QuoteIn 2018, the world's largest health insurance scheme 'Ayushman Bharat' was launched, every village of the country got electricity: PM Modi #MannKiBaat
QuoteOur festivals represent 'Unity in Diversity' and 'Ek Bharat, Shreshtha Bharat': PM Modi during #MannKiBaat
QuoteThe global importance that Kumbh holds is very well exemplified from the fact that UNESCO has described it as ‘Intangible Cultural Heritage of Humanity': PM during #MannKiBaat
QuoteKumbh in itself is grand in nature. It is divine as well as beautiful: PM Modi during #MannKiBaat
QuoteThis time, every devotee will be able to offer prayers at Akshay Vat after the holy bath in the Sangam: Prime Minister Modi during #MannKiBaat
QuotePujya Bapu’s connect with South Africa is unbreakable. It was in South Africa, where Mohan became the 'Mahatma': Prime Minister Modi #MannKiBaat
QuoteMahatma Gandhi had started his first Satyagraha in South Africa and he stood against the discrimination based on the colour of one's skin: PM #MannKiBaat
QuoteSardar Patel dedicated his entire life towards uniting India. He devoted every moment of his life to protect the nation's integrity: PM Modi during #MannKiBaat
QuoteGuru Gobind Singh Ji was born in Patna, His karmabhoomi was North India and He sacrificed His life in Maharashtra’s Nanded: PM during #MannKiBaat
QuoteGuru Gobind Singh Ji calm but whenever, an attempt was made to suppress the voice of the poor and the weak, then Guru Gobind Singh Ji raised his voice and stood firmly with the poor: PM #MannKiBaat
QuoteGuru Gobind Singh Ji always used to say that strength cannot be demonstrated by fighting weak sections: PM Modi #MannKiBaat

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. वर्ष 2018 संपणार आहे. आपण 2019 मध्ये प्रवेश करणार आहोत. अशा वेळी स्वाभाविकपणे गेल्या वर्षात घडलेल्या घटनांची चर्चा केली जाते,तसेच येणाऱ्या वर्षासाठीच्या संकल्पांची देखील चर्चा होते. व्यक्तीचे जीवन असो, समाजाचे जीवन असो, राष्ट्राचे जीवन असो, प्रत्येकाला सिंहावलोकन करतानाच, भविष्यात शक्य तितकं दूरवर बघण्याचा प्रयत्न देखील करायचा असतो. आणि तेंव्हाच अनुभवांचा फायदा होतो, आणि निवड करण्याचा आत्मविश्वास देखील निर्माण होतो. आपण असं काय करू शकतो, ज्यामुळे आपल्या जीवनात बदल घडवून येईल, त्यासोबतच समाज आणि देश पुढे नेण्यात आले योगदान देता येईल. आपणा सर्वांना 2019च्या अनेक शुभेच्छा. 2018च्या कुठल्या आठवणी सोबत ठेवायच्या हे आपणा सर्वांनी ठरवलंच असेल. 2018 हे वर्ष भारत एक देश म्हणून, आपल्या एकशे तीस कोटी जनतेची ताकद म्हणून कसं लक्षात ठेवलं जाईल हे देखील महत्वाचे आहे. आणि आम्हा सर्वांचा ऊर अभिमानाने भरून टाकणारे देखील आहे.

2018 मध्ये जगातील सर्वात मोठ्या ‘आयुष्यमान भारत’ ह्या आरोग्य विमा योजनेचा शुभारंभ झाला. देशाच्या प्रत्येक खेड्यात वीज पोहोचली. जगातील प्रतिष्ठित संस्थांनी मान्य केलं की भारत विक्रमी वेगाने गरिबी निर्मूलनाचे काम करत आहे. देशवासीयांच्या अटळ संकल्पाने स्वच्छतेची व्याप्ती 95%च्या पुढे नेण्याच्या दिशेने अग्रेसर होत आहे.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आझाद हिंद सरकारच्या 75व्या स्थापना दिवशी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला गेला. देशाला एकतेच्या धाग्यात ओवणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या सन्मानार्थ जगातील सर्वात उंच पुतळा ‘Staute of Unity’ देशाला मिळाला. जगात देशाचे नाव उंचावले गेले. संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार ‘Champion of the Earth’ देशाला देण्यात आला. सौर उर्जा आणि वातावरण बदलासाठी केलेल्या भारताच्या प्रयत्नांना जगात स्थान मिळालं. ‘जागतिक सौर आघाडी’ची पहिली बैठक भारतात झाली. आपल्या सामुहिक प्रयत्नांमुळेच भारताच्या व्यापार सुलभतेच्या क्रमवारीत अभूतपूर्व वाढ झाली. देशाची संरक्षणसज्जता अधिक मजबूत झाली. ह्याच वर्षी आपल्या देशाने आण्विक त्रिकोण यशस्वीपणे पूर्ण केला. म्हणजे आता आपण लष्कर,नौदल आणि वायुदल या तिन्ही क्षेत्रांत अण्वस्त्र सज्ज झालो आहोत. देशाच्या कन्यांनी सागर परीक्रमेद्वारे विश्व भ्रमण केले आणि देशाचा ऊर अभिमानाने भरून आला. वाराणसीमध्ये भारताच्या पहिल्या जलवाहतुकीची सुरवात झाली. ह्यामुळे जलमार्ग क्षेत्रात क्रांतीची सुरवात झाली आहे. देशातल्या सर्वात लांब रेल्वे-रस्ता पुलाचे उद्घाटन झाले. सिक्कीमच्या पहिल्या आणि देशातल्या 100व्या पाक्योंग विमानतळाचे उद्घाटन झाले. 19 वर्षांखालील क्रिकेटचा विश्वचषक, अंध क्रिकेट विश्वचषक देखील भारताने जिंकला. ह्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने मोठ्या संख्येने पदकांची कमाई केली. पॅरा आशियाई स्पर्धेत देखील भारताने चांगली कामगिरी केली. जर मी प्रत्येक भारतीयाच्या पुरुषार्थ आपल्या सामुहिक प्रयत्नांविषयी बोलत राहिलो तर आपली ‘मन की बात’ इतकी लांबेल कि 2019 उजाडेल. हे सगळं 130 कोटी देशबांधवांच्या अथक प्रयत्नांनीच शक्य झालं आहे. मला आशा आहे कि, 2019 मध्ये देखील भारताची प्रगती आणि उन्नती अशीच सुरु राहील आणि आपला देश अधिक ताकदीने यशाची नवी शिखरं सर करेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, ह्या डिसेंबरमध्ये आपण काही असामान्य भारतीयांना मुकलो आहोत. 19 डिसेंबरला चेन्नईमध्ये डॉक्टर जयाचंद्रन याचं निधन झालं. डॉक्टर जयाचंद्रन यांना लोक प्रेमाने ‘मक्कल मारुथुवर’ म्हणत असत. कारण लोकांनी त्यांना आपल्या मनात स्थान दिलं होतं. डॉक्टर जयाचंद्रन गरिबांना सगळ्यात स्वस्त उपचार देणारे म्हणून ओळखले जात. लोक सांगतात कि रुग्णसेवेसाठी ते सैद्यव तत्पर असत. त्यांच्याकडे येणाऱ्या वयस्क रुग्णांना तर ते येण्याजाण्याचा खर्च देखील देत असत. www.thebetterindia.com ह्या संकेतस्थळावर मी त्यांच्या समाजाला प्रेरक अशा कार्याविषयी अनेक लेख वाचले आहेत.

