QuoteThe determination of our sportspersons is admirable. They have pursued their passion with great diligence: PM
QuoteKhel Mahakumbh has brought a strong shift and further encouraged a sporting culture in Gujarat: PM
QuoteNeed to adopt a culture where sports is appreciated and supported, starting from the family: PM Modi

सर्व वरीष्ठ मान्यवर आणि भारताचे नाव जगात उज्ज्वल करणाऱ्या माझ्या खेळाडू मित्रांनो१० वर्षांपूर्वी हा कांकरिया भाग कसा होता हे या भागाशी परिचित असणाऱ्या अनेकांना निश्चितच आठवत असेल. या डेरीचे भग्नावशेषभटक्या कुत्र्यांचा मोकाट वावर अशी दुरवस्था होती. स्वप्न पाहण्याचे सामर्थ्य असले तर जग कसे बदलता येतेहे आपल्याला येथे निश्चितच पाहायला मिळेल. क्रीडा विश्वातील जे मान्यवर येथे आले आहेतत्यांनी या संपूर्ण क्रीडागारातील सर्व सुविधा पाहाव्यात आणि त्या पाहिल्यानंतरआमचे खेळाडू परदेशात ज्या सोयी-सुविधा पाहतातत्या भारतातही विकसित होत आहेतहे सांगून इतरांना प्रेरित करावेअशी मी विनंती करतो. 

मला जेव्हा आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंना भेटण्याची संधी मिळतेतेव्हा मी आवर्जून त्यांच्याशी संवाद साधतोत्यांचे अनुभव जाणून घेतो. मला आपल्या खेळाडूंचे मनोधैर्य कायम उंचावलेले असल्याचेच दिसून आले आहे. ते कठोर मेहनत करतात. खडतर परिस्थितीतही जगात भारताचा ध्वज फडकावण्यासाठीचा त्यांचा निर्धार नेहमी पक्का असतो. आपल्याकडे सामर्थ्यशाली युवा पिढी आहेसंपूर्ण भारत माझ्यासमोर आहेपण आपल्या देशातील अनेक लोकांची मानसिकता अजून  पुरेशी परिपक्व नाही. आपले खेळाडू प्रवास करतात. रेल्वेविमानातून फिरतातलोकांच्या ओळखी होतातमग विचारले जाते की तुम्ही काय करताकाही सांगतातराष्ट्रीय पातळीवर खेळतोआंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतो. यावर पुढचा प्रश्न काय असतोसांगू कापुढचा प्रश्न असतोवा वातुम्ही राष्ट्रीय पातळीवर खेळताआंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतापण करता कायम्हणजे खेळणे ही सुद्धा देशसेवा आहेयात सुद्धा कारकीर्द घडवता येतेहे अनेकांना मान्यच होत नाही. अनेकांना हा अनुभव येत असेल. राष्ट्रीय पातळीवर खेळतोअसे सांगितल्यानंतरहीखेळताते चांगलं आहेपण करता कायअसा प्रश्न विचारला जातो. सीमेवर जो जवान उभा असतोत्याला जर कोणी विचारले की तुम्ही काय करतातर तो उत्तर देईल की मी सीमेवर उभा असतो. त्यावर जर त्याला कोणी असे म्हणत असेल की ते ठीक आहेपण काम काय करतातर त्याच्या मनाला किती यातना होतीलआजच्या आपल्या समाजात माझ्या खेळाडूंना हेच ऐकावे लागते. केवळ समाजातच नाही तर अनेकांच्या घरातूनच सुरूवात होते. खेळतच राहणार आहेस की अभ्यासाकडे लक्ष देशील?सकाळ झाली की घराबाहेर पडता.. काही लोक तर पुलेला गोपीचंद यांनाही म्हणत असतील की तुम्ही आमच्या मुलांना बिघडवता... 

