Quote“महिला नैतिकता, निष्ठा, निश्चय आणि नेतृत्वाचे प्रतिबिंब असतात”
Quote“देशाला योग्य दिशा दाखविण्यासाठी महिला सक्षम आणि समर्थ असल्या पाहिजेत असे आपल्या वेद आणि परंपरांनी म्हटले आहे”
Quote“महिलांची प्रगती नेहमीच देशाच्या सक्षमीकरणाला बळकटी देते”
Quote“भारताच्या विकास यात्रेत महिलांना संपूर्णपणे सहभागी करून घेण्याला आज देशाने प्राधान्य दिले आहे”
Quote“स्टँड अप इंडिया” योजनेअंतर्गत देण्यात आलेली 80 टक्क्याहून अधिक कर्जे महिलांना देण्यात आली आहेत. तसेच मुद्रा योजनेखाली दिलेली 70 टक्के कर्जे आपल्या भगिनी आणि सुकन्यांना दिलेली आहेत”

नमस्कार!

तुम्हा सर्वांना, देशातल्या सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मी अनेकानेक शुभेच्छा देतो. आजच्या महिला दिनानिमित्त  देशातल्या महिला संत आणि साध्वींच्यावतीने या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.

माता भगिनींनो,

कच्छच्या ज्या भूमीवर तुम्हा सर्वांचे आगमन झाले आहे, ती भूमी अनेक युगांपासून स्त्री शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. इथे स्वतः माता आशापूरा मातृशक्तीच्या रूपामध्ये विराजमान आहे. याठिकाणच्या महिलांनी संपूर्ण समाजाला कठीण नैसर्गिक आव्हानांना, सर्व प्रकारच्या अवघड आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून राहायला शिकवले आहे. काही झाले तरी येणा-या प्रत्येक आव्हानांना तोंड देत लढायचे आणि त्या परिस्थितीवर मात करीत जिंकणेही शिकवले आहे. जल संरक्षणाच्या कार्यामध्ये कच्छच्या महिलांनी जी भूमिका बजावली आहे, पाणी समित्या बनवून जे कार्य केले आहे, त्या कार्याचा आंतरराष्ट्रीय संस्थांनीसुद्धा गौरव केला आहे. कच्छच्या महिलांनी आपल्या अथक परिश्रमांनी कच्छची संस्कृती, संस्कारही जिवंत ठेवण्याचे कार्य केले आहे. कच्छचे रंग, विशेषत्वाने इथली हस्तकला याचे एक मोठे उदाहरण आहे. या कला आणि हे कौशल्य आता तर संपूर्ण जगामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करीत आहे. आपण याक्षणी भारताच्या पश्चिमी सीमेवरच्या शेवटच्या गावामध्ये आहात. याचा अर्थ गुजरातच्या, हिंदुस्तानच्या सीमेवरचे हे अखेरचे गाव आहे. त्याच्या पुढे कोणत्याही प्रकारची मानवी वस्ती नाही. पुढे दुसरा देश सुरू होतो. सीमावर्ती गावांमध्ये तिथल्या लोकांवर देशाची विशेष जबाबदारी असते. कच्छच्या वीरांगना महिलांनी नेहमीच ही जबाबदारी उत्तमरितीने पार पाडली आहे. आता तुम्ही कालपासून तिथे आहात, त्यामुळे कदाचित तुम्ही कोणाकडून काहीतरी नक्कीच ऐकले असेल. 1971 मध्ये ज्यावेळी युद्ध सुरू होते, त्यावेळी शत्रूंनी भूजच्या विमानतळावर हल्ला केला होता. धावपट्टीवर बॉम्बवर्षाव केला त्यामुळे आपली धावपट्टी पूर्णपणे नष्ट झाली होती. अशावेळी, युद्ध काळामध्ये आणखी एका धावपट्टीची गरज होती. तुम्हा सर्वांना एका गोष्टीचा अभिमान वाटेल की, अशा अवघड प्रसंगी कच्छच्या महिलांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता रात्रीतून धावपट्टी तयार करण्याचे काम केले आणि भारतीय सेनेला लढता यावे, यासाठी सुविधा निर्माण करून दिली. ही इतिहासातली अतिशय महत्वपूर्ण घटना आहे. त्यावेळी धावपट्टी तयार करण्याचे काम करणा-या अनेक माता भगिनी आजही आपल्यामध्ये आहेत. तुम्ही त्यांच्याविषयी विचारपूस केलीत, तर त्या भेटतील. त्यांचे वय आता खूप जास्त झाले आहे. तरीही त्यांना भेटून संवाद साधण्याची संधी मला अनेकवेळा मिळाली आहे. महिलांच्या अशा असामान्य साहस आणि सामर्थ्याने भारलेल्या या भूमीवर आज  मातृशक्ती समाजासाठी एक सेवा यज्ञ सुरू करीत आहे.

|

माता- भगिनींनो,

आपल्या वेदांमध्ये महिलांना आवाहन केले आहे - ‘पुरन्धिः योषा’! अशा मंत्रांनी हे आवाहन केले आहे. याचा अर्थ महिला आपल्या नगराची, आपल्या समाजाची जबाबदारी पेलण्यामध्ये समर्थ व्हाव्यात. महिलांनी देशाला नेतृत्व द्यावे. नारी म्हणजे नीती, निर्णय शक्ती आणि नेतृत्वाचे प्रतिबिंब असते. त्यांचे प्रतिनिधित्व स्त्री करीत असते. म्हणूनच आपल्या वेदांनी, आपल्या परंपरांनी असे आवाहन केले आहे की, स्त्री सक्षम व्हावी, समर्थ व्हावी आणि राष्ट्राला तिने दिशा दाखवावी. आपण एक गोष्ट अधून-मधून बोलत असतो, ‘‘ नारी  तू नारायणी!’’ मात्र आणखी एक गोष्टही तुम्ही ऐकली असेल, कोणती ते अगदी लक्षपूर्वक ऐकावी. जसे की, आपल्याकडे म्हणतात, नर कार्य करेल तर तो नारायण होईल! परंतु नारीविषयी काय म्हटले आहे- नारी तू नारायणी! आता लक्षात घ्या, या दोन्हीमध्ये किती मोठे अंतर आहे. आपण बोलतो, त्याचा जर थोडा विचार केला तर आपल्या पूर्वजांनी किती सखोल चिंतन करून आपल्या पुरूषांसाठी म्हटले आहे की, नर कार्य करेल, तर तो नारायण होईल! मात्र माता -भगिनींसाठी म्हटले आहे, ‘‘नारी तू नारायणी!’’

