Quoteनॉर्थ ईस्टर्न कौन्सिलच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून बैठकीचे आयोजन
Quote‘ईशान्येचा विचार करा (लुक ईस्ट)’ या धोरणाचे ‘ईशान्येसाठी काम करा (ऍक्ट ईस्ट)’ यामध्ये सरकार पुढे गेले आहे आणि आता सरकारचे धोरण आहे ‘ईशान्येसाठी वेगाने कृती करा, आणि ‘ईशान्येसाठी सर्वप्रथम कृती करा’
Quoteईशान्येच्या विकासासाठी पंतप्रधानांची 8 आधारस्तंभांवर चर्चा
Quoteया भागाचे स्वरुप, संस्कृती आणि क्षमता यांचे दर्शन घडवण्यासाठी जी-20 बैठका ही अतिशय सुयोग्य संधी- पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी शिलॉंग येथे नॉर्थ ईस्टर्न कौन्सिलच्या बैठकीत मार्गदर्शन केले. 1972 मध्ये औपचारिकपणे उद्घाटन झालेल्या नॉर्थ ईस्टर्न कौन्सिलच्या(एनईसी) सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ईशान्य प्रदेशाच्या विकासामध्ये एनईसीने दिलेल्या योगदानाची प्रशंसा करत पंतप्रधान म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाशी या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा संयोग झाला आहे. या भागातील 8 राज्यांचा अष्टलक्ष्मी असा नेहमीच उल्लेख करत असल्याची बाब अधोरेखित करून ते म्हणाले की, या भागाच्या विकासासाठी सरकारने 8 आधारस्तंभांवर म्हणजे मुख्यत्वे शांतता, उर्जा, पर्यटन, 5जी कनेक्टिव्हिटी, संस्कृती, नैसर्गिक शेती, क्रीडा, क्षमता यावर काम केले पाहिजे.

आपला ईशान्य प्रदेश आग्नेय आशियाचे प्रवेशद्वार आहे आणि या संपूर्ण भागाच्या विकासाचे ते केंद्र बनू शकते, असे पंतप्रधानांनी सांगितले. या भागाच्या या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी भारत-म्यानमार-थायलंड त्रिराष्ट्रीय महामार्ग आणि आगरतळा-अखौरा रेल्वे प्रकल्प यांसारख्या प्रकल्पांवर काम सुरू आहे, असे ते म्हणाले.

‘ईशान्येचा विचार करा(लुक ईस्ट)’ या धोरणाचे ‘ईशान्येसाठी काम करा (ऍक्ट ईस्ट)’ यामध्ये सरकार पुढे गेले आहे आणि आता ‘ईशान्येसाठी वेगाने कृती करा, आणि ‘ईशान्येसाठी सर्वप्रथम कृती करा’ हे सरकारचे धोरण आहे, ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे यश अधोरेखित करताना ते म्हणाले की यासाठी अनेक शांतता करार करण्यात आले आहेत, आंतरराज्य सीमा करार करण्यात आले आहेत आणि कट्टरवादाच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

‘नेट झिरो’ कार्बन उत्सर्जनासंदर्भात भारताच्या भूमिकेबाबत बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, ईशान्य प्रदेश जलविद्युत निर्मितीचे उर्जाकेंद्र बनू शकतो. यामुळे या भागातील राज्ये अतिरिक्त उर्जेचे उत्पादक बनतील आणि उद्योगांचा विस्तार करण्यात आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यात योगदान देतील.  या भागातील पर्यटनक्षमतेबाबत बोलताना ते म्हणाले की, या भागातील संस्कृती आणि निसर्ग या दोन्हीकडे जगभरातील पर्यटक आकर्षित होत आहेत. या भागातील पर्यटन परिमंडळे बनण्याची क्षमता असलेली ठिकाणे विचारात घेतली जात आहेत आणि त्यांचा विकास देखील करण्यात येत आहे. 100 विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना ईशान्येकडील भागांमध्ये पाठवण्याची कल्पना त्यांनी बोलून दाखवली. ज्यामुळे वेगवेगळ्या भागातील लोक आणखी जवळ येतील. हे विद्यार्थी या भागांचे सदिच्छा दूत बनतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

