Quote"भूकंपाच्या वेळी भारताने दिलेल्या तत्पर प्रतिसादाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. हे आपल्या बचाव आणि मदत पथकांच्या सज्जतेचे प्रतिबिंब आहे”
Quote"भारताने आपल्या आत्मनिर्भरतेबरोबरच नि:स्वार्थीपणाही जपला आहे"
Quote"जगात कुठेही आपत्ती आली की, भारत प्रथम प्रतिसाद देण्यासाठी सज्ज असतो"
Quote“तिरंगा घेऊन आपण जिथे पोहोचतो, तेव्हा भारतीय पथके आल्यामुळे परिस्थिती सुधारायला सुरुवात होईल अशी खात्री पटते''
Quote“एनडीआरएफने देशातील लोकांमध्ये चांगली प्रतिष्ठा निर्माण केली आहे.देशातील जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे.''
Quote“आपल्याला जगातील सर्वोत्तम मदत आणि बचाव पथक म्हणून आपली ओळख बळकट करायची आहे. आपली सज्जता जितकी चांगली असेल तितकी आपल्याला जगाची सेवा करता येईल''

भूकंपग्रस्त तुर्किए  आणि सीरियामधील  ‘ऑपरेशन दोस्त’मध्ये सहभागी असलेल्या एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

पंतप्रधानांनी जवानांना संबोधित करताना  भूकंपग्रस्त तुर्किए  आणि सीरियामध्ये ‘ऑपरेशन दोस्त’ मध्ये केलेल्या महान कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले. पंतप्रधानांनी यावेळी वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना विशद केली. आपल्यासाठी संपूर्ण जग एक कुटुंब असल्याची भावना  तुर्किए  आणि सीरियामध्ये भारतीय पथकांनी प्रतिबिंबित केली , असे पंतप्रधान म्हणाले.

नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद देण्याच्या वेळेचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी ‘गोल्डन अवर’ चा उल्लेख केला आणि  तुर्किएतील एनडीआरएफ पथकाच्या  त्वरित  प्रतिसादाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले, असे त्यांनी सांगितले.  शीघ्र  प्रतिसाद हा बचाव आणि मदत पथकाची सज्जता  आणि प्रशिक्षण कौशल्ये  अधोरेखित करतो, असे ते म्हणाले.

Quote

या पथकातील  जवानांना  त्यांच्या प्रयत्नांसाठी भूकंपग्रस्त  माता आशीर्वाद देतानाची   छायाचित्र पाहिल्याची आठवण करून देत, प्रभावित भागात करण्यात आलेल्या बचाव आणि मदत कार्याचे प्रत्येक छायाचित्र  पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाला वाटणारा अभिमान पंतप्रधानांनी नमूद केला. पंतप्रधानांनी बचाव पथकांनी दाखवलेली अतुलनीय व्यावसायिकता आणि मानवी संवेदना अधोरेखित केली आणि  जेव्हा एखादी व्यक्ती आघात सहन करत असते आणि सर्व काही गमावते तेव्हा या गोष्टी  महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात असे  त्यांनी सांगितले.   या बचाव  पथकांनी  ज्याप्रकारे करुणेने  कार्य केले त्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

गुजरातमधील 2001 च्या भूकंपाची  आठवण करून देत  आणि त्यावेळी  तेथे  स्वयंसेवक म्हणून काम करत असतानाचा काळ आठवत ,ढिगारा हटवणे आणि त्याखालील माणसे शोधण्याच्या  कामातील अडचणी आणि भुजमध्ये रुग्णालयच कोसळल्याने संपूर्ण वैद्यकीय यंत्रणेला कशाप्रकारे  फटका बसला हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.पंतप्रधानांनी 1979 मधील मच्छू धरण दुर्घटनेची आठवणही सांगितली. “या आपत्तींमधील माझ्या अनुभवांना स्मरून   मी तुमच्या मेहनतीची, भावनांची आणि तळमळीची  प्रशंसा करतो  आज मी तुम्हा सर्वांना सलाम करतो.” असे  पंतप्रधान म्हणाले.

