पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतरत्न महामना पंडित मदन मोहन मालवीय यांचे पणतू गिरीधर मालवीय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. गंगा स्वच्छता मोहिमेत आणि शिक्षण जगतात गिरीधर मालवीय यांच्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे :

“भारतरत्न महामानव पंडित मदन मोहन मालवीय जी यांचे पणतू गिरीधर मालवीय जी यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण जगतासोबतच संपूर्ण देशाची अपरिमित हानी झाली आहे. गंगा स्वच्छता अभियानातील त्यांचे योगदान चिरकाल स्मरणात राहील. न्यायिक सेवेमध्ये देखील त्यांनी आपल्या कामगिरीतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांची व्यक्तिगत भेट घेण्याचे सौभाग्य मला अनेकदा लाभले होते. 2014 आणि 2019 मध्ये माझ्या वाराणसी मतदार संघाचे ते प्रस्तावक होते. ही बाब माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. अशा कठीण प्रसंगी ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य प्रदान करो! ओम शांती!”

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
In Mann Ki Baat, PM Stresses On Obesity, Urges People To Cut Oil Consumption

Media Coverage

In Mann Ki Baat, PM Stresses On Obesity, Urges People To Cut Oil Consumption
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 फेब्रुवारी 2025
February 24, 2025

6 Years of PM Kisan Empowering Annadatas for Success

Citizens Appreciate PM Modi’s Effort to Ensure Viksit Bharat Driven by Technology, Innovation and Research