Quote“This family of 130 crore Indians is all I have, you people are everything in my life and this life too is for you”
Quote“I repeat the resolve that I will do whatever I can, for the welfare of everyone, for the honour of every Indian, for the security of every Indian and for the prosperity of every Indian and a life of happiness and peace for everyone”
Quote“Seva, Sushasan aur Gareeb Kalyan have changed the meaning of government for the people”
Quote“Government is trying to give a permanent solution to the problems which were earlier assumed to be permanent”
Quote“Our government started empowering the poor from day one”
Quote“we are working to build a new India not a vote bank”
Quote“100% empowerment means ending discrimination and appeasement. 100% empowerment means that every poor gets full benefits of government schemes”
Quote“No goal is impossible for capability of New India”

भारत माता की, जय

भारत माता की, जय

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र जी, येथील लोकप्रिय आणि कर्तृत्ववान मुख्यमंत्री माझे मित्र जयराम ठाकुर जी, प्रदेशाध्यक्ष आणि आमचे जुने सहकारी  सुरेश जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, खासदार , आमदार , हिमाचलचे सर्व लोकप्रतिनिधि.  आज माझ्या आयुष्यातील एक विशेष दिवस देखील आहे आणि त्या विशेष दिवशी या देवभूमीला प्रणाम करण्याची संधी मिळाली यापेक्षा मोठे जीवनाचे सौभाग्‍य काय असू शकते. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला  आशीर्वाद देण्यासाठी आलात, मी तुमचे खूप-खूप  आभार मानतो.

आताच देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात  पीएम किसान सम्मान निधीचे पैसे हस्तांतरित झाले आहेत, त्यांना पैसे मिळाले ही आहेत, आणि आज मला   शिमल्याच्या या  भूमीवरून देशातील 10 कोटींहून अधिक  शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याचे  सौभाग्‍य लाभले आहे. ते शेतकरी देखील  शिमलाची आठवण काढतील , हिमाचलची आठवण काढतील, या देवभूमीची आठवण काढतील. मी या सर्व शेतकरी बंधू-भगिनींचे हार्दिक अभिनंदन करतो, अनेक-अनेक शुभेच्छा देतो.

मित्रांनो ,

हा कार्यक्रम शिमला इथे आहे , मात्र एक प्रकारे हा कार्यक्रम आज संपूर्ण भारताचा आहे. आमची इथे चर्चा सुरु होती की सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कसा आणि कोणता कार्यक्रम करायचा. तेव्हा आपले  नड्डा जी, जे हिमाचलचेच आहेत, आपले जयराम जी; यांच्याकडून  एक प्रस्ताव आला आणि दोन्ही प्रस्ताव मला खूप आवडले. या आठ वर्षांच्या निमित्ताने मला काल  कोरोना काळात ज्या मुलांनी आपले आई-वडील दोन्ही गमावले, अशा मुलांची जबाबदारी सांभाळण्याची संधी मला काल मिळाली. देशातील त्या हजारो मुलांची देखभाल करण्याचा  निर्णय सरकारने घेतला आणि काल मी त्यांना थोडे  पैसे  डिजिटली पाठवले. आठ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त असा कार्यक्रम होणे मनाला खूप समाधान देतो,  आनंद देतो.

आणि मग माझ्यासमोर प्रस्ताव आला की आपण  एक कार्यक्रम हिमाचलमध्ये करूया, तेव्हा मी डोळे झाकून करून होकार दिला.  कारण माझ्या जीवनात  हिमाचलचे स्‍थान इतके मोठे आहे, इतके मोठे आहे , इतके मोठे आहे आणि आनंदाचे क्षण जर  हिमाचलमध्ये येऊन व्यतीत करण्याची संधी मिळत असेल तर ती गोष्टच वेगळी.  म्हणूनच आज मी म्हणालो,  आठ वर्षांनिमित्त देशाचा हा महत्‍वपूर्ण कार्यक्रम आज शिमलाच्या भूमीवर होत आहे , जी कधी माझी  कर्मभूमि होती, माझ्यासाठी जी देवभूमी आहे, माझ्यासाठी जी पुण्‍यभूमी आहे. तिथे आज मला देशवासियांशी या  देवभूमीवरून बोलण्याची संधी मिळाली , ही  माझ्यासाठी आनंद द्विगुणित करणारी गोष्ट आहे. मित्रांनो ,

130 कोटी  भारतीयांचा सेवक म्हणून  काम करण्याची तुम्ही सर्वांनी मला जी संधी दिली , मला जे  सौभाग्य लाभले आहे , सर्व भारतीयांचा जो  विश्वास मला मिळाला आहे, आज मी जे काही करू शकलो आहे,  दिवस-रात्र धावू शकतो, तेव्हा असा विचार करू नका की मोदी करतात, असे समजू नका की मोदी धावत आहेत. हे सगळे तर  130 कोटी देशवासियांच्या कृपेने होत आहे, आशिर्वादाने होत आहे, त्यांच्यामुळे होत आहे , त्यांच्या ताकदीने होत आहे. कुटुंबाचा एक सदस्य या नात्याने मी कधीही स्वतःला त्या पदावर पाहिले नाही, कल्‍पना देखील केली नाही, आणि आजही करत नाही की मी कुणी पंतप्रधान आहे. जेव्हा फाईलीवर  सही  करतो, एक जबाबदारी असते, तेव्हा तर मला पंतप्रधानांचे  दायित्‍व म्हणून मला काम करायचे असते. मात्र त्यानंतर जशी ती फाईल तिथून जाते,  मी पंतप्रधान नसतो, मी केवळ आणि केवळ 130 कोटी देशवासियांच्या कुटुंबाचा  सदस्‍य बनतो. तुमच्याच कुटुंबाचा सदस्‍य म्हणून , एक प्रधान सेवक म्हणून जिथे कुठे असतो,  काम करत असतो आणि यापुढेही  कुटुंबाचा सदस्‍य म्हणून, कुटुंबाच्या  आशा-आकांक्षामध्ये सहभागी होणे ,  130 कोटी देशवासियांचे कुटुंब , हेच सगळे माझ्या आयुष्यात आहे. माझ्या आयुष्यात तुम्हीच सगळे सर्व काही आहात आणि हे आयुष्य देखील तुमच्यासाठीच आहे.