त्याचप्रमाणे, 25 डिसेंबरला कर्नाटकातील सुलागिट्टीनरसम्मा यांचे निधन झाले. सुलागिट्टी नरसम्मा ह्या सुईण होत्या. कर्नाटकातील दुर्गम भागातील माता भगिनींना त्या प्रसूतीमध्ये मदत करत असत. ह्याच वर्षीच्या सुरवातीला त्यांना ‘पद्मश्री’ ने सन्मानित करण्यात आलं होतं. डॉ. जयचंद्रन आणि सुलागिट्टी नरसम्मा यांच्यासारख्या अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी समाजाच्या भल्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. आपण आरोग्य सेवेविषयी बोलत आहोत, तर, उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील डॉक्टरांनी सुरु केलेल्या सामाजिक प्रयत्नांविषयी वोलायला मला आवडेल. अलीकडेच आमच्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं कि शहरातले काही तरुण डॉक्टर शिबिरं आयोजित करून गरीब रुग्णांना मोफत उपचार देतात. इथल्या हार्ट लंग क्रिटिकल केअर तर्फे दर महिन्यात असे शिबीर घेतले जाते. ह्या शिबिरांत अनेक प्रकारच्या रोगांवर मोफत इलाज करण्याची सोय असते. आज दर महिन्यात शेकडो गरीब रुग्ण ह्या शिबिरांचा लाभ घेतात. निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा करत असलेल्या ह्या तरुण डॉक्टरांचा उत्साह खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. आज मला हे सांगताना अभिमान वाटतो कि सामुहिक प्रयत्नामुळेच ‘स्वच्छ भारत अभियान ’ यशस्वी झालं आहे. मला काही लोकांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये जवळपास तीन लाखाहून जास्त लोकांनी स्वच्छता मोहीम राबविली. स्वच्छतेच्या ह्या महायज्ञात नगर पालिका, स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालये, जबलपूरचे जनता जनार्दन, सगळ्या लोकांनी मोठ्या हिरीरीने भाग घेतला. मी आत्ताच thebetterindia.com चा उल्लेख केला. जिथे मी डॉ. जयचंद्रन यांच्याविषयी वाचलं. शक्य असेल तेंव्हा मी कटाक्षाने thebetterindia.com ह्या संकेतस्थळावर जाऊन अशा प्रेरक गोष्टी वाचण्याचा प्रयत्न करतो. मला आनंद आहे, आजकालच्या काळात असे संकेतस्थळ आहे जे अशा विलक्षण लोकांच्या प्रेरणादायी गोष्टींशी समाजाचा परिचय करून देत आहे. ज्याप्रमाणे thepositiveindia.comसमाजात सकारात्मकता पसरविण्याचे आणि समाजाला अधिक संवेदनशील बनविण्याचे काम करत आहे, त्याच प्रमाणे yourstory.com युवा संशोधक आणि उद्योजकांच्या यशोगाथा मोठ्या कौशल्याने समाजाला सांगत आहे. त्याच प्रमाणे samskritabharati.in च्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या, सहजतेने संस्कृत भाषा शिकू शकता. आपण एक काम करू शकतो का, अशा अशा संकेतस्थळांची माहिती एकमेकांना देऊन समाजात सकारात्मकता पसरवूया. मला खात्री आहे, कि ह्यामुळे समाजात परिवर्तन घडवून आणणाऱ्या आमच्या नायाकांविषयी अधिकाधिक लोकांना माहिती मिळेल. नकारात्मकता पसरविणे सोपे असते. पण, समाजात आपल्या आजूबाजूला अनेक चांगली कामे होत आहेत. आणि हे सगळं 130 कोटी भारतीयांच्या सामुहिक प्रयत्नांनी होत आहे.