माता आणि भगिनींनो,

विश्वाच्या बौद्धिक परंपरेचा वाहक असणा-या भारताचे अस्तित्व त्याच्या तत्वज्ञानावर केंद्रीत आहे आणि या तत्वज्ञानाचा आधार भारतामध्ये असलेले अध्यात्मिक चैतन्य आहे. आणि हे अध्यात्मिक चैतन्य त्याच्या स्त्री शक्तीवर केंद्रीत आहे. आपण ईश्वरीय सत्तेलाही सहर्ष महिलेच्या रूपामध्ये स्थापित केले आहे. ज्यावेळी आपण ईश्वरीय सत्ता आणि ईश्वरीय सत्तांच्या स्त्री आणि पुरूष अशा दोन्ही स्वरूपांना पाहतो, त्यावेळी स्वाभाविकपणे प्राधान्य महिला सत्तेला  दिले जाते. मग ते सीता-राम असो राधा-कृष्ण असो, गौरी-गणेश असो अथवा लक्ष्मी- नारायण असो.  आपल्या या परंपरा तुमच्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असणार? आपल्या वेदांमध्ये घोषा, गोधा, अपाला आणि लोपामुद्रा अशा अनेक विदूषी, पंडिता ऋषीकन्या होऊन गेल्या आहेत. गार्गी आणि मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषींनी वेदांतांमध्ये शोधांना दिशा देण्याचे काम केले आहे. उत्तरेकडील मीराबाईपासून ते दक्षिणेतल्या संत अक्का महादेवीपर्यंत, भारतातल्या देवींनी भक्ती आंदोलनातून ज्ञानाचे तत्वज्ञान आणि समाजामध्ये सुधारणा घडविल्या तसेच परिवर्तनाचे स्वर आळवला आहे. गुजरात आणि कच्छच्या या भूमीवरही सती तोरल, गंगा सती, सती लोयण, रामबाई आणि लीरबाई यांच्यासारख्या अनेक देवींची नावे घेता येईल. तुम्ही सौराष्ट्रामध्ये गेला तर घराघरांमध्ये ही नावे घेतली जातात, ती ऐकायला मिळतील.  याचप्रमाणे तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन पहा, या देशामध्ये कदाचित असे एकही गाव असणार नाही, किंवा क्षेत्र असणार नाही की, स्थान असणार नाही की,  त्या त्या गावामध्ये, ग्रामदेवी, कुलदेवी तिथल्या लोकांचे श्रद्धेचे केंद्र नाही. या देवी या देशाची त्या स्त्रीच्या चैतन्याचे प्रतीक आहेत. या चैतन्याने सनातन काळापासून आपल्या समाजाला सृजन केले आहे. या नारी चैतन्याने स्वातंत्र्याच्या आंदोलन काळातही देशामध्ये स्वातंत्र्याची मशाल प्रज्वलित ठेवली. 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामाचे आपण स्मरण केले पाहिजे. आणि ज्यावेळी आता स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहेत, त्यावेळी हे स्मरण गरजेचे आहे. आपली अध्यात्मिक यात्रा अशीच सुरू राहील. मात्र सामाजिक चैतन्य, सामाजिक सामर्थ्य, सामाजिक विकास, समाजामध्ये परिवर्तन, याविषयी प्रत्येक नागरीक जोडला गेला आहे. त्याची प्रत्येकवेळी एक विशिष्ट जबाबदारी आहे. आता तर इतक्या मोठ्या संख्येने संत परंपरेतल्या माता- भगिनी इथे जमलेल्या आहेत, तर मला असे वाटते की, आज तुमच्याबरोबर काही विशेष गोष्टींबाबत बोललेच पाहिजे. आणि मी महिला चैतन्याने भारलेल्या एका जागृत समूहाबरोबर बोलत आहे, हे माझे सौभाग्य आहे.

माता- भगिनींनो,

जे राष्ट्र या भूमीला मातेस्वरूप मानते, तिथे महिलांची प्रगती राष्ट्राच्या सशक्तीकरणाला नेहमीच बळ देत असते. आज देशाची प्राथमिकता, महिलांचे जीवन अधिक सुकर, सुगम बनविणे आहे. आज देशाची प्राथमिकता भारताच्या विकास यात्रेमध्ये महिलांची संपूर्ण भागीदारी असावी, याला आहे आणि म्हणूनच आमच्या माता-भगिनींच्या अडचणी दूर करण्यावर आम्ही भर देत आहोत. आपल्याकडे अशी स्थिती होती की, कोट्यवधी माता- भगिनींना शौचासाठी घराबाहेर मोकळ्या जागी, उघड्यावर जावे लागत होते. घरामध्ये शौचालय नसल्यामुळे त्यांना किती त्रास भोगावा लागत होता. याचा अंदाज तुमच्यासमोर मला शब्दातून सांगण्याची गरज नाही. आमच्या सरकारनेच महिलांना होणारा हा त्रास जाणून घेतला. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून मी ही गोष्ट देशासमोर मांडली आणि आम्ही देशभरामध्ये स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत 11 कोटींपेक्षा जास्त शौचालये बनवली. आता अनेक लोकांना वाटत असेल की, हे काही काम आहे का? परंतु जर हे काम वाटत नसेल तर असे काम आधी कोणीही करू शकले नव्हते. तुम्ही सर्वांनी पाहिले आहे की, गावांमध्ये माता- भगिनींना लाकूड- सरपण, जळण, गोव-या यांच्या मदतीने चुलीवर स्वयंपाक करावा लागत होता. चुलीच्या धुरामुळे होणारा त्रास हा महिला आपल्या नशीबाचे भोग मानत होत्या. या त्रासातून त्यांना मुक्ती देण्यासाठी सरकारने देशाभरात   उज्ज्वला योजनेतून 9 कोटींपेक्षा जास्त घरांमध्ये गॅसजोडणी दिली आहे. त्या घरातल्या महिलांची धुराच्या त्रासातून मुक्तता केली आहे. आधी महिलांचे, विशेषतः गरीब महिलांचे बँकेत खातेही नसायचे. या कारणामुळे त्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल असायच्या. आमच्या सरकारने 23 कोटी महिलांची जन धन योजनेमार्फत बँकांमध्ये खाती उघडली आहेत. आधी आपल्याला माहितीच आहे की, स्वयंपाक घरामध्ये गव्हाच्या डब्यात किंवा अशाच कुठल्या तरी डब्यात महिला आपल्याकडचे पैसे ठेवत होत्या. तांदळाचा डबा असेल तर त्याच्या खाली तळाला पैसे महिला ठेवत होत्या. आज आपल्या माता -भगिनी बँकेत पैसे जमा करू शकतील अशी आम्ही व्यवस्था केली आहे.  आज गावा-गावांमध्ये महिला बचतगट तयार करून, लहान- लहान उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देत आहेत. महिलांकडे कौशल्याची काही कमी नसते. मात्र आता त्यांच्याकडचे कौशल्य त्यांची आणि त्यांच्या परिवाराची आर्थिक ताकद वाढवित आहेत. आमच्या भगिनी- कन्या पुढे जाव्यात, आमच्या कन्यांची स्वप्ने साकार व्हावीत, आपल्या इच्छेनुसार त्यांना काम करणे शक्य व्हावे, यासाठी सरकार अनेक माध्यमातून त्यांना आर्थिक मदतही देत आहे. आज ‘स्टँडअप इंडिया’ अंतर्गत 80 टक्के कर्ज आमच्या माता -भगिनींच्या नावे देण्यात आले आहे. मुद्रा योजनेअंतर्गत जवळपास 70 टक्के कर्ज आमच्या भगिनी - कन्यांना देण्यात आले आहे. आणि या योजनांमधून  हजारो -कोटी रूपये देण्यात आले आहेत. आणखी एक विशेष कार्य करण्यात आले आहे, त्याविषयीही  आपल्यासमोर बोलण्याची माझी मनापासून इच्छा आहे.

