
2017 मधील संसदेच्या सभेला आज प्रारंभ होत आहे. राष्ट्रपतींचे अभिभाषण, अर्थसंकल्प आणि दीर्घकाळ अधिवेशनात अनेक विषयांवर संवाद. गेल्या काही दिवसात सर्व राजकीय पक्षांशी सामुदायिक, आणि व्यक्तिगत स्तरावर सतत चर्चा झाली. अधिवेशनाचा सर्वाधिक उपयोग जनहितासाठी व्हावा, सार्थक चर्चा व्हावी, अर्थसंकल्पावरही सखोल चर्चा व्हावी.
पहिल्यांदाच अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होत आहे. आपल्याला आठवत असेल, की आपल्या देशात पूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर होत असे. जेव्हा अटलजींचे सरकार होते, तेव्हांपासून या वेळेत बदल करुन सकाळी सदनाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर ताबडतोब अर्थसंकल्प सादर व्हायला लागला.
आज आणखी एक नवी परंपरा सुरु होत आहे. एकतर अर्थसंकल्प एक महिना आधी सादर होतोय आणि दुसरे म्हणजे रेल्वे अर्थसंकल्पही त्याच्याशी जोडला गेलाय. सदनात यावर व्यापक चर्चा होईल आणि त्यामुळे आगामी काळात काय फायदा होईल, हे देखील समोर येईल.
चांगल्या चर्चेबरोबरच जनहिताच्या कामांनाही पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सभागृहाचा उत्तम उपयोग करावा, असा मला विश्वास वाटतो.