QuoteThe relationship between India and Palestine is built on the foundation of long-standing solidarity and friendship: PM 
QuoteIndia is committed to be a useful development partner of Palestine, says PM Modi 
QuoteIndia & Palestine sign five MoUs to strengthen cooperation in key sectors

 

सन्माननीय महमौद अब्बास,

पॅलेस्टीनचे राष्ट्रपती, पॅलेस्टीन आणि भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य,

प्रसार माध्यम प्रतिनिधी

महिला आणि सज्जन

भारताचा जुना मित्र देश असणाऱ्या पॅलेस्टीनचे राष्ट्रपती महमौद अब्बास सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे पुन्हा एकदा स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. दोन्ही देशांमधील एकता आणि ऋणानुबंध हे दृढ आहेत. आमचा स्वातंत्र्यासाठी जो संघर्ष सुरू होता, त्या काळापासून हे मित्रत्वाचे नाते निर्माण झाले आहे. सार्वभौम, स्वतंत्र, संयुक्त आणि व्यवहार्य नाते पॅलेस्टीनने जपले आहे, यापुढेही जपण्यात येईल, अशी आशा करतो.  राष्ट्रपती अब्बास यांच्याशी आज झालेल्या संवादामुळे उभय देशातील मैत्रीचे बंध अधिक बळकट होतील, असा विश्वास वाटतो.

|
|

मित्रहो,

विविध क्षेत्रात सहभागीता अधिक मजबूत करण्यासंबंधी राष्ट्रपती अब्बास आणि माझ्यात आज अगदी विस्तृत चर्चा झाली. पश्चिम आशिया आणि मध्य पूर्वेमध्ये शांतता प्रक्रियेविषयी आम्ही आपापले विचार मांडले. पश्चिम आशियामधील आव्हानांना तोंड देण्यासाठी शाश्वत, ठोस राजकीय चर्चा झाली तरच या प्रश्नावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा निघू शकतो. यावर आम्हा दोघांचेही एकमत झालं आहे. पॅलेस्टीन आणि इस्रायल यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी आणि सर्वंकष तोडगा काढण्यासाठी उभय बाजूंनी योग्य प्रकारे प्रयत्न होतील, अशी आशा भारताला आहे. पॅलेस्टीनची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि तेथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी भारत सहकार्याचा हात पुढे करत आहे. पॅलेस्टीनच्या क्षमतावृध्दीसाठी आणि विकासासाठी भारत सातत्याने पाठिंबा देत राहणार आहे. याचसाठी वेगवेगळे सामंजस्य-सहकार्याचे करार करण्यात आले आहेत. यामध्ये माहिती तंत्रज्ञान, युवावर्ग आणि कौशल्य विकास या क्षेत्रात भारत प्राधान्याने मदत देणार आहे. भारताच्या नेतृत्वाखाली रामल्लाह येथे ‘टेक्नो-पार्क’ उभारण्यात येणार आहे. एकदा का हे काम पूर्ण झाले की पॅलेस्टीन ‘आयटी हब’ म्हणून सेवा देऊ शकणार आहे. माहिती-तंत्रज्ञानशी संबंधित सर्व प्रकारचे प्रशिक्षण आणि सेवा पुरवण्याची क्षमता पॅलेस्टीनकडे असेल. याशिवाय सांस्कृतिक देवाण-घेवाणही पॅलेस्टीनशी करण्यात येणार आहे. यामध्ये ‘योग’ हा घटक यंदा नव्याने जोडण्यात आला आहे. पुढच्याच महिन्यात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पॅलेस्टीनमधून जास्तीत जास्‍त लोक सहभागी होतील अशी आशा आहे आणि अखेरीस, राष्ट्रपती महमौद अब्बास आणि त्यांच्या शिष्टमंडळाचा हा भारत दौरा आनंददायी आणि फलदायी ठरावा, अशी सदिच्छा व्यक्त करतो. राष्ट्रपती आब्बास यांच्याबरोबर काम करताना उभय देशांमधील संबंध असेच सुदृढ होऊन ते वृध्दींगत होतील अशी आशा व्यक्त करतो.

धन्यवाद!

खूप खूप धन्यवाद! 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
The Pradhan Mantri Mudra Yojana: Marking milestones within a decade

Media Coverage

The Pradhan Mantri Mudra Yojana: Marking milestones within a decade
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
10 Years of MUDRA Yojana has been about empowerment and enterprise: PM
April 08, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi today hailed the completion of 10 years of the Pradhan Mantri MUDRA Yojana, calling it a journey of “empowerment and enterprise.” He noted that with the right support, the people of India can do wonders.

Since its launch, the MUDRA Yojana has disbursed over 52 crore collateral-free loans worth ₹33 lakh crore, with nearly 70% of the loans going to women and 50% benefiting SC/ST/OBC entrepreneurs. It has empowered first-time business owners with ₹10 lakh crore in credit and generated over 1 crore jobs in the first three years. States like Bihar have emerged as leaders, with nearly 6 crore loans sanctioned, showcasing a strong spirit of entrepreneurship across India.

Responding to the X threads of MyGovIndia about pivotal role of Mudra Yojna in transforming the lives, the Prime Minister said;

“#10YearsofMUDRA has been about empowerment and enterprise. It has shown that given the right support, the people of India can do wonders!”