PM's second interaction with Additional Secretaries and Joint Secretaries
 
भारत सरकारमध्ये कार्यरत असणा-या 80 पेक्षा जास्त अतिरिक्त सचिव आणि संयुक्त सचिवांच्या समुहाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी संवाद साधला. अशाप्रकारे पाच संवाद सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून या मालिकेतले हे दुसरे सत्र होते.
कामगिरीवर आधारित प्रशासन, नवीन सुशासन, कचरा व्यवस्थापन, नदी आणि पर्यावरण प्रदूषण, वने, स्वच्छता, हवामान बदल, कृषी, शिक्षण आणि कौशल्य विकास या विषयांवर पंतप्रधानांनी उपस्थित अधिका-यांसमवेत चर्चा केली. अनेकांची मते जाणून घेतली.
“अधिका-यांनी स्वतःला फक्त कामांच्या फाइलींपुरती मर्यादित ठेवू नये तर कोणताही निर्णय घेतल्यानंतर त्याचा काय परिणाम होणार आहे, हे जाणून घेण्यासाठी त्या त्या क्षेत्राला भेट दिली पाहिजे”. असे मनोगत पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सनदी अधिका-यांशी बोलताना व्यक्त केले. या संदर्भात बोलताना त्यांनी 2001 मध्ये गुजरातमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर पुर्ननिर्माणाच्या कामाचा अनुभव सांगितला.
अधिका-यांनी कामाकडे फक्त नोकरी, कर्तव्य या भावनेने पाहू नये, तर देशामध्ये शासनामार्फत सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. या भावनेने कार्यरत राहावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जावा, असा आग्रहही त्यांनी केला.

देशभरातील सर्वात जास्त मागासलेल्या 100 जिल्हयांची सूची तयार करावी आणि त्या जिल्हयांमध्ये विकासकामे करून त्यांना देशाच्या इतर जिल्हयांच्या बरोबर आणावे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
When PM Modi Visited ‘Mini India’: A Look Back At His 1998 Mauritius Visit

Media Coverage

When PM Modi Visited ‘Mini India’: A Look Back At His 1998 Mauritius Visit
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
I reaffirm India’s commitment to strong bilateral relations with Mauritius: PM at banquet hosted by Mauritius President
March 11, 2025

Your Excellency राष्ट्रपति धरमबीर गोकुल जी,

First Lady श्रीमती बृंदा गोकुल जी,
उप राष्ट्रपति रोबर्ट हंगली जी,
प्रधान मंत्री रामगुलाम जी,
विशिष्ट अतिथिगण,

मॉरिशस के राष्ट्रीय दिवस समारोह में मुख्य अतिथि के रूप में एक बार फिर शामिल होना मेरे लिए सौभाग्य की बात है।

इस आतिथ्य सत्कार और सम्मान के लिए मैं राष्ट्रपति जी का हार्दिक आभार व्यक्त करता हूँ।
यह केवल भोजन का अवसर नहीं है, बल्कि भारत और मॉरीशस के जीवंत और घनिष्ठ संबंधों का प्रतीक है।

मॉरीशस की थाली में न केवल स्वाद है, बल्कि मॉरीशस की समृद्ध सामाजिक विविधता की झलक भी है।

इसमें भारत और मॉरीशस की साझी विरासत भी समाहित है।

मॉरीशस की मेज़बानी में हमारी मित्रता की मिठास घुली हुई है।

इस अवसर पर, मैं - His Excellency राष्ट्रपति धरमबीर गोकुल जी और श्रीमती बृंदा गोकुल जी के उत्तम स्वास्थ्य और कल्याण; मॉरीशस के लोगों की निरंतर प्रगति, समृद्धि और खुशहाली की कामना करता हूँ; और, हमारे संबंधों के लिए भारत की प्रतिबद्धता दोहराता हूँ

जय हिन्द !
विवे मॉरीस !