|

जे स्वत:ची मदत करण्यास सक्षम आहेत त्यांना स्वावलंबी म्हणतात परंतु ज्यांच्यामध्ये गरजेच्या वेळी इतरांना मदत करण्याची क्षमता आहे त्यांना निःस्वार्थी म्हणतात , असे त्यांनी अधोरेखित केले. हे केवळ व्यक्तींनाच नाही तर राष्ट्रांनाही लागू होते. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत भारताने आपल्या आत्मनिर्भरतेसोबतच  नि:स्वार्थीपणाही जपला  आहे, असे ते म्हणाले. “तिरंगा घेऊन आपण जिथे पोहोचतो, तेव्हा आता भारतीय पथके आल्यामुळे  परिस्थिती सुधारायला सुरुवात होईल अशी खात्री पटते'', असे पंतप्रधानांनी युक्रेनमधील तिरंग्याने बजावलेली  भूमिका अधोरेखित करत सांगितले. स्थानिक लोकांमध्ये तिरंग्याला मिळालेल्या आदराबद्दलही पंतप्रधान यावेळी बोलले.ऑपरेशन गंगा दरम्यान युक्रेनमधील प्रत्येकासाठी तिरंग्याने ढाल म्हणून कशाप्रकारे काम केले.

|

त्याचप्रमाणे, ऑपरेशन देवी शक्तीच्या माध्यमातून  अफगाणिस्तानमधून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत  आपल्या माणसांना कशाप्रकारे सुखरूप स्वदेशी आणण्यात आले याचे देखील पंतप्रधानांनी स्मरण केले.हीच वचनबद्धता कोरोना महामारीच्या काळात दिसून आली जेव्हा भारताने प्रत्येक नागरिकाला घरी परत आणले तसेच  औषधे आणि लसींचा पुरवठा करून जागतिक स्तरावर सद्भावना मिळवली, असे पंतप्रधान म्हणाले.

|

“तुर्किए  आणि सीरियाला भूकंप झाला तेव्हा भारत प्रथम प्रतिसाद देणारा देश होता”, असे सांगत पंतप्रधानांनी  ‘ऑपरेशन दोस्त’ द्वारे मानवतेच्याप्रति  असेलली भारताची बांधिलकी अधोरेखित केली. त्यांनी नेपाळमधील भूकंप, मालदीव आणि श्रीलंकेतील संकटाची उदाहरणे देत  मदतीसाठी भारताने सर्वप्रथम पुढाकार घेतल्याचे   सांगितले. इतर देशांचाही भारतीय लष्करासह एनडीआरएफवर विश्वास वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.एनडीआरएफने गेल्या काही वर्षांत देशातील लोकांमध्ये चांगली प्रतिष्ठा निर्माण केली आहे याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला."देशातील लोकांचा एनडीआरएफवर विश्वास आहे", असे ते  म्हणाले. एनडीआरएफ जेव्हा घटनास्थळी पोहोचते तेव्हा लोकांचा विश्वास आणि आशा पक्की होते हे त्यांनी अधोरेखित केले आणि हे एक मोठे यश असल्याचे त्यांनी नमूद केले. जेव्हा कौशल्याच्या माध्यमातून  एखाद्या सामर्थ्यामध्ये  संवेदनशीलता जोडली जाते तेव्हा त्या सामर्थ्याची  ताकद अनेक पटींनी वाढते, असे पंतप्रधान म्हणाले.

“आपल्याला जगातील सर्वोत्तम मदत आणि बचाव पथक म्हणून आपली ओळख बळकट  करायची आहे, असे पंतप्रधानांनी आपत्तीच्या वेळी मदत आणि बचावासाठी भारताची क्षमता बळकट करण्याच्या गरजेवर भर देताना  सांगितले.  आपली स्वतःची सज्जता  जितकी उत्तम असेल तितकी आपल्याला जगाची सेवा करता येईल''. भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी एनडीआरएफ पथकाच्या प्रयत्नांचे आणि अनुभवांचे कौतुक केले आणि म्हणाले की, एनडीआरएफचे जवान  भूकंपग्रस्त भागात बचाव कार्य करत असले तरी गेल्या 10 दिवसांपासून ते  त्यांच्याशी मनाने आणि हृदयाने नेहमीच जोडलेले होते. 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