या भागातील कनेक्टिविटीमध्ये वाढ करण्याबाबत बोलताना ते म्हणाले की, अनेक दशकांपासून प्रलंबित राहिलेले अतिशय महत्त्वाचे पुलांचे प्रकल्प आता पूर्ण झाले आहेत. गेल्या 8 वर्षात या भागातील विमानतळांची संख्या 9 वरून 16 वर पोहोचली आहे आणि उड्डाणांची संख्या 2014 मधील 900 वरून 1900 वर पोहोचली आहे. पहिल्यांदाच ईशान्येकडील राज्ये आता रेल्वेच्या नकाशावर आली आहेत आणि आता जलमार्गांचा देखील विस्तार केला जात आहे. 2014 पासून राष्ट्रीय महामार्गांच्या लांबीत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पीएम डीव्हाईन योजना सुरू केल्यानंतर ईशान्येकडील पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना मिळाली आहे. ऑप्टिकल फायबर जाळ्याचा विस्तार करून ईशान्येकडील भागांमध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा करण्यासाठी देखील सरकार प्रयत्न करत आहे. आत्मनिर्भर 5जी पायाभूत सुविधांबाबत बोलताना ते म्हणाले की स्टार्टअप पूरक व्यवस्थांच्या विकासाला 5जीमुळे आणखी चालना मिळेल. ईशान्येकडील भागांना केवळ आर्थिक विकासाचेच नव्हे तर सांस्कृतिक वृद्धीचे केंद्र बनवण्यासाठी देखील सरकार वचनबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रदेशाच्या शेतीविषयक क्षमतेबाबत बोलताना पंतप्रधानांनी नैसर्गिक शेतीसाठी असलेला वाव अधोरेखित केला. कृषी उडान योजनेच्या माध्यमातून या भागातील शेतकरी देशाच्या आणि जगाच्या देखील विविध भागात आपली उत्पादने पाठवू शकत आहेत. सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय खाद्यतेल मोहीम – ऑईल पाम मध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी ईशान्येकडील राज्यांना केले. क्रीडा क्षेत्रामध्ये या प्रदेशाच्या योगदानाविषयी बोलताना ते म्हणाले की, या भागातील क्रीडापटूंना पाठबळ पुरवण्यासाठी सरकार ईशान्येकडील पहिल्या क्रीडा विद्यापीठाच्या विकासाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर या भागातील 8 राज्यात 200 पेक्षा जास्त खेलो इंडिया केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे आणि टॉप्स योजनेंतर्गत अनेक खेळाडूंना लाभ मिळत आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधानांनी यावेळी भारताच्या जी20 अध्यक्षपदाबाबतही चर्चा केली आणि या बैठकांसाठी जगाच्या विविध भागातून लोक ईशान्येकडच्या राज्यांमध्ये येतील, असे सांगितले. या भागाचा निसर्ग, संस्कृती आणि या भागाची क्षमता यांचे दर्शन घडवण्याची ही अतिशय सुयोग्य संधी आहे, असे त्यांनी सांगितले.

 

  • Reena chaurasia August 31, 2024

    बीजेपी
  • Narayan Singh Chandana January 15, 2023

    जय हो
  • Anil Kumar January 12, 2023

    नटराज 🖊🖋पेंसिल कंपनी दे रही है मौका घर बैठे काम करें 1 मंथ सैलरी होगा आपका ✔25000 एडवांस 5000✔मिलेगा पेंसिल पैकिंग करना होगा खुला मटेरियल आएगा घर पर माल डिलीवरी पार्सल होगा अनपढ़ लोग भी कर सकते हैं पढ़े लिखे लोग भी कर सकते हैं लेडीस 😍भी कर सकती हैं जेंट्स भी कर सकते हैं Call me 📲📲8768474505✔ ☎व्हाट्सएप नंबर☎☎ 8768474505🔚🔚. आज कोई काम शुरू करो 24 मां 🚚🚚डिलीवरी कर दिया जाता है एड्रेस पर✔✔✔
  • CHANDRA KUMAR December 24, 2022