आपल्या देशात ही परिस्थिती आहे आणि मला ही परिस्थीती बदलायची आहे. खेळामुळे त्या व्यक्तीला आयुष्यात यशाची नवनवी शिखरे गाठण्याची संधी मिळतेत्याचबरोबर या खेळाडूंमुळेत्यांच्या उत्तम खेळामुळे सव्वाशे कोटी भारतीयांना जगासमोर मान उंचावण्याची संधी मिळते. जगात कोणत्याही देशात मी भाषण करतानातेथील खेळाडूचे नाव घेतले की उपस्थित सर्व ५-५ मिनीटे टाळ्यांचा कडकडाट करतात. 

अलीकडेच दोन दिवसांपूर्वी मी पोर्तुगालमध्ये होतोतेथील फुटबॉलपटूंचा मी उल्लेख केला आणि सगळे वातावरण बदलून गेले. टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला. आपल्या देशातही खेळाडूंबद्दल अशी सन्मानाचीआदराची परंपरा असली पाहिजे. आपल्या देशात ही सामाजिक भावना रूजली पाहिजे. त्यासाठी यंत्रणाही विकसित झाल्या पाहिजेत. आज मला क्रीडा क्षेत्रातील महाकुंभ म्हणता येईलअशा कार्यक्रमाच्या सादरीकरणाच्या ॲपचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली. प्रत्येक जण राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय खेळाडू झालाच पाहिजेअसा आग्रह नाही. पण खेळण्यामुळे आयुष्य फार आनंदी होते. खेळ जगायला शिकवतो. खेळाडूंच्या आयुष्यातून आपण एक महत्वाची गोष्ट शिकू शकतो. अनेकदा लोक म्हणतात की, आम्हा राजकारण्यांना यश पचवणे शिकले पाहिजे. पण मी अनेक खेळाडूंना पराभव स्वीकारताना पाहिले आहेखेळाडूंमध्ये हे सामर्थ्य असते आणि हे सामर्थ्यच त्यांना विजयपथावर घेऊन जातो. हे सामर्थ्य खेळातून मिळतेखेळाच्या मैदानावर मिळते. प्रत्येक क्षण हा विजय-पराभवाचा असतो आणि प्रत्यक्ष आयुष्यातही विजय-पराभवाचा स्वीकार करण्याची सवय असणे ही फार सुदैवाची बाब असते. खेळाडूंना अशा प्रकारे आयुष्य जगण्याची संधी मिळते. अशा प्रकारची व्यवस्था विकसित करण्याची आवश्यकता आहे. 

खेळाच्या या महाकुंभात गेल्या वेळी ३० लाख लोक गुजरातमध्ये खेळाच्या मैदानात उतरले होते. प्रत्येक जण खेळात कुशल असेलचअशी अपेक्षा करणे योग्य नाही. खेळ सुरू असताना तुम्ही टाळ्या वाजवल्या तरी खेळणाऱ्याचा उत्साह वाढतो. जिंकायची लालसा वाढते. खेळ ही स्वाभाविक संस्कृती झाली पाहिजे. म्हणूनच खेळाचा हा महाकुंभ सुरू केला आहे. आज इतक्या कमी वेळात गुजरातमध्ये हे शक्य झाले आहे.  

|

गुजरातमध्ये मुले शाळा-महाविद्यालयात शिकायला जाताततेव्हा खिशात दोन पेन घेऊन जातात आणि संध्याकाळी घरी येताना त्यातील एक पेन विकून येतात. त्यांच्या रक्तातच व्यापार असतो. आमचे लोक एखादी नवी वस्तू घेऊन निघाले की ती मित्रमंडळींना दाखवणार आणि ती विकून येणारहे नक्की. अशा या गुजरातमध्ये प्रतिभावंत खेळाडूंचीही कमतरता नाही. राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांमध्ये हे खेळाडू चमकदार कामगिरी करतातयापेक्षा मोठा आनंद काय असेल२५ वर्षांत गुजरातला १० सुवर्ण पदके मिळाली२५ वर्षांत १०... आणि क्रीडा महाकुंभाचा असा परिणाम झाला की गुजरातला एका वर्षात १० सुवर्ण पदके मिळाली. 