प्रत्येक समाजात खेळांचं एक महत्व आहे. जेंव्हा खेळ खेळले जातात तेंव्हा ते बघणाऱ्यांच्या मनात देखील उर्जा निर्माण होते. खेळाडूंची प्रसिद्धी, ओळख, मान-सन्मान अशा अनेक गोष्टी आपण बघत असतो. पण अनेकदा यांच्यामागे अनेक अशा गोष्टी असतात ज्या क्रीडा विश्वापेक्षा कितीतरी अधिक असतात, मोठ्या असतात. काश्मीरची कन्या हनाया निसारबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे. तिने कोरियात झालेल्या कराटे अजिंक्य स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. हनाया 12 वर्षांची आहे आणि काश्मीरच्या अनंतनाग येथे राहते. हनायाने मेहनत आणि चिकाटीने कराटेचा अभ्यास आणि सराव केला. त्यातले बारकावे शिकली आणि स्वतःला सिद्ध केलं. मी सर्व देशवासीयांतर्फे तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो. हनायाला अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद. त्याचप्रमाणे 16 वर्षांच्या रजनी ह्या मुलीविषयी माध्यमांमध्ये खूप चर्चा झाली. आपण नक्कीच वाचलं असेल, रजनीने कनिष्ठ गटात मुष्ठीयुध्द स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर ती लगेच जवळच्या दुधाच्या एका छोट्या दुकानात गेली आणि एक प्याला दुध प्यायली. त्यानंतर रजनीने ते पदक कापडात गुंडाळलं आणि आपल्या बॅगमध्ये ठेवून दिलं. आपण विचार करत असाल, कि रजनी एक प्याला दुध का प्यायली? तिने ते आपले पिता जसमेर सिंग यांच्यासाठी केलं. ते पानिपत येथे एका छोट्या दुकानात लस्सी विकतात. रजनीने सांगितलं, कि इथवर पोहोचण्यासाठी तिच्या वडिलांनी खूप त्याग केला आहे, खूप कष्ट केले आहेत. जसमेर सिंग रोज सकाळी रजनी आणि तिची भावंड उठण्यापूर्वी कामावर निघून जायचे. रजनीने जेंव्हा मुष्टियुद्ध शिकण्याची इच्छा व्यक्त केली, तेंव्हा वडिलांनी शक्य ती सर्व साधने गोळा केली आणि तिचा उत्साह वाढविला. रजनीला मुष्टीयुद्धाचा सराव करण्यासाठी जुने gloves वापरावे लागले कारण तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची होती. इतके सगळे अडथळे असूनही रजनी खचून न जाता मुष्टीयुध्द शिकत राहिली. तिने सर्बियामध्ये देखील एक पदक जिंकले आहे. मी रजनीला शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो आणि रजनीला मदत करण्यास आणि तिचा उत्साह वाढविण्यासाठी तिचे माता-पिता जसमेर सिंगजी आणि उषा राणी यांचे अभिनंदन करतो. ह्याच महिन्यात पुण्याच्या एका 20 वर्षीय कन्या, वेदांगी कुलकर्णी सायकलने जगप्रवास करणारी सर्वात वेगवान आशियाई बनली आहे. ती 159 दिवस रोज जवळजवळ 300 किलोमीटर सायकल चालवत होती. तुम्ही कल्पना करा रोज 300 किलोमीटर cycling ! सायकल चालविण्याची तिची जिद्द खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. असे यश, अशा कामगिरीबद्दल ऐकून आपल्याला प्रेरणा मिळते की नाही. विशेषकरून माझे युवा मित्र जेंव्हा अश्या घटनांबद्दल ऐकतात, तेंव्हा त्यांना देखील अडथळे पार करून काहीतरी करून दाखविण्याची प्रेरणा मिळते. जर दृढनिश्चय केला, संकल्पात शक्ती असेल तर सगळ्या समस्या आपोआप गळून पडतात. कुठलीच समस्या अडथळा बनू शकत नाही. जेंव्हा अशा उदाहरणाविषयी आपण ऐकतो, तेंव्हा आपल्याला देखील आयुष्याच्या प्रत्येक क्षणी एक प्रेरणा मिळत असते.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, जानेवारीत उत्साह आणि आनंदाचे लोहडी, पोंगल, मकर संक्रांत, उत्तरायण, माघ बिहू, माघी, यासारखे अनेक सण येणार आहेत. ह्या सर्व सणांच्या निमित्ताने सानौर्ण देशात कुठे पारंपारिक नृत्यांचा रंग दिसेल, तर कुठे सुगीच्या आनंदात लोहडी दहन केलं जाईल. कुठे आकाशात रंगी बेरंगी पतंग उडवले जातील. तर कुठे जत्रेचा आनंद असेल, तर कुठे खेळांच्या स्पर्धा होतील, तर कुठे एकमेकांना तीळ गुळ दिला जाईल. लोक एकमेकांना म्हणतील, ‘तीळ गुळ घ्या गोड गोड बोला.’ ह्या सगळ्या सणांची नवे भलेही वेगवेगळी असतील पण सर्वांमागची भावना एकाच आहे. हे सण कुठे ना कुठे पिक आणि शेतीशी संबंधित आहेत. शेतकऱ्यांशी संबंधित आहेत, खेड्यांशी संबंधित आहेत. शेती वाडीशी संबंधित आहेत. याच काळात सूर्याचे उत्तरायण होऊन तो मकर राशीत प्रवेश करतो. ह्यानंतर दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो आणि हिवाळ्यातील सुगीचा हंगाम सुरु होतो. आमचे अन्नदाते असलेल्या शेतकरी बांधवांना देखील अनेकानेक अनेक शुभेच्छा. आपले सण विविधतेत एकता – एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना आपल्या सणांमध्ये सामावलेली आहे. आपण बघू शकतो, आपले उत्सव निसर्गाशी किती एकरूप झालेले आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये समाज आणि निसर्ग हे वेगवेगळे नाहीत. येथे व्यक्ती आणि समष्टि एकच आहे. निसर्गाशी असलेल्या आपल्या जवळच्या संबंधांचे उत्तम उदाहरण म्हणजे – सणांवर आधारित कॅलेंडर. ह्यात वर्षभरातील सण तर असताच, त्यासोबतच ग्रह – नक्षत्रांची माहिती देखील असते. ह्या पारंपरिक कॅलेंडरमधून नैसर्गिक आणि खगोलिय घटनांशी आपला संबंध किती जुना आहे याची माहिती मिळते. चंद्र आणि सूर्याच्या गतीनुसार चंद्र आणि सूर्य कॅलेंडरनुसार सणांची तिथी निश्चित केली जाते. जो ज्या कॅलेंडरनुसार कालगणना करतो त्यावर हे अवलंबून असते.अनेक भागात नक्षत्रांच्या स्थितीनुसार देखील सण साजरे केले जातात. गुढी पाडवा, चेटीचंड, उगादि हे सर्व चंद्र कॅलेंडरनुसार साजरे केले जातात, तर तमिळ पुथांडु, विषु, वैशाख, बैसाखी, पोइला बैसाख, बिहु – हे सर्व सण पर्व सूर्य कॅलेंडरनुसार साजरे केले जातात. आपल्या अनेक सणांमध्ये नदी आणि जल संवर्धनाला विशेष महत्व आहे. छठ हा सण नद्या, तलावांमध्ये सूर्याची उपासना करण्याचा सण आहे. मकर संक्रांतीला देखील लाखो-करोडो लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. आमचे सण आम्हाला सामाजिक मुल्यांची देखील शिकवण देतात. एकीकडे यांचे पौराणिक महत्व आहे, तर दुसरीकडे प्रत्येक सण सहजतेने सामाजिक बंधुभावाची प्रेरणा देऊन जातो. मी आपणा सर्वांना 2019 च्या अनेकानेक शुभेच्छा देतो आणि येणारे सण आपल्याला भरपूर आनंद देतील अशी इच्छा व्यक्त करतो. ह्या सणांना काढलेले फोटो सर्वांसोबत शेयर करा. म्हणजे मग भारताची विविधता आणि भारतीय संस्कृतीचे सौंदर्य प्रत्येक जण बघू शकेल.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या संस्कृतीत अशा अनेक गोष्टी आहेत,ज्यांचा आपण अभिमान बाळगू शकतो आणि सगळ्या जगाला अभिमानाने दाखवू शकतो. आणि अशा गोष्टींपैकीच एक आहे आपला कुंभमेळा! तुम्ही कुंभमेळ्याविषयी बरंच काही ऐकलं असेल. चित्रपटांमधून त्याची भव्यता आणि विशाल आकार याविषयी बरंच काही पाहिलंही असेल, आणि ते खरंही आहे.