आमच्या सरकारने पंतप्रधान घरकुल योजनेत जी 2 कोटींपेक्षा जास्त घरे बांधून दिली आहेत, कारण आमचे स्वप्न आहे की हिंदुस्तानातील प्रत्येक गरीबाचं स्वतःचं घर असावं. पक्कं छत असलेलं घर असावं आणि घर म्हणजे फक्त चार भिंती नाही, एक असं घर, जिथे शौचालय असेल, एक असं घर जिथे नळाद्वारे पाणीपुरवठा होत असेल, एक असं घर जिथे वीजपुरवठा असेल, एक असं घर जिथे त्यांना प्राथमिक सुविधा मिळतील, गॅस जोडणी सकट, या सगळ्या सुविधा असलेलं घर मिळेल, आमचं सरकार आल्यानंतर दोन कोटी गरीब कुटुंबांसाठी दोन कोटी घरं बांधण्यात आली. हा फार मोठी संख्या आहे. आता दोन कोटी घरं, आज दोन कोटी घरांची किंमत किती असते, आपण विचार करत असाल, किती असते किंमत, दीड लाख, दोन लाख, अडीच लाख, तीन लाख, छोटंसं घर असेल, तर याचा अर्थ असा दोन कोटी महिलांच्या नावावर जी घरं बनली आहेत, म्हणजे दोन कोटी महिला लखपती झाल्या आहेत. जेंव्हा आपण लखपती हा शब्द ऐकतो, तेंव्हा किती मोठा वाटत असे. मात्र, जर गरिबांविषयी संवेदना असेल, काम करण्याची इच्छा असेल, तर कामं होतात आणि आज बहुतेक सर्व दोन कोटी माता भगिनींना त्यांच्या मालकीचं घर मिळालं आहे. एक काळ होता, जेव्हा महिलांच्या नावावर ना जमीन असायची, न दुकान असायचं, आणि ना घर असायचं, कुणालाही विचारा, की दादा, जमीन कोणाच्या नावावर आहे, तर उत्तर मिळायचं एकतर पतीच्या नावावर नाही तर मुलाच्या नावावर, नाहीतर भावाच्या नावावर. दुकान कोणाच्या नावावर, पती, मुलगा किंवा भावाच्या नावावर. गाडी घेतली, स्कूटर घेतली तर कुणाच्या नावावर, पती, मुलगा. आता आपल्या माता - भगिनींच्या नावावर देखील संपत्ती असेल, आणि म्हणून आम्ही असे महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आणि यामुळे जेंव्हा त्यांच्याकडे ताकद येते ना, त्याला सक्षमीकरण म्हणतात, तर जेंव्हा घरात आर्थिक निर्णय घेण्याची वेळ येते तेंव्हा माता - भगिनी त्यात भागीदार बनतात. त्यांचा सहभाग वाढतो नाहीतर आधी काय व्हायचं घरात मुलगा आणि वडील काही व्यापार आणि व्यवसायाची चर्चा करत असतात आणि स्वयंपाकघरातून आई येऊन मुकाट्याने उभी राहायची तर लगेच ते म्हणत, तू स्वयंपाकघरात जाऊन काम कर, मी मुलाशी बोलतो आहे. म्हणजे समाजाची ही स्थिती आपण बघितली आहे. आज माता - भगिनी सक्षम होऊन म्हणतात, हे तुम्ही चुकीचं करत आहात, असं करा. असं केल्यानं नुकसान होईल, असं केल्यानं फायदा होईल. आज त्यांची भागीदारी वाढत आहे. माता भगिनी, मुली पूर्वी इतक्या सक्षम नव्हत्या, मात्र आधी त्यांच्या स्वप्नांना जुनाट विचार आणि अव्यवस्थांचे कुंपण होते. मुली काही काम करत असत, नोकरी करत असत, तेंव्हा अनेकदा त्यांना मातृत्वाच्या वेळी नोकरी सोडावी लागत असे. आता त्या वेळी जेंव्हा सर्वात जास्त गरज असेल, पैशांची देखील गरज अशो, इतर मदतीची गरज असताना जर त्याच वेळी नोकरी सोडावी लागली, तर तिच्या पोटात जे मूल आहे, त्यावर परिणाम होतो. कितीतरी मुलींना स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या भीतीने काम सोडावं लागत होतं. आम्ही ही परिस्थिती बदलण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. आम्ही मातृत्व रजा 12 आठवड्यांवरून वाढवून 26 आठवडे केली आहे म्हणजे एक प्रकारे 52 आठवड्यांचं वर्ष असतं, 26 आठवडे रजा देऊन टाकतात. आम्ही कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे केले आहेत. बलात्कार, आणि आम्ही देशात आमच्या सरकारने खूप मोठं काम केलं आहे, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात, दोषीना फाशीची शिक्षा होईल, अशी तरतूदही आम्ही कायद्यात केली आहे. त्याचप्रमाणे मुलगा-मुलगी यांना समान मानत, सरकार मुलींच्या विवाहाचे वय 21 करण्याच्या प्रस्तावावर देखील विचार करत आहे. संसदेत हे विधेयक मांडण्यात आले आहे. आज देशाच्या सैन्यदलात, मुलींच्या अधिक व्यापक योगदानाला प्रोत्साहन दिले जात आहे. सैनिकी शाळांमध्ये देखील मुलींना प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे.

