Quoteभारताचे G20 अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित आहे
Quoteवंचितांची, रांगेतील अगदी शेवटच्या व्यक्तीची सेवा करण्याच्या गांधीजींच्या मिशनचे अनुकरण करणे महत्त्वाचे

नवी दिल्ली G20 शिखर परिषद मानवकेंद्रित आणि सर्वसमावेशक विकासाचा एक नवा मार्ग प्रशस्त करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. भारताचे G20 अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित आहे, जिथे दक्षिणेकडील देशांच्या विकास विषयक समस्या सक्रियपणे मांडल्या गेल्या आहेत यावर त्यांनी भर दिला.

वंचितांची सेवा करण्याच्या गांधीजींच्या ध्येयाचे अनुकरण करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी प्रगतीला चालना देणाऱ्या  मानव-केंद्रित मार्गावर भारताचा अधिक भर आहे याकडे लक्ष वेधले.

‘एक पृथ्वी’, ‘एक कुटुंब’ आणि ‘एक भविष्य’ या विषयावरील सत्रे त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत, ज्यात मजबूत, शाश्वत, सर्वसमावेशक आणि संतुलित विकासासह जागतिक समुदायाला भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांचा देखील समावेश असेल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.  मैत्री आणि सहकार्याचे बंध अधिक दृढ करण्यासाठी अनेक नेते आणि शिष्टमंडळ प्रमुखांसोबत द्विपक्षीय बैठका घेत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

पंतप्रधान पुढे म्हणाले की राष्ट्रपतींनी  प्रमुख नेत्यांसाठी 9 सप्टेंबर 2023 रोजी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. जी20 देशांचे नेते 10 सप्टेंबर 2023 रोजी राजघाट येथे महात्मा गांधींना आदरांजली वाहतील. त्याच दिवशी समारोप समारंभात, G20 नेते एक शाश्वत आणि न्याय्य 'एक भविष्य', 'एक कुटुंब' प्रमाणे एकजूट आणि सुदृढ  'एक पृथ्वी' प्रति  त्यांचे सामूहिक विचार  सामायिक करतील.

X वर एक थ्रेड शेअर करत पंतप्रधान म्हणाले:

“नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 9-10 सप्टेंबर 2023 रोजी 18 व्या G20 शिखर परिषदेचे आयोजन करताना भारताला आनंद होत आहे. भारत यजमानपद भूषवत असलेली ही पहिलीच G20 शिखर परिषद आहे. पुढील दोन दिवसांत जागतिक नेत्यांसोबत फलदायी चर्चेसाठी मी उत्सुक आहे.

मला ठाम विश्वास आहे की नवी दिल्ली G20 शिखर परिषद मानव-केंद्रित आणि सर्वसमावेशक विकासाचा एक नवा मार्ग प्रशस्त  करेल."

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
How has the Modi Government’s Atmanirbhar Bharat push powered Operation Sindoor?

Media Coverage

How has the Modi Government’s Atmanirbhar Bharat push powered Operation Sindoor?
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
महाराष्ट्रात सोलापूर येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
May 18, 2025
Quoteप्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मदत जाहीर

महाराष्ट्रातील सोलापूर येथे आग लागून झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातात जखमी झालेले लोक लवकर बरे व्हावेत अशा शुभेच्छाही पंतप्रधानांनी दिल्या आहेत.

प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे ;

"महाराष्ट्रातील सोलापूर येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती सहवेदना. जखमी व्यक्ती लवकर बऱ्या  व्हाव्यात अशी प्रार्थना.

प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान" @narendramodi

 

 

"महाराष्ट्रात सोलापूर इथे आग लागून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीमुळे तीव्र दु:ख झाले. आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबांप्रति माझ्या सहवेदना. जखमी झालेले लवकर बरे होवोत ही प्रार्थना. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (PMNRF) प्रत्येक मृतांच्या वारसाला 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील : पंतप्रधान" @narendramodi