं वाटतं की मेक इन इंडियाच्या भावनेसोबत आपण पुढे जायला हवे. काही विशिष्ट प्रकारच्या पोलादासाठी भारत आयातीवर अवलंबून आहे. आपले लोह खनिज आता विदेशात जाईल आणि त्यापासूनच बनलेले उत्तम पोलाद आपण पुन्हा आयात करायचे, आता ही स्थिती कशी आहे, की आपण त्याच लोह खनिजापासून पोलाद बनवायचे नाही, ज्याची आपल्या देशाला गरज आहे. मला असं वाटतं हे आपलं कर्तव्य देखील आहे. आणि मी उद्योग जगतातील लोकांना आवाहन करेन की हा कच्चा माल, लोह खनिज बाहेर विकण्याऐवजी देशातच त्यापासून पोलाद बनवून देशाला द्या.

मित्रांनो,

देशाचे परदेशी उत्पादनांवरील अवलंबित्व कमी व्हावे, यासाठी देखील भारतीय उत्पादकांनी प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे, या क्षेत्रातही ‘मेक इन इंडिया’ आज काळाची गरज आहे. आणखी एक क्षेत्र म्हणजे वैद्यकीय उपकरणांचे क्षेत्र आहे. आपण अनेक वैद्यकीय उपकरणे परदेशातून मागवतो. आता आपण वैद्यकीय उपकरणे तयार करू शकत नाही का? मला नाही तसे वाटत. हे काही इतके कठीण काम नाही. आपल्या लोकांमध्ये इतके सामर्थ्य नक्कीच आहे, आपण करु करतो. आपण त्यावर भर देऊ शकतो का? आपल्याला हे समजून घ्यायला हवे, की कोणतीही वस्तू बाजारात उपलब्ध असली की आपण त्यात समाधान मानतो, की लोकांच्या गरजेनुसार वस्तू उपलब्ध तर आहेत. बाजारात गोष्टी मिळतात, हे खरे आहे, पण त्या परदेशातून आलेल्या वस्तू आहेत. आणि त्याला पर्याय म्हणून ‘मेड इन इंडिया’ उत्पादने जेव्हा बाजारात येतात, आपल्याला उपलब्ध होतात, तेव्हा आपल्या मनात हा विचार यायला हवा की, बाहेरच्या गोष्टी घेण्यापेक्षा तर आपल्याकडे मिळणाऱ्या गोष्टी चांगल्या आहेत. आपण स्वदेशी वस्तू घेऊ. अशी मानसिकता आपण तयार करायला हवी. आणि हा फरक ठळकपणे दिसायला हवा. आता बघा, आपल्याकडे इतके सणवार असतात. होळी आहे, गणेशोत्सव आहे, दिवाळी आहे. या सणवारांना इतक्या छोट्या मोठ्या वस्तू विकायला असतात. त्यांची एक मोठी बाजारपेठ असते. आणि त्यामुळे छोट्या छोट्या लोकांना रोजगाराच्या संधी मिळतात. मात्र आज ही संपूर्ण बाजारपेठ विदेशी उत्पादनांनी काबिज केली आहे.

आधी अशा सगळ्या वस्तू आपले स्थानिक उत्पादकच देत असत आणि अगदी उत्तम प्रकारे देत असत. मात्र आता काळ बदलला आहे, हे लक्षात घेऊन पारंपरिक वस्तूंच्या स्वरूपातही बदल केला पाहिजे. आपण जुनाट गोष्टींनाच चिकटून राहू शकत नाही. आणि माझी अशी इच्छा आहे, की यात आपण पुढाकार घ्यायला हवा. आणि मी जेव्हा ‘व्होकल फॉर लोकल’ विषयी बोलत असतो, तेव्हा मी एक अनुभवले आहे, की काही लोकांना असे वाटते की दिवाळीचे दिवे स्थानिक दुकानदारांकडून खरेदी करायचे म्हणजेच ‘व्होकल फॉर लोकल’ असते. नाही, हो, मी दिवाळीच्या पणत्याबद्दल बोलत नाहीये. अशा अनेक गोष्टी आहेत. आपली दृष्टी थोडी व्यापक करा. मी एक दिवस एक छोटासा विषय सगळ्यांसमोर मांडला होता. आपणही, आज जे या वेबिनार मध्ये उपस्थित आहात, त्या सर्वांनी एक काम करा. आपल्या मुलांसोबत बसा. आपल्या घरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या ज्या गोष्टींचा वापर होतो, त्यांची यादी करा. त्यातल्या किती वस्तू आहेत, ज्या आपण स्वदेशी कंपनीच्या वापरत नाही. आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या विदेशीच घेणे भाग पडते, त्या बाजूला ठेवा. आणि मग बघा. तुम्हालाही धक्का बसेल की आपण काय करतो आहोत. आणि म्हणूनच जे उत्पादक आहेत, त्यांना देखील मी या मंचावर एकत्र आणू इच्छितो.