माता-भगिनींनो,

नारीशक्तीच्या सक्षमीकरणाच्या या प्रवासाला जलद गतीने पुढे नेणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मला कायमच आपल्या सर्वांचा स्नेह मिळाला आहे. आपले आशीर्वाद मिळाले आहेत. तुमच्या सहवासातच मी मोठा झालो आहे आणि म्हणूनच, आज मला इच्छा होते आहे, की माझ्या मनातले काही तुम्हाला सांगावे, मी तुम्हाला एक विनंती करतो आहे. तुम्हाला काही जबाबदारी द्यायची आहे. मला आपण मदत करावी, आपले काही मंत्री देखील इथे आले आहेत.काही आपले कार्यकर्ते आहेत. त्यांनी देखील सांगितलं असेल किंवा पुढे सांगणार असतील. आता बघा, अल्पपोषण आपण कुठेही असू, म्हणजे गृहस्थजीवनात असू अथवा संन्यासी असू, पण जर भारतातील मुले अल्पपोषित असतील, तर आपल्याला त्रास होणार नाही का? अल्पपोषित बालके बघून आपल्याला त्रास होऊ नये का? आपण या समस्येवर काही वैज्ञानिक पद्धतीने उपाय शोधू शकतो का? आपण याची जबाबदारी घेऊ शकतो का? आणि म्हणूनच मला सांगायचे आहे की अल्पपोषणाविरोधात देशभरात जो लढा सुरु आहे, त्यात आपण खूप मदत करु शकता. आपण, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानात देखील आपली महत्वाची भूमिका आहे.  मुली जास्तीत जास्त संख्येने शाळेत जाव्या, एवढेच नाही तर त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी आपण सतत त्यांच्याशी संवाद साधत राहिला पाहिजे. आपणही कधी कधी या मुलींना इथे बोलावून त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. आपल्या मठात, मंदिरात जिथे जिथे शक्य आहे, तिथे त्यांना प्रेरणा द्यायला हवी.

आता सरकार एक मोहीम हाती घेत आहे, ज्यात मुलींच्या शाळेत जाण्यचा उत्सव केला जाईल. यात सुद्धा तुमची सक्रीय भागीदारी खूप मदत करेल. असाच एक विषय आहे, व्होकल फॉर लोकल. हा शब्द तुम्ही माझ्या तोंडी सारखा सारखा ऐकला असेल तुम्ही मला सांगा महात्मा गांधी आपल्याला सांगून गेले आहेत, मात्र आपण सगळे विसरून गेलो आहोत. आज जगाची जी अवस्था आपण बघत आहोत, त्यात, तोच देश जग चालवू शकतो जो स्वतःच्या पायावर उभा असेल. जो बाहेरून येणाऱ्या वस्तूंवर अवलंबून असतो, तो काही करू शकत नाही. म्हणूनच आता व्होकल फॉर लोकल आपल्या अर्थव्यवस्थेशी निगडीत एक महत्वाचा विषय बनला आहे, पण याचा महिला सशक्तीकरणाशी देखील खोलवर संबंध आहे. बहुतांश स्थानिक उत्पादनांची शक्ती महिलांच्या हातात असते. म्हणूनच, आपल्या भाषणांत, आपल्या जनजगृती मोहिमांत आपण स्थानिक उत्पादने वापरण्यासाठी लोकांना प्रेरित करा. लोक, आपल्या घरांत जे आपले भक्त लोक आहेत ना, त्यांना म्हणा, बंधू, तुमच्या घरात किती परदेशी वस्तू आहेत आणि हिंदुस्तानी वस्तू किती आहेत, जरा हिशेब करा. आपल्या घरात लहान लहान विदेशी वस्तू शिरल्या आहेत. हे आमच्या देशातले लोक..... मी बघितलं छत्री, तो म्हणाला ही परदेशी छत्री आहे. अरे बाबा, आपल्या देशात शतकानुशतके छत्र्या बनत आहेत तर परदेशी छत्री घेण्याची काय गरज होती. एखादवेळेस दोन - चार रुपये किंमत जास्त असेल, पण त्यामुळे आपल्या किती लोकांना रोजगार मिळेल. आणि म्हणूनच मला असं वाटतं की इतक्या वस्तू आहेत की बाहेरून वस्तू आणण्याचा आपल्याला छंद जडला आहे. आपण लोकांना कशा प्रकारे जीवन जगावे, तुम्ही या गोष्टीवर लोकांना प्रेरणा देऊ शकता. आपण लोकांना एक दिशा दाखवू शकता. आणि यामुळे भारताच्या मातीत तयार झालेल्या वस्तू, भारताच्या मातीत तयार झालेल्या वस्तू, ज्यात भारताच्या लोकांची मेहनत असेल, अशा वस्तू आणि जेंव्हा मी व्होकल फॉर लोकल म्हणतो, तेंव्हा लोकांना वाटतं की दिवाळीचे दिवे, दिवाळीचे दिवेच नाही, बंधू, प्रत्येक गोष्टींकडे बघा, फक्त दिवाळीच्या दिव्यांवर नका जाऊ. असंच जेव्हा तुम्ही आपल्या विणकर बंधू - भगिनींना, हस्त कारागिरांना भेटाल तर त्यांना, सरकारचं एक GeM पोर्टल आहे, GeM पोर्टल विषयी सांगा. भारत सरकारने हे एक असं पोर्टल बनवलं आहे, ज्याद्वारे कुणी, कुठल्याही दुर्गम भागात राहत असेल, कुठेही राहत असेल, तो ज्या वस्तू तयार करतो, तो आपल्या सरकारला विकू शकतो. एक फार मोठं काम होतं आहे. माझा आणखी एक आग्रह असाही आहे, जेव्हा आपण समाजाच्या विविध वर्गातल्या लोकांना भेटता, त्यांच्याशी जे बोलाल त्यात नागरिकांच्या कर्तव्यांवर भर द्या. एक नागरिक म्हणून त्यांचा धर्म काय हे आपण त्यांना सांगितले पाहिजे. आणि आपण पितृधर्म, मातृधर्म हे सगळं तर सांगताच. देशासाठी नागरिक धर्म देखील तितकाच गरजेचा आहे. राज्यघटनेत अपेक्षित ही भावना आपल्याला सर्वांना मिळून दृढ करायची आहे. हीच भावना मजबूत करून आपण नव्या भारताच्या निर्मितीचे लक्ष्य गाठू शकतो. मला पूर्ण विश्वास आहे की, देशाला अध्यात्मिक आणि सामाजिक नेतृत्व देत असताना आपण प्रत्येक व्यक्तीला राष्ट्र निर्माणाच्या या यात्रेत सामील करून घ्याल. आपले आशीर्वाद आणि मार्गदर्शन यामुळे आपण नवीन भारताचे स्वप्न लवकरच साकार करू शकू आणि मग आपण बघितलं आहे की हिंदुस्तानातल्या शेवटच्या गावाचं दृश्य आपल्याला किती आनंद देत असेल. कदाचित आपल्यापैकी काही लोकांनी शुभ्र वाळवंट बघायला गेला असाल. काही लोक कदाचित आज जाणार असतील. त्याचं स्वतःचं एक सौंदर्य आहे. आणि त्यात एक आध्यात्मिक अनुभव देखील घेऊ शकता. काही क्षण एकटेच, थोडे दूर जाऊन बसा. एका नव्या चेतनेची अनुभूती होईल. कारण एके काळी माझ्यासाठी या जागेचा दुसरा मोठा उपयोग होत असे. तर, मी फार मोठा काळ, या जमिनीशी जोडलेला माणूस आहे. आणि आपण जेंव्हा इथे आलात, तर आपण नक्की बघा, की तो एक खास अनुभव असतो, तो अनुभव तुम्ही घ्या. मी आपणा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा देतो. आमचे काही सहकारी तिथे आहेत, त्यांच्याशी चर्चा करा. आपण समाजासाठी देखील पुढे या. स्वातंत्र्य संग्रामात संत परंपरेने फार मोठी भूमिका निभावली आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनतर देशाला पुढे नेण्यासाठी संत परंपरेने पुढाकार घ्यावा, आपली जबाबदारी सामाजिक जबाबदारी म्हणून पार पाडावी. माझी आपल्याकडून ही अपेक्षा आहे. आपणा सर्वांचे खूप खूप  आभार!

