QuotePM Modi lays foundation stone for new office complex for Vanijya Bhawan
QuoteWe are breaking silos within the working of the Government; we are moving from silos to solutions: PM Modi
QuoteIt is our collective responsibility to fulfil the aspirations of our youth: PM Modi
QuoteIndia is now playing an important role in the global economy, says PM Modi
QuoteEfforts must be made to raise domestic manufacturing output, to reduce imports: PM Modi

मंत्रिमंडळातले माझे सहकारी, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, सुरेश प्रभू, गृहनिर्माण आणि शहरी कार्य राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप सिंह पुरी, वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सी.आर. चौधरी, वाणिज्य मंत्रालय आणि संबंधित विभागाचे अधिकारी आणि उपस्थित मान्यवर,

वाणिज्य भवनाचे भूमिपूजन झाल्याबद्दल मी आपणा  सर्वांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो. आज हे काम सुरु झाले आणि पुढच्या डिसेंबरला हे काम पूर्ण होईल असे या व्यासपीठावर सांगितले आहे. नियोजित वेळेतच हे वाणिज्य भवन निर्माण होईल आणि लवकरच जनतेला याचा लाभ मिळायला लागेल असा मला विश्वास आहे.

मित्रहो, वेळेचा मुद्दा मी सर्वात आधी घेतला कारण या सरकारच्या कार्यकाळात जितक्या इमारतींचे भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली त्या सर्वात एक बाब सामाईक होती. सामाईक हे आहे की इमारतीच्या निर्मितीत सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीचे प्रतिबिंब दिसते. नव भारताच्या दिशेने वाटचाल करणारा देश आणि आधीची जुनी व्यवस्था यातला फरकही यातून कळतो.

मित्रहो, मी आपल्याला काही उदाहरणे देऊ इच्छितो. मला आठवते आहे, 2016 मधे प्रवासी भारतीय केंद्राचे लोकार्पण झाले त्या वेळी ही बाब समोर आली की अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात या केंद्राची घोषणा झाली होती. त्याला मूर्त स्वरूप येईपर्यंत 12 वर्षे लागली.

 

|

गेल्या वर्षी डिसेंबरमधे डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे लोकार्पण झाले त्याच्या निर्मितीचा निर्णयही 1992 मधेच घेतला गेला होता. मात्र त्याचे भूमिपूजन झाले 2015 मधे. कुठे1992, कुठे 2015, याचे लोकार्पण 2017 मधे झाले म्हणजेच निर्णय घेतल्यानंतर 23-24 वर्षे लागली केवळ एक केंद्र निर्माण करायला.   

मित्रहो, याच मार्च मधे मी केंद्रीय माहिती आयोगाच्या नव्या इमारतीचेही राष्टार्पण केले होते. सी आय सी साठी नव्या  इमारतीची मागणीही गेली 12 वर्षे होत होती, मात्र त्यासाठीही रालोआच्या या सरकारने सुरु केले आणि निर्धारीत वेळेत ते पूर्णही केले.

आणखी एक उदाहरण आहे, अलीपूर रोड वर निर्माण झालेल्या आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे. दोन महिन्यापूर्वी याचेही लोकार्पण करण्यात आले. या स्मारकासाठीही अनेक वर्षे चर्चा झाली, अटलजी यांच्या कार्यकाळात कामाला वेगही आला, मात्र त्यानंतर दहा बारा वर्षे काम ठप्प पडले. दिल्लीच्या या चार  वेगवेगळ्या इमारती याचेच प्रतिक आहेत की जेव्हा सर्व मंत्रालये, सर्व विभाग, केवळ आपल्याच कप्प्यात न राहता, लक्ष्य प्राप्तीसाठी मिळून काम करतात तेव्हा चांगला आणि लवकर परिणाम मिळतो. प्रत्येक काम अडकवण्याच्या, भरकटत ठेवण्याच्या आणि लटकवत ठेवण्याच्या प्रवृत्तीला मागे टाकून देश पुढे आला आहे.

मला आनंद आहे की आज यात पाचवे प्रतिक जोडले जाण्याची सुरवात झाली आहे. या वाणिज्य भवनात एकाच छताखाली, वाणिज्य क्षेत्रातल्या सर्व  विभागांनी आपसात मेळ ठेवून सहकार्याने काम करण्यासाठीचे कार्य उत्तम पद्धतीने केले जाईल. मला विश्वास आहे की हे परिपूर्ण असेल.

मित्रहो, आज भारत काळाच्या एका महत्वाच्या वळणावर उभा आहे. आपला डेमोग्राफिक डिव्हिडंड कोणत्याही देशासाठी इर्षेचा विषय असू शकतो. आपल्या लोकशाहीला, आपले युवा नवी उर्जा देतात. हा युवा वर्ग 21 व्या शतकातल्या भारताचा आधार आहे, त्यांच्या आशा- आकांक्षाची पूर्तता ही काही मंत्रालयांची नव्हे तर आपणा सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे.

 मागच्या शतकात भारत औद्योगिक क्रांतीचा लाभ उठवू शकला नाही, त्याची अनेक कारणेही होती मात्र आता तितकीच कारणे आहेत ज्यामुळे भारत या शतकातल्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करण्यापैकी एक ठरू शकतो. चौथ्या औद्योगिक क्रांतीचा मुख्य आधार आहे, डिजिटल तंत्रज्ञान आणि या संदर्भात भारत जगातल्या अनेक देशांच्या पुढे आहे. आज वाणिज्य मंत्रालयाची जेव्हढी उद्दिष्टे आपण पाहाल, जेवढी कार्ये पाहाल त्या सर्वात प्रामुख्याने डिजिटल तंत्रज्ञान  आपल्याला दिसून येईल.