मित्रांनो,

दुसरा मुद्दा म्हणजे भारतात बनवलेल्या उत्पादनांचे ब्रँडिंग. आता मी पाहतो की, आपल्या  कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या अनेक जाहिराती देतात, मात्र दबावामुळे एकाही जाहिरातीत व्होकल फॉर लोकलबद्दल सांगत नाहीत. मेक इन इंडियाबद्दलही सांगत नाहीत. तुम्ही तुमची जाहिरात करता  तर त्याच वेळी याही गोष्टींबद्दल बोलायला तुमचे काय जाते ? तुमचा माल विकला जाणार आहे आणि आजही देशात देशभावना असलेला  एक मोठा समुदाय आहे  जो या बाबतीत जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो. पण तुम्ही त्याला प्रोत्साहन देण्यासाठी व्यवसाय धोरण म्हणून याचा विचार करा.तुमची कंपनी जी उत्पादने तयार करते, त्याबद्दल तुम्ही स्वतः  अभिमान बाळगा आणि लोकांनाही  त्याचा अभिमान बाळगण्यासाठी  प्रेरित करा.तुमची मेहनत वाया जाणार  नाही, तुमच्याकडे अनेक चांगल्या गोष्टी आहेत.पण हिंमत दाखवा, लोकांना सांगा आमच्या देशातील आणि आमच्या मातीतील वस्तू आहेत. आमच्या लोकांनी घाम गाळून  ही वस्तू तयार केली  आहे.  त्यांना भावनिक रूपात या सगळ्याशी जोडा. आणि यासाठी समान  ब्रँडिंगचाही विचार केला जावा असे मला वाटते. सरकार आणि खाजगी क्षेत्र एकत्रितपणे आपण चांगले  उत्पादन  विकसित करू शकतो.

मित्रांनो,

आपल्या खाजगी क्षेत्रालाही त्यांच्या उत्पादनांसाठी ठिकाणे  शोधावी  लागतील.आपल्याला संशोधन आणि विकास क्षेत्रातही  आपली गुंतवणूक वाढवायची आहे आणि उत्पादनामध्ये  विविधता आणण्यासाठी श्रेणीवर्धनावर  भर द्यायचा आहे. आता तुम्हाला माहिती आहे की , 2023 हे वर्ष जगभरात भरड धान्य आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे केले जाईल.आता भरडधान्यांकडे  लोकांचे आकर्षण वाढणे साहजिक आहे. भारतातील भरड धान्ये  जगाच्या जेवणाच्या टेबलावर  थोड्या फार प्रमाणात पोहोचवावी, हे भारतीयांचे स्वप्न का बरे असू नये? आपले  छोटे शेतकरी आपल्याला किती आशीर्वाद देतील. आणि त्यासाठी त्या त्या देशाची जी  चव आहे त्या दृष्टीने आपली भरड धान्ये दाखवणे, तिथे भरड धान्ये कशाप्रकारे पोहोचतील, हे काम आपण करू शकतो आणि मला वाटते आपण ते करायला हवे  यामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. जागतिक बाजारपेठांचा अभ्यास करून, आपण आपल्या गिरण्यांना जास्तीत जास्त उत्पादन आणि पॅकेजिंगसाठी आतापासूनच तयार केले पाहिजे .  खाणकाम, कोळसा, संरक्षण, अशी क्षेत्रे खुली झाल्याने  अनेक नवीन शक्यताही वाढल्या आहेत.

या क्षेत्रांद्वारे निर्यातीसाठी आतापासून आपण काही धोरण आखू शकतो का? आपण जागतिक मानकांचे देखील पालन केले पाहिजे आणि जागतिक स्तरावर स्पर्धासुद्धा  केली पाहिजे.

मित्रांनो,

या अर्थसंकल्पात पत सुविधा आणि तंत्रज्ञान श्रेणीवर्धनाद्वारे  सूक्ष्म ,लघु आणि मध्यम उद्योग  बळकट  करण्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. सरकारने सूक्ष्म ,लघु आणि मध्यम उद्योगांसाठी    6,000 कोटी रुपयांचा आरएएमपी  कार्यक्रमही जाहीर केला आहे.अर्थसंकल्पामध्ये  मोठे उद्योग आणि  सूक्ष्म ,लघु आणि मध्यम उद्योगांसाठी, शेतकऱ्यांसाठी, नवीन रेल्वे लॉजिस्टिक उत्पादने विकसित करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. टपाल आणि रेल्वे जाळ्याच्या एकत्रीकरणामुळे लघु उद्योग आणि दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटीच्या समस्या दूर होतील.आपल्याला या क्षेत्रात नाविन्यपूर्ण उत्पादने विकसित करायची आहेत आणि यामध्ये तुमचे सक्रिय योगदान आवश्यक असेल.प्रादेशिक उत्पादन व्यवस्थेला  चालना देण्यासाठी, पीएम-डिव्हाईन  योजना देखील अर्थसंकल्पाचा  एक भाग आहे, ही योजना विशेषतः   ईशान्य भागासाठी  आहे. मात्र आपण या संकल्पनेचे  मॉडेल देशाच्या वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारे विकसित करू शकतो.विशेष आर्थिक क्षेत्र कायद्यातील सुधारणांमुळे आपल्या निर्यातीला मोठी चालना मिळेल आणि मेक इन इंडियाचे सामर्थ्य वाढेल. निर्यात वाढवण्यासाठी आपण आपल्या  विद्यमान विशेष आर्थिक क्षेत्राच्या  कार्यपद्धतीत कोणते बदल करू शकतो याबद्दल तुमच्या सूचना मोलाच्या ठरतील.

मित्रांनो,

उद्योगांना सोबत घेऊन एकापाठोपाठ एक सतत  होत असलेल्या   सुधारणांचा परिणामही दिसून येत आहे.उदाहरणार्थ, मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनाच घ्या, डिसेंबर 2021 पर्यंत आपण यासाठीच्या उद्दिष्टाच्या दिशेने 1 लाख कोटी रुपयांचे उत्पादनही पार केले आहे. आपल्या  अनेक उत्पादन संलग्न प्रोत्साहन  योजना सध्या अंमलबजावणीच्या अत्यंत महत्वाच्या  टप्प्यात आहेत. तुमच्या सूचना अंमलबजावणीला गती देण्यासाठी उपयुक्त ठरतील.

|

मित्रांनो,

भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या  प्रवासात अनुपालनाचे  ओझे प्रचंड मोठा अडथळा राहिला आहे. गेल्या वर्षीच आम्ही 25 हजारांहून अधिक अनुपालन नियम  रद्द केले आहेत, परवान्यांचे स्वयं नूतनीकरण करण्याची प्रणाली सुरू केली आहे.त्याचप्रमाणे, डिजिटायझेशन देखील आज नियामक आराखड्यामध्ये  वेग आणि पारदर्शकता आणत आहे. कंपनी स्थापन करण्यासाठी कॉमन स्पाईस फॉर्मपासून ते राष्ट्रीय एक खिडकी प्रणाली पर्यंत , आता तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर आमचा विकासस्नेही  दृष्टिकोन जाणवत असेल.