  • krishangopal sharma Bjp January 14, 2025

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
  • krishangopal sharma Bjp January 14, 2025

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
  • krishangopal sharma Bjp January 14, 2025

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
  • Devendra Kunwar October 19, 2024

    BJP
  • JBL SRIVASTAVA July 04, 2024

    नमो नमो
  • Pradhuman Singh Tomar April 26, 2024

    150
  • Pradhuman Singh Tomar April 26, 2024

    BJP
  • Pradhuman Singh Tomar April 26, 2024

    BJP
  • Jayanta Kumar Bhadra April 01, 2024

    Jay Mata
  • Jayanta Kumar Bhadra April 01, 2024

    My mom
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

Media Coverage

"Huge opportunity": Japan delegation meets PM Modi, expressing their eagerness to invest in India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Today, India is not just a Nation of Dreams but also a Nation That Delivers: PM Modi in TV9 Summit
March 28, 2025
QuoteToday, the world's eyes are on India: PM
QuoteIndia's youth is rapidly becoming skilled and driving innovation forward: PM
Quote"India First" has become the mantra of India's foreign policy: PM
QuoteToday, India is not just participating in the world order but also contributing to shaping and securing the future: PM
QuoteIndia has given Priority to humanity over monopoly: PM
QuoteToday, India is not just a Nation of Dreams but also a Nation That Delivers: PM

श्रीमान रामेश्वर गारु जी, रामू जी, बरुन दास जी, TV9 की पूरी टीम, मैं आपके नेटवर्क के सभी दर्शकों का, यहां उपस्थित सभी महानुभावों का अभिनंदन करता हूं, इस समिट के लिए बधाई देता हूं।

TV9 नेटवर्क का विशाल रीजनल ऑडियंस है। और अब तो TV9 का एक ग्लोबल ऑडियंस भी तैयार हो रहा है। इस समिट में अनेक देशों से इंडियन डायस्पोरा के लोग विशेष तौर पर लाइव जुड़े हुए हैं। कई देशों के लोगों को मैं यहां से देख भी रहा हूं, वे लोग वहां से वेव कर रहे हैं, हो सकता है, मैं सभी को शुभकामनाएं देता हूं। मैं यहां नीचे स्क्रीन पर हिंदुस्तान के अनेक शहरों में बैठे हुए सब दर्शकों को भी उतने ही उत्साह, उमंग से देख रहा हूं, मेरी तरफ से उनका भी स्वागत है।

साथियों,

आज विश्व की दृष्टि भारत पर है, हमारे देश पर है। दुनिया में आप किसी भी देश में जाएं, वहां के लोग भारत को लेकर एक नई जिज्ञासा से भरे हुए हैं। आखिर ऐसा क्या हुआ कि जो देश 70 साल में ग्यारहवें नंबर की इकोनॉमी बना, वो महज 7-8 साल में पांचवे नंबर की इकोनॉमी बन गया? अभी IMF के नए आंकड़े सामने आए हैं। वो आंकड़े कहते हैं कि भारत, दुनिया की एकमात्र मेजर इकोनॉमी है, जिसने 10 वर्षों में अपने GDP को डबल किया है। बीते दशक में भारत ने दो लाख करोड़ डॉलर, अपनी इकोनॉमी में जोड़े हैं। GDP का डबल होना सिर्फ आंकड़ों का बदलना मात्र नहीं है। इसका impact देखिए, 25 करोड़ लोग गरीबी से बाहर निकले हैं, और ये 25 करोड़ लोग एक नियो मिडिल क्लास का हिस्सा बने हैं। ये नियो मिडिल क्लास, एक प्रकार से नई ज़िंदगी शुरु कर रहा है। ये नए सपनों के साथ आगे बढ़ रहा है, हमारी इकोनॉमी में कंट्रीब्यूट कर रहा है, और उसको वाइब्रेंट बना रहा है। आज दुनिया की सबसे बड़ी युवा आबादी हमारे भारत में है। ये युवा, तेज़ी से स्किल्ड हो रहा है, इनोवेशन को गति दे रहा है। और इन सबके बीच, भारत की फॉरेन पॉलिसी का मंत्र बन गया है- India First, एक जमाने में भारत की पॉलिसी थी, सबसे समान रूप से दूरी बनाकर चलो, Equi-Distance की पॉलिसी, आज के भारत की पॉलिसी है, सबके समान रूप से करीब होकर चलो, Equi-Closeness की पॉलिसी। दुनिया के देश भारत की ओपिनियन को, भारत के इनोवेशन को, भारत के एफर्ट्स को, जैसा महत्व आज दे रहे हैं, वैसा पहले कभी नहीं हुआ। आज दुनिया की नजर भारत पर है, आज दुनिया जानना चाहती है, What India Thinks Today.

|

साथियों,

भारत आज, वर्ल्ड ऑर्डर में सिर्फ पार्टिसिपेट ही नहीं कर रहा, बल्कि फ्यूचर को शेप और सेक्योर करने में योगदान दे रहा है। दुनिया ने ये कोरोना काल में अच्छे से अनुभव किया है। दुनिया को लगता था कि हर भारतीय तक वैक्सीन पहुंचने में ही, कई-कई साल लग जाएंगे। लेकिन भारत ने हर आशंका को गलत साबित किया। हमने अपनी वैक्सीन बनाई, हमने अपने नागरिकों का तेज़ी से वैक्सीनेशन कराया, और दुनिया के 150 से अधिक देशों तक दवाएं और वैक्सीन्स भी पहुंचाईं। आज दुनिया, और जब दुनिया संकट में थी, तब भारत की ये भावना दुनिया के कोने-कोने तक पहुंची कि हमारे संस्कार क्या हैं, हमारा तौर-तरीका क्या है।