आणि जेव्हा आमचे सरकार आपली  आठ वर्ष पूर्ण करत आहे, तेव्हा आज मी पुन्हा एकदा या देवभूमीवरून माझ्या संकल्पाचा पुनरुच्चार करतो, कारण  संकल्‍प पुन्हा पुन्हा आठवत रहायला हवा,  संकल्‍प कधीही विसरता कामा नये, आणि माझा संकल्‍प होता,  आज आहे, आणि यापुढेही राहील. ज्या संकल्पासाठी लढत राहीन, ज्या संकल्पासाठी तुम्हा सर्वांबरोबर चालत राहीन आणि म्हणूनच माझा हा संकल्‍प आहे  भारतवासीच्या सन्मानासाठी, प्रत्येक भारतीयाची सुरक्षा , प्रत्येक भारतीय कसा  समृद्ध होईल, भारतीयांना  सुख-शांततापूर्ण जीवन कसे मिळेल,  या एकच भावनेने गरीबातील  गरीब असेल, दलित असेल,  पीड़ित असेल, शोषित असेल,  वंचित असेल,  दूर-सुदूर जंगलांमध्ये राहणारे लोक असतील, डोंगरमाथ्यावर राहणारे एखाद-दोन कुटुंबे असतील , या सर्वांच्या कल्याणासाठी  जितके जास्त  काम करू शकतो, ते करत असतो, हीच भावना घेऊन आज मी पुन्हा एकदा  या देवभूमीवरून स्वतःला   संकल्पित करतो.

मित्रांनो ,

आपण सर्वांनी मिळून भारताला त्या उंचीवर घेऊन जाऊ , जिथे पोहचण्याचे स्वप्न स्वातंत्र्यासाठी स्वतःचे सगळे काही समर्पित करणाऱ्या लोकांनी पाहिले होते. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात  भारताच्या अतिशय उज्वल भविष्याच्या  विश्वासासह , भारताची युवा शक्ति, भारताची नारीशक्ति, यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून मी आज तुमच्यासमोर आलो आहे.

मित्रांनो ,

आयुष्यात जेव्हा आपण मोठ्या लक्ष्यांच्या दिशेने पुढे वाटचाल करतो, तेव्हा अनेकदा हे पाहणे देखील गरजेचे असते की आपण कुठून निघालो होतो, कुठून सुरुवात केली होती. आणि जेव्हा ते आठवतो, तेव्हाच तर हिशेब लागतो की  कुठून निघालो आणि कुठे पोहचलो  , आपला वेग कसा होता,आपली  प्रगति कशी होती, आपली उपलब्धि काय होती. जर आपण 2014 पूर्वीचे दिवस आठवले , ते दिवस विसरू नका मित्रांनो, तर कुठे आजच्या दिवसाचे मोल समजेल.  आजची परिस्थिती पाहिली , तर समजेल मित्रांनो , देशाने खूप मोठा पल्ला गाठला आहे.

2014 पूर्वी वृत्तपत्रात बातम्या असायच्या, ठळक बातम्या असायच्या, टीव्हीवर चर्चाही व्हायची. आणि कशाबद्दल असायचे तर लूटमार, भ्रष्टाचार, घोटाळे, घराणेशाही, नोकरशाही, रखडलेल्या अडकलेल्या भरकटलेल्या योजनांबद्दल. मात्र आता काळ बदलला आहे,आज सरकारी योजनांमधून मिळणाऱ्या लाभांची चर्चा होते. सिरमौर इथून एखादी समादेवी सांगते की मला हे लाभ मिळाले आहेत. हा  शेवटच्या घरापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असतो.

गरीबांच्या हक्काचे पैसे थेट त्यांच्या खात्यात पोहचण्याची चर्चा व्हायची, आज जगात चर्चा होते  भारताच्या  स्टार्टअपची,  आज चर्चा होते, जागतिक बँक देखील चर्चा करते भारताच्या व्यवसाय सुलभतेची, आज भारतातील  निर्दोष नागरिक चर्चा करतात, गुन्हेगारांना लगाम घालण्याच्या आपल्या ताकदीची , भ्रष्टाचार विरोधात शून्य सहनशीलतेसह पुढे जाण्याची आज चर्चा होते.

2014 पूर्वीच्या सरकारने भ्रष्टाचार हा व्यवस्थेचा आवश्यक भाग मानला होता, तेव्हाच्या सरकारने  भ्रष्टाचारा विरोधात लढण्याऐवजी त्याच्यासमोर गुडघे टेकले होते. तेव्हा  देश पाहत होता की  योजनांचे पैसे गरजूंपर्यंत पोहचण्यापूर्वीच लुटले जातात. मात्र आज चर्चा जन-धन खात्यांमधून मिळणाऱ्या लाभांची होत आहे. जनधन-आधार आणि मोबाइल यातून बनलेल्या  त्रिशक्तिची होत आहे. पूर्वी स्वयंपाकघरात धूर सहन करणे नाईलाज होता, आज उज्ज्वला योजनेमुळे सिलेंडर मिळवण्याची सोय आहे. पूर्वी उघड्यावर शौचाला नाईलाजाने जावे लागायचे, आज घरात  शौचालय बांधून सन्मानाने जगण्याचे स्वातंत्र्य आहे.  पूर्वी उपचारांसाठी  पैसे गोळा करावे लागायचे, आज प्रत्येक  गरीबाला आयुष्मान भारतचा आधार आहे. पूर्वी तिहेरी  तलाकची भीती होती, आता आपल्या अधिकारांसाठी लढाई लढण्याचा उत्साह आहे.

मित्रहो

2014 च्या पूर्वी देशाच्या सुरक्षेबद्दल चिंता वाटत असे, आज सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक याचा अभिमान वाटतो. आमच्या सीमा पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित आहेत. पूर्वी देशाचा ईशान्य भाग असंतुलित विकासामुळे, भेदभावामुळे दुखावला गेला होता, दुःखी होता. आज आपला इशान्य प्रदेश आपल्या हृदयाशी जोडला गेला आहे आणि आधुनिक पायाभूत सुविधांशीसुद्धा जोडला जात आहे. सेवा, सुशासन आणि गरीबांच्या कल्याणासाठी बनवल्या गेलेल्या आमच्या योजनांमुळे लोकांच्या दृष्टीने सरकारचा अर्थच बदलून टाकला आहे. आता सरकार म्हणजे मायबाप नाही, तो जमाना गेला, आता सरकार सेवक आहे, सेवक, जनता जनार्दनाचा सेवक. आता सरकार जीवनात दखल देण्यासाठी नाही तर जीवन सोपे करण्यासाठी काम करत आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही विकासाचे राजकारण देशाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. विकासाच्या याच आशेमुळे लोक पुन्हा स्थिर सरकार निवडून देत आहे आणि डबल इंजिनचे सरकार निवडून देत आहे.

मित्रहो,

आपण नेहमी ऐकत असतो की सरकार येते, सरकार जाते, परंतु सिस्टीम तीच राहत असते. आमच्या सरकारने या सिस्टीमला गरिबांच्या बाबतीत जास्त संवेदनशील बनवले, व्यवस्थेमध्ये सातत्याने सुधारणा केल्या. पीएम आवास योजना असो, शिष्यवृत्ती देणे असो, किंवा निवृत्तीवेतन योजना, तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही भ्रष्टाचाराला कमीत कमी वाव ठेवला आहे. यापूर्वी प्रश्न हे कायमच्या समस्या असल्यासारखे मानले जात होते, त्या प्रश्नांना आम्ही कायमचा तोडगा देण्याचा प्रयत्न करत आहोत. जेव्हा सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण हे लक्ष्य असेल तेव्हा काम कसे होते त्याचे एक उदाहरण आहे ते म्हणजे थेट लाभ हस्तांतरण योजना. आता मी जे म्हणत होतो, थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून दहा कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यामध्ये थेट 21 हजार कोटी रुपये ट्रान्सफर झाले आहेत.