मित्रांनो,

आम्हाला तुमच्याकडून  जास्तीत जास्त सहकार्य हवे, नावीन्य हवे आणि आणि संशोधनावर आधारित भविष्यसंबंधी  दृष्टीकोन आवश्यक आहे.मला विश्वास  आहे की ,या वेबिनारमध्ये आपण जे विचारमंथन करणार आहोत ते मेक इन इंडिया अभियानाला अधिक बळकट करेल. हे आवाहन  मी तुम्हा सर्वांना करणार आहे. पहा, हे  वेबिनार लोकशाहीचा असाच एक प्रकार आहे, ज्याकडे फार कमी लोकांचे लक्ष गेले आहे. लोकप्रतिनिधींनी  अर्थसंकल्पावर चर्चा करावी आणि अंमलबजावणीच्या दृष्टीने अर्थसंकल्पाशी संबंधित पुढील कार्यवाही करावी. सरकारी बाबू आणि राजकीय नेतृत्वाने  अर्थसंकल्पावर   आधारित कार्यक्रम तयार करावेत. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर प्रथमच एक एप्रिलपूर्वी दोन महिन्यांचा कालावधी मिळाला आहे, त्यात मी अर्थसंकल्पातील प्रत्येक तरतुदीबाबत संबंधितांशी चर्चा करत आहे.मी तुमच्याकडून सूचना घेत आहे, तुमचा सहभाग हवा आहे आणि मला असे वाटते की, अंमलबजावणी करताना पूर्णविराम, स्वल्पविराम इकडे तिकडे होतात, ज्यामुळे फायली  6-6 महिने फिरत राहतात. मला तो वेळ वाचवायचा आहे. तुम्ही त्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला माहीत आहे की ,हा अर्थसंकल्प आहे. जर तुम्ही अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने  हे केले तर खूप फायदा होईल, ते  केले तर तेवढा फायदा होईल हे न सांगता तुम्ही चांगल्या पर्यायी व्यावहारिक सूचना देऊ शकता. आज आपण अर्थसंकल्प कसा असावा याबद्दल चर्चा करत नाही आहोत.

आज आपण अर्थसंकल्पाची अंमलबजावणी कशी करायची यावर चर्चा करत आहोत. जास्तीत जास्त सुलभता , जास्तीत जास्त फलनिष्पत्ती , जास्तीत जास्त परिणामकारकता असावी, या उद्दिष्टावर आपली  चर्चा केंद्रित असेल.सरकारकडून तुम्हाला ज्ञान देण्यासाठी हे  वेबिनार नाही. हे  वेबिनार तुमच्याकडून शिकण्यासाठी आहे. तुमच्याकडून समजून घेण्यासाठी  आहे आणि म्हणूनच सरकारची संपूर्ण यंत्रणा तुमचे म्हणणे ऐकण्यासाठी बसली आहे. आणि त्या आधारावर एक  एप्रिलपासून आपण आपला अर्थसंकल्प चांगल्या पद्धतीने कसा अंमलात आणू शकतो  याचा विचार करावा लागेल.मी काही उद्योगसमूहांना आवाहन करतो की,  आपल्या देशात काही काही वस्तूंची आयात केली जाते, मी वर्षभरात अशी परिस्थिती निर्माण करेन की या देशाला कधीच अशी आयात करावी लागणार नाही,हे आव्हान तुम्ही पेलू शकता का?  जर मी देशात 100 वस्तू आयात केल्या तर त्यातील 2 वस्तू कमी करण्याचे मी काम करेन.कोणी म्हणेल, मी तीन गोष्टी कमी करेन. अशा प्रकारे, मी भारतात  पूर्णपणे मेक इन इंडिया करेन. आपले एक स्वप्न असायला हवे . मी एका शेतकऱ्याला ओळखतो, त्या शेतकऱ्याने ठरवले की पंचतारांकित हॉटेलमध्ये जी भाजी येते.,त्याने ठरवले की ज्या भाजीला लहान टोमॅटो, छोटे कांदे, छोटे मके लागतात ती भाजी पंचतारांकित  हॉटेलमध्ये हवी आहे, तो म्हणाला, मी उत्पादित करतो  कारण ही भाजी माझ्या देशात उत्पादित व्हायला हवी. मी पाहिले की तो सुशिक्षित शेतकरी नव्हता, त्याने खूप कष्ट घेतले. , त्याने लोकांची मदत घेतली आणि त्याने अशा गोष्टी दिल्या त्यामुळे  भारतातील पंचतारांकित हॉटेल्स त्याच्याकडून त्याची उत्पादने खरेदी करू लागली. त्यांनाही पैशाच्या रुपात  फायदा झाला, देशालाही फायदा झाला. तर  माझ्या उद्योग जगतातील  लोक हे काम करू शकत नाहीत, का? हे मी  तुम्हाला आवाहन करेन ,  या देशाचा तुमच्यावर अधिकार आहे. आणि म्हणूनच मी म्हणतो की भारताला बळकट करायचे असेल तर तुमचा उद्योगही  मजबूत झाला पाहिजे, हेच आम्हाला हवे आहे.आम्हाला वाटते की, तुमच्या उत्पादनांना  जगभरात आदर मिळावा आणि म्हणूनच  आपण एकत्र बसून निर्णय घेऊया आणि पुढे जाऊया.यासाठीच मी तुम्हाला आमंत्रित केले आहे. तुम्ही वेळ दिला आहे, हा वेळ दिवसभर अधिक फलदायी व्हावा, हीच माझी अपेक्षा आहे,  तुम्हाला खूप शुभेच्छा देतो!

