अतिशय अवघड काम अंगी घेणारे आणि त्यांच्या संघातील सहका-यांच्या क्षमतेच्या परिसीमेपर्यंत त्यांना काम करायला लावणारे आणि त्यानंतर त्यापेक्षाही जास्त क्षमतेची कामगिरी करायला प्रोत्साहित करायला लावणारे व्यक्तिमत्व अशी नरेंद्र मोदी यांची ओळख निर्माण झाली आहे. मग अशा वेळी जर त्यांचे संघसहकारी अपयशी ठरले तर मोदी यांचा संयम कधीतरी सुटतो का? मोदी निष्ठुर आहेत का?

31 ऑगस्ट 2012 रोजी निर्माण झालेली परिस्थिती आणि तिची झालेली हाताळणी हे मोदी अशा परिस्थितीची हाताळणी कशी करतात याचे उत्तम उदाहरण आहे. त्यावेळी पहिल्यांदाच एखाद्या भारतीय नेत्याच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गुगलवरुन होणार होते. या कार्यक्रमाबाबत जगभरातून लोकांमध्ये इतकी उत्सुकता निर्माण झाली की असंख्य लोकांच्या प्रतिसादामुळे या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाच्या वेळीच गुगलचे सर्व्हर क्रॅश झाले आणि कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण युट्यूबवर 45 मिनिटांच्या विलंबाने सुरू झाले. हे प्रक्षेपण संपल्यानंतर गुगल इंटरनॅशनलच्या टीमला मोदींच्या कार्यालयामध्ये शिष्टाचारानुसार अनौपचारिक गप्पांसाठी आमंत्रित करण्यात आले. परिपूर्णतेबद्दल असलेल्या त्यांच्या लौकिकामुळे आणि अशा परिस्थितींमध्ये भारतीय राजकारण्यांबाबत असलेल्या सर्वसामान्य दृष्टिकोनामुळे आपल्याला बोलणी खावी लागणार अशी भीती या टीमच्या मनात निर्माण झाली होती. मात्र त्यांना वेगळाच अनुभव आला आणि ते चकित झाले. मोदी यांनी त्यांचे सुहास्य मुद्रेने स्वागत केले आणि त्यांच्या भावी काळातील योजना आणि भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून कोणत्या प्रकारच्या तांत्रिक सुधारणा आवश्यक असतील याबाबत दिलखुलास गप्पा मारल्या.

हा केवळ एकच किस्सा नाही, मोदी यांचा हा स्वभाव, एक अशी व्यक्ती की जी कधीही सहनशक्तीचा अंत करणा-या स्थितीतही आपले भान सोडत नाही हा त्यांचा लौकिक ज्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे त्यांनीही मान्य केला आहे. ते कधीच निष्ठुर किंवा उद्धट होत नाहीत. एखादी व्यक्ती किंवा त्यांचा एक संपूर्ण संघ जेव्हा अपयशी ठरतो तेव्हा ते त्यांना त्या अपयशातून मिळालेल्या शिकण्याच्या संधीचा उपयोग करण्याचा आणि तपशीलवार योजना तयार करून पुढील प्रयत्नांसाठी त्यांचा वापर करण्याचा सल्ला देतात. जोपर्यंत काहीतरी शिकण्याची तुमची तयारी असेल, तोपर्यंत मोदी नेहमीच तुमच्या पाठिशी असतील.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Bharat Tex showcases India's cultural diversity through traditional garments: PM Modi

Media Coverage

Bharat Tex showcases India's cultural diversity through traditional garments: PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान मोदींचे हृद्य पत्र
December 03, 2024

दिव्यांग कलाकार दिया गोसाईसाठी, सर्जनशीलतेचा क्षण आयुष्य बदलणारा अनुभव ठरला. 29 ऑक्टोबर रोजी बडोद्यात पंतप्रधान मोदींचा रोड शो सुरू असताना, तिने रेखाटलेली त्यांची आणि स्पेन सरकारचे अध्यक्ष महामहीम. श्री. पेड्रो सांचेझ यांची रेखाचित्रे त्यांना भेट दिली. तिने अत्यंत मनापासून दिलेली ही भेट स्वीकारण्यासाठी दोन्ही नेते वाहनातून उतरून जातीने तिच्याजवळ त्यामुळे तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

काही आठवड्यांनंतर, 6 नोव्हेंबर रोजी, दियाला तिच्या कलाकृतीची प्रशंसा करणारे पंतप्रधानांचे पत्र आले, त्यामध्ये त्यांनी महामहीम. श्री. सांचेझ यांनीही त्याचे कौतुक केल्याचे देखील कळवले होते. पीएम मोदींनी तिला ललित कलांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून त्याचे शिक्षण घेण्याच्या आवाहनाबरोबरच "विकसित भारत" घडवण्यातील तरुणांच्या भूमिकेवर विश्वासही व्यक्त केला होता. त्या पत्राला त्यांनी खास आपल्या पद्धतीची जोड देत तिच्या कुटुंबियांना दिवाळी आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या होत्या.

या पत्रामुळे आनंदाने भारावून, दियाने तिच्या पालकांना पत्र वाचून दाखवले असता तिने आपल्या कुटुंबाला इतका मोठा बहुमान मिळवून दिल्याचा त्यांनाही आनंद झाला. " आपल्या देशाचा एक छोटासा भाग असल्याचा मला अभिमान आहे. मोदीजी, तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मला दिल्याबद्दल धन्यवाद," असे म्हणत दियाने पंतप्रधानांच्या पत्रामुळे आपल्याला जीवनात धाडसी पावले उचलण्याची आणि इतरांनाही अशा प्रकारे सक्षम बनविण्याची प्रेरणा मिळाली, असेही नमूद केले.

पंतप्रधान मोदींच्या या कृतीतून दिव्यांगांना सक्षम बनविण्याची आणि त्यांच्या योगदानाची यथोचित दखल घेण्याची त्यांची बांधिलकी दिसून येते. सुगम्य भारत अभियानासारख्या अनेक उपक्रमांपासून ते दिया सारखीशी वैयक्तिक नाते प्रस्थापित करण्यापर्यंत, ते सातत्याने प्रेरणा देण्याचा आणि त्यांना वर आणण्याचे काम करून, प्रत्येक प्रयत्न चांगल्या भविष्यासाठी आवश्यक असल्याचे सिद्ध करत आहेत .