आता प्रत्येक शहरातप्रत्येक जिल्ह्यात खेळण्यासाठी मैदाने तयार करणेप्रशिक्षण देणेचांगले खेळाडू घडविणेशाळेत क्रीडा संस्कृती रूजवणे हे घडत जाणार आहे. ज्याप्रमाणे आम्ही गुजरातमध्ये क्रीडा महाकुंभ केलात्याचप्रमाणे आता देशभरात ‘खेले इंडिया’ अभियान राबवणार आहोत. कोट्यवधी लोक यात सहभागी होतील. खेळामुळेच आयुष्यात आनंद बहरतो. आज मी जेव्हा हे स्टेडीयम पाहिले तेव्हा मला मनापासून आनंद झाला. अगदी सुरूवातीपासून मी याची जडण-घडण पाहत होतोत्यामुळे इथल्या बदलत्या चित्राचा मी साक्षीदार आहे. पूर्णपणे तयार झालेले हे स्टेडियम पाहिल्यानंतर मला मनापासून आनंद झाला आणि असे वाटले की शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी या स्टेडियमची सफर घडविणारा अर्ध्या तासाचा कार्यक्रम तयार केला पाहिजे. गुजरात सरकारनेही विद्यार्थ्यांना हे स्टेडीयम दाखविले पाहिजे. जेव्हा विद्यार्थी येथे फिरतीलतेव्हा त्यांना यामागील विज्ञानाची जाणीव होईलखेळात किती ताकत असतेत्याची जाणीव होईल. खेळात आधुनिक तंत्रज्ञान किती खोलवर रूजलेले असते याची जाणीव होईल. क्रीडा जगतातल्या लोकांच्या आहारावर किती नियंत्रण ठेवावे लागतेहे समजेल. मला चांगलेच आठवतेआमच्या मित्राचा मुलगापार्थिव पटेलत्याला आम्ही लहानपणापासून ओळखतो. तो चांगला खेळाडू व्हावायासाठी त्याचे काका सकाळी चार वाजता त्याला स्कूटरवर बसवून खेळाच्या मैदानात पोहोचत. हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. संपूर्ण आयुष्यभर सकाळी चार वाजता उठणे,थंडी असोपाऊस असो कशाचीही तमा न बाळगता त्याच्या दिनक्रमात खंड पडू न देणेया अशा तपश्चर्येतून एखादा पार्थिव पटेल घडतो. त्यासाठी संपूर्ण कुटुंबाची साथ असावी लागते.  

तुम्ही सर्वांनी एकदा तरी दीपाची भेट घ्यावीअसा आग्रह मी करेन. एक खेळाडू म्हणून संपूर्ण देश दीपाला ओळखतोपण आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल की दीपा ही उत्तम प्रोत्साहन देणारी मुलगी आहे. कधीतरी तिचे अनुभव तुम्ही ऐका.. अर्धे शरीर हालचाल करू शकत नाहीपण ती नेहमी नव्या स्वप्नांबद्दल बोलतेनव्या उत्साहाने भरभरून बोलते. नव्या उमेदीने आपला चरितार्थ चालविण्याबद्दल बोलते. ही अशी माणसे आमच्या युवा पीढीचे आदर्श आहेत. असे आदर्श सोबत घेऊन देशात खेळासाठी पोषक वातावरण निर्माण करायचे आहेदेशातील युवा पिढीला प्रेरीत करायचे आहे. त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करायची गरज आहे. पहिल्यांदाच देशात खाजगी-सार्वजनिक भागिदारीतून क्रीडा जगतासाठी गुजरातने एक नवे मॉडेल दिले आहे. सरकार आणि उद्योग विश्वव्यापार विश्व एकत्र येऊन आपल्या नव्या पीढीसाठी काय घडवू शकतेयाचे हे उत्तम उदाहरण आहे. 