हे वाणिज्य भवनच पहा ना, ज्या जमिनीवर ही इमारत उभी राहील ती पहिल्यांदा पुरवठाविषयक   महासंचालनालयाच्या अधिकारात होती. शंभर वर्षाहून जुना हा विभाग आता बंद झाला आहे आणि त्याची जागा घेतली आहे सरकारच्या ई बाजारपेठेने, सरकार आपल्या आवश्यकतेचे  सामान कसे खरेदी करते त्या व्यवस्थेत या बाजारपेठेने पूर्ण बदल केला आहे. 

आजच्या तारखेपर्यंत 1 लाख 17 हजारहून जास्त लहान-मोठे विक्रेते, कंपन्या याच्याशी जोडले गेले आहेत. या विक्रेत्यांना 5 लाखाहून अधिक ऑर्डर या ई बाजारपेठेच्या माध्यमातून दिल्या गेल्या आहेत. अतिशय कमी वेळात या ई बाजारपेठेच्या माध्यमातून  8700 कोटी रुपयांचे सामान खरेदी केले आहे.

ज्या पद्धतीने सरकारच्या ई बाजारपेठेने देशाच्या सर्वदूर भागात पसरलेल्या छोट्या छोट्या उद्योजकांना, आपली उत्पादने थेट सरकारला विकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे त्यासाठी वाणिज्य मंत्रालय प्रशंसेला पात्र आहे. एका दूरच्या प्रवासाची ही सुरवात आहे असे मी मानतो.

या ई बाजारपेठेचा विस्तार आणखी कसा वाढवता येईल, देशातल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम क्षेत्रातल्या उद्योजकांना, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दिशेने कसे नेता येईल याबाबत अजून बरेच काम बाकी आहे. आज देशात 40 कोटीपेक्षा जास्त स्मार्ट फोन, इंटरनेट वापरणाऱ्यांची वाढती संख्या, स्वस्त डेटा, आपले  काम अधिकच सुलभ करत आहेत.

मित्रहो, आपल्याकडे म्हटले जाते की भार: समर्थानाम् किम् दूर व्यवसायिनाम् म्हणजे जी व्यक्ती सामर्थ्यशाली असते त्या व्यक्तीसाठी कोणतीही गोष्ट कठीण नसते. याचप्रमाणे व्यावसायिकांसाठी कोणतीही जागा  दूर नसते. आज तंत्रज्ञानाने व्यापार इतका सुलभ केला आहे की अंतर दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. या तंत्रज्ञानाची देशाच्या व्यापार संस्कृतीत जितकी व्याप्ती वाढेल, तितका त्याचा लाभ मिळत जाईल.

आपण पाहतो आहोत की एका वर्षापेक्षा कमी काळात वस्तू आणि सेवा कराने, देशाच्या व्यापाराच्या पद्धतीत कसा बदल केला हे आपण पाहतोच आहोत. तंत्रज्ञान नसते तर हे शक्य झाले असते का? वस्तू आणि सेवा करामुळे देशात अप्रत्यक्ष कर आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या संख्येत  झपाट्याने वाढ होत आहे.

|

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात अप्रत्यक्ष कर यंत्रणेशी केवळ 60 लाख लोक जोडले गेले होते, तर वस्तू आणि सेवा कर लागू केल्यानंतर 11 महिन्यात 54 लाखाहुन अधिक लोकांनी नोंदणी अर्ज केला आणि त्यातल्या  47 लाखाहून अधिक लोकांची नोंदणी झाली. अशा प्रकारे नोंदणी कृत लोकांची संख्या आता एक कोटीहून अधिक झाली आहे.

यावरून हे स्पष्ट होते की प्रक्रिया सुलभ केल्यानंतर, किमान सरकार आणि कमाल प्रशासन हे ब्रीद घेऊन वाटचाल केल्यानंतर उत्तम परिणाम दिसून येतात आणि जास्तीत जास्त लोकही विकासाच्या  मुख्य प्रवाहात सहभागी होण्याच्या दिशेने वाटचाल करतात.

मित्रहो, आपण सर्वजण जाणताच की गेल्या चार वर्षात सरकारने, लोकाभिमुख, विकासाभिमुख आणि गुंतवणूकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा निरंतर प्रयत्न केला आहे. अनेक जागतिक आव्हानाच्या पार्श्वभूमीवरही भारताचे ढोबळ आर्थिक  निर्देशक स्थिर राहिले आहेत. चलन फुगवटा असो, वित्तीय तुट असो किंवा चालू खात्यातली शिल्लक असू दे या सर्वामध्ये, आधीच्या सरकारच्या तुलनेत सुधारणा दिसून येत आहे. 

भारत आज, जगाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. गेल्या तिमाहीतच देशाच्या विकास दराने 7.7 टक्‍के हा आकडा गाठला. गेल्या चार वर्षात झालेली परदेशी गुंतवणूक, परकीय गंगाजळी यांनी विक्रमी अंक गाठला आहे.