खूप खूप धन्यवाद !

  • Reena chaurasia September 04, 2024

    राम
  • Reena chaurasia September 04, 2024

    बीजेपी
  • JBL SRIVASTAVA July 04, 2024

    नमो नमो
  • Hitesh Deshmukh July 04, 2024

    Jay ho
  • Madhusmita Baliarsingh June 29, 2024

    "Under PM Modi's leadership, India's economic growth has been remarkable. His bold reforms and visionary policies have strengthened the economy, attracted global investments, and paved the way for a prosperous future. #Modinomics #IndiaRising"
  • Rajender Kumar June 21, 2024

    Modi ji Main Rajender Kumar Aligarh Uttar Pradesh. Modi ji Last 5 Years Blue Dart Express Courior Company Main Work Kar Raha Hu. Modi ji Saal Dar Saal Manhgai Bad Rahi H. Parntu Hamari Salary ek Rupya Bhi Nahi Bad Rahi H. Modi ji Aapse Haath Jod Kar Vinti Kar Raha Hu. Modi ji Ye Main Apne Liye Hi Nahi Valki Yun Sabhi Workers Ki Baat Kar Raha Hu. Jo PVT Sector Main Work Kar Rahe H. Karpya Karke Aap Is PVT Sector Par Parsnal Kuchh Kijiye. PVT Sector Main Salary Ke Naam Par Kuchh Nahi Milta. Ye Main Aligarh Uttar Pradesh Ki Hi Nahi Valki All Hindustan Ki Baat Kar Raha Hu. Sir Mujhe Jo Salary Milti H. Main Us Salary Se Apne Parivar (3 Parsons) Ka Sahi Se Khana Khilane Main Bhai Asmarth Hu. Please Modi Ji Is Thoda Dhyaan Deni Ka Kast Kare. Thank you
  • Vijay Kant Chaturvedi June 15, 2024

    jai ho
  • Jayanta Kumar Bhadra May 08, 2024

    Kalyani Simanta
  • Jayanta Kumar Bhadra May 08, 2024

    Jai hind sir
  • Jayanta Kumar Bhadra May 08, 2024

    om good night
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

Media Coverage

"Huge opportunity": Japan delegation meets PM Modi, expressing their eagerness to invest in India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Today, India is not just a Nation of Dreams but also a Nation That Delivers: PM Modi in TV9 Summit
March 28, 2025
QuoteToday, the world's eyes are on India: PM
QuoteIndia's youth is rapidly becoming skilled and driving innovation forward: PM
Quote"India First" has become the mantra of India's foreign policy: PM
QuoteToday, India is not just participating in the world order but also contributing to shaping and securing the future: PM
QuoteIndia has given Priority to humanity over monopoly: PM
QuoteToday, India is not just a Nation of Dreams but also a Nation That Delivers: PM

श्रीमान रामेश्वर गारु जी, रामू जी, बरुन दास जी, TV9 की पूरी टीम, मैं आपके नेटवर्क के सभी दर्शकों का, यहां उपस्थित सभी महानुभावों का अभिनंदन करता हूं, इस समिट के लिए बधाई देता हूं।

TV9 नेटवर्क का विशाल रीजनल ऑडियंस है। और अब तो TV9 का एक ग्लोबल ऑडियंस भी तैयार हो रहा है। इस समिट में अनेक देशों से इंडियन डायस्पोरा के लोग विशेष तौर पर लाइव जुड़े हुए हैं। कई देशों के लोगों को मैं यहां से देख भी रहा हूं, वे लोग वहां से वेव कर रहे हैं, हो सकता है, मैं सभी को शुभकामनाएं देता हूं। मैं यहां नीचे स्क्रीन पर हिंदुस्तान के अनेक शहरों में बैठे हुए सब दर्शकों को भी उतने ही उत्साह, उमंग से देख रहा हूं, मेरी तरफ से उनका भी स्वागत है।

साथियों,

आज विश्व की दृष्टि भारत पर है, हमारे देश पर है। दुनिया में आप किसी भी देश में जाएं, वहां के लोग भारत को लेकर एक नई जिज्ञासा से भरे हुए हैं। आखिर ऐसा क्या हुआ कि जो देश 70 साल में ग्यारहवें नंबर की इकोनॉमी बना, वो महज 7-8 साल में पांचवे नंबर की इकोनॉमी बन गया? अभी IMF के नए आंकड़े सामने आए हैं। वो आंकड़े कहते हैं कि भारत, दुनिया की एकमात्र मेजर इकोनॉमी है, जिसने 10 वर्षों में अपने GDP को डबल किया है। बीते दशक में भारत ने दो लाख करोड़ डॉलर, अपनी इकोनॉमी में जोड़े हैं। GDP का डबल होना सिर्फ आंकड़ों का बदलना मात्र नहीं है। इसका impact देखिए, 25 करोड़ लोग गरीबी से बाहर निकले हैं, और ये 25 करोड़ लोग एक नियो मिडिल क्लास का हिस्सा बने हैं। ये नियो मिडिल क्लास, एक प्रकार से नई ज़िंदगी शुरु कर रहा है। ये नए सपनों के साथ आगे बढ़ रहा है, हमारी इकोनॉमी में कंट्रीब्यूट कर रहा है, और उसको वाइब्रेंट बना रहा है। आज दुनिया की सबसे बड़ी युवा आबादी हमारे भारत में है। ये युवा, तेज़ी से स्किल्ड हो रहा है, इनोवेशन को गति दे रहा है। और इन सबके बीच, भारत की फॉरेन पॉलिसी का मंत्र बन गया है- India First, एक जमाने में भारत की पॉलिसी थी, सबसे समान रूप से दूरी बनाकर चलो, Equi-Distance की पॉलिसी, आज के भारत की पॉलिसी है, सबके समान रूप से करीब होकर चलो, Equi-Closeness की पॉलिसी। दुनिया के देश भारत की ओपिनियन को, भारत के इनोवेशन को, भारत के एफर्ट्स को, जैसा महत्व आज दे रहे हैं, वैसा पहले कभी नहीं हुआ। आज दुनिया की नजर भारत पर है, आज दुनिया जानना चाहती है, What India Thinks Today.