साथियों,

अतीत में दुनिया ने देखा है कि दूसरे विश्व युद्ध के बाद जब भी कोई वैश्विक संगठन बना, उसमें कुछ देशों की ही मोनोपोली रही। भारत ने मोनोपोली नहीं बल्कि मानवता को सर्वोपरि रखा। भारत ने, 21वीं सदी के ग्लोबल इंस्टीट्यूशन्स के गठन का रास्ता बनाया, और हमने ये ध्यान रखा कि सबकी भागीदारी हो, सबका योगदान हो। जैसे प्राकृतिक आपदाओं की चुनौती है। देश कोई भी हो, इन आपदाओं से इंफ्रास्ट्रक्चर को भारी नुकसान होता है। आज ही म्यांमार में जो भूकंप आया है, आप टीवी पर देखें तो बहुत बड़ी-बड़ी इमारतें ध्वस्त हो रही हैं, ब्रिज टूट रहे हैं। और इसलिए भारत ने Coalition for Disaster Resilient Infrastructure - CDRI नाम से एक वैश्विक नया संगठन बनाने की पहल की। ये सिर्फ एक संगठन नहीं, बल्कि दुनिया को प्राकृतिक आपदाओं के लिए तैयार करने का संकल्प है। भारत का प्रयास है, प्राकृतिक आपदा से, पुल, सड़कें, बिल्डिंग्स, पावर ग्रिड, ऐसा हर इंफ्रास्ट्रक्चर सुरक्षित रहे, सुरक्षित निर्माण हो।

साथियों,

भविष्य की चुनौतियों से निपटने के लिए हर देश का मिलकर काम करना बहुत जरूरी है। ऐसी ही एक चुनौती है, हमारे एनर्जी रिसोर्सेस की। इसलिए पूरी दुनिया की चिंता करते हुए भारत ने International Solar Alliance (ISA) का समाधान दिया है। ताकि छोटे से छोटा देश भी सस्टेनबल एनर्जी का लाभ उठा सके। इससे क्लाइमेट पर तो पॉजिटिव असर होगा ही, ये ग्लोबल साउथ के देशों की एनर्जी नीड्स को भी सिक्योर करेगा। और आप सबको ये जानकर गर्व होगा कि भारत के इस प्रयास के साथ, आज दुनिया के सौ से अधिक देश जुड़ चुके हैं।

साथियों,

बीते कुछ समय से दुनिया, ग्लोबल ट्रेड में असंतुलन और लॉजिस्टिक्स से जुड़ी challenges का सामना कर रही है। इन चुनौतियों से निपटने के लिए भी भारत ने दुनिया के साथ मिलकर नए प्रयास शुरु किए हैं। India–Middle East–Europe Economic Corridor (IMEC), ऐसा ही एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट है। ये प्रोजेक्ट, कॉमर्स और कनेक्टिविटी के माध्यम से एशिया, यूरोप और मिडिल ईस्ट को जोड़ेगा। इससे आर्थिक संभावनाएं तो बढ़ेंगी ही, दुनिया को अल्टरनेटिव ट्रेड रूट्स भी मिलेंगे। इससे ग्लोबल सप्लाई चेन भी और मजबूत होगी।

|

साथियों,

ग्लोबल सिस्टम्स को, अधिक पार्टिसिपेटिव, अधिक डेमोक्रेटिक बनाने के लिए भी भारत ने अनेक कदम उठाए हैं। और यहीं, यहीं पर ही भारत मंडपम में जी-20 समिट हुई थी। उसमें अफ्रीकन यूनियन को जी-20 का परमानेंट मेंबर बनाया गया है। ये बहुत बड़ा ऐतिहासिक कदम था। इसकी मांग लंबे समय से हो रही थी, जो भारत की प्रेसीडेंसी में पूरी हुई। आज ग्लोबल डिसीजन मेकिंग इंस्टीट्यूशन्स में भारत, ग्लोबल साउथ के देशों की आवाज़ बन रहा है। International Yoga Day, WHO का ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन, आर्टिफिशियल इंटेलीजेंस के लिए ग्लोबल फ्रेमवर्क, ऐसे कितने ही क्षेत्रों में भारत के प्रयासों ने नए वर्ल्ड ऑर्डर में अपनी मजबूत उपस्थिति दर्ज कराई है, और ये तो अभी शुरूआत है, ग्लोबल प्लेटफॉर्म पर भारत का सामर्थ्य नई ऊंचाई की तरफ बढ़ रहा है।

साथियों,

21वीं सदी के 25 साल बीत चुके हैं। इन 25 सालों में 11 साल हमारी सरकार ने देश की सेवा की है। और जब हम What India Thinks Today उससे जुड़ा सवाल उठाते हैं, तो हमें ये भी देखना होगा कि Past में क्या सवाल थे, क्या जवाब थे। इससे TV9 के विशाल दर्शक समूह को भी अंदाजा होगा कि कैसे हम, निर्भरता से आत्मनिर्भरता तक, Aspirations से Achievement तक, Desperation से Development तक पहुंचे हैं। आप याद करिए, एक दशक पहले, गांव में जब टॉयलेट का सवाल आता था, तो माताओं-बहनों के पास रात ढलने के बाद और भोर होने से पहले का ही जवाब होता था। आज उसी सवाल का जवाब स्वच्छ भारत मिशन से मिलता है। 2013 में जब कोई इलाज की बात करता था, तो महंगे इलाज की चर्चा होती थी। आज उसी सवाल का समाधान आयुष्मान भारत में नजर आता है। 2013 में किसी गरीब की रसोई की बात होती थी, तो धुएं की तस्वीर सामने आती थी। आज उसी समस्या का समाधान उज्ज्वला योजना में दिखता है। 2013 में महिलाओं से बैंक खाते के बारे में पूछा जाता था, तो वो चुप्पी साध लेती थीं। आज जनधन योजना के कारण, 30 करोड़ से ज्यादा बहनों का अपना बैंक अकाउंट है। 2013 में पीने के पानी के लिए कुएं और तालाबों तक जाने की मजबूरी थी। आज उसी मजबूरी का हल हर घर नल से जल योजना में मिल रहा है। यानि सिर्फ दशक नहीं बदला, बल्कि लोगों की ज़िंदगी बदली है। और दुनिया भी इस बात को नोट कर रही है, भारत के डेवलपमेंट मॉडल को स्वीकार रही है। आज भारत सिर्फ Nation of Dreams नहीं, बल्कि Nation That Delivers भी है।