आज भारत थेट परकीय गुंतवणूक विश्वास निर्देशांकात सर्वोच्च दोन उदयोन्मुख मार्केट परफॉर्मर पैकी एक आहे. व्यापारासाठी सुलभ वातावरण यामधल्या क्रमवारीत 142 वरून 100 क्रमांकावर पोहोचणे, लॉजिस्टिक परफॉर्मन्स निर्देशांकात 19 अंकांची सुधारणा, जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात 71 वरून 39 अंकांवर पोहोचणे, जागतिक कल्पकता निर्देशांकात 21 अंकांची सुधारणा होणे हा त्याच दूरदृष्टीचा परिपाक आहे.

आपल्याला हे नक्कीच माहित असेल की भारताने नुकतीच जगभरातल्या फिन टेक अर्थात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत वित्तीय सेवा पुरवणाऱ्या सर्वोच्च 5 देशातही स्थान प्राप्त केले आहे.

मात्र या सकारात्मक द्योतक बाबींबरोबरच पुढचा प्रश्न आहे की आता पुढे काय ? मित्रहो, सात टक्के, आठ टक्के विकास दरानंतर त्या पुढे जाऊन आपल्याला दोन अंकी विकास दर गाठण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यावर काम करायचे आहे. भारत किती वर्षात 5 ट्रीलीयन डॉलर क्लब मधे सामील होतो याकडे जगाचे लक्ष आहे.

वाणिज्य मंत्रालय आणि आपण सर्व अधिकारीवर्ग यांनी हे लक्ष्य एक आव्हान म्हणून स्वीकारायला हवे. आर्थिक आघाडीवर केलेली प्रगती थेट सामान्य नागरिकाच्या जीवनाशी जोडली गेली आहे.

म्हणूनच आपण हेही पाहिले असेल की मी व्यापारासाठी सुलभ वातावरणाविषयी बोलतो तेव्हा त्याचबरोबर जीवनमान अधिक सुकर करण्याचा मुद्दाही नेहमी  उपस्थित करतो. आजच्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या या जगात हे सर्व मुद्दे एकमेकांशी जोडले गेले आहेत.

जेव्हा वीज जोडणी घेणे सुलभ होते, बांधकामासंबंधीची मंजुरी लवकर मिळते, उद्योगांना, कंपन्यांना रखडावे लागत नाही त्यावेळी त्याचा लाभ सर्व सामान्य जनतेपर्यंतही  पोहोचतो. म्हणूनच आपणा सर्वांसाठी एक आव्हान आहे की अजूनही ज्या क्षेत्रात काही अडथळे राहिले असतील,काही विभाग अजूनही इतर विभागांशी जुळवून न घेता एकतर्फी काम करत असतील तर लवकरात लवकर हे दूर करायला हवे. 

विशेषतः पायाभूत क्षेत्रात ज्या अडचणी  येतात, उत्पादन वाढवण्यासाठी ज्या बाबी अडथळा निर्माण करतात, त्या थांबवणे, सुधारणे आवश्यक आहे.

वाणिज्य मंत्रालयाने देशाच्या लॉजिस्टिक क्षेत्राच्या एकात्मिक विकासाचा प्रण केला आहे, याचा मला आनंद आहे. हा उपक्रम देशात व्यापार विषयक वातावरण अधिक सुधारण्यामध्ये मोठी भूमिका बजावणार आहे.

मित्रहो, एकात्मिक लॉजिस्टिक कृती आराखडा आज काळाची गरज आहे आणि नव भारताची गरजही. धोरणात बदल करून, सध्याच्या प्रक्रियेत सुधारणा घडवून, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवून हे उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते.

वाणिज्य विभाग या दिशेने एका ऑनलाईन पोर्टलवर काम करत आहे अशी माहिती मला देण्यात आली आहे. जागतिक बाजारपेठेत भारताचे अस्तित्व अधिक ठळक करण्यासाठी, नवी उंची गाठण्यासाठी सर्व मंत्रालये आणि सर्व राज्यांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे.

व्यापार विकास आणि प्रोत्साहन परिषद, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशात आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण करण्यासाठी काम करत आहे हे एक उत्तम पाऊल उचलण्यात आले आहे. भारताची निर्यात वाढवायची असेल तर राज्यांना सक्रीय भागीदार करूनच वाटचाल करावी लागेल.

राज्यांमध्ये, राज्य स्तरीय निर्यात धोरण निर्माण करून, त्याची राष्ट्रीय व्यापार धोरणाशी सांगड घालून, आर्थिक सहाय्यता करून, सर्व संबंधिताना  बरोबर घेऊन या दिशेने जेवढ्या जोमाने आणि वेगाने वाटचाल करू तेव्हढा देशाला लाभ होईल.

मित्रहो, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतले भारताचे अस्तित्व आणखी ठळक करण्यासाठी आपली पारंपरिक उत्पादने आणि बाजारपेठ कायम राखतानाच नवी उत्पादने आणि नव्या बाजारपेठावर लक्ष ठेवणे अतिशय आवश्यक आहे. देशांतर्गत आणि जागतिक परिस्थितीसाठीही स्वतःला आणखी खंबीर करावे लागेल.

आपण जेव्हा अल्पकालीन विकासाचे लाभ आणि दीर्घकालीन स्थैर्य यांच्यात समतोल राखून वाटचाल केली तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.