|

साथियों,

भारत आज, वर्ल्ड ऑर्डर में सिर्फ पार्टिसिपेट ही नहीं कर रहा, बल्कि फ्यूचर को शेप और सेक्योर करने में योगदान दे रहा है। दुनिया ने ये कोरोना काल में अच्छे से अनुभव किया है। दुनिया को लगता था कि हर भारतीय तक वैक्सीन पहुंचने में ही, कई-कई साल लग जाएंगे। लेकिन भारत ने हर आशंका को गलत साबित किया। हमने अपनी वैक्सीन बनाई, हमने अपने नागरिकों का तेज़ी से वैक्सीनेशन कराया, और दुनिया के 150 से अधिक देशों तक दवाएं और वैक्सीन्स भी पहुंचाईं। आज दुनिया, और जब दुनिया संकट में थी, तब भारत की ये भावना दुनिया के कोने-कोने तक पहुंची कि हमारे संस्कार क्या हैं, हमारा तौर-तरीका क्या है।

साथियों,

अतीत में दुनिया ने देखा है कि दूसरे विश्व युद्ध के बाद जब भी कोई वैश्विक संगठन बना, उसमें कुछ देशों की ही मोनोपोली रही। भारत ने मोनोपोली नहीं बल्कि मानवता को सर्वोपरि रखा। भारत ने, 21वीं सदी के ग्लोबल इंस्टीट्यूशन्स के गठन का रास्ता बनाया, और हमने ये ध्यान रखा कि सबकी भागीदारी हो, सबका योगदान हो। जैसे प्राकृतिक आपदाओं की चुनौती है। देश कोई भी हो, इन आपदाओं से इंफ्रास्ट्रक्चर को भारी नुकसान होता है। आज ही म्यांमार में जो भूकंप आया है, आप टीवी पर देखें तो बहुत बड़ी-बड़ी इमारतें ध्वस्त हो रही हैं, ब्रिज टूट रहे हैं। और इसलिए भारत ने Coalition for Disaster Resilient Infrastructure - CDRI नाम से एक वैश्विक नया संगठन बनाने की पहल की। ये सिर्फ एक संगठन नहीं, बल्कि दुनिया को प्राकृतिक आपदाओं के लिए तैयार करने का संकल्प है। भारत का प्रयास है, प्राकृतिक आपदा से, पुल, सड़कें, बिल्डिंग्स, पावर ग्रिड, ऐसा हर इंफ्रास्ट्रक्चर सुरक्षित रहे, सुरक्षित निर्माण हो।

साथियों,

भविष्य की चुनौतियों से निपटने के लिए हर देश का मिलकर काम करना बहुत जरूरी है। ऐसी ही एक चुनौती है, हमारे एनर्जी रिसोर्सेस की। इसलिए पूरी दुनिया की चिंता करते हुए भारत ने International Solar Alliance (ISA) का समाधान दिया है। ताकि छोटे से छोटा देश भी सस्टेनबल एनर्जी का लाभ उठा सके। इससे क्लाइमेट पर तो पॉजिटिव असर होगा ही, ये ग्लोबल साउथ के देशों की एनर्जी नीड्स को भी सिक्योर करेगा। और आप सबको ये जानकर गर्व होगा कि भारत के इस प्रयास के साथ, आज दुनिया के सौ से अधिक देश जुड़ चुके हैं।

साथियों,

बीते कुछ समय से दुनिया, ग्लोबल ट्रेड में असंतुलन और लॉजिस्टिक्स से जुड़ी challenges का सामना कर रही है। इन चुनौतियों से निपटने के लिए भी भारत ने दुनिया के साथ मिलकर नए प्रयास शुरु किए हैं। India–Middle East–Europe Economic Corridor (IMEC), ऐसा ही एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट है। ये प्रोजेक्ट, कॉमर्स और कनेक्टिविटी के माध्यम से एशिया, यूरोप और मिडिल ईस्ट को जोड़ेगा। इससे आर्थिक संभावनाएं तो बढ़ेंगी ही, दुनिया को अल्टरनेटिव ट्रेड रूट्स भी मिलेंगे। इससे ग्लोबल सप्लाई चेन भी और मजबूत होगी।