येत्या काही दिवसात ऑलिम्पीकच्या मैदानातही भारताची उत्तम कामगिरी दिसून येईलअसा विश्वास मला वाटतो. ही कामगिरी अधिक व्यापक होईलयाची मला खात्री वाटते. जगातील अगदी लहान लहान देशही ऑलिम्पीकमध्ये उत्तम कामगिरी करतात आणि संपूर्ण जगात आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करतात. सव्वाशे कोटींचा भारतसुद्धा असे स्वप्नं पूर्ण करू शकतोआपल्या देशात हे सामर्थ्य आहे. युवकांना संधी हवीयुवकांना व्यवस्था हवी आणि युवकांना कुटुंबाकडून संपूर्ण सहकार्य हवे आहे. हेच युवक आपल्या देशात बदल घडविण्याचे सामर्थ्य बाळगून आहेत आणि म्हणूनच आम्ही अशी व्यवस्था तयार करतो आहोत. 

|

मी सुद्धा देशात ज्या ज्या ठिकाणी खेळाडूंची भेट घेईनतेव्हा त्यांना आग्रह करेन की या ठिकाणी या आणि ही व्यवस्था पाहा. यात आणखी काय सुधारणा करायला हव्यातते सांगा. हळू-हळू देशात अशा प्रकारची व्यवस्था विकसित करू या. मित्रांनोआज व्हीडीयो गेममध्ये आपल्या अनेक पिढ्या वाया जात आहेत. मला खेळाच्या मैदानात मुलांना पाहायचे आहे. मी जेव्हा गुजरातमध्ये होतोतेव्हा अनेकदा शाळांमध्ये जात असे. सतत दोन-तीन दिवस जात असे आणि मुलांना प्रश्न विचारत असेदिवसातून किती वेळा घाम गाळताकिती वेळ धावताझाडावर किती वेळा चढताकिती भरभर जीने चढू शकता..अनेकदा मला दु:ख होते. अनेक मुले मला विचारतातघाम म्हणजे काय असतेशाळेतून आम्ही थेट घरी जातोनंतर घराबाहेर पडत नाही. 

असे बाल्य आपल्याला उज्ज्वल भवितव्य देऊ शकणार नाही. आपल्या कुटुंबातील मुलांना खेळाची गोडी लावणेहे आपले कौटुंबिक कर्तव्य आहे. कोणत्याही साधनांशिवाय खेळणेही शक्य आहे. आपला संघ उत्तम क्रिकेट खेळतोही खरोखरच अभिमानाची बाब आहे. पण त्याचवेळी आपण फुटबॉल आणि हॉकीला विसरणे योग्य नाही. माझे सहकारी भूतिया या ठिकाणी बसले आहेत. फुटबॉल या खेळात त्यांनी खऱ्या अर्थाने देशाचे नाव उंचावले आहे. या वर्षी भारतात एकोणीस वर्षाखालील फिफा विश्वचषक भारतात होत आहे. जगभरातील खेळाडूंना मी आपल्या देशात आणतो आहे. यांचा खेळ पाहून माझ्या देशातील युवकांमध्येही खेळाची प्रेरणा निर्माण व्हावीअसे मला वाटते. जगभरातील खेळाडू येथे आले पाहिजेत. आपण यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. क्रिकेट व्यतिरिक्तही असे अनेक खेळ आहेतज्यांत भारत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करू शकतो. नेमबाजीतिरंदाजी अशा अनेक क्षेत्रात भारताचे खेळाडू आज उत्तम कामगिरी करत आहेत. खेळाच्या या क्षेत्रात आमच्या मुली मुलांना अगदी सहज मागे टाकताना आपण पाहत आहोत. आमच्या मुली आमच्या देशाचे नाव उज्ज्वल करीत आहेत. आमच्या देशाच्या या लेकी एकापेक्षा एक सरस कामगिरी करत आहेत. जर माझ्या देशातील मुलींमध्ये हे सामर्थ्य असेलतर त्यापेक्षा कोणती प्रेरणा जास्त प्रभावी ठरेल?       