गेल्या वर्षी डिसेंबर मधे विदेशी व्यापार धोरणाशी संबंधित मध्यावधी आढावा घेतला गेला हा आढावा म्हणजे एक सकारात्मक उपाय असल्याचे मला वाटते. प्रोत्साहन वाढवून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला आश्वासक आधार देत निर्यात वाढवण्यासाठी करण्यात आलेला प्रत्येक बदल प्रशंसनीय आहे. हे सर्व  थेट देशाच्या रोजगार विषयक गरजांशी जोडले गेले आहे.

एक आणखी महत्वाचा विषय आहे-उत्पादनाचा दर्जा. याच कारणास्तव मी 2014 मधे 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून झिरो डीफेक्ट,झीरो इफेक्टसाठी आवाहन केले होते. उद्योग छोटा असो वा मोठा, प्रत्येक उत्पादकाला यासाठी प्रेरित केले पाहिजे की असे उत्पादन तयार करा की ज्यात काहीच दोष नसेल, कोणी आपण निर्यात केलेल्या वस्तू परत माघारी पाठवू शकणार नाही. याच बरोबर मी झिरो इफेक्ट बाबतही बोललो होतो. म्हणजे  आपल्या उत्पादनाचा पर्यावरणावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही. उत्पादनाच्या दर्जाबाबतची ही जागरूकता मेक इन इंडियाची चमक वाढवण्यासाठी आणि नव भारताची ओळख दृढ करण्यासाठी कामी येईल.

2014 मधे आपल्या देशात केवळ 2 मोबाईल निर्मिती कंपन्या होत्या. त्यात वाढ होऊन आता ही संख्या 120 झाली आहे, खूप कमी किमतीत जागतिक स्तरावर दर्जेदार उत्पादने तयार करत आहेत याचा त्यांना नक्कीच अभिमान वाटत असेल.

मित्रहो, ही वेळ संकल्प करण्याची आहे, आव्हाने स्वीकारण्याची आहे.

जगातल्या एकूण निर्यातीत भारताचे योगदान वाढवून दुप्पट करण्याचा संकल्प वाणिज्य विभाग हाती घेऊ शकतो, आताच्या 1.6 टक्क्यावरून कमीत कमी 3.4 टक्क्यापर्यंत नेऊ. यामुळे देशात रोजगाराच्या  आणखी नव्या संधी निर्माण होतील आणि आपल्या दर डोई उत्पन्नातही वाढ होईल.

यासाठी सरकारचे सर्व विभाग आणि इथे उपस्थित निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या सर्वाना एकत्रित प्रयत्न करावे लागतील.

यासाठी आणखी एक संकल्प घेता येऊ शकतो, आयातीच्या बाबतीत. काही निवडक क्षेत्रात आयातीवरची आपली निर्भरता आपण कमी करू शकतो का ? उर्जेबाबतची आयात असो, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची आयात असो, संरक्षण उत्पादन क्षेत्र असो किंवा वैद्यकीय उपकरणांचे क्षेत्र असो. मेक इन इंडिया द्वारे हे शक्य आहे.

देशांतर्गत उत्पादन द्वारे आयातीत 10 टक्‍के कपात देशाचे साडेतीन लाख कोटीचे उत्पन्न वाढवू शकते. देशाची सकल राष्ट्रीय उत्पन्नातली वृद्धी दोन अंकी आकड्यात आणण्यासाठी एक प्रभावी साधन ठरू शकते. आपल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या उत्पादनाचे उदाहरण मी देऊ इच्छितो. आपण सर्वाना हे आव्हान नाही का, की  देशात  इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या एकूण मागणीच्या 65 टक्‍के आपल्याला बाहेरून खरेदी करावे लागते?

मोबाईल क्षेत्रात ज्याप्रमाणे घडले त्याप्रमाणे आपण या आव्हानाचा स्वीकार करून देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या निर्मितीत  आत्मनिर्भर होऊ शकते का ?

मित्रहो, आपण हे जनताच की आयातीवरची निर्भरता कमी करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल गेल्या वर्षी उचलण्यात आले. सार्वजनिक विभागासाठीच्या  खरेदीत मेक इन इंडियाला प्राधान्य  या आदेशानुसार सरकारचे सर्व विभाग आणि शासकीय संस्था मधे खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवांमध्ये आपल्या देशातल्याच सूत्रांकडून वस्तू खरेदी करण्यावर भर देण्यात येत आहे. हा आदेश गांभीर्यपूर्वक  अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.       

यासाठी आपण सर्वाना, सरकारच्या सर्व विभागांना, आपल्या देखरेख यंत्रणांना या आदेशाचे पालन करण्यासाठी अधिक बळकट करायला हवे.

देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मग तो नियामक चौकाटीबाबतचा असो, नियामक आराखड्यात सरळता आणण्याचे काम असो, गुंतवणूकदार स्नेही धोरण असो, पायाभूत आणि लॉजिस्टिक वर भर असो हे सर्व भारताला आत्म निर्भर करण्यासाठी केले जात आहे. 21 व्या शतकात औद्योगिक  क्रांतीत एक पाऊलही मागे राहता कामा नये. 

मेक इन इंडिया च्या साथीने हा वाढणारा गौरव, नव्याने निर्माण होत असलेल्या या वाणिज्य भवनाचा गौरवही वाढवावा अशी माझी इच्छा आहे.