|

साथियों,

ग्लोबल सिस्टम्स को, अधिक पार्टिसिपेटिव, अधिक डेमोक्रेटिक बनाने के लिए भी भारत ने अनेक कदम उठाए हैं। और यहीं, यहीं पर ही भारत मंडपम में जी-20 समिट हुई थी। उसमें अफ्रीकन यूनियन को जी-20 का परमानेंट मेंबर बनाया गया है। ये बहुत बड़ा ऐतिहासिक कदम था। इसकी मांग लंबे समय से हो रही थी, जो भारत की प्रेसीडेंसी में पूरी हुई। आज ग्लोबल डिसीजन मेकिंग इंस्टीट्यूशन्स में भारत, ग्लोबल साउथ के देशों की आवाज़ बन रहा है। International Yoga Day, WHO का ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन, आर्टिफिशियल इंटेलीजेंस के लिए ग्लोबल फ्रेमवर्क, ऐसे कितने ही क्षेत्रों में भारत के प्रयासों ने नए वर्ल्ड ऑर्डर में अपनी मजबूत उपस्थिति दर्ज कराई है, और ये तो अभी शुरूआत है, ग्लोबल प्लेटफॉर्म पर भारत का सामर्थ्य नई ऊंचाई की तरफ बढ़ रहा है।

साथियों,

21वीं सदी के 25 साल बीत चुके हैं। इन 25 सालों में 11 साल हमारी सरकार ने देश की सेवा की है। और जब हम What India Thinks Today उससे जुड़ा सवाल उठाते हैं, तो हमें ये भी देखना होगा कि Past में क्या सवाल थे, क्या जवाब थे। इससे TV9 के विशाल दर्शक समूह को भी अंदाजा होगा कि कैसे हम, निर्भरता से आत्मनिर्भरता तक, Aspirations से Achievement तक, Desperation से Development तक पहुंचे हैं। आप याद करिए, एक दशक पहले, गांव में जब टॉयलेट का सवाल आता था, तो माताओं-बहनों के पास रात ढलने के बाद और भोर होने से पहले का ही जवाब होता था। आज उसी सवाल का जवाब स्वच्छ भारत मिशन से मिलता है। 2013 में जब कोई इलाज की बात करता था, तो महंगे इलाज की चर्चा होती थी। आज उसी सवाल का समाधान आयुष्मान भारत में नजर आता है। 2013 में किसी गरीब की रसोई की बात होती थी, तो धुएं की तस्वीर सामने आती थी। आज उसी समस्या का समाधान उज्ज्वला योजना में दिखता है। 2013 में महिलाओं से बैंक खाते के बारे में पूछा जाता था, तो वो चुप्पी साध लेती थीं। आज जनधन योजना के कारण, 30 करोड़ से ज्यादा बहनों का अपना बैंक अकाउंट है। 2013 में पीने के पानी के लिए कुएं और तालाबों तक जाने की मजबूरी थी। आज उसी मजबूरी का हल हर घर नल से जल योजना में मिल रहा है। यानि सिर्फ दशक नहीं बदला, बल्कि लोगों की ज़िंदगी बदली है। और दुनिया भी इस बात को नोट कर रही है, भारत के डेवलपमेंट मॉडल को स्वीकार रही है। आज भारत सिर्फ Nation of Dreams नहीं, बल्कि Nation That Delivers भी है।

साथियों,

जब कोई देश, अपने नागरिकों की सुविधा और समय को महत्व देता है, तब उस देश का समय भी बदलता है। यही आज हम भारत में अनुभव कर रहे हैं। मैं आपको एक उदाहरण देता हूं। पहले पासपोर्ट बनवाना कितना बड़ा काम था, ये आप जानते हैं। लंबी वेटिंग, बहुत सारे कॉम्प्लेक्स डॉक्यूमेंटेशन का प्रोसेस, अक्सर राज्यों की राजधानी में ही पासपोर्ट केंद्र होते थे, छोटे शहरों के लोगों को पासपोर्ट बनवाना होता था, तो वो एक-दो दिन कहीं ठहरने का इंतजाम करके चलते थे, अब वो हालात पूरी तरह बदल गया है, एक आंकड़े पर आप ध्यान दीजिए, पहले देश में सिर्फ 77 पासपोर्ट सेवा केंद्र थे, आज इनकी संख्या 550 से ज्यादा हो गई है। पहले पासपोर्ट बनवाने में, और मैं 2013 के पहले की बात कर रहा हूं, मैं पिछले शताब्दी की बात नहीं कर रहा हूं, पासपोर्ट बनवाने में जो वेटिंग टाइम 50 दिन तक होता था, वो अब 5-6 दिन तक सिमट गया है।

साथियों,

ऐसा ही ट्रांसफॉर्मेशन हमने बैंकिंग इंफ्रास्ट्रक्चर में भी देखा है। हमारे देश में 50-60 साल पहले बैंकों का नेशनलाइजेशन किया गया, ये कहकर कि इससे लोगों को बैंकिंग सुविधा सुलभ होगी। इस दावे की सच्चाई हम जानते हैं। हालत ये थी कि लाखों गांवों में बैंकिंग की कोई सुविधा ही नहीं थी। हमने इस स्थिति को भी बदला है। ऑनलाइन बैंकिंग तो हर घर में पहुंचाई है, आज देश के हर 5 किलोमीटर के दायरे में कोई न कोई बैंकिंग टच प्वाइंट जरूर है। और हमने सिर्फ बैंकिंग इंफ्रास्ट्रक्चर का ही दायरा नहीं बढ़ाया, बल्कि बैंकिंग सिस्टम को भी मजबूत किया। आज बैंकों का NPA बहुत कम हो गया है। आज बैंकों का प्रॉफिट, एक लाख 40 हज़ार करोड़ रुपए के नए रिकॉर्ड को पार कर चुका है। और इतना ही नहीं, जिन लोगों ने जनता को लूटा है, उनको भी अब लूटा हुआ धन लौटाना पड़ रहा है। जिस ED को दिन-रात गालियां दी जा रही है, ED ने 22 हज़ार करोड़ रुपए से अधिक वसूले हैं। ये पैसा, कानूनी तरीके से उन पीड़ितों तक वापिस पहुंचाया जा रहा है, जिनसे ये पैसा लूटा गया था।