मित्रहो,

आमच्या छोट्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी हे होत आहे. त्यांच्या सन्मानासाठीच हा निधी आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये अशाच प्रकारे थेट लाभ हस्तांतरण योजनेच्या माध्यमातून आम्ही देशवासीयांच्या खात्यांमध्ये बावीस लाख कोटी रुपयांहून जास्त रक्कम ट्रान्सफर केली आहे आणि पूर्वी शंभर रुपये पाठवले तर आधी 85 पैसे गायब होऊन जात असत. जेवढे पैसे पाठवले तेवढे संपूर्णपणे योग्य लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पाठवले गेले आहेत.

मित्रहो,

आज या योजनेमुळे सव्वा दोन लाख करोड रुपयांची गळती थांबवली गेली आहे. यापूर्वी हेच सव्वा दोन लाख करोड रुपये मध्यस्थांच्या हातात जात असत. या थेट लाभ हस्तांतरण योजनेमुळे देशात सरकारी योजनांचा गैरफायदा घेणारी नऊ कोटींपेक्षा अधिक खोटी नावे आम्ही यादीतून हटवली आहेत. आपण कल्पना करा, खोटी नावे चढवून गॅस सबसिडी, मुलांच्या शिक्षणासाठी पाठवलेली फीस, कुपोषणमुक्तीसाठी पाठवला गेलेला पैसा सर्व काही लुटण्याचा एक उघड-उघड खेळच देशात चालत होता. देशातील गरिबांबाबत हा अन्याय होत नव्हता का? जी मुले उज्वल भविष्याची आशा बाळगतात त्या मुलांवर हा अन्याय नव्हता? हे पाप नव्हते का? जर कोरोना काळात ही 9 कोटी बनावट नावे कागदपत्रात असती तर गरिबांना सरकारच्या प्रयत्नांचा लाभ मिळू शकला असता का?

मित्रहो,

जेव्हा गरिबांना दररोज करावा लागणारा संघर्ष कमी होतो, जेव्हा तो शक्तीशाली होतो तेव्हा  तो आपली गरिबी दूर करण्यासाठी नव्या ऊर्जेनिशी कामाला लागतो. याच विचारांसह आमचे सरकार पहिल्या दिवसापासून गरिबाला शक्तीशाली करण्याच्या  कामी लागले आहे. आम्ही त्याच्या जगण्यातील हर एक चिंता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आज देशातील तीन कोटी गरिबांकडे त्यांचे स्वतःचे पक्के आणि नवीन घर आहे. जिथे आज ते राहायलासुद्धा लागले आहेत. आज देशातील 50 कोटींपेक्षा जास्त गरिबांकडे पाच लाख रुपयांपर्यंतच्या विनामूल्य इलाजाची सुविधा आहे. आज देशातील 25 कोटींहून अधिक गरिबांकडे 2-2 लाख रुपयांचा अपघाती विमा आणि  टर्म विमा आहे, विमा आहे.  आज 45 कोटी गरिबांच्याकडे जनधन खाते आहे.

मित्रहो,

आज मोठ्या अभिमानाने सांगू शकतो की देशात अपवादानेच असे कुटुंब असेल जे सरकारच्या कोणत्याही योजनेशी जोडले गेलेले नाही, त्या योजनेचा त्याला फायदा होत नाही. आम्ही दूर दूर पर्यंत जाऊन लोकांना लस दिली आहे. देश जवळपास दोनशे कोटी लसमात्रांच्या रेकॉर्ड करण्याच्या स्तरावर जाऊन पोहोचत आहे आणि मी जयरामजींचे अभिनंदन करतो की करोना काळात ज्याप्रकारे त्यांच्या सरकारने काम केले आणि हे पर्यटन स्थळ असल्यामुळे पर्यटनाच्या बाबतीत कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्यांनी लसीकरण एवढ्या वेगाने चालवले. हिंदुस्थानात सर्वात आधी लसीकरणाचे काम पूर्ण करणाऱ्यांमध्ये जयरामजींचे सरकार वरच्या स्थानावर आहे. मित्रहो, आम्ही गावात राहणाऱ्या सहा कोटी कुटुंबांना स्वच्छ पाण्याच्या जोडणीशी जोडले आहे, नल से जल.

मित्रहो,

आम्ही 35 कोटी मुद्रा कर्ज देऊन गावातील आणि छोट्या शहरातील करोडो युवकांना स्वयंरोजगाराची संधी मिळवून दिली आहे. मुद्रा कर्ज घेऊन कोणी टॅक्सी चालवत आहे, कोणी शिवणकामाचे दुकान टाकत आहे तर एखादी मुलगी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहे. फेरीवाले, ठेले, हे काम करणाऱ्या साधारण 35 लाख मित्रांना पहिल्यांदाच बँकेकडून कर्ज मिळाले आहे. आपले काम वाढवण्याचा मार्ग मिळाला आहे. आणि ही जी प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे ती माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, ज्यामध्ये बँकेकडून 70 टक्के पैसा मिळवणाऱ्यामध्ये 70 टक्के आमच्या माता भगिनींचा समावेश आहे. त्या आज नवउद्योजक बनून लोकांना रोजगार देत आहेत.

मित्रहो,

इथे हिमाचल प्रदेशातील प्रत्येक घरातून, अगदी एखादे कुटुंब अपवाद असेल की त्या कुटुंबातील कोणीही सैनिक नाही. ही शूरवीरांची भूमी आहे ही वीरमातांची भूमी आहे, ज्या आपल्या कुशीतून अशा शूरवीरांना जन्म देतात जे मातृभूमीच्या रक्षणासाठी 24 तास स्वतः मेहनत करतात.

मित्रहो

ही सैनिकांची भूमी आहे, सैनिक कुटुंबांची भूमी आहे. आधीच्या सरकारने त्यांच्याबरोबर कशा तऱ्हेने वर्तणूक ठेवली होती, वन रैंक वन पेंशन या नावाखाली कशाप्रकारे फसवले होते ते येथील लोक कधीही विसरू शकत नाहीत. आता आम्ही एका माजी सैनिक बरोबर बोलत होतो. त्यांचे जीवन सैन्यात गेले आहे. आम्ही आल्यानंतर त्यांना स्वतःचे पक्के घर मिळाले. मित्रहो, त्यांना निवृत्त होऊन सुद्धा तीस-चाळीस वर्षे होऊन गेली आहेत.