मित्रांनोदेशभरात खेळाला आयुष्याचे अविभाज्य अंग व्हावेयासाठी प्रयत्न करू या. व्यवस्था विकसित करू या. उद्योग जगताने पुढाकार घ्यावाकुटुंबांनी पुढाकार घ्यावा,सरकारांनी पुढाकार घ्यावा,समाजाने पुढाकार घ्यावा आणि भारताने क्रीडा विश्वातही आपले नाव उज्ज्वल करावे. 

याच सदिच्छेसह आपणा सर्वांना माझ्या अनेकानेक शुभेच्छा. 

हा असा कार्यक्रम आहेजेथे नवा भारत माझ्यासमोर बसला आहे. येथून जाण्याची इच्छा होऊ नयेअसे वातावरण आहे. मात्र येथून गेल्यानंतर रात्री १२ वाजता संसदेत भारताच्या सौभाग्याच्या एका नव्या दिशेचे द्वार खुले होणार आहे. मला येथून थेट संसदेत पोहोचायचे आहे. पण तरीसुद्धाशक्य तितका वेळ आपणा सर्वांसोबत घालवण्याची संधी मला मिळाली. हे खेळाडू येथे आहेत्याबद्दल त्यांचा मन:पूर्वक आभारी आहे. आमच्या शब्दांपेक्षा तुम्ही गाळलेल्या घामात जास्त ताकत आहे. आपल्या मेहनतीची ताकत फार मोठी आहे. या मित्रांनोपुढे या. या सर्वांनी आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. अगदी अलिकडेच आपण श्रीकांतचे नाव ऐकले असेलच. श्रीकांतजरा हात वर करा पाहू. श्रीकांतने अलिकडेच आपल्या उत्तम खेळाने देशाची मान उंचावली आहे. 

बंधु आणि भगिनिंनोही आपल्या देशाची खरी संपत्ती आहे. आपण सर्व उभे राहूनटाळ्यांच्या गजरात यांना सन्मानित करू. अनेकानेक आभार!!!

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
'Operation Sindoor on, if they fire, we fire': India's big message to Pakistan

Media Coverage

'Operation Sindoor on, if they fire, we fire': India's big message to Pakistan
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi's address to the nation
May 12, 2025
QuoteToday, every terrorist knows the consequences of wiping Sindoor from the foreheads of our sisters and daughters: PM
QuoteOperation Sindoor is an unwavering pledge for justice: PM
QuoteTerrorists dared to wipe the Sindoor from the foreheads of our sisters; that's why India destroyed the very headquarters of terror: PM
QuotePakistan had prepared to strike at our borders,but India hit them right at their core: PM
QuoteOperation Sindoor has redefined the fight against terror, setting a new benchmark, a new normal: PM
QuoteThis is not an era of war, but it is not an era of terrorism either: PM
QuoteZero tolerance against terrorism is the guarantee of a better world: PM
QuoteAny talks with Pakistan will focus on terrorism and PoK: PM

प्रिय देशवासीयांनो

नमस्कार!

आपण सर्वांनी गेल्या काही दिवसांत देशाचं सामर्थ्य आणि त्याचा संयम दोन्ही पाहिलं आहे. मी सर्वप्रथम भारताच्या पराक्रमी सैन्यदलांना, सशस्त्र दलांना, आपल्या गुप्तहेर संस्थांना, आपल्या वैज्ञानिकांना प्रत्येक भारतीयाच्या वतीनं सॅल्यूट करतो. आपल्या शूर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या लक्ष्यप्राप्तीसाठी असीम शौर्य गाजवलं.