साथियों,

जब कोई देश, अपने नागरिकों की सुविधा और समय को महत्व देता है, तब उस देश का समय भी बदलता है। यही आज हम भारत में अनुभव कर रहे हैं। मैं आपको एक उदाहरण देता हूं। पहले पासपोर्ट बनवाना कितना बड़ा काम था, ये आप जानते हैं। लंबी वेटिंग, बहुत सारे कॉम्प्लेक्स डॉक्यूमेंटेशन का प्रोसेस, अक्सर राज्यों की राजधानी में ही पासपोर्ट केंद्र होते थे, छोटे शहरों के लोगों को पासपोर्ट बनवाना होता था, तो वो एक-दो दिन कहीं ठहरने का इंतजाम करके चलते थे, अब वो हालात पूरी तरह बदल गया है, एक आंकड़े पर आप ध्यान दीजिए, पहले देश में सिर्फ 77 पासपोर्ट सेवा केंद्र थे, आज इनकी संख्या 550 से ज्यादा हो गई है। पहले पासपोर्ट बनवाने में, और मैं 2013 के पहले की बात कर रहा हूं, मैं पिछले शताब्दी की बात नहीं कर रहा हूं, पासपोर्ट बनवाने में जो वेटिंग टाइम 50 दिन तक होता था, वो अब 5-6 दिन तक सिमट गया है।

साथियों,

ऐसा ही ट्रांसफॉर्मेशन हमने बैंकिंग इंफ्रास्ट्रक्चर में भी देखा है। हमारे देश में 50-60 साल पहले बैंकों का नेशनलाइजेशन किया गया, ये कहकर कि इससे लोगों को बैंकिंग सुविधा सुलभ होगी। इस दावे की सच्चाई हम जानते हैं। हालत ये थी कि लाखों गांवों में बैंकिंग की कोई सुविधा ही नहीं थी। हमने इस स्थिति को भी बदला है। ऑनलाइन बैंकिंग तो हर घर में पहुंचाई है, आज देश के हर 5 किलोमीटर के दायरे में कोई न कोई बैंकिंग टच प्वाइंट जरूर है। और हमने सिर्फ बैंकिंग इंफ्रास्ट्रक्चर का ही दायरा नहीं बढ़ाया, बल्कि बैंकिंग सिस्टम को भी मजबूत किया। आज बैंकों का NPA बहुत कम हो गया है। आज बैंकों का प्रॉफिट, एक लाख 40 हज़ार करोड़ रुपए के नए रिकॉर्ड को पार कर चुका है। और इतना ही नहीं, जिन लोगों ने जनता को लूटा है, उनको भी अब लूटा हुआ धन लौटाना पड़ रहा है। जिस ED को दिन-रात गालियां दी जा रही है, ED ने 22 हज़ार करोड़ रुपए से अधिक वसूले हैं। ये पैसा, कानूनी तरीके से उन पीड़ितों तक वापिस पहुंचाया जा रहा है, जिनसे ये पैसा लूटा गया था।

साथियों,

Efficiency से गवर्नमेंट Effective होती है। कम समय में ज्यादा काम हो, कम रिसोर्सेज़ में अधिक काम हो, फिजूलखर्ची ना हो, रेड टेप के बजाय रेड कार्पेट पर बल हो, जब कोई सरकार ये करती है, तो समझिए कि वो देश के संसाधनों को रिस्पेक्ट दे रही है। और पिछले 11 साल से ये हमारी सरकार की बड़ी प्राथमिकता रहा है। मैं कुछ उदाहरणों के साथ अपनी बात बताऊंगा।

|

साथियों,

अतीत में हमने देखा है कि सरकारें कैसे ज्यादा से ज्यादा लोगों को मिनिस्ट्रीज में accommodate करने की कोशिश करती थीं। लेकिन हमारी सरकार ने अपने पहले कार्यकाल में ही कई मंत्रालयों का विलय कर दिया। आप सोचिए, Urban Development अलग मंत्रालय था और Housing and Urban Poverty Alleviation अलग मंत्रालय था, हमने दोनों को मर्ज करके Housing and Urban Affairs मंत्रालय बना दिया। इसी तरह, मिनिस्ट्री ऑफ ओवरसीज़ अफेयर्स अलग था, विदेश मंत्रालय अलग था, हमने इन दोनों को भी एक साथ जोड़ दिया, पहले जल संसाधन, नदी विकास मंत्रालय अलग था, और पेयजल मंत्रालय अलग था, हमने इन्हें भी जोड़कर जलशक्ति मंत्रालय बना दिया। हमने राजनीतिक मजबूरी के बजाय, देश की priorities और देश के resources को आगे रखा।

साथियों,

हमारी सरकार ने रूल्स और रेगुलेशन्स को भी कम किया, उन्हें आसान बनाया। करीब 1500 ऐसे कानून थे, जो समय के साथ अपना महत्व खो चुके थे। उनको हमारी सरकार ने खत्म किया। करीब 40 हज़ार, compliances को हटाया गया। ऐसे कदमों से दो फायदे हुए, एक तो जनता को harassment से मुक्ति मिली, और दूसरा, सरकारी मशीनरी की एनर्जी भी बची। एक और Example GST का है। 30 से ज्यादा टैक्सेज़ को मिलाकर एक टैक्स बना दिया गया है। इसको process के, documentation के हिसाब से देखें तो कितनी बड़ी बचत हुई है।

साथियों,

सरकारी खरीद में पहले कितनी फिजूलखर्ची होती थी, कितना करप्शन होता था, ये मीडिया के आप लोग आए दिन रिपोर्ट करते थे। हमने, GeM यानि गवर्नमेंट ई-मार्केटप्लेस प्लेटफॉर्म बनाया। अब सरकारी डिपार्टमेंट, इस प्लेटफॉर्म पर अपनी जरूरतें बताते हैं, इसी पर वेंडर बोली लगाते हैं और फिर ऑर्डर दिया जाता है। इसके कारण, भ्रष्टाचार की गुंजाइश कम हुई है, और सरकार को एक लाख करोड़ रुपए से अधिक की बचत भी हुई है। डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर- DBT की जो व्यवस्था भारत ने बनाई है, उसकी तो दुनिया में चर्चा है। DBT की वजह से टैक्स पेयर्स के 3 लाख करोड़ रुपए से ज्यादा, गलत हाथों में जाने से बचे हैं। 10 करोड़ से ज्यादा फर्ज़ी लाभार्थी, जिनका जन्म भी नहीं हुआ था, जो सरकारी योजनाओं का फायदा ले रहे थे, ऐसे फर्जी नामों को भी हमने कागजों से हटाया है।

साथियों,

 

हमारी सरकार टैक्स की पाई-पाई का ईमानदारी से उपयोग करती है, और टैक्सपेयर का भी सम्मान करती है, सरकार ने टैक्स सिस्टम को टैक्सपेयर फ्रेंडली बनाया है। आज ITR फाइलिंग का प्रोसेस पहले से कहीं ज्यादा सरल और तेज़ है। पहले सीए की मदद के बिना, ITR फाइल करना मुश्किल होता था। आज आप कुछ ही समय के भीतर खुद ही ऑनलाइन ITR फाइल कर पा रहे हैं। और रिटर्न फाइल करने के कुछ ही दिनों में रिफंड आपके अकाउंट में भी आ जाता है। फेसलेस असेसमेंट स्कीम भी टैक्सपेयर्स को परेशानियों से बचा रही है। गवर्नेंस में efficiency से जुड़े ऐसे अनेक रिफॉर्म्स ने दुनिया को एक नया गवर्नेंस मॉडल दिया है।