मित्रहो, इथे येण्यापूर्वी आणखी एक शुभ कार्य करण्याची संधी आपण मला दिलीत. या परिसरात बकुळीची झाडे लावण्याचे भाग्य मला लाभले. या झाडाला पौराणिक संदर्भ आहे. याशिवाय या वृक्षात अनेक औषधी गुण आहेत आणि अनेक वर्षे सावलीही आपल्याला लाभते. इथे याशिवाय हजार झाडे लावण्याची योजना आहे अशी माहिती  मला देण्यात आली आहे.

निर्माण होणाऱ्या  नव्या  वाणिज्य भवनाचा निसर्गाशी हा संवाद, इथे काम करणाऱ्या लोकांना स्फूर्ती देत राहील, प्रसन्नता देत राहील.    

पर्यावरण स्नेही, आधुनिक तंत्रज्ञानाने संपन्न वातावरणात आपण सर्व नव भारतासाठी आपले सर्वोत्तम योगदान द्यावे, जास्तीत जास्त प्रयत्न कराल अशी आशा बाळगून माझे भाषण समाप्त करतो.

वाणिज्य भवनाच्या निर्मितीचे काम सुरु झाल्या बद्दल आपणा सर्वाना पुन्हा एकवार अनेक शुभेच्छा.

धन्यवाद.

  • krishangopal sharma Bjp January 14, 2025

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
  • krishangopal sharma Bjp January 14, 2025

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
  • krishangopal sharma Bjp January 14, 2025

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
  • Reena chaurasia August 29, 2024

    modi
  • Reena chaurasia August 29, 2024

    bjp
  • Govindan Krishnamurthy October 03, 2022

    Excellent
  • R N Singh BJP June 27, 2022

    jai hind
  • Laxman singh Rana June 23, 2022

    नमो नमो 🇮🇳🌷
  • Laxman singh Rana June 23, 2022

    नमो नमो 🇮🇳
  • G.shankar Srivastav June 11, 2022

    G.shankar Srivastav
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Laying the digital path to a developed India

Media Coverage

Laying the digital path to a developed India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
This decade is becoming the decade of Uttarakhand: PM Modi at Harsil
March 06, 2025
QuoteBlessed to be in Devbhoomi Uttarakhand once again: PM
QuoteThis decade is becoming the decade of Uttarakhand: PM
QuoteDiversifying our tourism sector, making it perennial, is very important for Uttarakhand: PM
QuoteThere should not be any off season, tourism should be on in every season in Uttarakhand: PM
QuoteOur governments at Center and state are working together to make Uttarakhand a developed state: PM

गंगा मैया की जय।

गंगा मैया की जय।

गंगा मैया की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय!

उत्तराखंड का म्यारा प्यारा भै-वैण्यों, आप सबी तैं मेरी सेवा-सौंली, नमस्कार!

यहां के ऊर्जावान मुख्यमंत्री, मेरे छोटे भाई पुष्कर सिंह धामी जी, केंद्रीय मंत्री श्री अजय टम्टा जी, राज्य के मंत्री सतपाल महाराज जी, संसद में मेरे साथी और भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष महेंद्र भट्ट जी, संसद में मेरे साथी माला राज्य लक्ष्मी जी, विधायक सुरेश चौहान जी, सभी गणमान्य लोग, भाइयों और बहनों।

सबसे पहले मैं माणा गांव में कुछ दिन पहले जो हादसा हुआ है, उस पर अपना दु:ख व्यक्त करता हूं। मैं हादसे में जान गंवाने वाले साथियों के परिवारों के प्रति अपनी संवेदना प्रकट करता हूं। संकट की घड़ी में देश के लोगों ने जो एकजुटता दिखाई है, उससे पीड़ित परिवारों को बहुत हौसला मिला है।

|

साथियों,

उत्तराखंड की ये भूमि, हमारी ये देवभूमि, आध्यात्मिक ऊर्जा से ओतप्रोत है। चार धाम और अनंत तीर्थों का आशीर्वाद, जीवनदायिनी मां गंगा का ये शीतकालीन गद्दी स्थल, आज एक बार फिर यहाँ आकर, आप सब अपने परिवारजनों से मिलकर, मैं धन्य हो गया हूं। माँ गंगा की कृपा से ही मुझे दशकों तक उत्तराखंड की सेवा का सौभाग्य मिला है। मैं मानता हूँ, उन्हीं के आशीर्वाद से मैं काशी तक पहुंचा, और अब सांसद के रूप में काशी की सेवा कर रहा हूँ। और इसलिए, मैंने काशी में कहा भी था- मुझे माँ गंगा ने बुलाया है। और कुछ महीने पहले मुझे ये भी अनुभूति हुई कि जैसे मां गंगा ने मुझे अब गोद ले लिया है। ये माँ गंगा की ही दुलार है। अपने इस बच्चे के प्रति उनका स्नेह है कि आज मैं उनके मायके मुखवा गांव आया हूँ। यहाँ मुझे मुखीमठ-मुखवा में दर्शन पूजन का भी सौभाग्य प्राप्त हुआ है।

साथियों,

आज हर्षिल की इस धरती पर आया हूं तो मैं अपनी दीदी-भुलियों के स्नेह को भी याद कर रहा हूं। वो मुझे हर्षिल का राजमा और दूसरे लोकल प्रोडक्ट्स भेजती रहती हैं। आपके इस लगाव और उपहार के लिए मैं आपका आभारी हूं।