मित्रहो,

सैनिकांचे कुटुंबीय आमच्या संवेदनशीलतेला जास्त चांगले समजू शकतील. हे आमचे सरकार आहे. ज्यांनी चार दशके ज्याची वाट बघितली जात होती ती पेन्शन लागू केली. आमच्या माजी सैनिकांना एरिअर्सची रक्कम दिली. हिमाचल प्रदेशात प्रत्येक कुटुंबाला याचा खूप मोठा फायदा झाला आहे.

आमच्या देशामध्ये कित्येक दशके वोट बँकेचे राजकारण झाले आहे. आपली आपली वोट बँक बनवण्याच्या राजकारणाने देशाचे प्रचंड नुकसान केले आहे. आम्ही वोट बँक उभारण्यासाठी नाही तर नवीन भारत उभारण्यासाठी काम करत आहोत. जेव्हा राष्ट्राच्या नवनिर्माणाचे ध्येय्य असते, जेव्हा आत्मनिर्भर भारत हे लक्ष्य असते, जेव्हा 130 कोटी देशवासीयांची सेवा आणि त्यांचे कल्याण हे उद्दिष्ट असते, तेव्हा वोटबँक बनवली जात नाही. सर्व देशवासीयांचा विश्वास जिंकून घेतला जातो. म्हणूनच सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास या भावनेने पुढे मार्गक्रमण करत आहोत. सरकारी योजनांचा लाभ सगळ्यांना मिळावा, प्रत्येक गरिबाला मिळावा, कोणीही गरीब त्यापासून वंचित राहू नये आता हाच सरकारचा विचार आहे आणि याच भावनेने आम्ही काम करत आहोत.

आम्ही शंभर टक्के लाभ देण्याचा आणि शंभर टक्के लाभार्थींपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. लाभार्थी भरपूर असावेत, सर्वांना लाभ मिळावा, यासाठी कार्य केले जात आहे. शंभर टक्के सबलीकरण म्हणजे भेदभाव संपुष्टात येणार, शिफारस, तुष्टीकरण अशा गोष्टी होणार नाहीत. शंभर टक्के सशक्तीकरण म्हणजे प्रत्येक गरीबाला सरकारी योजनांचा पूर्ण लाभ मिळणे होय.

जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हिमाचल प्रदेशामध्ये या दिशेने चांगले काम होत आहे, हे जाणून मला खूप चांगले वाटले.  प्रत्येक घराला नळाव्दारे पाणी योजनेमध्येही हिमाचलने 90 टक्के काम पूर्ण केले आहे. किन्नौर, लाहौल-स्पिती, चंबा, हमीरपूर या सारख्या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के योजनांचे काम करण्यात यश मिळाले आहे.

मित्रांनो,

मला चांगले आठवतेय, 2014 च्या आधी ज्यावेळी आपल्यामध्ये येत होतो, त्यावेळी म्हणत होतो की, भारत जगाबरोबर नजर खाली करून नाही तर, नजरेला नजर भिडवून बोलेल. आज भारत, नाइलाजाने मैत्रीचा हात पुढे करीत नाही. ज्यावेळी नाइलाजाने हात पुढे केला जातो, तो अशा कारणासाठी असतो की, समोरच्याला आपण मदत करणार आहोत. कोरोना काळामध्येही आपण 150 पेक्षा जास्त देशांना औषधे पाठवली, लस पाठवली. यामध्ये हिमाचल प्रदेशच्या औषध निर्मिती केंद्रांनी मोठी भूमिका बजावली आहे.

भारताने सिद्ध करून दाखवले की, आपल्याकडे क्षमताही आहे आणि आम्ही कार्यही करू शकतो. आंतरराष्ट्रीय संस्थांनीही आता हे मान्य केले आहे की, भारतामधली गरीबी कमी होत आहे. लोकांकडे आता सुविधा वाढल्या आहेत. म्हणूनच भारताला फक्त आपल्या लोकांची आवश्यकता पूर्ण करायची आहे असे नाही तर लोकांमध्ये जागृत झालेल्या आकांक्षाही आपण पूर्ण करायच्या आहेत.

आपल्याला 21 व्या शतकातल्या मजबूत भारतासाठी, आगामी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला परिश्रम करायचे आहेत. एक असा भारत निर्माण करायचा आहे, की ज्याची ओळख अभाव असलेला देश म्हणून नाही तर आधुनिक असणारा देश म्हणून निर्माण झाली पाहिजे. एक असा भारत, ज्यामध्ये स्थानिक उत्पादक, स्थानिक मागणी तर पूर्ण करतातच आणि जगाच्या बाजारपेठेमध्येही आपल्या विक्री करतात. एक असा भारत, जो आत्मनिर्भर असेल, जो आपल्या लोकलसाठी  व्होकल असेल. ज्याला आपल्या स्थानिक उत्पादनाचा अभिमान वाटत असेल.

आपल्या हिमाचलचे तर हस्तशिल्प, इथली वास्तुकला, अशीच खूप प्रसिद्ध आहे. चंबाचे धातूकाम, सोलनची पाइन कला,  कांगडाची मिनिएचर चित्रकला वेगळी त्यामुळे  हे पाहण्यासाठी येणारे पर्यटक तर आश्चर्यचकीत होतात. अशी उत्पादने, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली  पाहिजेत.   बाजारपेठांची शान वाढविण्यासाठी आम्ही काम करीत आहोत.

तसे पाहिले तर बंधू आणि भगिनींनो, हिमाचलच्या स्थानिक उत्पादनांचा चकचकाट आता तर काशी बाबा विश्वनाथ मंदिरापर्यंत पोहोचला आहे. कुल्लूमध्ये बनविलेली, आमच्या माता-भगिनी बनवितात, कुल्लूमध्ये बनविण्यात आलेली ‘पूहलें’ कडाक्याच्या थंडीच्या दिवसात काशी विश्वनाथ मंदिराच्या पूजारी आणि सुरक्षा रक्षकांची मदत करते. बनारसचा खासदार या नात्याने मी भेट देण्यासाठी हिमाचल प्रदेशच्या लोकांचे विशेष आभार व्यक्त करतो.

मित्रांनो,

गेल्या आठ वर्षांच्या प्रयत्नांचे जे परिणाम आता दिसून येत आहेत, त्यामुळे माझ्या मनामध्ये खूप मोठा विश्वास निर्माण झाला आहे. आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आपल्या भारतावासियांच्या दृष्टीने कोणतेही लक्ष्य गाठणे अशक्य आहे,  असे अजिबात नाही. आज भारत जगातला सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था असणारा देश आहे. आज भारतामध्ये विक्रमी परदेशी गुंतवणूक होत आहे. आज भारताने निर्यातीचे नवेनवे विक्रम प्रस्थापित करीत आहे. आठ वर्षांपूर्वी स्टार्ट अप्स उद्योग देशात कुठेही नव्हते. आज आपण जगामध्ये तिसरी मोठी स्टार्ट अप परिसंस्था निर्माण केली आहे. जवळ-जवळ दर आठवड्याला हजार कोटी रूपयांची कंपनी आपले युवक तयार करीत आहेत. आगामी 25 वर्षांच्या विराट संकल्पांना सिद्धीस नेण्यासाठी देश नवीन अर्थव्यवस्थेसाठी नवीन पायाभूत सुविधांची निर्मिती वेगाने करीत आहे.