  • Mahendra singh Solanki Loksabha Sansad Dewas Shajapur mp November 30, 2023

    नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो
  • Aishwariya Rawat March 05, 2023

    jai hind
  • CHANDRA KUMAR February 25, 2023

    बीजेपी और लोकसभा चुनाव 2024 वर्ष 2023 में 7 राज्यों में विधानसभा चुनाव होनेवाला है। बीजेपी को चुनाव में जीत सुनिश्चित करने के लिए कुछ विशेष कार्य करना चाहिए : 1. सबसे पहले शोर मचाइए, बीजेपी भारतीय नौजवानों को रोजगार देने के लिए जोर लगा दिया है। अब सभी युवाओं को रोजगार मिलेगा। 2. यूपीएससी और एसएससी में हाल ही में सरकारी पदों पर नियुक्ति हेतु परीक्षा के लिए ऑनलाइन एप्लीकेशन जमा लिया गया। आपको क्या लगता है, देश के सभी नागरिक को यह बात मालूम हुआ, की बीजेपी सरकार में भी नियुक्ति परीक्षा जारी है। थोड़ा सा विवाद पैदा कीजिए, यूपीएससी परीक्षा में आवेदन की तिथि बढ़ा दीजिए और 50 पद बढ़ा दीजिए। अंग्रेजी भाषा, सिर्फ इस वर्ष के लिए पूरी तरह से हटा दीजिए। फिर देखिए, पूरे देश को मालूम हो जायेगा की बीजेपी रोजगार दे रही है। एसएससी की नियुक्ति हेतु आवेदन की तिथि बढ़ा दीजिए, उम्र सीमा में छूट बढ़ा दीजिए, सामान्य जाति के युवाओं के लिए भी। इससे सामान्य जाति का युवा बीजेपी को वोट देगा। बाकी जाति के युवा को इससे नाराजगी भी नहीं होगी। 2. सभी विपक्षी दलों का कहना है, बीजेपी सरकारी कंपनी का निजीकरण करके पैसा कमा रही है। बीजेपी पूरा देश बेच देगा। अब बीजेपी को इस निजीकरण, देश बेचो कैंपेन को बंद करने के लिए, 100 सरकारी कंपनी बनाने का घोषणा कर देना चाहिए। 3. नई 100 सरकारी कंपनी का शिलान्यास, उन जिलों में करना चाहिए, जहां थोड़ा सा प्रयास करने मात्र से ही विधानसभा और लोकसभा सीट पर जीत मिल जाए। और आसपास के जिले के युवा को रोजगार मिलेगा तो आसपास के जिले में भी बीजेपी का मत प्रतिशत बढ़ेगा। 4. नई सरकारी कंपनी में नियुक्ति का कार्य सेंट्रल स्टाफ सिलेक्शन कमीशन को दे दिया जाए। 5. इस नई सरकारी कंपनी को अलग अलग क्षेत्र जैसे कृषि, बागवानी आदि में पोस्ट प्रोडक्शन क्वालिटी एन्हांसमेंट पर कार्य करके, सबसे अच्छा कृषि उत्पाद विकसित देशों के बाजारों तक पहुंचाने का कार्य करे। 6. इस नई सौ सरकारी कंपनी में निर्यात को बढ़ावा देने वाला उद्योग से जोड़ा जाए और नए उद्योग स्थापित किया जाए। 7. बीजेपी को चाहिए की नई सरकारी कंपनी बनाकर, रोजगार और बाजार को गतिशीलता प्रदान करके, भारतीय अर्थव्यवस्था को गति प्रदान करे। अंग्रेज केवल टैक्स लेकर भारतीय अर्थव्यवस्था को जोंक की तरह चूस लिया। अब केवल टैक्स नहीं लिया जाए। बल्कि भारत सरकार को अर्थव्यवस्था में सक्रियता पूर्वक भागीदारी निभाया जाए और चीन की तरह निर्यात केंद्रित उत्पाद बनाकर मुद्रा भंडार बढ़ाया जाए। 8. सीधे सब्सिडी देने में पैसा खर्च करने से अर्थव्यवस्था में डाला गया पैसा, विदेशी माल खरीदने में चला जाता है। इससे भारतीय अर्थव्यवस्था को ज्यादा लाभ नहीं होता है। अतः अब सभी प्रकार की सेवा, शुल्क सहित कर दिया जाए, लोकसभा चुनाव 2024 में जीत मिलने के बाद। 9. अभी तो बीजेपी को 100 नई सरकारी कंपनी खोलकर अधिक से अधिक संख्या में कम ग्रेड पे जैसे 1,2,3 पर नियुक्ति किया जाए। किस पद पर रोजगार दिए, यह मायने नहीं रखता है, कितना रोजगार दिए यह मायने रखता है। इसीलिए तो नीतीश कुमार ने बिहार में कम वेतन पर ज्यादा शिक्षक को नियुक्त कर रखा है, और लगातार चुनाव जीत रहा है। 10. माहौल बदलिए , चुनाव जीतिए।
  • THENNARASU February 24, 2023

