पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातल्या तुमकुर इथल्या जाहीर सभेत प्रगतीशील शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांची कृषी कर्मण पुरस्कार आणि राज्यांनी प्रशस्तीपत्र प्रदान केले. यावेळी त्यांनी डिसेंबर 2019 ते मार्च 2020 या कालावधीसाठी पीएम किसान (प्रधानमंत्री किसान सन्मान निधी)चा 2000 रुपयांचा तिसरा हफ्ता जारी केला, यामुळे सुमारे 6 कोटी लाभर्थ्यांना याचा लाभ मिळेल. यावेळी त्यांनी कर्नाटकच्या निवडक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरीत केली. पंतप्रधानांनी 8 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील पीएम किसान अंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रही प्रदान केली. तसेच पंतप्रधानांनी तामिळनाडूच्या निवडक शेतकऱ्यांना खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौका आणि ट्रान्स्पॉडर्सच्या चाव्या प्रदान केल्या.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.44039100_1577978543_krin1.jpg)
यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले कि, नव्या दशकाच्या सुरुवातीला, नव्या वर्षात आपले शेतकरी बंधू आणि भगिनी अर्थात अन्नदात्यांना पाहणे ही आपल्यासाठी सौभाग्याची बाब आहे. 130 कोटी देशवासियांच्या वतीने पंतप्रधानांनी देशाच्या शेतकऱ्यांचे आभार मानले.
पंतप्रधान म्हणाले की, कर्नाटकची भूमी आज एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार झाली आहे. पीएम किसान योजने अंतर्गत दिले जाणारे पैसे आज देशातील सुमारे 6 कोटी शेतकऱ्यांच्या वैयक्तिक खात्यात थेट वितरीत करण्यात आले. या योजनेचा तिसरा हफ्ता म्हणून एकूण 12 हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.61285300_1577978589_krin2.jpg)
ज्या राज्यांनी ‘पीएम किसान सन्मान निधी योजना’ राबवलेली नाही, ते ती राबवतील आणि आपापल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राजकीय पक्ष राजकारण बाजूला ठेवतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
देशात एक काळ असा होता जेव्हा देशातल्या गरीबांसाठी 1 रुपया पाठवला जायचा, मात्र त्यातले केवळ 15 पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचायचे अशी आठवण पंतप्रधानांनी सांगितली. ते म्हणाले कि, आता दलालांच्या मध्यस्थीशिवाय गरीबांपर्यंत पैसे थेट पोहोचतात.
अनेक दशकं रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची आता अंमलबजावणी केली जात आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. पीक विमा, मुद्रा आरोग्य कार्ड आणि 100 टक्के कडूनिम लेपित युरिया यासारख्या योजनांसह केंद्र सरकारने नेहमीच आपल्या शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारच्या प्रयत्नांमुळे मसाल्यांचे उत्पादन आणि निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. ‘मसाल्याचे उत्पादन 2.5 दशलक्ष टनापेक्षा अधिक वाढले असून, निर्यातही 15 हजार कोटींवरुन 19 हजार कोटी रुपयांपर्यंत गेली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.15235300_1577978612_krin3.jpg)
फलोत्पादना व्यतिरिक्त डाळी, तेल आणि भरड धान्याच्या उत्पादनात दक्षिण भारताचा मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले.
‘भारतात डाळींच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी बियाणे केंद्र उभारण्यात आली आहेत. यापैकी 30 हून अधिक केंद्रे कर्नाटक, आंध्र, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगण मध्येच आहेत,’ असे पंतप्रधान म्हणाले.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.34652800_1577978638_krin4.jpg)
मत्स्योद्योग क्षेत्रातील सरकारच्या प्रयत्नांचा उल्लेख करतांना पंतप्रधान म्हणाले कि, या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकार तीन स्तरांवर काम करत आहे.
एक- मच्छिमारांना आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून गावांमध्ये मत्स्योद्योगाला प्रोत्साहन.
दोन- निल क्रांती योजने अंतर्गत मासेमारी नौकांचे आधुनिकीकरण.
आणि तीन- मत्स्य व्यापार आणि उद्योगाशी संबंधित आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती.
‘मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्ड सुविधेशी जोडण्यात आले आहे. मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी समुद्रात आणि मोठ्या नद्यांमध्ये नवीन मासेमारी बंदरे उभारली जात आहेत. आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी 7.50 हजार कोटी रुपयांचा विशेष निधी स्थापन करण्यात आला आहे. खोल समुद्रात मासेमारीसाठी नौकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. तसेच इस्रोच्या मदतीने मच्छिमारांच्या संरक्षणासाठी नौकांमध्ये दिशादर्शक उपकरणे बसवली जात आहेत,’ असे पंतप्रधान म्हणाले.
देशाच्या पोषण सुरक्षा लक्षात घेऊन पंतप्रधानांनी पोषक धान्य, फलोत्पादन आणि सेंद्रिय शेतीसाठी कृषी कर्मण पुरस्कारांमध्ये विशेष श्रेणी निर्माण करण्याची विनंती केली. यामुळे या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या राज्यांना आणि लोकांना प्रोत्साहन मिळेल.