आपण एकमेकांना पूरक, समर्थन-पाठिंबा देणारी बहुस्तरीय संपर्क यंत्रणा कार्यान्वित करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या अंदाजपत्रकामध्ये जी पर्वतमाला योजनेची घोषणा केली आहे, त्या योजनेमुळे हिमाचल सारख्या डोंगराळ प्रदेशामध्ये संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होईल. इतकेच नाही, तर आम्ही ‘व्हायब्रंट ब्रॉर्डर व्हिलेज’ यासारख्या योजनेसाठीही अंदाजपत्रकामध्ये तरतूद केली आहे. त्यामुळे सीमेवरच्या गावे चांगली व्हायब्रंट बनतील, पर्यटकांनाच्या दृष्टीने आवडती स्थाने बनतील. अनेक क्रियाकलापांचे केंद्र ही गावे बनतील. सीमेला लागून असलेल्या गावांच्या विकासासाठी भारत सरकारने एक विशेष योजना तयार केली आहे. या व्हायब्रंट बॉर्डर व्हिलेज योजनेचा लाभ माझ्या हिमाचलच्या सीमावर्ती गावांना स्वाभाविक रूपाने मिळणार आहे.

मित्रांनो,

आज ज्यावेळी आपण जगातल्या सर्वश्रेष्ठ डिजिटल पायाभूत सुविधा बनविण्यावर लक्ष केंद्रीत करीत आहोत. आपल्या देशभरामध्ये आरोग्य सेवांच्या आधुनिकीकरणाचे काम केले जात आहे. आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मोहिमे अंतर्गत जिल्हा आणि प्रभाग स्तरावर गंभीर आजारांवर उपचार करण्‍यासाठी  आरोग्य दक्षता सुविधा आम्ही तयार करीत आहोत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय असावे, या दिशेने काम सुरू आहे. आणि इतकेच नाही तर गरीब माता आपल्या मुलाला अथवा मुलीला आता डॉक्टर बनवण्याचे स्वप्नही पूर्ण शकणार आहे. आधी तर अशी परिस्थिती होती की, जर त्या मुला-मुलीचे शाळेत इंग्रजी शिक्षण झाले नसेल तर त्या अपत्याला डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्णच रहायचे. आता आम्ही निर्णय घेतला आहे  की, वैद्यकीय आणि तंत्रज्ञान शिक्षण आपण मातृभाषेतून मिळावे, यासाठी प्रोत्साहन देत आहोत. यामुळे गरीबातल्या गरीबाचे मूल, गावांतली मुलेही डॉक्टर बनू शकतील. आणि म्हणूनच त्याला इंग्रजीचे गुलाम होण्याची गरज पडणार नाही.

मित्रांनो,

देशामध्ये एम्ससारख्या उत्कृष्ट संस्थांचा व्याप्ती देशाच्या दूर-दुर्गम राज्यांपर्यंत वाढविण्यात येत आहे. बिलासपूरमध्ये निर्माण होत असलेले एम्स हे याचे प्रत्यक्ष प्रमाण आहे. आता हिमाचलवासियांना चंदीगढ अथवा दिल्ली येथे जाण्याची गरज पडणार नाही.

मित्रांनो,

हे सर्व प्रयत्न हिमाचल प्रदेशाच्या विकासालाही वेग देण्याचे काम करीत आहे. ज्यावेळी अर्थव्यवस्था मजबूत असते, रस्ते संपर्क यंत्रणा, इंटरनेट संपर्क व्यवस्था, आरोग्य सेवा सुधारणा होते, त्यावेळी पर्यटनालाही प्रोत्साहन मिळते. भारत आपल्याकडे ज्या पद्धतीने ड्रोनचे उत्पादन वाढवत आहे,  ड्रोनचा वापर वाढवत आहे, त्यामुळे सुदूर-दुर्गम क्षेत्रातल्या, हिंदुस्तानमधले जे दुर्गम, पोहोचण्यासाठी अवघड भाग आहेत, त्यांना ड्रोन सेवेचा खूप मोठा लाभ मिळणार आहे.

बंधू आणि भगिनींनो,

गेल्या आठ वर्षांमध्ये स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षासाठी म्हणजेच 2047 साठी भक्कम आधार तयार झाला आहे. या अमृतकाळामध्ये सिद्धीसाठी एकच मंत्र आहे, - सबका प्रयास! सर्वांनी कामामध्ये सहभागी व्हावे आणि सर्वांनी पुढे मार्गक्रमणा करावी. याच भावनेने आम्ही कार्यरत आहोत. कितीतरी दशकांनंतर आणि कितीतरी पिढ्यांनंतर आपल्या पिढीला हे सौभाग्य मिळाले आहे. म्हणूनच, चला तर मग, या आपण संकल्प करू या. आपण सर्वजण मिळून, सर्वांच्या प्रयत्नांनी - ‘हम सबका प्रयास‘ च्या आवाहनामध्ये आपल्या सर्वांची सक्रीय भागीदारी असली पाहिजे. प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.

याच विश्वासाने आज हिमाचलने जो आशीर्वाद दिला आहे. आणि देशाच्या प्रत्येक विभागातून आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले, जोडले गेलेले लोक आहेत. आज संपूर्ण हिंदुस्तान सिमल्याला जोडला गेला आहे. कोट्यवधी -कोट्यवधी लोक आज जोडले गेले आहेत. आज मी सिमल्याच्या भूमीवरून त्या कोट्यवधी देशवासियांबरोबर संवाद साधत आहे. मी त्या कोट्यवधी देशवासियांना अनेकानेक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद असेच कायम रहावेत, आपण आणखी जास्त काम करीत रहावे, रात्रंदिवस कार्यरत रहावे, अगदी आपले प्राण ओतून काम करीत रहावे. अशा एका भावनेने आपल्या सर्वांच्या आशीर्वादासह मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अगदी मनापासून- हृदयापासून धन्यवाद देतो. माझ्याबरोबर जयघोष करावा -

भारत माता की -जय !

भारत माता की -जय !!

भारत माता की -जय !!!