    मोहनपुर+2 विद्यालय देवघर, झारखंड में, जेसीईआरटी उपनिदेशक प्रदीप चौबे ने निरीक्षण किया। इस दौरान, 1. 2019 से निर्माणाधीन विद्यालय का निर्माण कार्य पूर्ण नहीं हुआ था और 2. विद्यालय के मुख्य गेट पर विद्यालय का नाम लिखा हुआ नहीं था। 3. विकाश कोष रोकड पंजी अद्यतन नहीं था। अब आप सोचेंगे की 2019 से निर्माणाधीन विद्यालय का निर्माण अधूरा क्यों है, क्योंकि उस विद्यालय का निर्माण खराब सीमेंट से किया गया है, विद्यालय का भवन कभी भी गिर सकता है। ऐसे में प्रश्न उठता है की प्रभारी प्रधानाध्यापक महोदय 5000 बच्चे को कहां बैठाते हैं। तो बात यह है की विद्यालय में इंटर के छात्र पढ़ने नहीं आते हैं, केवल रजिस्ट्रेशन कराने और फॉर्म भरने आते हैं। विद्यालय में एक लाख रुपए मासिक वेतन लेने वाले शिक्षक केवल गप्प करके समय बिता देते हैं। ई विद्या वाहिनी पर बच्चों की उपस्थिति हजार में दिखाया जाता है, लेकिन सचमुच में यदि हजार बच्चे विद्यालय पहुंच जाएं, तब उनके लिए कमरे तथा बेंच कम पड़ जायेंगे। अब प्रश्न उठता है की जब कमरे नहीं है, बेंच नहीं हैं, तब इतने बच्चे का नामांकन क्यों लिया जाता है। दरअसल प्रभारी प्रधानाध्यापक विकास कोष का पैसा लेने , नामांकन के समय, रजिस्ट्रेशन के समय, फॉर्म जमा करते समय, नाम सुधार करवाते समय, प्रायोगिक परीक्षा के समय अतिरिक्त पैसा लेते हैं। जितना अधिक छात्र, उतना अधिक आमदनी। छात्रों रशीद देते हैं और कभी कभी नहीं भी देते हैं, ऐसे में अतिरिक्त पैसे और बढ़ जाते हैं। अब देखिए, निरीक्षण में गड़बड़ी मिला, लेकिन फाइल मैनेज करने के लिए समय दे दिया, नकली रशीद और नकली हिसाब किताब तैयार किया जा रहा है। इस विद्यालय के प्रभारी प्रधानाध्यापक पुरुषोत्तम चौधरी, झारखंड के झारखंड मुक्ति मोर्चा पार्टी को प्रतिवर्ष लाखों रुपए का चंदा देता है,बदले में दुमका में पेट्रोल पंप मिला है, करोड़ों की संपत्ति और कई फॉर व्हीलर गाडियां है, लेकिन इनकम टैक्स चोरी करना आम बात है। जिला शिक्षा पदाधिकारी कार्यालय उसका गुलाम है और राज्य का निरीक्षण टीम भी उस पर कोई कार्रवाई नहीं किया है, जबकि उसे कई अनियमितता मिला है। दरवाजे पर, विद्यालय का मुख्य गेट पर विद्यालय का नाम नहीं लिखने का कारण यह है की कोई भी निरीक्षण टीम को पता न चल सके की विद्यालय कहां है। बाहर से देखने पर, जंगल के बीच में एक बॉउंड्री जैसा दिखेगा। ऐसे कोई निरीक्षण टीम जल्दी विद्यालय नहीं पहुंच पाता है। केंद्रीय जांच दल को जाकर इस विद्यालय का निरीक्षण करना चाहिए, तभी इस विद्यालय को आदर्श विद्यालय का दर्जा देना चाहिए। सुशील कुमार वर्मा इस विद्यालय के वरीय पीजीटी शिक्षक हैं, लेकिन टीजीटी शिक्षक पुरुषोत्तम चौधरी, अवैध तरीके से इस विद्यालय का प्रभारी बना हुआ है और छात्रों के पैसे से अपना जेब भर रहा है। कई बार नोटिफिकेशन जारी होने के बावजूद, अपने रूतबे का इस्तेमाल करके वह प्रभारी बने हुए हैं। देश में, अन्य कई ऐसे विद्यालय हैं, यदि बीजेपी सरकार, सरकारी विद्यालय के नेतृत्व और निरीक्षण पर ध्यान दे, तो तस्वीर बदल सकती है। और जनता बीजेपी की प्रशंसक बन सकती है।
  • CHANDRA KUMAR December 23, 2022