कुंभमेळ्याचं स्वरुप विशाल असतं-जितके दिव्य तितकेच भव्य ! देशविदेशातून लोक तिथे येतात आणि कुंभमेळ्याशी कायमचे जोडले जातात. कुंभमेळ्यात आस्था आणि श्रद्धेचा जनसागर लोटलेला असतो. एकाच जागी, देशविदेशातील कोट्यवधी लोक एकत्र आले असतात. कुंभमेळ्याची परंपरा आपल्या महान सांस्कृतिक वारशातून साकारलेली आणि फुललेली आहे. यावर्षी 15 जानेवारीपासून प्रयागराज येथे जगप्रसिद्ध कुंभमेळा आयोजित होत आहे, ज्याची कदाचित तुम्ही सगळेही उत्सुकतेने वाट बघत असाल. कुंभ मेळ्यासाठी आतापासूनच संत-महात्मे प्रयागराज ला पोहचू लागले आहेत. गेल्या वर्षी युनेस्कोने कुंभमेळ्याला मानवतेच्या अद्भुत सांस्कृतिक परंपरांच्या यादीत स्थान दिलं आहे, यावरुन आपल्याला त्याच्या जागतिक महत्तेची कल्पना येऊ शकते. काही दिवसांपूर्वी अनेक देशांचे राजदूत कुंभमेळ्याची तयारी बघायला आले होते. त्यावेळी तिथे एकाच वेळी अनेक देशांचे राष्ट्रध्वज फडकवले गेले. प्रयागराज मध्ये आयोजित होत असलेल्या या कुंभमेळ्यात 150 पेक्षा अधिक देशांमधील लोक येण्याची शक्यता आहे. कुंभाच्या दिव्यतेतून भारताची भव्यता संपूर्ण जगात आपल्या विविधरंगी खुणा उमटवेल.कुंभमेळा स्वतःचा शोध घेण्याचं प्रभावी माध्यम आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी अनुभूती होत असते. संसारतल्या व्यावहारिक गोष्टींकडे आपण आध्यात्मिक दृष्टीने बघतो-जाणून घेतो. विशेषतः युवकांसाठी हा एक खूप मोठा शैक्षणिक अनुभवच असतो. मी स्वतः काही दिवसांपूर्वीच प्रयागराजला गेलो होतो. मी तिथे पाहिलं की कुंभमेळ्याची तयारी अगदी जोमाने सुरु आहे. प्रयागराजचे लोकही कुंभमेळ्याविषयी अत्यंत उत्साहात आहेत. मी तिथे एकीकृत निर्देश आणि नियंत्रण केंद्राचे लोकार्पण केले. भाविकांना या केंद्रामुळे मोठ्या सुविधा मिळणार आहेत. यावर्षी कुंभमेळ्यात स्वच्छतेवर देखील भर दिला जात आहे. कुंभाच्या आयोजनात स्वच्छतेसोबतच साफसफाईकडे लक्ष दिलं गेलं, तर त्याचा चांगला संदेश दूरपर्यत पोहोचेल.यावर्षी भाविक त्रिवेणी संगमातल्या पवित्र स्नानानंतर अक्षयवटाचे पुण्यदर्शन देखील करु शकेल. भाविकांच्या आस्थेचं प्रतीक असलेला हा अक्षयवट कित्येक वर्षांपासून एका किल्यात बंद होता, त्यामुळे इच्छा असूनही भाविक त्याचे दर्शन घेऊ शकत नव्हते. मात्र आता, या अक्षयवटाच्या किल्याची दारं सर्वांसाठी खुली करण्यात आली आहेत. मी तुम्हाला आग्रह करेन की जेव्हा तुम्ही कुंभमेळ्याला जाल, तेव्हा कुंभमेळ्याचे विविध पैलू आणि रंग दाखवणारे काही फोटो सोशल मिडियावर नक्की अपलोड करा, ते फोटो बघून अधिकाधिक लोकांना या कुंभमेळ्याला जायची प्रेरणा मिळेल.

अध्यात्माचा हा कुंभ भारतीयांसाठी भारतात दर्शनांचा महाकुंभ बनो.

आस्थेचा हा कुंभ राष्ट्रीयतेचाही महाकुंभ बनो.

राष्ट्रीय एकतेचाही महाकुंभ बनो.

भाविकांचा हा कुंभ जगभरातील पर्यटकांचाही महाकुंभ बनो.

कलात्मकतेचा हा कुंभ, सृजन शक्तींचाही महाकुंभ बनो.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, 26 जानेवारीच्या गणराज्य दिनाच्या कार्यक्रमाविषयी आपल्या सर्व देशबांधवांच्या मनात खूप उत्सुकता असते. त्यादिवशी आपण आपल्याला संविधानाची भेट देणाऱ्या देशातील महान विभूतींचं स्मरण करतो.

या वर्षी आपण पूज्य बापूंची 150 वी जयंती साजरी करतो आहोत.आपल्यासाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती श्री सिरील रामाफोसा, यावर्षी गणराज्य दिवसाचे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. पूज्य बापू आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एक अतूट नातं आहे. दक्षिण आफ्रिकेतूनच’मोहन’, ‘महात्मा’ बनून आले. दक्षिण आफ्रिकेतच महात्मा गांधी यांनी आपला पहिला सत्याग्रह सुरु केला आणि वर्णभेदाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिलेत. त्यांनीच फिनिक्स आणि टॉलस्टॉय फार्म्सचीही स्थापना केली, तिथूनच संपूर्ण जगात शांती आणि न्यायासाठी आवाज उठवला गेला. 2018 हे वर्ष, नेल्सन मंडेला यांचेही जनशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यांना ‘मडीबा’ या नावानेही ओळखले जाते.