खूप- खूप धन्यवाद !!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Namo Drone Didi, Kisan Drones & More: How India Is Changing The Agri-Tech Game

Media Coverage

Namo Drone Didi, Kisan Drones & More: How India Is Changing The Agri-Tech Game
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
In future leadership, SOUL's objective should be to instill both the Steel and Spirit in every sector to build Viksit Bharat: PM
February 21, 2025
QuoteThe School of Ultimate Leadership (SOUL) will shape leaders who excel nationally and globally: PM
QuoteToday, India is emerging as a global powerhouse: PM
QuoteLeaders must set trends: PM
QuoteIn future leadership, SOUL's objective should be to instill both the Steel and Spirit in every sector to build Viksit Bharat: PM
QuoteIndia needs leaders who can develop new institutions of global excellence: PM
QuoteThe bond forged by a shared purpose is stronger than blood: PM

His Excellency,

भूटान के प्रधानमंत्री, मेरे Brother दाशो शेरिंग तोबगे जी, सोल बोर्ड के चेयरमैन सुधीर मेहता, वाइस चेयरमैन हंसमुख अढ़िया, उद्योग जगत के दिग्गज, जो अपने जीवन में, अपने-अपने क्षेत्र में लीडरशिप देने में सफल रहे हैं, ऐसे अनेक महानुभावों को मैं यहां देख रहा हूं, और भविष्य जिनका इंतजार कर रहा है, ऐसे मेरे युवा साथियों को भी यहां देख रहा हूं।

साथियों,

कुछ आयोजन ऐसे होते हैं, जो हृदय के बहुत करीब होते हैं, और आज का ये कार्यक्रम भी ऐसा ही है। नेशन बिल्डिंग के लिए, बेहतर सिटिजन्स का डेवलपमेंट ज़रूरी है। व्यक्ति निर्माण से राष्ट्र निर्माण, जन से जगत, जन से जग, ये किसी भी ऊंचाई को प्राप्त करना है, विशालता को पाना है, तो आरंभ जन से ही शुरू होता है। हर क्षेत्र में बेहतरीन लीडर्स का डेवलपमेंट बहुत जरूरी है, और समय की मांग है। और इसलिए The School of Ultimate Leadership की स्थापना, विकसित भारत की विकास यात्रा में एक बहुत महत्वपूर्ण और बहुत बड़ा कदम है। इस संस्थान के नाम में ही ‘सोल’ है, ऐसा नहीं है, ये भारत की सोशल लाइफ की soul बनने वाला है, और हम लोग जिससे भली-भांति परिचित हैं, बार-बार सुनने को मिलता है- आत्मा, अगर इस सोल को उस भाव से देखें, तो ये आत्मा की अनुभूति कराता है। मैं इस मिशन से जुड़े सभी साथियों का, इस संस्थान से जुड़े सभी महानुभावों का हृदय से बहुत-बहुत अभिनंदन करता हूं। बहुत जल्द ही गिफ्ट सिटी के पास The School of Ultimate Leadership का एक विशाल कैंपस भी बनकर तैयार होने वाला है। और अभी जब मैं आपके बीच आ रहा था, तो चेयरमैन श्री ने मुझे उसका पूरा मॉडल दिखाया, प्लान दिखाया, वाकई मुझे लगता है कि आर्किटेक्चर की दृष्टि से भी ये लीडरशिप लेगा।

|

साथियों,

आज जब The School of Ultimate Leadership- सोल, अपने सफर का पहला बड़ा कदम उठा रहा है, तब आपको ये याद रखना है कि आपकी दिशा क्या है, आपका लक्ष्य क्या है? स्वामी विवेकानंद ने कहा था- “Give me a hundred energetic young men and women and I shall transform India.” स्वामी विवेकानंद जी, भारत को गुलामी से बाहर निकालकर भारत को ट्रांसफॉर्म करना चाहते थे। और उनका विश्वास था कि अगर 100 लीडर्स उनके पास हों, तो वो भारत को आज़ाद ही नहीं बल्कि दुनिया का नंबर वन देश बना सकते हैं। इसी इच्छा-शक्ति के साथ, इसी मंत्र को लेकर हम सबको और विशेषकर आपको आगे बढ़ना है। आज हर भारतीय 21वीं सदी के विकसित भारत के लिए दिन-रात काम कर रहा है। ऐसे में 140 करोड़ के देश में भी हर सेक्टर में, हर वर्टिकल में, जीवन के हर पहलू में, हमें उत्तम से उत्तम लीडरशिप की जरूरत है। सिर्फ पॉलीटिकल लीडरशिप नहीं, जीवन के हर क्षेत्र में School of Ultimate Leadership के पास भी 21st सेंचुरी की लीडरशिप तैयार करने का बहुत बड़ा स्कोप है। मुझे विश्वास है, School of Ultimate Leadership से ऐसे लीडर निकलेंगे, जो देश ही नहीं बल्कि दुनिया की संस्थाओं में, हर क्षेत्र में अपना परचम लहराएंगे। और हो सकता है, यहां से ट्रेनिंग लेकर निकला कोई युवा, शायद पॉलिटिक्स में नया मुकाम हासिल करे।

साथियों,

कोई भी देश जब तरक्की करता है, तो नेचुरल रिसोर्सेज की अपनी भूमिका होती ही है, लेकिन उससे भी ज्यादा ह्यूमेन रिसोर्स की बहुत बड़ी भूमिका है। मुझे याद है, जब महाराष्ट्र और गुजरात के अलग होने का आंदोलन चल रहा था, तब तो हम बहुत बच्चे थे, लेकिन उस समय एक चर्चा ये भी होती थी, कि गुजरात अलग होकर के क्या करेगा? उसके पास कोई प्राकृतिक संसाधन नहीं है, कोई खदान नहीं है, ना कोयला है, कुछ नहीं है, ये करेगा क्या? पानी भी नहीं है, रेगिस्तान है और उधर पाकिस्तान है, ये करेगा क्या? और ज्यादा से ज्यादा इन गुजरात वालों के पास नमक है, और है क्या? लेकिन लीडरशिप की ताकत देखिए, आज वही गुजरात सब कुछ है। वहां के जन सामान्य में ये जो सामर्थ्य था, रोते नहीं बैठें, कि ये नहीं है, वो नहीं है, ढ़िकना नहीं, फलाना नहीं, अरे जो है सो वो। गुजरात में डायमंड की एक भी खदान नहीं है, लेकिन दुनिया में 10 में से 9 डायमंड वो है, जो किसी न किसी गुजराती का हाथ लगा हुआ होता है। मेरे कहने का तात्पर्य ये है कि सिर्फ संसाधन ही नहीं, सबसे बड़ा सामर्थ्य होता है- ह्यूमन रिसोर्स में, मानवीय सामर्थ्य में, जनशक्ति में और जिसको आपकी भाषा में लीडरशिप कहा जाता है।