साथियों,

Efficiency से गवर्नमेंट Effective होती है। कम समय में ज्यादा काम हो, कम रिसोर्सेज़ में अधिक काम हो, फिजूलखर्ची ना हो, रेड टेप के बजाय रेड कार्पेट पर बल हो, जब कोई सरकार ये करती है, तो समझिए कि वो देश के संसाधनों को रिस्पेक्ट दे रही है। और पिछले 11 साल से ये हमारी सरकार की बड़ी प्राथमिकता रहा है। मैं कुछ उदाहरणों के साथ अपनी बात बताऊंगा।

|

साथियों,

अतीत में हमने देखा है कि सरकारें कैसे ज्यादा से ज्यादा लोगों को मिनिस्ट्रीज में accommodate करने की कोशिश करती थीं। लेकिन हमारी सरकार ने अपने पहले कार्यकाल में ही कई मंत्रालयों का विलय कर दिया। आप सोचिए, Urban Development अलग मंत्रालय था और Housing and Urban Poverty Alleviation अलग मंत्रालय था, हमने दोनों को मर्ज करके Housing and Urban Affairs मंत्रालय बना दिया। इसी तरह, मिनिस्ट्री ऑफ ओवरसीज़ अफेयर्स अलग था, विदेश मंत्रालय अलग था, हमने इन दोनों को भी एक साथ जोड़ दिया, पहले जल संसाधन, नदी विकास मंत्रालय अलग था, और पेयजल मंत्रालय अलग था, हमने इन्हें भी जोड़कर जलशक्ति मंत्रालय बना दिया। हमने राजनीतिक मजबूरी के बजाय, देश की priorities और देश के resources को आगे रखा।

साथियों,

हमारी सरकार ने रूल्स और रेगुलेशन्स को भी कम किया, उन्हें आसान बनाया। करीब 1500 ऐसे कानून थे, जो समय के साथ अपना महत्व खो चुके थे। उनको हमारी सरकार ने खत्म किया। करीब 40 हज़ार, compliances को हटाया गया। ऐसे कदमों से दो फायदे हुए, एक तो जनता को harassment से मुक्ति मिली, और दूसरा, सरकारी मशीनरी की एनर्जी भी बची। एक और Example GST का है। 30 से ज्यादा टैक्सेज़ को मिलाकर एक टैक्स बना दिया गया है। इसको process के, documentation के हिसाब से देखें तो कितनी बड़ी बचत हुई है।

साथियों,

सरकारी खरीद में पहले कितनी फिजूलखर्ची होती थी, कितना करप्शन होता था, ये मीडिया के आप लोग आए दिन रिपोर्ट करते थे। हमने, GeM यानि गवर्नमेंट ई-मार्केटप्लेस प्लेटफॉर्म बनाया। अब सरकारी डिपार्टमेंट, इस प्लेटफॉर्म पर अपनी जरूरतें बताते हैं, इसी पर वेंडर बोली लगाते हैं और फिर ऑर्डर दिया जाता है। इसके कारण, भ्रष्टाचार की गुंजाइश कम हुई है, और सरकार को एक लाख करोड़ रुपए से अधिक की बचत भी हुई है। डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर- DBT की जो व्यवस्था भारत ने बनाई है, उसकी तो दुनिया में चर्चा है। DBT की वजह से टैक्स पेयर्स के 3 लाख करोड़ रुपए से ज्यादा, गलत हाथों में जाने से बचे हैं। 10 करोड़ से ज्यादा फर्ज़ी लाभार्थी, जिनका जन्म भी नहीं हुआ था, जो सरकारी योजनाओं का फायदा ले रहे थे, ऐसे फर्जी नामों को भी हमने कागजों से हटाया है।

साथियों,

 

हमारी सरकार टैक्स की पाई-पाई का ईमानदारी से उपयोग करती है, और टैक्सपेयर का भी सम्मान करती है, सरकार ने टैक्स सिस्टम को टैक्सपेयर फ्रेंडली बनाया है। आज ITR फाइलिंग का प्रोसेस पहले से कहीं ज्यादा सरल और तेज़ है। पहले सीए की मदद के बिना, ITR फाइल करना मुश्किल होता था। आज आप कुछ ही समय के भीतर खुद ही ऑनलाइन ITR फाइल कर पा रहे हैं। और रिटर्न फाइल करने के कुछ ही दिनों में रिफंड आपके अकाउंट में भी आ जाता है। फेसलेस असेसमेंट स्कीम भी टैक्सपेयर्स को परेशानियों से बचा रही है। गवर्नेंस में efficiency से जुड़े ऐसे अनेक रिफॉर्म्स ने दुनिया को एक नया गवर्नेंस मॉडल दिया है।

साथियों,

पिछले 10-11 साल में भारत हर सेक्टर में बदला है, हर क्षेत्र में आगे बढ़ा है। और एक बड़ा बदलाव सोच का आया है। आज़ादी के बाद के अनेक दशकों तक, भारत में ऐसी सोच को बढ़ावा दिया गया, जिसमें सिर्फ विदेशी को ही बेहतर माना गया। दुकान में भी कुछ खरीदने जाओ, तो दुकानदार के पहले बोल यही होते थे – भाई साहब लीजिए ना, ये तो इंपोर्टेड है ! आज स्थिति बदल गई है। आज लोग सामने से पूछते हैं- भाई, मेड इन इंडिया है या नहीं है?