नेल्सन मंडेला, हे संपूर्ण जगात वर्णभेदाविरुद्धच्या लढ्यातील एक आदर्श मानले जातात, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. आणि मंडेला यांचे प्रेरणास्रोत कोण होते ? त्यांना इतकी वर्षे तुरुंगवास सोसण्याची सहनशक्ती आणि प्रेरणा, आदरणीय बापूंकडून मिळाली होती. मंडेला यांनी बापूंबद्दल बोलताना म्हटले होते, “महात्मा गांधी हे आमच्या इतिहासाचे अविभाज्य घटक आहेत. कारण याच ठिकाणी त्यांनी सत्याचा पहिला प्रयोग केला होता, याच ठिकाणी त्यांनी न्यायाप्रति आपला विलक्षण आग्रह सिद्ध केला होता, याच ठिकाणी त्यांनी आपल्या सत्याग्रहाचे दर्शन आणि संघर्षाच्या पद्धती विकसित केल्या.” ते बापूंना आपला आदर्श मानत होते. बापू आणि मंडेला, दोघेही संपूर्ण जगासाठी केवळ प्रेरणास्रोत नाहीत, तर त्यांचे आदर्श, आपल्याला प्रेम आणि करुणेने परिपूर्ण अशा समाजाच्या निर्मितीसाठी सदैव प्रोत्साहित करतात.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये नर्मदातटावर केवडिया येथे डीजीपी परिषद झाली. तेथे जगातील सर्वात उंच पुतळा अर्थात ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आहे. त्या ठिकाणी देशातील सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्यांसोबत साधक-बाधक चर्चा झाली.देश आणि देशवासीयांची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी कशा प्रकारची पावले उचलली जावीत, याबाबत सविस्तर विचार-विनिमय करण्यात आला. त्याच दरम्यान मी राष्ट्रीय एकतेसाठी सरदार पटेल पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली. कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय एकतेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. सरदार पटेल यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या एकतेसाठी समर्पित केले होते. ते नेहमीच भारताची अखंडता अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील राहिले. येथील विविधतेमध्येच भारताची खरी ताकद एकवटली आहे, असे सरदार पटेल मानत असत. त्यांच्या त्या भावनेचा आदर करत, एकतेच्या या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, 13 जानेवारी हा गुरु गोबिंद सिंह जी यांच्या जयंतीचा पवित्र दिवस आहे. गुरु गोबिंद सिंह जी यांचा जन्म पाटणा येथे झाला होता, आयुष्यातील बराच काळ उत्तर भारत ही त्यांची कर्मभूमी होती आणि महाराष्ट्रात नांदेड येथे त्यांनी अखेर प्राणत्याग केला. जन्मभूमी पाटणा, कर्मभूमी उत्तर भारत आणि जीवनाची अखेर नांदेडमध्ये. अशा प्रकारे एका अर्थाने संपूर्ण भारतवर्षाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला. त्यांच्या आयुष्यावर नजर टाकली तर त्यात संपूर्ण भारताचे प्रतिबिंब पाहायला मिळते. पिता श्री गुरू तेग बहादुर जी शहीद झाल्यानंतर गुरु गोबिंद सिंह जीं नी नऊ वर्षांच्या अल्पायुष्यात गुरुचे पद प्राप्त केले. न्यायासाठी लढा देण्याचे साहस गुरू गोविंद सिंगजी यांना गुरूंकडून वारसाच्या रूपातच मिळाले. त्यांचे व्यक्तिमत्व शांत आणि सरळ होते. मात्र जेव्हा जेव्हा गरीब आणि दुर्बलांची मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न झाले, त्यांच्यावर जेव्हा जेव्हा अन्याय झाला, त्या प्रत्येक वेळी गुरुगोविंद सिंग यांनी गरीब आणि दुर्बलांसाठी प्रखर लढा दिला आणि म्हणूनच म्हटले जाते की…

“सवा लाख से एक लड़ाऊँ,

चिड़ियों सों मैं बाज तुड़ाऊँ,

तबे गोबिंदसिंह नाम कहाऊँ |

ते म्हणत असत की दुर्बलांविरुद्ध लढाई करून आपल्या शक्तीचे प्रदर्शन करणे योग्य नाही. मानवाची दुःखे दूर करणे, ही सर्वात मोठी सेवा आहे, असे श्री गुरु गोबिंद सिंह जी मानत असत. साहस, शौर्य, त्याग आणि धर्मपरायणतेने परिपूर्ण, असे ते एक दिव्य पुरुष होते, ज्यांना शस्त्र आणि शास्त्र दोन्हींचे पुरेपूर ज्ञान होते. ते एक उत्तम तिरंदाज होते, त्याचबरोबर गुरुमुखी, संस्कृत, फारशी, हिंदी आणि उर्दूसह इतर अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. मी पुन्हा एकदा श्री गुरु गोबिंद सिंग यांना वंदन करतो.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, देशात अशा अनेक चांगल्या गोष्टी होत असतात ज्यांची व्यापक स्तरावर चर्चा होत नाही. असाच एक उपक्रम F.S.S.A.I अर्थात भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण राबवत आहे. महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच मालिकेचा एक भाग म्हणून F.S.S.A.I तर्फे आहाराच्या सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण सवयींना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. “Eat Right India” मोहिमेअंतर्गत, स्वस्थ भारत यात्रांचे आयोजन केले जात आहे. ही मोहीम 27 जानेवारीपर्यंत सुरू राहील. अनेकदा सरकारी संघटनांचा परिचय अतिशय साचेबद्ध पद्धतीने करून दिला जातो, मात्र त्यापुढे एक पाऊल टाकत F.S.S.A.I. जनजागृती बरोबरच लोकशिक्षणाचे काम करीत आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. जेव्हा भारत स्वच्छ असेल, आरोग्यपूर्ण असेल, तेव्हाच भारत समृद्ध होऊ शकेल. चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक भोजन ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. याच संदर्भात F.S.S.A.I. ने हाती घेतलेल्या या उपक्रमाबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असा आग्रह मी आपणाला करू इच्छितो. आपणही यात सहभागी व्हावे आणि विशेष करून मुलांना या गोष्टी नक्कीच दाखवा, असे मी सांगू इच्छितो. आहाराचे महत्त्व सांगणारे शिक्षण लहानपणापासूनच मिळणे आवश्यक असते.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, 2018 या वर्षातील हा शेवटचा कार्यक्रम आहे. 2019 या वर्षात आपण पुन्हा एकदा भेटू. पुन्हा एकदा मनातील गोष्टी बोलू. आयुष्य, मग ते व्यक्तीचे असो, राष्ट्राचे असो वा समाजाचे असो, प्रेरणा ही त्या आयुष्याच्या प्रगतीचा पाया असते. अशी नवी प्रेरणा, नवा उत्साह, नवा संकल्प, नवी सिद्धी आणि नवी उंची यांसह पुढे जाऊया, पुढे पाऊल टाकू या. स्वतःत बदल घडवू या आणि देशालाही बदलू या. अनेकानेक धन्यवाद!!!

 

  • Priya Satheesh January 15, 2025

    🐯
  • krishangopal sharma Bjp January 12, 2025

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌹🌷🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌹🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
  • krishangopal sharma Bjp January 12, 2025

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌹🌷🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌹🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
  • krishangopal sharma Bjp January 12, 2025

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌹🌷🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌹🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
  • ram Sagar pandey November 04, 2024

    🌹🌹🙏🙏🌹🌹जय श्रीकृष्णा राधे राधे 🌹🙏🏻🌹जय माता दी 🚩🙏🙏जय श्रीराम 🙏💐🌹
  • Pradhuman Singh Tomar July 25, 2024

    bjp
  • Pawan Jain April 17, 2024

    नमो नमो
  • rida rashid February 19, 2024

    Jay shree ram
  • Maruti Wagh February 16, 2024

    👍
  • Subhamay Sarkar February 09, 2024

    জয় শ্রী রাম
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

Media Coverage

"Huge opportunity": Japan delegation meets PM Modi, expressing their eagerness to invest in India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of PM’s speech at TV9 Summit 2025
March 28, 2025
QuoteToday, the world's eyes are on India: PM
QuoteIndia's youth is rapidly becoming skilled and driving innovation forward: PM
Quote"India First" has become the mantra of India's foreign policy: PM
QuoteToday, India is not just participating in the world order but also contributing to shaping and securing the future: PM
QuoteIndia has given Priority to humanity over monopoly: PM
QuoteToday, India is not just a Nation of Dreams but also a Nation That Delivers: PM