21st सेंचुरी में तो ऐसे रिसोर्स की ज़रूरत है, जो इनोवेशन को लीड कर सकें, जो स्किल को चैनेलाइज कर सकें। आज हम देखते हैं कि हर क्षेत्र में स्किल का कितना बड़ा महत्व है। इसलिए जो लीडरशिप डेवलपमेंट का क्षेत्र है, उसे भी नई स्किल्स चाहिए। हमें बहुत साइंटिफिक तरीके से लीडरशिप डेवलपमेंट के इस काम को तेज गति से आगे बढ़ाना है। इस दिशा में सोल की, आपके संस्थान की बहुत बड़ी भूमिका है। मुझे ये जानकर अच्छा लगा कि आपने इसके लिए काम भी शुरु कर दिया है। विधिवत भले आज आपका ये पहला कार्यक्रम दिखता हो, मुझे बताया गया कि नेशनल एजुकेशन पॉलिसी के effective implementation के लिए, State Education Secretaries, State Project Directors और अन्य अधिकारियों के लिए वर्क-शॉप्स हुई हैं। गुजरात के चीफ मिनिस्टर ऑफिस के स्टाफ में लीडरशिप डेवलपमेंट के लिए चिंतन शिविर लगाया गया है। और मैं कह सकता हूं, ये तो अभी शुरुआत है। अभी तो सोल को दुनिया का सबसे बेहतरीन लीडरशिप डेवलपमेंट संस्थान बनते देखना है। और इसके लिए परिश्रम करके दिखाना भी है।

साथियों,

आज भारत एक ग्लोबल पावर हाउस के रूप में Emerge हो रहा है। ये Momentum, ये Speed और तेज हो, हर क्षेत्र में हो, इसके लिए हमें वर्ल्ड क्लास लीडर्स की, इंटरनेशनल लीडरशिप की जरूरत है। SOUL जैसे Leadership Institutions, इसमें Game Changer साबित हो सकते हैं। ऐसे International Institutions हमारी Choice ही नहीं, हमारी Necessity हैं। आज भारत को हर सेक्टर में Energetic Leaders की भी जरूरत है, जो Global Complexities का, Global Needs का Solution ढूंढ पाएं। जो Problems को Solve करते समय, देश के Interest को Global Stage पर सबसे आगे रखें। जिनकी अप्रोच ग्लोबल हो, लेकिन सोच का एक महत्वपूर्ण हिस्सा Local भी हो। हमें ऐसे Individuals तैयार करने होंगे, जो Indian Mind के साथ, International Mind-set को समझते हुए आगे बढ़ें। जो Strategic Decision Making, Crisis Management और Futuristic Thinking के लिए हर पल तैयार हों। अगर हमें International Markets में, Global Institutions में Compete करना है, तो हमें ऐसे Leaders चाहिए जो International Business Dynamics की समझ रखते हों। SOUL का काम यही है, आपकी स्केल बड़ी है, स्कोप बड़ा है, और आपसे उम्मीद भी उतनी ही ज्यादा हैं।

|

साथियों,

आप सभी को एक बात हमेशा- हमेशा उपयोगी होगी, आने वाले समय में Leadership सिर्फ Power तक सीमित नहीं होगी। Leadership के Roles में वही होगा, जिसमें Innovation और Impact की Capabilities हों। देश के Individuals को इस Need के हिसाब से Emerge होना पड़ेगा। SOUL इन Individuals में Critical Thinking, Risk Taking और Solution Driven Mindset develop करने वाला Institution होगा। आने वाले समय में, इस संस्थान से ऐसे लीडर्स निकलेंगे, जो Disruptive Changes के बीच काम करने को तैयार होंगे।

साथियों,

हमें ऐसे लीडर्स बनाने होंगे, जो ट्रेंड बनाने में नहीं, ट्रेंड सेट करने के लिए काम करने वाले हों। आने वाले समय में जब हम Diplomacy से Tech Innovation तक, एक नई लीडरशिप को आगे बढ़ाएंगे। तो इन सारे Sectors में भारत का Influence और impact, दोनों कई गुणा बढ़ेंगे। यानि एक तरह से भारत का पूरा विजन, पूरा फ्यूचर एक Strong Leadership Generation पर निर्भर होगा। इसलिए हमें Global Thinking और Local Upbringing के साथ आगे बढ़ना है। हमारी Governance को, हमारी Policy Making को हमने World Class बनाना होगा। ये तभी हो पाएगा, जब हमारे Policy Makers, Bureaucrats, Entrepreneurs, अपनी पॉलिसीज़ को Global Best Practices के साथ जोड़कर Frame कर पाएंगे। और इसमें सोल जैसे संस्थान की बहुत बड़ी भूमिका होगी।

साथियों,

मैंने पहले भी कहा कि अगर हमें विकसित भारत बनाना है, तो हमें हर क्षेत्र में तेज गति से आगे बढ़ना होगा। हमारे यहां शास्त्रों में कहा गया है-

यत् यत् आचरति श्रेष्ठः, तत् तत् एव इतरः जनः।।

यानि श्रेष्ठ मनुष्य जैसा आचरण करता है, सामान्य लोग उसे ही फॉलो करते हैं। इसलिए, ऐसी लीडरशिप ज़रूरी है, जो हर aspect में वैसी हो, जो भारत के नेशनल विजन को रिफ्लेक्ट करे, उसके हिसाब से conduct करे। फ्यूचर लीडरशिप में, विकसित भारत के निर्माण के लिए ज़रूरी स्टील और ज़रूरी स्पिरिट, दोनों पैदा करना है, SOUL का उद्देश्य वही होना चाहिए। उसके बाद जरूरी change और रिफॉर्म अपने आप आते रहेंगे।

|

साथियों,

ये स्टील और स्पिरिट, हमें पब्लिक पॉलिसी और सोशल सेक्टर्स में भी पैदा करनी है। हमें Deep-Tech, Space, Biotech, Renewable Energy जैसे अनेक Emerging Sectors के लिए लीडरशिप तैयार करनी है। Sports, Agriculture, Manufacturing और Social Service जैसे Conventional Sectors के लिए भी नेतृत्व बनाना है। हमें हर सेक्टर्स में excellence को aspire ही नहीं, अचीव भी करना है। इसलिए, भारत को ऐसे लीडर्स की जरूरत होगी, जो Global Excellence के नए Institutions को डेवलप करें। हमारा इतिहास तो ऐसे Institutions की Glorious Stories से भरा पड़ा है। हमें उस Spirit को revive करना है और ये मुश्किल भी नहीं है। दुनिया में ऐसे अनेक देशों के उदाहरण हैं, जिन्होंने ये करके दिखाया है। मैं समझता हूं, यहां इस हॉल में बैठे साथी और बाहर जो हमें सुन रहे हैं, देख रहे हैं, ऐसे लाखों-लाख साथी हैं, सब के सब सामर्थ्यवान हैं। ये इंस्टीट्यूट, आपके सपनों, आपके विजन की भी प्रयोगशाला होनी चाहिए। ताकि आज से 25-50 साल बाद की पीढ़ी आपको गर्व के साथ याद करें। आप आज जो ये नींव रख रहे हैं, उसका गौरवगान कर सके।