साथियों,

कुछ साल पहले जब मैं बाबा केदारनाथ के दर्शन के लिए, बाबा के चरणों में गया था, तो बाबा के दर्शन-अर्चन के बाद मेरे मुंह से अचानक कुछ भाव प्रकट हुए थे, और मैं बोल पड़ा था- ये दशक उत्तराखंड का दशक होगा। वो शब्द मेरे थे, भाव मेरे थे, लेकिन उनके पीछे सामर्थ्य देने की शक्ति स्वयं बाबा केदारनाथ ने दी थी। मैं देख रहा हूँ, बाबा केदार के आशीर्वाद से धीरे-धीरे वो शब्द, वो भाव सच्चाई में, हकीकत में बदल रहे हैं। ये दशक उत्तराखंड का बन रहा है। यहां उत्तराखंड की प्रगति के लिए नए-नए रास्ते खुल रहे हैं। जिन आकांक्षाओं को लेकर उत्तराखंड का जन्म हुआ था, उत्तराखंड के विकास के लिए जो संकल्प हमने लिए थे, नित नई सफलताओं और नए लक्ष्यों की ओर बढ़ते हुए वो संकल्प आज पूरे हो रहे हैं। इसी दिशा में, शीतकालीन पर्यटन एक और बड़ा महत्वपूर्ण कदम है। इसके माध्यम से उत्तराखंड के आर्थिक सामर्थ्य को साकार करने में बहुत बड़ी मदद मिलेगी। मैं इस अभिनव प्रयास के लिए धामी जी को, उत्तराखंड सरकार को बहुत-बहुत बधाई देता हूँ, और उत्तराखंड की प्रगति के लिए कामना करता हूँ।

|

साथियों,

अपने टूरिज्म सेक्टर को diversify करना, बारहमासी बनाना, 365 दिन, ये उत्तराखंड के लिए बहुत जरूरी है। मैं चाहता हूं कि उत्तराखंड में कोई भी सीजन हो, कोई भी सीजन ऑफ सीजन ना हो, हर सीजन में टूरिज्म ऑन रहे। अब ऑफ नहीं ऑन का जमाना। अभी पहाड़ों पर पर्यटन सीजन के हिसाब से चलता है। आप सब जानते हैं, मार्च, अप्रैल, मई, जून के महीने में बड़ी संख्या में पर्यटक आते हैं, लेकिन इसके बाद उनकी गिनती बहुत कम हो जाती है। सर्दियों में अधिकतर होटल्स, resorts और होमस्टे खाली पड़े रहते हैं। ये असंतुलन उत्तराखंड में, साल के एक बड़े हिस्से में आर्थिक सुस्ती ला देता है, इससे पर्यावरण के लिए भी चुनौती पैदा होती है।

साथियों,

सच्चाई ये है कि अगर देश-विदेश के लोग सर्दियों के मौसम में यहाँ आएं, तो उन्हें सच्चे अर्थ में देवभूमि की आभा का वास्तविक परिचय मिलेगा। विंटर टूरिज्म में यहां लोगों को ट्रैकिंग, स्कीइंग जैसी Activities का रोमांच, सचमुच में रोमांचित कर देगा। धार्मिक यात्रा के लिए भी उत्तराखंड में सर्दियों का समय बेहद खास होता है। कई तीर्थ स्थलों पर इसी समय विशेष अनुष्ठान भी होते हैं। यहां मुखवा गांव में ही देखिए, यहाँ जो धार्मिक अनुष्ठान किया जाता है, वो हमारी प्राचीन और अद्भुत परंपरा का हिस्सा है। इसलिए, उत्तराखंड सरकार का बारहमासी पर्यटन का विजन, 365 दिन के पर्यटन का विजन लोगों को दिव्य अनुभूतियों से जुड़ने का अवसर देगा। इससे यहां साल भर उपलब्ध रहने वाले रोजगार के अवसर विकसित होंगे, इसका बड़ा फायदा उत्तराखंड के स्थानीय लोगों को होगा, यहां के युवाओं को होगा।

साथियों,

उत्तराखंड को विकसित राज्य बनाने के लिए हमारी डबल इंजन सरकार मिलकर काम कर रही हैं। चारधाम-ऑल वेदर रोड, आधुनिक एक्सप्रेस-वे, राज्य में रेलवे, विमान औऱ हेलीकॉप्टर सेवाओं का विस्तार, 10 वर्षों में उत्तराखंड में तेजी से विकास हुआ है। अभी कल ही उत्तराखंड के लिए केंद्र सरकार ने बहुत बड़े निर्णय लिए हैं। कल केंद्रीय कैबिनेट ने केदारनाथ रोपवे प्रोजेक्ट और हेमकुंड रोपवे प्रोजेक्ट को मंजूरी दे दी है। केदारनाथ रोपवे बनने के बाद जो यात्रा 8 से 9 घंटे में पूरी होती है, अब उसे लगभग 30 मिनट में पूरा किया जाएगा। इससे बुजुर्गों, बच्चों, महिलाओं के लिए केदारनाथ यात्रा और सुगम हो जाएगी। इन रोप-वे प्रोजेक्ट्स पर हजारों करोड़ रुपए खर्च किए जाएंगे। मैं उत्तराखंड समेत पूरे देश को इन प्रोजेक्ट्स की बधाई देता हूं।