श्रीमान रामेश्वर गारु जी, रामू जी, बरुन दास जी, TV9 की पूरी टीम, मैं आपके नेटवर्क के सभी दर्शकों का, यहां उपस्थित सभी महानुभावों का अभिनंदन करता हूं, इस समिट के लिए बधाई देता हूं।

TV9 नेटवर्क का विशाल रीजनल ऑडियंस है। और अब तो TV9 का एक ग्लोबल ऑडियंस भी तैयार हो रहा है। इस समिट में अनेक देशों से इंडियन डायस्पोरा के लोग विशेष तौर पर लाइव जुड़े हुए हैं। कई देशों के लोगों को मैं यहां से देख भी रहा हूं, वे लोग वहां से वेव कर रहे हैं, हो सकता है, मैं सभी को शुभकामनाएं देता हूं। मैं यहां नीचे स्क्रीन पर हिंदुस्तान के अनेक शहरों में बैठे हुए सब दर्शकों को भी उतने ही उत्साह, उमंग से देख रहा हूं, मेरी तरफ से उनका भी स्वागत है।

साथियों,

आज विश्व की दृष्टि भारत पर है, हमारे देश पर है। दुनिया में आप किसी भी देश में जाएं, वहां के लोग भारत को लेकर एक नई जिज्ञासा से भरे हुए हैं। आखिर ऐसा क्या हुआ कि जो देश 70 साल में ग्यारहवें नंबर की इकोनॉमी बना, वो महज 7-8 साल में पांचवे नंबर की इकोनॉमी बन गया? अभी IMF के नए आंकड़े सामने आए हैं। वो आंकड़े कहते हैं कि भारत, दुनिया की एकमात्र मेजर इकोनॉमी है, जिसने 10 वर्षों में अपने GDP को डबल किया है। बीते दशक में भारत ने दो लाख करोड़ डॉलर, अपनी इकोनॉमी में जोड़े हैं। GDP का डबल होना सिर्फ आंकड़ों का बदलना मात्र नहीं है। इसका impact देखिए, 25 करोड़ लोग गरीबी से बाहर निकले हैं, और ये 25 करोड़ लोग एक नियो मिडिल क्लास का हिस्सा बने हैं। ये नियो मिडिल क्लास, एक प्रकार से नई ज़िंदगी शुरु कर रहा है। ये नए सपनों के साथ आगे बढ़ रहा है, हमारी इकोनॉमी में कंट्रीब्यूट कर रहा है, और उसको वाइब्रेंट बना रहा है। आज दुनिया की सबसे बड़ी युवा आबादी हमारे भारत में है। ये युवा, तेज़ी से स्किल्ड हो रहा है, इनोवेशन को गति दे रहा है। और इन सबके बीच, भारत की फॉरेन पॉलिसी का मंत्र बन गया है- India First, एक जमाने में भारत की पॉलिसी थी, सबसे समान रूप से दूरी बनाकर चलो, Equi-Distance की पॉलिसी, आज के भारत की पॉलिसी है, सबके समान रूप से करीब होकर चलो, Equi-Closeness की पॉलिसी। दुनिया के देश भारत की ओपिनियन को, भारत के इनोवेशन को, भारत के एफर्ट्स को, जैसा महत्व आज दे रहे हैं, वैसा पहले कभी नहीं हुआ। आज दुनिया की नजर भारत पर है, आज दुनिया जानना चाहती है, What India Thinks Today.

|

साथियों,

भारत आज, वर्ल्ड ऑर्डर में सिर्फ पार्टिसिपेट ही नहीं कर रहा, बल्कि फ्यूचर को शेप और सेक्योर करने में योगदान दे रहा है। दुनिया ने ये कोरोना काल में अच्छे से अनुभव किया है। दुनिया को लगता था कि हर भारतीय तक वैक्सीन पहुंचने में ही, कई-कई साल लग जाएंगे। लेकिन भारत ने हर आशंका को गलत साबित किया। हमने अपनी वैक्सीन बनाई, हमने अपने नागरिकों का तेज़ी से वैक्सीनेशन कराया, और दुनिया के 150 से अधिक देशों तक दवाएं और वैक्सीन्स भी पहुंचाईं। आज दुनिया, और जब दुनिया संकट में थी, तब भारत की ये भावना दुनिया के कोने-कोने तक पहुंची कि हमारे संस्कार क्या हैं, हमारा तौर-तरीका क्या है।

साथियों,

अतीत में दुनिया ने देखा है कि दूसरे विश्व युद्ध के बाद जब भी कोई वैश्विक संगठन बना, उसमें कुछ देशों की ही मोनोपोली रही। भारत ने मोनोपोली नहीं बल्कि मानवता को सर्वोपरि रखा। भारत ने, 21वीं सदी के ग्लोबल इंस्टीट्यूशन्स के गठन का रास्ता बनाया, और हमने ये ध्यान रखा कि सबकी भागीदारी हो, सबका योगदान हो। जैसे प्राकृतिक आपदाओं की चुनौती है। देश कोई भी हो, इन आपदाओं से इंफ्रास्ट्रक्चर को भारी नुकसान होता है। आज ही म्यांमार में जो भूकंप आया है, आप टीवी पर देखें तो बहुत बड़ी-बड़ी इमारतें ध्वस्त हो रही हैं, ब्रिज टूट रहे हैं। और इसलिए भारत ने Coalition for Disaster Resilient Infrastructure - CDRI नाम से एक वैश्विक नया संगठन बनाने की पहल की। ये सिर्फ एक संगठन नहीं, बल्कि दुनिया को प्राकृतिक आपदाओं के लिए तैयार करने का संकल्प है। भारत का प्रयास है, प्राकृतिक आपदा से, पुल, सड़कें, बिल्डिंग्स, पावर ग्रिड, ऐसा हर इंफ्रास्ट्रक्चर सुरक्षित रहे, सुरक्षित निर्माण हो।

साथियों,

भविष्य की चुनौतियों से निपटने के लिए हर देश का मिलकर काम करना बहुत जरूरी है। ऐसी ही एक चुनौती है, हमारे एनर्जी रिसोर्सेस की। इसलिए पूरी दुनिया की चिंता करते हुए भारत ने International Solar Alliance (ISA) का समाधान दिया है। ताकि छोटे से छोटा देश भी सस्टेनबल एनर्जी का लाभ उठा सके। इससे क्लाइमेट पर तो पॉजिटिव असर होगा ही, ये ग्लोबल साउथ के देशों की एनर्जी नीड्स को भी सिक्योर करेगा। और आप सबको ये जानकर गर्व होगा कि भारत के इस प्रयास के साथ, आज दुनिया के सौ से अधिक देश जुड़ चुके हैं।