    JAI HIND BJP4INDIA
  • SRS SwayamSewak RSS February 24, 2023

    शुक्रवार 17/02/2023 को वुमैन सेल फेस आठ मोहाली से बुड्ढे को फोन आया कि सोनिका और गिन्नी ने आपके खिलाफ शिकायत की है। वैसे तो शिकायत पुरानी है लेकिन हमारे पास अभी आयी है। क्या आपका मामला सुलट गया है? बुड्ढे ने उन्हें बताया कि मामला नहीं सुलटा बल्कि और उलझ गया है। बुड्ढे ने उनको बोला कि मैं आपसे सोमवार 20/02/2023 को मिलकर विस्तार से बताउँगा। बूढा सोमवार को वुमैन सेल फेस आठ मोहाली गया। वहाँ शिकायतकर्ता सोनिका भी आयी हुई थी। वुमैन सेल में दोनों ने अपनी अपनी व्यथा बताई। बुड्ढे (उम्र 67 साल) ने वुमैन सेल को बताया कि उसने अपने उस मकान के लिए (जो उसने अपनी सेवानिवृत्ति के उपरांत मिले पैसों से खरीदा) कोर्ट में टाइटल सूट फाइल किया हुआ है जिस पर सोनिका कब्जा करके बैठी हैं। और सोनिका (उम्र इकसठ साल) ने बताया कि उसने कोर्ट में डीवी एक्ट में केस फाइल किया हुआ हैं। बुड्ढे ने उन्हें बताया कि उसके केस की डेट एक मार्च है। सोनिका ने बताया कि उसका केस बाईस फरवरी को लगा है। दोनों ने अपनी उपस्थिति दर्ज करवायी और वापस आ गये। 🌚 गौरतलब यह है कि इन दोनों के बच्चे उच्च शिक्षित हैं। बेटा एम ए एल एल बी पंजाब हरियाणा हाईकोर्ट में अधिवक्ता है और बेटी दिल्ली के जे एन यू से पी एच डी है। दोनों बच्चों ने मिलकर अपने माँ बाप की वृद्धावस्था नारकीय कर दी है। 🌚 मैनें कहा कि तेरे को कुछ मैं भी बता दूँ।
  • Tribhuwan Kumar Tiwari February 23, 2023

    वंदेमातरम
  • Umakant Mishra February 22, 2023

    Jay Shri ram
  • Amit Singh Rajput February 22, 2023

    क्या क्या मांगू मां शारदा से आपके लिए आ दत है सब कुछ है आपके पास जब तक जब तक राज करो
  • DINESH RAM GAONKAR February 22, 2023

    Mera Bharat Mahan🪷🪷
  • rajib phukon February 22, 2023

    jay shree ram
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India's first microbiological nanosat, developed by students, to find ways to keep astronauts healthy

Media Coverage

India's first microbiological nanosat, developed by students, to find ways to keep astronauts healthy
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 फेब्रुवारी 2025
February 20, 2025

Citizens Appreciate PM Modi's Effort to Foster Innovation and Economic Opportunity Nationwide