मी त्यांचं शौर्य, त्यांचं साहस, त्यांचा पराक्रम आज समर्पित करतो आहे. आपल्या देशाच्या प्रत्येक मातेला, देशाच्या प्रत्येक भगिनीला आणि देशाच्या प्रत्येक कन्येला हा पराक्रम समर्पित करतो आहे.

मित्रहो,

२२ एप्रिलला पहेलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या क्रौर्याचं प्रदर्शन मांडलं, त्यानं देशाला आणि जगालाही हादरवून टाकलं होतं. सुट्टीचा आनंद घेणाऱ्या निर्दोष निरपराध नागरिकांना धर्म विचारून...त्यांचा कुटुंबासमोर, त्यांच्या मुलांसमोर निर्घृणपणे मारून टाकणं. हा दहशतीचा अतिशय बीभत्स चेहरा होता, क्रौर्य होतं. देशातला एकोपा आणि सुसंवाद भंग करण्याचाही हा किळसवाणा प्रयत्न होता. मला व्यक्तिशः याचा फार त्रास झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर सारा देश, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, प्रत्येक राजकीय पक्ष‌ एकमुखाने दहशतवादाविरोधात कठोर कारवाईसाठी उभा राहिला. आम्ही दहशतवाद्यांना धूळ चारण्यासाठी भारताच्या सैन्यदलांना पूर्ण मुभा दिली. आणि आज प्रत्येक दहशतवाद्याला, प्रत्येक दहशतवादी संघटनेला हे पुरेपूर समजलंय की आमच्या बहिणींच्या आणि मुलींच्या कपाळावरचं कुंकू- सिंदूर पुसण्याचा परिणाम काय होतो.

मित्रहो,

ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाही. देशातल्या कोट्यवधी लोकांच्या भावनांचं हे प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे च्या रात्री उशिरा ७ मे च्या सकाळी साऱ्या जगानं ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात येताना पाहिली आहे. भारताच्या सैन्यदलांनी पाकिस्तानात दहशतवादाच्या तळांवर त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर अचूक प्रहार केला. दहशतवाद्यांना स्वप्नातही वाटलं नसेल, की भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल. पण जेव्हा देशाची एकजूट होते. 'राष्ट्र प्रथम' या भावनेने देश भारून जातो. राष्ट्र सर्वोपरि असतं...तेव्हा पोलादी निर्णय घेतले जातात. अपेक्षित परिणाम घडवून दाखवले जातात. जेव्हा पाकिस्तानात दहशतीच्या अड्ड्यांवर भारताच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. भारताच्या ड्रोन्सनी हल्ला केला...तेव्हा दहशतवादी संघटनांच्या केवळ इमारतीच नाही, तर त्यांचं धैर्यही डळमळीत झालं. बहावलपूर आणि मुरीदके यासारखे दहशतवाद्यांचे तळ, एक प्रकारे जागतिक दहशतवादाची विद्यापीठं बनली होती. जगात कुठेही जे मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत...मग तो नाइन इलेव्हन असो. कींवा लंडन ट्यूब बॉंबिंग्स असोत किंवा भारतात अनेक दशकांत जे मोठमोठे दहशतवादी हल्ले झाले. त्यांचे धागेदोरे दहशतीच्या या तळांशी कुठे ना कुठे जोडलेले दिसत आले आहेत. दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींच्या कपाळीचं कुंकू पुसलं म्हणून भारताने दहशतीची ही मुख्यालयं पुसून टाकली. भारताच्या या हल्ल्यांमध्ये शंभराहून अधिक क्रूरकर्मा दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलं. दहशतवाद्यांचे कित्येक म्होरके आश्रयदाते गेल्या अडीच तीन दशकांपासून पाकिस्तानात राजरोस फिरत होते, जे भारताविरुद्ध कारस्थानं करत होते त्यांना भारतानं एका झटक्यात संपवलं आहे.