साथियों,

बीते कुछ समय से दुनिया, ग्लोबल ट्रेड में असंतुलन और लॉजिस्टिक्स से जुड़ी challenges का सामना कर रही है। इन चुनौतियों से निपटने के लिए भी भारत ने दुनिया के साथ मिलकर नए प्रयास शुरु किए हैं। India–Middle East–Europe Economic Corridor (IMEC), ऐसा ही एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट है। ये प्रोजेक्ट, कॉमर्स और कनेक्टिविटी के माध्यम से एशिया, यूरोप और मिडिल ईस्ट को जोड़ेगा। इससे आर्थिक संभावनाएं तो बढ़ेंगी ही, दुनिया को अल्टरनेटिव ट्रेड रूट्स भी मिलेंगे। इससे ग्लोबल सप्लाई चेन भी और मजबूत होगी।

|

साथियों,

ग्लोबल सिस्टम्स को, अधिक पार्टिसिपेटिव, अधिक डेमोक्रेटिक बनाने के लिए भी भारत ने अनेक कदम उठाए हैं। और यहीं, यहीं पर ही भारत मंडपम में जी-20 समिट हुई थी। उसमें अफ्रीकन यूनियन को जी-20 का परमानेंट मेंबर बनाया गया है। ये बहुत बड़ा ऐतिहासिक कदम था। इसकी मांग लंबे समय से हो रही थी, जो भारत की प्रेसीडेंसी में पूरी हुई। आज ग्लोबल डिसीजन मेकिंग इंस्टीट्यूशन्स में भारत, ग्लोबल साउथ के देशों की आवाज़ बन रहा है। International Yoga Day, WHO का ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन, आर्टिफिशियल इंटेलीजेंस के लिए ग्लोबल फ्रेमवर्क, ऐसे कितने ही क्षेत्रों में भारत के प्रयासों ने नए वर्ल्ड ऑर्डर में अपनी मजबूत उपस्थिति दर्ज कराई है, और ये तो अभी शुरूआत है, ग्लोबल प्लेटफॉर्म पर भारत का सामर्थ्य नई ऊंचाई की तरफ बढ़ रहा है।

साथियों,

21वीं सदी के 25 साल बीत चुके हैं। इन 25 सालों में 11 साल हमारी सरकार ने देश की सेवा की है। और जब हम What India Thinks Today उससे जुड़ा सवाल उठाते हैं, तो हमें ये भी देखना होगा कि Past में क्या सवाल थे, क्या जवाब थे। इससे TV9 के विशाल दर्शक समूह को भी अंदाजा होगा कि कैसे हम, निर्भरता से आत्मनिर्भरता तक, Aspirations से Achievement तक, Desperation से Development तक पहुंचे हैं। आप याद करिए, एक दशक पहले, गांव में जब टॉयलेट का सवाल आता था, तो माताओं-बहनों के पास रात ढलने के बाद और भोर होने से पहले का ही जवाब होता था। आज उसी सवाल का जवाब स्वच्छ भारत मिशन से मिलता है। 2013 में जब कोई इलाज की बात करता था, तो महंगे इलाज की चर्चा होती थी। आज उसी सवाल का समाधान आयुष्मान भारत में नजर आता है। 2013 में किसी गरीब की रसोई की बात होती थी, तो धुएं की तस्वीर सामने आती थी। आज उसी समस्या का समाधान उज्ज्वला योजना में दिखता है। 2013 में महिलाओं से बैंक खाते के बारे में पूछा जाता था, तो वो चुप्पी साध लेती थीं। आज जनधन योजना के कारण, 30 करोड़ से ज्यादा बहनों का अपना बैंक अकाउंट है। 2013 में पीने के पानी के लिए कुएं और तालाबों तक जाने की मजबूरी थी। आज उसी मजबूरी का हल हर घर नल से जल योजना में मिल रहा है। यानि सिर्फ दशक नहीं बदला, बल्कि लोगों की ज़िंदगी बदली है। और दुनिया भी इस बात को नोट कर रही है, भारत के डेवलपमेंट मॉडल को स्वीकार रही है। आज भारत सिर्फ Nation of Dreams नहीं, बल्कि Nation That Delivers भी है।

साथियों,

जब कोई देश, अपने नागरिकों की सुविधा और समय को महत्व देता है, तब उस देश का समय भी बदलता है। यही आज हम भारत में अनुभव कर रहे हैं। मैं आपको एक उदाहरण देता हूं। पहले पासपोर्ट बनवाना कितना बड़ा काम था, ये आप जानते हैं। लंबी वेटिंग, बहुत सारे कॉम्प्लेक्स डॉक्यूमेंटेशन का प्रोसेस, अक्सर राज्यों की राजधानी में ही पासपोर्ट केंद्र होते थे, छोटे शहरों के लोगों को पासपोर्ट बनवाना होता था, तो वो एक-दो दिन कहीं ठहरने का इंतजाम करके चलते थे, अब वो हालात पूरी तरह बदल गया है, एक आंकड़े पर आप ध्यान दीजिए, पहले देश में सिर्फ 77 पासपोर्ट सेवा केंद्र थे, आज इनकी संख्या 550 से ज्यादा हो गई है। पहले पासपोर्ट बनवाने में, और मैं 2013 के पहले की बात कर रहा हूं, मैं पिछले शताब्दी की बात नहीं कर रहा हूं, पासपोर्ट बनवाने में जो वेटिंग टाइम 50 दिन तक होता था, वो अब 5-6 दिन तक सिमट गया है।

साथियों,

ऐसा ही ट्रांसफॉर्मेशन हमने बैंकिंग इंफ्रास्ट्रक्चर में भी देखा है। हमारे देश में 50-60 साल पहले बैंकों का नेशनलाइजेशन किया गया, ये कहकर कि इससे लोगों को बैंकिंग सुविधा सुलभ होगी। इस दावे की सच्चाई हम जानते हैं। हालत ये थी कि लाखों गांवों में बैंकिंग की कोई सुविधा ही नहीं थी। हमने इस स्थिति को भी बदला है। ऑनलाइन बैंकिंग तो हर घर में पहुंचाई है, आज देश के हर 5 किलोमीटर के दायरे में कोई न कोई बैंकिंग टच प्वाइंट जरूर है। और हमने सिर्फ बैंकिंग इंफ्रास्ट्रक्चर का ही दायरा नहीं बढ़ाया, बल्कि बैंकिंग सिस्टम को भी मजबूत किया। आज बैंकों का NPA बहुत कम हो गया है। आज बैंकों का प्रॉफिट, एक लाख 40 हज़ार करोड़ रुपए के नए रिकॉर्ड को पार कर चुका है। और इतना ही नहीं, जिन लोगों ने जनता को लूटा है, उनको भी अब लूटा हुआ धन लौटाना पड़ रहा है। जिस ED को दिन-रात गालियां दी जा रही है, ED ने 22 हज़ार करोड़ रुपए से अधिक वसूले हैं। ये पैसा, कानूनी तरीके से उन पीड़ितों तक वापिस पहुंचाया जा रहा है, जिनसे ये पैसा लूटा गया था।