साथियों,

आज हम भारत की मैन्युफैक्चरिंग एक्सीलेंस का एक नया रूप देख रहे हैं। अभी 3-4 दिन पहले ही एक न्यूज आई है कि भारत ने अपनी पहली MRI मशीन बना ली है। अब सोचिए, इतने दशकों तक हमारे यहां स्वदेशी MRI मशीन ही नहीं थी। अब मेड इन इंडिया MRI मशीन होगी तो जांच की कीमत भी बहुत कम हो जाएगी।

|

साथियों,

आत्मनिर्भर भारत और मेक इन इंडिया अभियान ने, देश के मैन्युफैक्चरिंग सेक्टर को एक नई ऊर्जा दी है। पहले दुनिया भारत को ग्लोबल मार्केट कहती थी, आज वही दुनिया, भारत को एक बड़े Manufacturing Hub के रूप में देख रही है। ये सक्सेस कितनी बड़ी है, इसके उदाहरण आपको हर सेक्टर में मिलेंगे। जैसे हमारी मोबाइल फोन इंडस्ट्री है। 2014-15 में हमारा एक्सपोर्ट, वन बिलियन डॉलर तक भी नहीं था। लेकिन एक दशक में, हम ट्वेंटी बिलियन डॉलर के फिगर से भी आगे निकल चुके हैं। आज भारत ग्लोबल टेलिकॉम और नेटवर्किंग इंडस्ट्री का एक पावर सेंटर बनता जा रहा है। Automotive Sector की Success से भी आप अच्छी तरह परिचित हैं। इससे जुड़े Components के एक्सपोर्ट में भी भारत एक नई पहचान बना रहा है। पहले हम बहुत बड़ी मात्रा में मोटर-साइकल पार्ट्स इंपोर्ट करते थे। लेकिन आज भारत में बने पार्ट्स UAE और जर्मनी जैसे अनेक देशों तक पहुंच रहे हैं। सोलर एनर्जी सेक्टर ने भी सफलता के नए आयाम गढ़े हैं। हमारे सोलर सेल्स, सोलर मॉड्यूल का इंपोर्ट कम हो रहा है और एक्सपोर्ट्स 23 गुना तक बढ़ गए हैं। बीते एक दशक में हमारा डिफेंस एक्सपोर्ट भी 21 गुना बढ़ा है। ये सारी अचीवमेंट्स, देश की मैन्युफैक्चरिंग इकोनॉमी की ताकत को दिखाती है। ये दिखाती है कि भारत में कैसे हर सेक्टर में नई जॉब्स भी क्रिएट हो रही हैं।

साथियों,

TV9 की इस समिट में, विस्तार से चर्चा होगी, अनेक विषयों पर मंथन होगा। आज हम जो भी सोचेंगे, जिस भी विजन पर आगे बढ़ेंगे, वो हमारे आने वाले कल को, देश के भविष्य को डिजाइन करेगा। पिछली शताब्दी के इसी दशक में, भारत ने एक नई ऊर्जा के साथ आजादी के लिए नई यात्रा शुरू की थी। और हमने 1947 में आजादी हासिल करके भी दिखाई। अब इस दशक में हम विकसित भारत के लक्ष्य के लिए चल रहे हैं। और हमें 2047 तक विकसित भारत का सपना जरूर पूरा करना है। और जैसा मैंने लाल किले से कहा है, इसमें सबका प्रयास आवश्यक है। इस समिट का आयोजन कर, TV9 ने भी अपनी तरफ से एक positive initiative लिया है। एक बार फिर आप सभी को इस समिट की सफलता के लिए मेरी ढेर सारी शुभकामनाएं हैं।

मैं TV9 को विशेष रूप से बधाई दूंगा, क्योंकि पहले भी मीडिया हाउस समिट करते रहे हैं, लेकिन ज्यादातर एक छोटे से फाइव स्टार होटल के कमरे में, वो समिट होती थी और बोलने वाले भी वही, सुनने वाले भी वही, कमरा भी वही। TV9 ने इस परंपरा को तोड़ा और ये जो मॉडल प्लेस किया है, 2 साल के भीतर-भीतर देख लेना, सभी मीडिया हाउस को यही करना पड़ेगा। यानी TV9 Thinks Today वो बाकियों के लिए रास्ता खोल देगा। मैं इस प्रयास के लिए बहुत-बहुत अभिनंदन करता हूं, आपकी पूरी टीम को, और सबसे बड़ी खुशी की बात है कि आपने इस इवेंट को एक मीडिया हाउस की भलाई के लिए नहीं, देश की भलाई के लिए आपने उसकी रचना की। 50,000 से ज्यादा नौजवानों के साथ एक मिशन मोड में बातचीत करना, उनको जोड़ना, उनको मिशन के साथ जोड़ना और उसमें से जो बच्चे सिलेक्ट होकर के आए, उनकी आगे की ट्रेनिंग की चिंता करना, ये अपने आप में बहुत अद्भुत काम है। मैं आपको बहुत बधाई देता हूं। जिन नौजवानों से मुझे यहां फोटो निकलवाने का मौका मिला है, मुझे भी खुशी हुई कि देश के होनहार लोगों के साथ, मैं अपनी फोटो निकलवा पाया। मैं इसे अपना सौभाग्य मानता हूं दोस्तों कि आपके साथ मेरी फोटो आज निकली है। और मुझे पक्का विश्वास है कि सारी युवा पीढ़ी, जो मुझे दिख रही है, 2047 में जब देश विकसित भारत बनेगा, सबसे ज्यादा बेनिफिशियरी आप लोग हैं, क्योंकि आप उम्र के उस पड़ाव पर होंगे, जब भारत विकसित होगा, आपके लिए मौज ही मौज है। आपको बहुत-बहुत शुभकामनाएं।

धन्यवाद।