QuoteThose who sacrificed their lives for nation security will continue to live in our hearts: PM Modi
QuoteVande Bharat Express is a successful example of #MakeInIndia initiative: PM Modi
QuoteOur efforts are towards making a modern Kashi that also retains its essence: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीमध्ये 3,350 कोटी रुपयांच्या विकास कामांचे अनावरण केले. आरोग्य, स्वच्छता, स्मार्ट सिटी, ऊर्जा, गृहनिर्माण या क्षेत्राशी संबंधित हे प्रकल्प आहेत. यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

|

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वाराणसीच्या रमेश यादव यांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली.

वाराणसी लगतच्या आऊरे गावात त्यांनी एका सभेला संबोधित केले.

|

विकासाला चालना देण्यासाठी सरकार दोन आघाड्यांवर काम करत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. सरकार एकीकडे, महामार्ग, रेल्वे यासाख्या पायाभूत सुविधा उभारत आहे तर दुसरीकडे विकासाची फळे सर्वांपर्यंत पोहोचतील याची काळजी सरकार घेत आहे, असे ते म्हणाले. यादृष्टीने अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

|

वाराणसीला नवभारतातील महत्त्वाचे केंद्र करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगून पंतप्रधानांनी आज अनावरण केलेल्या विकास कामांबाबत सांगितले. भारतीय रेल्वेच्या प्रगतीसाठी गेल्या साडेचार वर्षात विविध पावले उचलली असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली-वाराणसी मार्गावरील, भारतातील पहिली सेमी वेगवान रेल्वेगाडी ‘वंदे भारत एक्सप्रेस’ हे त्यादृष्टीने एक पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे वाहतूक सुगम होण्याबरोबरच वाराणसी, पूर्वांचल आणि लगतच्या क्षेत्रात नवे उद्योग उभे राहतील, असे ते म्हणाले.

|

 

यावेळी पंतप्रधानांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली. आयआयटी बनारस हिंदू विद्यापीठाच्या शतकपूर्ती निमित्त स्मृती टपाल तिकिटाचे अनावरण पंतप्रधानांनी केले.

|

उत्तर प्रदेशात सुमारे 38 हजार लोकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळाला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. योजनेतून उत्तर प्रदेशातल्या सुमारे 1 कोटी 20 लाख कुटुंबांना लाभ मिळेल, असे ते म्हणाले.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ उत्तर प्रदेशातल्या 2 कोटी 25 लाख गरीब शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे महत्त्वही पंतप्रधानांनी सांगितले.

वाराणसीमध्ये पायाभरणी झालेले प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

व्यक्तींना मदत आणि सहायक उपकरणांचे वाटप पंतप्रधानांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केले.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Over 28 lakh companies registered in India: Govt data

Media Coverage

Over 28 lakh companies registered in India: Govt data
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister pays homage to Chhatrapati Shivaji Maharaj on his Jayanti
February 19, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi has paid homage to Chhatrapati Shivaji Maharaj on his Jayanti.

Shri Modi wrote on X;

“I pay homage to Chhatrapati Shivaji Maharaj on his Jayanti.

His valour and visionary leadership laid the foundation for Swarajya, inspiring generations to uphold the values of courage and justice. He inspires us in building a strong, self-reliant and prosperous India.”

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो.

त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत.”