मित्रहो,

भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान घोर निराशेच्या खाईत ढकलला गेला होता. कमालीचा हताश झाला होता. बिथरला होता आणि याच बिथरलेपणाच्या भावनेतून त्यानं आणखी एक दुःसाहस केलं. दहशतवादाविरोधात भारताच्या कारवाईला साथ देण्याऐवजी पाकिस्ताननं भारतावरच हल्ला करायला सुरुवात केली. पाकिस्ताननं आपल्या शाळा-महाविद्यालयांना गुरुद्वारांना मंदिरांना सामान्य नागरिकांच्या घरांना लक्ष्य केलं. पाकिस्ताननं आपल्या सैनिकी तळांना लक्ष्य केलं. पण यातही पाकिस्तानचा बुरखा गळून पडला. जगानं हे पाहिलं की पाकिस्तानचे ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रं भारतासमोर काड्या काटक्यांसारखी कशी उधळली गेली. भारताचा सशक्त हवाई संरक्षण प्रणालीनं त्यांना आकाशातच नष्ट करून टाकलं. पाकिस्ताननं सीमेवर वार करण्याची तयारी केली होती. पण भारताने पाकिस्तानच्या छातीवरच प्रहार केला. भारताचे ड्रोन्स भारताच्या क्षेपणास्त्रांनी अतिशय अचूक हल्ला केला. पाकिस्तानी वायुदलाच्या त्याच हवाई तळांची हानी केली, ज्यांच्याबद्दल पाकिस्तानला फारच घमेंड होती. भारताने पहिल्या तीन दिवसांतच पाकिस्तानला इतकं उध्वस्त केलं ज्याचा त्याला अंदाजही नव्हता. म्हणूनच तर भारताच्या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्ताननं सुटकेचे मार्ग शोधायला सुरुवात केली. पाकिस्तान जगाकडे तणाव कमी करण्यासाठी विनंतीची याचना करत होता आणि जबरदस्त मार खाल्ल्यानंतर, १० मे रोजी दुपारी, पाकिस्तानी सैन्यानं आपल्या डीजीएमओ शी संपर्क साधला. तोपर्यंत आपण दहशतवादाला पोसणाऱ्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात नष्ट केल्या होत्या. दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलं होतं, पाकिस्तानने अगदी हृदयाशी बाळगलेल्या दहशतवादी तळांना आपण उध्वस्त केलं होतं. म्हणूनच जेव्हा पाकिस्तानकडून विनंतीची याचना करण्यात आली. जेव्हा पाकिस्तानकडून हे सांगण्यात आलं की त्यांच्याकडून यापुढे दहशतवादी कारवाया आणि लष्करी दुःसाहस होणार नाही. तेव्हा भारतानही त्यावर विचार केला. आणि मी पुन्हा सांगतो. आपण पाकिस्तानमधील दहशतवादी आणि लष्करी तळांविरुद्धची आपली प्रत्युत्तरात्मक कारवाई सध्या फक्त स्थगित केली आहे. येत्या काळात आम्ही पाकिस्तानचे प्रत्येक पाऊल या निकषावर पारखू...की तो नेमका कोणता दृष्टिकोन स्वीकारतो?