साथियों,

एक institute के रूप में आपके सामने करोड़ों भारतीयों का संकल्प और सपना, दोनों एकदम स्पष्ट होना चाहिए। आपके सामने वो सेक्टर्स और फैक्टर्स भी स्पष्ट होने चाहिए, जो हमारे लिए चैलेंज भी हैं और opportunity भी हैं। जब हम एक लक्ष्य के साथ आगे बढ़ते हैं, मिलकर प्रयास करते हैं, तो नतीजे भी अद्भुत मिलते हैं। The bond forged by a shared purpose is stronger than blood. ये माइंड्स को unite करता है, ये passion को fuel करता है और ये समय की कसौटी पर खरा उतरता है। जब Common goal बड़ा होता है, जब आपका purpose बड़ा होता है, ऐसे में leadership भी विकसित होती है, Team spirit भी विकसित होती है, लोग खुद को अपने Goals के लिए dedicate कर देते हैं। जब Common goal होता है, एक shared purpose होता है, तो हर individual की best capacity भी बाहर आती है। और इतना ही नहीं, वो बड़े संकल्प के अनुसार अपनी capabilities बढ़ाता भी है। और इस process में एक लीडर डेवलप होता है। उसमें जो क्षमता नहीं है, उसे वो acquire करने की कोशिश करता है, ताकि औऱ ऊपर पहुंच सकें।

साथियों,

जब shared purpose होता है तो team spirit की अभूतपूर्व भावना हमें गाइड करती है। जब सारे लोग एक shared purpose के co-traveller के तौर पर एक साथ चलते हैं, तो एक bonding विकसित होती है। ये team building का प्रोसेस भी leadership को जन्म देता है। हमारी आज़ादी की लड़ाई से बेहतर Shared purpose का क्या उदाहरण हो सकता है? हमारे freedom struggle से सिर्फ पॉलिटिक्स ही नहीं, दूसरे सेक्टर्स में भी लीडर्स बने। आज हमें आज़ादी के आंदोलन के उसी भाव को वापस जीना है। उसी से प्रेरणा लेते हुए, आगे बढ़ना है।

साथियों,

संस्कृत में एक बहुत ही सुंदर सुभाषित है:

अमन्त्रं अक्षरं नास्ति, नास्ति मूलं अनौषधम्। अयोग्यः पुरुषो नास्ति, योजकाः तत्र दुर्लभः।।

यानि ऐसा कोई शब्द नहीं, जिसमें मंत्र ना बन सके। ऐसी कोई जड़ी-बूटी नहीं, जिससे औषधि ना बन सके। कोई भी ऐसा व्यक्ति नहीं, जो अयोग्य हो। लेकिन सभी को जरूरत सिर्फ ऐसे योजनाकार की है, जो उनका सही जगह इस्तेमाल करे, उन्हें सही दिशा दे। SOUL का रोल भी उस योजनाकार का ही है। आपको भी शब्दों को मंत्र में बदलना है, जड़ी-बूटी को औषधि में बदलना है। यहां भी कई लीडर्स बैठे हैं। आपने लीडरशिप के ये गुर सीखे हैं, तराशे हैं। मैंने कहीं पढ़ा था- If you develop yourself, you can experience personal success. If you develop a team, your organization can experience growth. If you develop leaders, your organization can achieve explosive growth. इन तीन वाक्यों से हमें हमेशा याद रहेगा कि हमें करना क्या है, हमें contribute करना है।

|

साथियों,

आज देश में एक नई सामाजिक व्यवस्था बन रही है, जिसको वो युवा पीढी गढ़ रही है, जो 21वीं सदी में पैदा हुई है, जो बीते दशक में पैदा हुई है। ये सही मायने में विकसित भारत की पहली पीढ़ी होने जा रही है, अमृत पीढ़ी होने जा रही है। मुझे विश्वास है कि ये नया संस्थान, ऐसी इस अमृत पीढ़ी की लीडरशिप तैयार करने में एक बहुत ही महत्वपूर्ण भूमिका निभाएगा। एक बार फिर से आप सभी को मैं बहुत-बहुत शुभकामनाएं देता हूं।

भूटान के राजा का आज जन्मदिन होना, और हमारे यहां यह अवसर होना, ये अपने आप में बहुत ही सुखद संयोग है। और भूटान के प्रधानमंत्री जी का इतने महत्वपूर्ण दिवस में यहां आना और भूटान के राजा का उनको यहां भेजने में बहुत बड़ा रोल है, तो मैं उनका भी हृदय से बहुत-बहुत आभार व्यक्त करता हूं।

|

साथियों,

ये दो दिन, अगर मेरे पास समय होता तो मैं ये दो दिन यहीं रह जाता, क्योंकि मैं कुछ समय पहले विकसित भारत का एक कार्यक्रम था आप में से कई नौजवान थे उसमें, तो लगभग पूरा दिन यहां रहा था, सबसे मिला, गप्पे मार रहा था, मुझे बहुत कुछ सीखने को मिला, बहुत कुछ जानने को मिला, और आज तो मेरा सौभाग्य है, मैं देख रहा हूं कि फर्स्ट रो में सारे लीडर्स वो बैठे हैं जो अपने जीवन में सफलता की नई-नई ऊंचाइयां प्राप्त कर चुके हैं। ये आपके लिए बड़ा अवसर है, इन सबके साथ मिलना, बैठना, बातें करना। मुझे ये सौभाग्य नहीं मिलता है, क्योंकि मुझे जब ये मिलते हैं तब वो कुछ ना कुछ काम लेकर आते हैं। लेकिन आपको उनके अनुभवों से बहुत कुछ सीखने को मिलेगा, जानने को मिलेगा। ये स्वयं में, अपने-अपने क्षेत्र में, बड़े अचीवर्स हैं। और उन्होंने इतना समय आप लोगों के लिए दिया है, इसी में मन लगता है कि इस सोल नाम की इंस्टीट्यूशन का मैं एक बहुत उज्ज्वल भविष्य देख रहा हूं, जब ऐसे सफल लोग बीज बोते हैं तो वो वट वृक्ष भी सफलता की नई ऊंचाइयों को प्राप्त करने वाले लीडर्स को पैदा करके रहेगा, ये पूरे विश्वास के साथ मैं फिर एक बार इस समय देने वाले, सामर्थ्य बढ़ाने वाले, शक्ति देने वाले हर किसी का आभार व्यक्त करते हुए, मेरे नौजवानों के लिए मेरे बहुत सपने हैं, मेरी बहुत उम्मीदें हैं और मैं हर पल, मैं मेरे देश के नौजवानों के लिए कुछ ना कुछ करता रहूं, ये भाव मेरे भीतर हमेशा पड़ा रहता है, मौका ढूंढता रहता हूँ और आज फिर एक बार वो अवसर मिला है, मेरी तरफ से नौजवानों को बहुत-बहुत शुभकामनाएं।

बहुत-बहुत धन्यवाद।