साथियों,

पिछले 10-11 साल में भारत हर सेक्टर में बदला है, हर क्षेत्र में आगे बढ़ा है। और एक बड़ा बदलाव सोच का आया है। आज़ादी के बाद के अनेक दशकों तक, भारत में ऐसी सोच को बढ़ावा दिया गया, जिसमें सिर्फ विदेशी को ही बेहतर माना गया। दुकान में भी कुछ खरीदने जाओ, तो दुकानदार के पहले बोल यही होते थे – भाई साहब लीजिए ना, ये तो इंपोर्टेड है ! आज स्थिति बदल गई है। आज लोग सामने से पूछते हैं- भाई, मेड इन इंडिया है या नहीं है?

साथियों,

आज हम भारत की मैन्युफैक्चरिंग एक्सीलेंस का एक नया रूप देख रहे हैं। अभी 3-4 दिन पहले ही एक न्यूज आई है कि भारत ने अपनी पहली MRI मशीन बना ली है। अब सोचिए, इतने दशकों तक हमारे यहां स्वदेशी MRI मशीन ही नहीं थी। अब मेड इन इंडिया MRI मशीन होगी तो जांच की कीमत भी बहुत कम हो जाएगी।

|

साथियों,

आत्मनिर्भर भारत और मेक इन इंडिया अभियान ने, देश के मैन्युफैक्चरिंग सेक्टर को एक नई ऊर्जा दी है। पहले दुनिया भारत को ग्लोबल मार्केट कहती थी, आज वही दुनिया, भारत को एक बड़े Manufacturing Hub के रूप में देख रही है। ये सक्सेस कितनी बड़ी है, इसके उदाहरण आपको हर सेक्टर में मिलेंगे। जैसे हमारी मोबाइल फोन इंडस्ट्री है। 2014-15 में हमारा एक्सपोर्ट, वन बिलियन डॉलर तक भी नहीं था। लेकिन एक दशक में, हम ट्वेंटी बिलियन डॉलर के फिगर से भी आगे निकल चुके हैं। आज भारत ग्लोबल टेलिकॉम और नेटवर्किंग इंडस्ट्री का एक पावर सेंटर बनता जा रहा है। Automotive Sector की Success से भी आप अच्छी तरह परिचित हैं। इससे जुड़े Components के एक्सपोर्ट में भी भारत एक नई पहचान बना रहा है। पहले हम बहुत बड़ी मात्रा में मोटर-साइकल पार्ट्स इंपोर्ट करते थे। लेकिन आज भारत में बने पार्ट्स UAE और जर्मनी जैसे अनेक देशों तक पहुंच रहे हैं। सोलर एनर्जी सेक्टर ने भी सफलता के नए आयाम गढ़े हैं। हमारे सोलर सेल्स, सोलर मॉड्यूल का इंपोर्ट कम हो रहा है और एक्सपोर्ट्स 23 गुना तक बढ़ गए हैं। बीते एक दशक में हमारा डिफेंस एक्सपोर्ट भी 21 गुना बढ़ा है। ये सारी अचीवमेंट्स, देश की मैन्युफैक्चरिंग इकोनॉमी की ताकत को दिखाती है। ये दिखाती है कि भारत में कैसे हर सेक्टर में नई जॉब्स भी क्रिएट हो रही हैं।

साथियों,

TV9 की इस समिट में, विस्तार से चर्चा होगी, अनेक विषयों पर मंथन होगा। आज हम जो भी सोचेंगे, जिस भी विजन पर आगे बढ़ेंगे, वो हमारे आने वाले कल को, देश के भविष्य को डिजाइन करेगा। पिछली शताब्दी के इसी दशक में, भारत ने एक नई ऊर्जा के साथ आजादी के लिए नई यात्रा शुरू की थी। और हमने 1947 में आजादी हासिल करके भी दिखाई। अब इस दशक में हम विकसित भारत के लक्ष्य के लिए चल रहे हैं। और हमें 2047 तक विकसित भारत का सपना जरूर पूरा करना है। और जैसा मैंने लाल किले से कहा है, इसमें सबका प्रयास आवश्यक है। इस समिट का आयोजन कर, TV9 ने भी अपनी तरफ से एक positive initiative लिया है। एक बार फिर आप सभी को इस समिट की सफलता के लिए मेरी ढेर सारी शुभकामनाएं हैं।

मैं TV9 को विशेष रूप से बधाई दूंगा, क्योंकि पहले भी मीडिया हाउस समिट करते रहे हैं, लेकिन ज्यादातर एक छोटे से फाइव स्टार होटल के कमरे में, वो समिट होती थी और बोलने वाले भी वही, सुनने वाले भी वही, कमरा भी वही। TV9 ने इस परंपरा को तोड़ा और ये जो मॉडल प्लेस किया है, 2 साल के भीतर-भीतर देख लेना, सभी मीडिया हाउस को यही करना पड़ेगा। यानी TV9 Thinks Today वो बाकियों के लिए रास्ता खोल देगा। मैं इस प्रयास के लिए बहुत-बहुत अभिनंदन करता हूं, आपकी पूरी टीम को, और सबसे बड़ी खुशी की बात है कि आपने इस इवेंट को एक मीडिया हाउस की भलाई के लिए नहीं, देश की भलाई के लिए आपने उसकी रचना की। 50,000 से ज्यादा नौजवानों के साथ एक मिशन मोड में बातचीत करना, उनको जोड़ना, उनको मिशन के साथ जोड़ना और उसमें से जो बच्चे सिलेक्ट होकर के आए, उनकी आगे की ट्रेनिंग की चिंता करना, ये अपने आप में बहुत अद्भुत काम है। मैं आपको बहुत बधाई देता हूं। जिन नौजवानों से मुझे यहां फोटो निकलवाने का मौका मिला है, मुझे भी खुशी हुई कि देश के होनहार लोगों के साथ, मैं अपनी फोटो निकलवा पाया। मैं इसे अपना सौभाग्य मानता हूं दोस्तों कि आपके साथ मेरी फोटो आज निकली है। और मुझे पक्का विश्वास है कि सारी युवा पीढ़ी, जो मुझे दिख रही है, 2047 में जब देश विकसित भारत बनेगा, सबसे ज्यादा बेनिफिशियरी आप लोग हैं, क्योंकि आप उम्र के उस पड़ाव पर होंगे, जब भारत विकसित होगा, आपके लिए मौज ही मौज है। आपको बहुत-बहुत शुभकामनाएं।

धन्यवाद।