|

साथियों,

आज पहाड़ों पर इको लॉग हट्स, कन्वेंशन सेंटर, हेलीपैड इंफ्रास्ट्रक्चर पर फोकस भी किया जा रहा है। उत्तराखंड के टिम्मर-सैण महादेव, माणा गांव, जादुंग गांव में टूरिज्म इंफ्रास्ट्रक्चर नए सिरे से विकसित हो रहा है, और देशवासियों को पता होगा, शायद नहीं होगा, 1962 में जब चीन ने भारत पर आक्रमण किया, तब ये हमारा जादुंग गांव को खाली करवा दिया गया था, ये हमारे दो गांव खाली कर दिए गए थे। 60-70 साल हो गए, लोग भूल गए, हम नहीं भूल सकते, हमने उन दो गांवों को फिर से बसाने का अभियान चलाया है, और बहुत बड़ा टूरिस्ट डेस्टिनेशन बनाने की दिशा में हम आगे बढ़ रहे हैं। और इसी का परिणाम है कि उत्तराखंड में पर्यटकों की संख्या इस एक दशक में तेजी से बढ़ी है। 2014 से पहले चारधाम यात्रा पर हर साल औसतन 18 लाख यात्री आते थे। अब हर साल लगभग 50 लाख तीर्थयात्री आने लगे हैं। इस साल के बजट में 50 Tourist destinations को विकसित करने का प्रावधान किया गया है। इन destinations पर होटलों को इंफ्रास्ट्रक्चर का दर्जा दिया जाएगा। इससे पर्यटकों के लिए सुविधाएं बढ़ेंगी और स्थानीय रोजगार को भी बढ़ावा मिलेगा।

साथियों,

हमारा प्रयास है, उत्तराखंड के बॉर्डर वाले इलाकों को भी पर्यटन का विशेष लाभ मिले। पहले सीमावर्ती गांवों को आखिरी गाँव कहा जाता था। हमने ये सोच बदल दी, हमने कहा ये आखिरी गांव नहीं है, ये हमारे प्रथम गाँव कहा। उनके विकास के लिए वाइब्रेंट विलेज प्रोग्राम शुरू किया। इस क्षेत्र के भी 10 गांव इस योजना में शमिल किए गए हैं, और मुझे बताया गया, उस गांव से भी कुछ बंधु आज यहां हमारे सामने मौजूद हैं। नेलांग और जादुंग गांव, जिसका मैंने वर्णन किया, 1962 में क्या हुआ था, फिर से बसाने का काम शुरू किया गया है। आज यहां से जादुंग के लिए मैंने अभी-अभी बाइक रैली को रवाना किया। हमने होमस्टे बनाने वालों को मुद्रा योजना का लाभ देने का ऐलान किया है। उत्तराखंड सरकार भी राज्य में होमस्टे को बढ़ावा देने में जुटी है। जो गांव इतने दशकों तक इंफ्रास्ट्रक्चर से वंचित रहें, वहाँ नए होमस्टे खुलने से पर्यटन बढ़ रहा है, लोगों की आय बढ़ रही है।

साथियों,

आज मैं देवभूमि से, देश के पूरब-पश्चिम-उत्तर-दक्षिण, और मध्य भी, हर कोने के लोगों से, खासकर युवा पीढ़ी से, और मां गंगा के मायके से, इस पवित्र भूमि से, देश की नौज़वान पीढ़ी को विशेष रूप से आह्वान कर रहा हूं, आग्रह कर रहा हूं।

|

साथियों,

सर्दियों में देश के बड़े हिस्से में जब कोहरा होता है, सूर्यदेव के दर्शन नहीं होते, तब पहाड़ों पर धूप का आनंद मिल रहा होता है। ये एक स्पेशल इवेंट बन सकता है। और गढ़वाली में इसे क्या कहेंगे? 'घाम तापो पर्यटन', सही है ना? 'घाम तापो पर्यटन'। इसके लिए देश के कोने-कोने से लोग उत्तराखंड जरूर आयें। खासकर, हमारे कॉरपोरेट वर्ल्ड के साथी, वे विंटर टूरिज्म का हिस्सा बनें। Meetings करनी हों, conferences करनी हों, exhibitions करने हों, तो विंटर का समय और देवभूमि, इससे होनहार कोई जगह नहीं हो सकती है। मैं कॉरपोरेट वर्ल्ड के बड़े महानुभावों से भी आग्रह करूंगा, वो अपने बड़े-बड़े सेमिनार्स के लिए उत्तराखंड आएं, माइस सेक्टर को explore करें। यहाँ आकर लोग योग और आयुर्वेद के जरिए recharge और re-energise भी हो सकते हैं। देश की यूनिवर्सिटीज, प्राइवेट स्कूल्स और कॉलेज में, मैं उन सब नौज़वान साथियों से भी कहूंगा कि students के विंटर ट्रिप्स के लिए आप उत्तराखंड को पसंद कीजिए।