    भारत जोड़ो यात्रा, एक हुडदंग से ज्यादा कुछ भी नहीं है। कांग्रेस पार्टी अपनी बची हुई जमा पूंजी दांव पर लगा चुकी है। बीजेपी सेल्फ गोल करने के लिए बैचेन लग रहा है। भाई , उसने भारत जोड़ो यात्रा किया, आप धर्म जोड़ो (हिंदू सिख बौद्ध जैन आदिवासी देवता आदि) यात्रा का आयोजन कीजिए, परिवार जोड़ो यात्रा का आयोजन कीजिए। आप बेवजह एक हारे हुए व्यक्ति को क्यों हराना चाहते हैं, आपको मालूम होना चाहिए की जब आप एक हिंसक व्यक्ति को मारेंगे, तब सब कोई आपके साथ होगा, लेकिन जब आप एक निहत्थे आदमी को मारेंगे, तब कोई आपके साथ नहीं होगा। सबकी सहानुभूति निहत्थे व्यक्ति के साथ होगा। बीजेपी क्या चाहती है की भारतीय जनता राहुल गांधी को अगला महात्मा गांधी मान ले। यदि नहीं, तो राहुल गांधी पर अभी हमला मत कीजिए। राहुल गांधी अभी पदयात्रा कर रहा है। जनता को उससे अभी सहानुभूति है। थोड़ा इंतजार कीजिए, एक वर्ष बाद लोकसभा चुनाव है, तब तक भारतीय जनता भूल जायेगी, की राहुल गांधी ने पदयात्रा भी किया था। लेकिन यदि बीजेपी ने राहुल गांधी को परेशान किया, तो पश्चिम बंगाल विधानसभा चुनाव की तरह, 2024 का लोकसभा चुनाव भी हारेगी। यह अच्छा हुआ कि कांग्रेस पार्टी का पदयात्रा 2023 में खत्म हो जायेगा, अन्यथा यदि यह पदयात्रा 2024 तक जारी रहता तो बीजेपी के खिलाफ भी माहौल बन सकता था। राहुल गांधी भुला हुआ कल है, उन्हें याद करने लायक मत बनाइए। राहुल गांधि का विरोध बंद कीजिए। अन्यथा राहुल गांधी, महात्मा गांधी बन जायेगा, यदि आप गोडसे बनने का कोशिश किए। राहुल गांधी को बस नजरंदाज कीजिए, वह कोई भी बयान दे, उस पर ध्यान मत दीजिए। तब भारतीय मीडिया और भारतीय जनता भी , उस पर ध्यान नहीं देगी। जब राहुल गांधी की पदयात्रा, भारत जोड़ो यात्रा, खत्म हो जाए, तब मालूम कीजिए, की इस तूफान ने बीजेपी के वोट बैंक का कितना नुकसान किया। फिर उस नुकसान के भरपाई का उपाय , उसी अनुसार से खोजिएगा।
  • Mohit Pandey December 23, 2022

    Good Morning Honourable Prime Minister Sir, It was 3-4 years back in one of your speech you've Said 'Kuch Likhte Wikhte hain' and laughed On that Speech then I started writing skills, ideas, and Connected dots from every sector how to make india 6 Trillion Economy till 2022 and unfortunately I throwed that notebook with taped in silver adhesive tape and droped in Guptar Ghat Kanpur dustbin 3 years back and now this time I've prepared 5 Trillion Economy alone means 5 Trillion Total 8-9+ Trillion in my notebook (Memory card') for next 3-4 years (indian economy) but there is no proper mechanism or channel whom I can handover and it goes in right hand either Finance Minister or to your Administrative team in kanpur and trying it from last 6 Months here but can't write too much cause it's risky if any spam caught this So now this time I wanted to burn the 'Magic Memory card' ( Best possible ways to generate economy) or will be dropped wherever you tell by car number or proper mechanism please consider into this matter it's urgent and very important for our economy and growth. Please send anyone to collect this Magic Memory card. Thank you, Modi JI 🙏, 🇮🇳 Jai Hind.
  • Biplab Biswas December 22, 2022

    জয় মোদীজি
  • dharmveer December 22, 2022

    jayshriramji
  • dharmveer December 22, 2022

    jaysgriramji
  • Sujit Kumar December 22, 2022

    shillong mei. bharat ki chhavi badhaya apne
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India's first microbiological nanosat, developed by students, to find ways to keep astronauts healthy

Media Coverage

India's first microbiological nanosat, developed by students, to find ways to keep astronauts healthy
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister Narendra Modi greets the people of Arunachal Pradesh on their Statehood Day
February 20, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi has extended his greetings to the people of Arunachal Pradesh on their Statehood Day. Shri Modi also said that Arunachal Pradesh is known for its rich traditions and deep connection to nature. Shri Modi also wished that Arunachal Pradesh may continue to flourish, and may its journey of progress and harmony continue to soar in the years to come.

The Prime Minister posted on X;

“Greetings to the people of Arunachal Pradesh on their Statehood Day! This state is known for its rich traditions and deep connection to nature. The hardworking and dynamic people of Arunachal Pradesh continue to contribute immensely to India’s growth, while their vibrant tribal heritage and breathtaking biodiversity make the state truly special. May Arunachal Pradesh continue to flourish, and may its journey of progress and harmony continue to soar in the years to come.”