नए वर्ष, नए दशक की शुरुआत में, देश के अन्नदाता-हमारे किसान भाई-बहनों के दर्शन होना, मेरे लिए बहुत सौभाग्य की बात है।
— PMO India (@PMOIndia) January 2, 2020
मैं 130 करोड़ देशवासियों की तरफ से, देश के हर किसान को नए वर्ष की शुभकामनाएं देता हूं, देश के लिए अन्न उपजाने वाले किसानों का आभार व्यक्त करता हूं:PM @narendramodi
कृषि कर्मण अवार्ड के साथ ही, आज कर्नाटका की ये धरती, एक और ऐतिहासिक उपलब्धि की गवाह बनी है।
— PMO India (@PMOIndia) January 2, 2020
आज प्रधानमंत्री किसान सम्मान निधि के तहत 8 करोड़वें किसान साथी के खाते में पैसा जमा किया गया है: PM @narendramodi
इतना ही नहीं, आज अभी, इस कार्यक्रम में ही एक साथ देश के 6 करोड़ किसान परिवारों के खाते में 12 हजार करोड़ रुपए जमा करवाए गए हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 2, 2020
देश में एक वो दौर भी था जब देश में गरीब के लिए एक रुपए भेजा जाता था तो सिर्फ 15 पैसे पहुंचते थे।
— PMO India (@PMOIndia) January 2, 2020
बाकी के 85 पैसे बिचौलिए मार जाते थे।
आज जितने भेजे जा रहे हैं, उतने, पूरे के पूरे सीधे गरीब के खाते में पहुंच रहे हैं: PM @narendramodi
दशकों से लटकी सैकड़ों सिंचाई परियोजनाएं हों, फसल बीमा से जुड़े नियमों में बदलाव हो, सॉयल हेल्थ कार्ड हो या फिर यूरिया की 100 प्रतिशत नीम कोटिंग, हमने हमेशा किसानों के हितों को प्राथमिकता दी: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 2, 2020
हमारी सरकार के प्रयासों के कारण भारत द्वारा मसालों के उत्पादन और निर्यात, दोनों में काफी बढ़ोतरी हुई है।
— PMO India (@PMOIndia) January 2, 2020
भारत में मसाला उत्पादन 25 लाख टन से अधिक बढ़ा है तो एक्सपोर्ट भी करीब 15 हज़ार करोड़ से बढ़कर लगभग 19 हज़ार करोड़ रुपए तक पहुंच चुका है: PM @narendramodi
Horticulture के अलावा दाल, तेल और मोटे अनाज के उत्पादन में भी दक्षिण भारत का हिस्सा अधिक है। भारत में दाल के उत्पादन को बढ़ावा देने के लिए बीज हब बनाए गए हैं, जिनमें से 30 से अधिक सेंटर कर्नाटका, आंध्रा, केरल, तमिलनाडु और तेलंगाना में ही हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 2, 2020
फिशरीज सेक्टर को मजबूत करने के लिए सरकार तीन स्तरों पर काम कर रही है।
— PMO India (@PMOIndia) January 2, 2020
पहला- गांवों में मछलीपालन को बढ़ावा, मछुवारे भाई-बहनों को आर्थिक मदद: PM @narendramodi
दूसरा- ब्लू रिवोल्यूशन स्कीम के तहत नावों का आधुनिकीकरण।
— PMO India (@PMOIndia) January 2, 2020
और तीसरा- मछली के व्यापार और कारोबार से जुड़े आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण: PM @narendramodi
मछलीपालकों को किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा जा चुका है। मछली पालकों की सहूलियत के लिए बड़ी नदियों और समंदर में नए फिशिंग हार्बर बनाए जा रहे हैं।
— PMO India (@PMOIndia) January 2, 2020
आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर के लिए साढ़े 7 हज़ार करोड़ रुपए का विशेष फंड भी बनाया गया है: PM @narendramodi
डीप सी फिशिंग के लिए मछुआरों की नावों का आधुनिकीकरण किया जा रहा है और ISRO की मदद से मछुआरों की सुरक्षा के लिए नेविगेशन डिवाइस नावों में लगाए जा रहे हैं।
— PMO India (@PMOIndia) January 2, 2020
आज यहां तमिलनाडु और कर्नाटका के अनेक किसानों को इसका लाभ लेते हुए आपने भी देखा है: PM @narendramodi
मेरा आग्रह है कि कृषि कर्मण अवार्ड में देश की पोषण सुरक्षा को ध्यान में रखते हुए पौष्टिक अनाज- Nutri Cereals, Horticulture और Organic Agriculture को लेकर भी नई कैटेगरी बनाई जाए।
— PMO India (@PMOIndia) January 2, 2020
इससे, इन क्षेत्रों में बेहतर काम कर रहे लोगों और राज्यों को प्रोत्साहन मिलेगा: PM @narendramodi
वर्ष 2022 में जब हमारा देश अपनी आजादी के 75 वर्ष का पर्व मनाए, तब हमारे संकल्पों की सिद्धि ही हमारे राष्ट्र निर्माताओं को हमारी श्रद्धांजलि होगी।
— PMO India (@PMOIndia) January 2, 2020
आज हमें यहां से किसानों की आय दोगुनी करने के लिए नई ऊर्जा लेकर, नई प्रतिबद्धता लेकर जाना है: PM @narendramodi