मित्रांनो,

भारताची तिन्ही सैन्यदलं आपलं हवाई दल आपलं भूदल आणि आपलं नौदल आपलं सीमा सुरक्षा दल – बीएसएफ, भारताची निमलष्करी दलं सातत्यानं सतर्क आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक नंतर आता ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्ध भारताचं धोरण आहे. ऑपरेशन सिंदूरनं दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक नवीन रेषा आखली आहे. एक नवीन मानक, एक नवीन उदाहरण, घालून दिलं आहे. पहिले- जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. आपण आपल्या पद्धतीनं, आपल्या स्वतःच्या अटींनिशी प्रतिसाद देऊ. दहशतवादाची मुळे जिथे जिथे उगम पावत असतील तिथे तिथे जाऊन आम्ही कठोर कारवाई करू. दुसरे - भारत कोणत्याही आण्विक ब्लॅकमेलला भीतीच्या बागुलबुवाला भीक घालणार नाही. आण्विक ब्लॅकमेलच्या आडून फोफावणाऱ्या दहशतवादी अड्ड्यांवर भारत अचूक आणि निर्णायक हल्ला करेल. तिसरे म्हणजे, दहशतवादाला आश्रय देणारं सरकार आणि दहशतवादाचे सूत्रधार, यांना आपण वेगवेगळे घटक समजणार नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगानं पुन्हा एकदा पाकिस्तानचं घृणास्पद सत्य अनुभवलं. जेव्हा मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पाकिस्तानी सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उडाउडी पडली. एखादा देश पुरस्कृत करत असलेल्या दहशतवादाचा…हा जिवंत पुरावा आहे. आपण भारत आणि आपल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी सातत्यानं निर्णायक पावलं उचलत राहू.

मित्रानो,

रणागणांत प्रत्येकवेळी आपण पाकिस्तानवर मात केली आहे आणि यावेळी ऑपरेशन सिंदूरनं नवा आयाम स्थापित केला आहे. आपण वाळवंट आणि पर्वतीय भागातही आपल्या क्षमतेचं शानदार प्रदर्शन केलं आणि सोबतच नव्या पिढीच्या आधुनिक युध्दनीतीतही आपलं श्रेष्‍ठत्व सिध्द केलं. या ऑपरेशन दरम्यान, आपली मेड इन इंडिया शस्त्र प्रमाणांच्या कसोटीवर खरी उतरली. आज जग पाहत आहे, एकविसाव्या शतकाच्या युध्दनीतीत मेड इन इंडिया संरक्षण उत्पादनांची वेळ आली आहे.

मित्रानों,

प्रत्येक प्रकारच्या दहशतवादा विरोधात आपल्या सगळयाची एकजूट आपली सर्वात मोठी शक्ती आहे. निश्चितच हे युग युध्दाचं नाही, परंतु हे युग दहशतवादाचंही नाही. दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णूता ही एका चांगल्या जगाची हमी आहे.

मित्रानों,

पाकिस्तानी सैन्य पाकिस्तानचं सरकार ज्याप्रकारे दहशतवादाला खतपाणी घालत आहे. तो एकदिवस पाकिस्तानलाच संपवून टाकेल. पाकिस्तानला यातून वाचायचं असेल तर, त्याला आपल्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट कराव्या लागतील. याशिवाय, शांततेचा दुसरा मार्ग नाही. भारताचं मत एकदम स्पष्ट आहे. दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाहीत. दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाहीत आणि पाणी आणि रक्त हे देखील एकत्र वाहू शकत नाही. मला आज जागतिक समुदायाला सांगायचं आहे. आमचं जाहीर धोरण राहिलं आहे, पाकिस्तानशी चर्चा होईल तर दहशतवादावर होईल. पाकिस्तानशी चर्चा होईल तर पाकव्याप्त काश्मीरवर होईल.

प्रिय देशवासीयांनो, आज बुध्दपौर्णिमा आहे. भगवान बुध्दांनी आपल्याला शांततेचा मार्ग दाखवला आहे. शांततेचा मार्गही शक्तीमार्गेच जातो. मानवता, शांतता आणि समृध्दीकडे अग्रेसर व्हावं. प्रत्येक भारतीयाला शांततेनं जगता यावं, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करता यावं, यासाठी भारताचं शक्तीशाली होणं गरजेचं आहे आणि आवश्यकता असेल तेव्हा, या शक्तीचा वापरही गरजेचा आहे आणि गेल्या काही दिवसात भारतानं हेच केलं आहे. मी पुन्हा एकदा भारताचं सैन्य आणि सशस्त्रदलांना सलाम करतो. आपण भारतीयांच्या उमेद आणि एकजूटीला वंदन करतो.

धन्यवाद.

भारतमाता की जय.