Avoid getting into a mindset that resists change, fill the administrative system with energy of New India: PM to IAS officers
Boldness is required to drive change: PM Modi to IAS officers
Dynamic change is needed to transform the system: PM Modi to IAS officers

सनदी अधिकाऱ्यांनी बदलांचा स्वीकार न करण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडत, प्रशासकीय व्यवस्था नव्या भारताच्या ऊर्जेसह निर्माण करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

नवी दिल्लीत आज सहाय्यक सचिवांच्या उद्‌घाटन सत्रात, 2015 च्या युवा सनदी अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. भारतानंतर स्वातंत्र्य मिळालेल्या आणि भारतापेक्षा कमी स्रोत उपलब्ध असलेल्या देशांनी विकासाची नवी उंची गाठली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. बदल घडवून आणण्यासाठी धाडसी वृत्ती आवश्यक असते, असे सांगत, विघटीत प्रशासकीय व्यवस्थेत अधिकाऱ्यांची एकत्रित क्षमताही पुरेसे यश देण्यात अपयशी ठरते, असे पंतप्रधान म्हणाले. व्यवस्था आमूलाग्र बदलण्यासाठी गतिमान बदल होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सहाय्यक सचिवांचा हा तीन महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम गेल्या तीन वर्षांपासून राबवला जात असून, त्याचा मोठा परिणाम जाणवतो आहे. या प्रशिक्षक काळात, केंद्र सरकारमधल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी युवा अधिकाऱ्यांनी नि:संकोच संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले. ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा प्रशासकीय अनुभव आणि युवा अधिकाऱ्यांच्या नवनवीन कल्पना व ऊर्जेच्या संगमातून उत्तम काम होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उर्त्तीण होण्यापर्यंतचे दिवस, त्या काळातली आव्हाने या सगळ्याचा विचार करावा आणि मिळालेल्या संधीतून देशात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काम करावे, असा सल्ला त्यांनी युवा अधिकाऱ्यांना दिला.

यावेळी कर्मचारी, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
‘Make in India’ is working, says DP World Chairman

Media Coverage

‘Make in India’ is working, says DP World Chairman
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi condoles loss of lives due to stampede at New Delhi Railway Station
February 16, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the loss of lives due to stampede at New Delhi Railway Station. Shri Modi also wished a speedy recovery for the injured.

In a X post, the Prime Minister said;

“Distressed by the stampede at New Delhi Railway Station. My thoughts are with all those who have lost their loved ones. I pray that the injured have a speedy recovery. The authorities are assisting all those who have been affected by this stampede.”