साथियों,

हमारे यहाँ हजारों करोड़ की इकोनॉमी, वेडिंग इकोनॉमी है, शादियों में हजारों करोड़ रूपये का खर्च होता है, बहुत बड़ी इकोनॉमी है। आपको याद होगा, मैंने देश के लोगों से आग्रह किया था- Wed in India, हिन्दुस्तान में शादी करों, आजकल लोग दुनिया के देशों में चले जाते हैं, यहां क्या कमी है भई? पैसे यहां खर्च करो ना, और उत्तराखंड से बढ़िया क्या हो सकता है। मैं चाहूँगा कि सर्दियों में destination वेडिंग के लिए भी उत्तराखंड को देशवासी प्राथमिकता दें। इसी तरह भारत की फिल्म इंडस्ट्री से भी मेरी अपेक्षाएं हैं। उत्तराखंड को मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट का पुरस्कार मिला हुआ है। यहां तेजी के साथ आधुनिक सुविधाएं डेवलप हो रही हैं। इसलिए सर्दियों के दिनों में फिल्म की शूटिंग्स के लिए भी उत्तराखंड, पूरे भारत का फेवरेट डेस्टिनेशन बन सकता है।

साथियों,

दुनिया के कई देशों में विंटर टूरिज़्म काफी पॉपुलर है। उत्तराखंड में विंटर टूरिज़्म को बढ़ावा देने के, और इसके लिए हम ऐसे देशों से बहुत कुछ सीख सकते हैं। मैं चाहूँगा, उत्तराखंड के टूरिज़्म सेक्टर से जुड़े सभी स्टेकहोल्डर्स, होटल और resorts उन देशों की जरूर स्टडी करें। अभी मैं यहां, एक छोटी सी प्रदर्शनी लगी है, उसको मैंने देखा, बहुत प्रभावित करने वाला मुझे लगा, जो कल्पना की गई है, जो लोकेशंस तय किए गए हैं, जो आधुनिक रचनाएं खड़ी की जा रही हैं, एक-एक लोकेशन का, एक-एक चित्र इतना प्रभावित करने वाला था, जैसे मन कर रहा था, मेरे 50 साल पुरानी वो जिंदगी के दिन, मैं फिर एक बार यहां आपके बीच आकर के बिताऊ, और हर डेस्टिनेशन पर कभी जाने का मौका तलाशू, इतने बढ़िया बना रहे हैं। मैं उत्तराखंड सरकार से कहूंगा कि जो विदशों से स्टडी हो, और स्टडी से निकले एक्शनेबल प्वाइंट्स पर सक्रिय रूप से काम करे। हमें स्थानीय परंपराओं, म्यूजिक, डांस और कुजीन को बढ़ावा देना होगा। यहां कई हॉट स्प्रिंग्स हैं, सिर्फ बद्रीनाथ जी में ही है, ऐसा नहीं है, और भी है, उन क्षेत्रों को वेलनेस स्पा के रूप में भी विकसित किया जा सकता है। शांत और बर्फीले क्षेत्रों में विंटर योगा रिट्रीट का आयोजन किया जा सकता है। मैं सभी बड़े-बड़े साधु-महात्माओं को, मठ-मंदिर के मठाधिपतियों को, सभी योगाचार्यों को, उनसे भी आग्रह करूंगा कि वे साल में एक योगा कैंप अपने शिष्यों का, विंटर में उत्तराखंड में लगाए। विंटर सीजन के लिए स्पेशल वाइल्ड लाइफ सफारी का आकर्षण उत्तराखंड की विशेष पहचान बन सकता है। यानि हमें 360 डिग्री अप्रोच के साथ आगे बढ़ना होगा, हर स्तर पर काम करना होगा।

|

साथियों,

सुविधाओं के विकास के अलावा, लोगों तक जानकारी पहुंचाना भी उतना ही अहम होता है। इसके लिए मैं देश के युवा content creators, आजकल सोशल मीडिया में, बहुत बड़ी संख्या में influencers हैं, content creators हैं, वे अपने यहाँ बैठे-बैठे भी मेरे उत्तराखंड की, मेरी देवभूमि की सेवा कर सकते हैं, वे भी पुण्य कमा सकते हैं। आप देश के पर्यटन सेक्टर को गति देने में, लोगों तक जानकारी पहुंचाने में बहुत बड़ी भूमिका निभा सकते हैं, जो भूमिका निभाई है, उसका और विस्तार करने की जरूरत है। आप उत्तराखंड की विंटर टूरिज़्म की इस मुहिम का भी हिस्सा बनिए, और मैं तो चाहूंगा कि उत्तराखंड सरकार एक बड़ा कंपटीशन आयोजित करें, ये जो content creators हैं, influencers हैं, वे 5 मिनट की, विंटर टूरिज्म की प्रमोशन की फिल्म बनाएं, उनकी कंपटीशन हो और जो अच्छी से अच्छी बनाएं, उसको बढ़िया से बढ़िया इनाम दिया जाए, देशभर के लोगों को कहा जाए, आइए मैदान में, बहुत बड़ा प्रचार-प्रसार होना शुरू हो जाएगा। और मुझे विश्वास है जब ऐसे कंपटीशन करेंगे, तो नई-नई जगहों को एक्सप्लोर करके, नई-नई फिल्में बनाएंगे, लोगों को बताएंगे।

साथियों,

मुझे विश्वास है, आने वाले वर्षों में हम इस सेक्टर में तेज गति से विकास के साक्षी बनेंगे। एक बार फिर 365 दिन का, बारहमासी टूरिज्म अभियान, इसके लिए मैं उत्तराखंड के सभी भाई-बहनों को शुभकामनाएं देता हूं, बधाई देता हूं और राज्य सरकार का अभिनदंन करता हूं। आप सब मेरे साथ बोलिए-

गंगा मैया की जय।

गंगा मैया की जय।

गंगा मैया की जय।

बहुत-बहुत धन्यवाद।