साथियों,

Efficiency से गवर्नमेंट Effective होती है। कम समय में ज्यादा काम हो, कम रिसोर्सेज़ में अधिक काम हो, फिजूलखर्ची ना हो, रेड टेप के बजाय रेड कार्पेट पर बल हो, जब कोई सरकार ये करती है, तो समझिए कि वो देश के संसाधनों को रिस्पेक्ट दे रही है। और पिछले 11 साल से ये हमारी सरकार की बड़ी प्राथमिकता रहा है। मैं कुछ उदाहरणों के साथ अपनी बात बताऊंगा।

|

साथियों,

अतीत में हमने देखा है कि सरकारें कैसे ज्यादा से ज्यादा लोगों को मिनिस्ट्रीज में accommodate करने की कोशिश करती थीं। लेकिन हमारी सरकार ने अपने पहले कार्यकाल में ही कई मंत्रालयों का विलय कर दिया। आप सोचिए, Urban Development अलग मंत्रालय था और Housing and Urban Poverty Alleviation अलग मंत्रालय था, हमने दोनों को मर्ज करके Housing and Urban Affairs मंत्रालय बना दिया। इसी तरह, मिनिस्ट्री ऑफ ओवरसीज़ अफेयर्स अलग था, विदेश मंत्रालय अलग था, हमने इन दोनों को भी एक साथ जोड़ दिया, पहले जल संसाधन, नदी विकास मंत्रालय अलग था, और पेयजल मंत्रालय अलग था, हमने इन्हें भी जोड़कर जलशक्ति मंत्रालय बना दिया। हमने राजनीतिक मजबूरी के बजाय, देश की priorities और देश के resources को आगे रखा।

साथियों,

हमारी सरकार ने रूल्स और रेगुलेशन्स को भी कम किया, उन्हें आसान बनाया। करीब 1500 ऐसे कानून थे, जो समय के साथ अपना महत्व खो चुके थे। उनको हमारी सरकार ने खत्म किया। करीब 40 हज़ार, compliances को हटाया गया। ऐसे कदमों से दो फायदे हुए, एक तो जनता को harassment से मुक्ति मिली, और दूसरा, सरकारी मशीनरी की एनर्जी भी बची। एक और Example GST का है। 30 से ज्यादा टैक्सेज़ को मिलाकर एक टैक्स बना दिया गया है। इसको process के, documentation के हिसाब से देखें तो कितनी बड़ी बचत हुई है।

साथियों,

सरकारी खरीद में पहले कितनी फिजूलखर्ची होती थी, कितना करप्शन होता था, ये मीडिया के आप लोग आए दिन रिपोर्ट करते थे। हमने, GeM यानि गवर्नमेंट ई-मार्केटप्लेस प्लेटफॉर्म बनाया। अब सरकारी डिपार्टमेंट, इस प्लेटफॉर्म पर अपनी जरूरतें बताते हैं, इसी पर वेंडर बोली लगाते हैं और फिर ऑर्डर दिया जाता है। इसके कारण, भ्रष्टाचार की गुंजाइश कम हुई है, और सरकार को एक लाख करोड़ रुपए से अधिक की बचत भी हुई है। डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर- DBT की जो व्यवस्था भारत ने बनाई है, उसकी तो दुनिया में चर्चा है। DBT की वजह से टैक्स पेयर्स के 3 लाख करोड़ रुपए से ज्यादा, गलत हाथों में जाने से बचे हैं। 10 करोड़ से ज्यादा फर्ज़ी लाभार्थी, जिनका जन्म भी नहीं हुआ था, जो सरकारी योजनाओं का फायदा ले रहे थे, ऐसे फर्जी नामों को भी हमने कागजों से हटाया है।

साथियों,

 

हमारी सरकार टैक्स की पाई-पाई का ईमानदारी से उपयोग करती है, और टैक्सपेयर का भी सम्मान करती है, सरकार ने टैक्स सिस्टम को टैक्सपेयर फ्रेंडली बनाया है। आज ITR फाइलिंग का प्रोसेस पहले से कहीं ज्यादा सरल और तेज़ है। पहले सीए की मदद के बिना, ITR फाइल करना मुश्किल होता था। आज आप कुछ ही समय के भीतर खुद ही ऑनलाइन ITR फाइल कर पा रहे हैं। और रिटर्न फाइल करने के कुछ ही दिनों में रिफंड आपके अकाउंट में भी आ जाता है। फेसलेस असेसमेंट स्कीम भी टैक्सपेयर्स को परेशानियों से बचा रही है। गवर्नेंस में efficiency से जुड़े ऐसे अनेक रिफॉर्म्स ने दुनिया को एक नया गवर्नेंस मॉडल दिया है।

साथियों,

पिछले 10-11 साल में भारत हर सेक्टर में बदला है, हर क्षेत्र में आगे बढ़ा है। और एक बड़ा बदलाव सोच का आया है। आज़ादी के बाद के अनेक दशकों तक, भारत में ऐसी सोच को बढ़ावा दिया गया, जिसमें सिर्फ विदेशी को ही बेहतर माना गया। दुकान में भी कुछ खरीदने जाओ, तो दुकानदार के पहले बोल यही होते थे – भाई साहब लीजिए ना, ये तो इंपोर्टेड है ! आज स्थिति बदल गई है। आज लोग सामने से पूछते हैं- भाई, मेड इन इंडिया है या नहीं है?

साथियों,

आज हम भारत की मैन्युफैक्चरिंग एक्सीलेंस का एक नया रूप देख रहे हैं। अभी 3-4 दिन पहले ही एक न्यूज आई है कि भारत ने अपनी पहली MRI मशीन बना ली है। अब सोचिए, इतने दशकों तक हमारे यहां स्वदेशी MRI मशीन ही नहीं थी। अब मेड इन इंडिया MRI मशीन होगी तो जांच की कीमत भी बहुत कम हो जाएगी।

|

साथियों,

आत्मनिर्भर भारत और मेक इन इंडिया अभियान ने, देश के मैन्युफैक्चरिंग सेक्टर को एक नई ऊर्जा दी है। पहले दुनिया भारत को ग्लोबल मार्केट कहती थी, आज वही दुनिया, भारत को एक बड़े Manufacturing Hub के रूप में देख रही है। ये सक्सेस कितनी बड़ी है, इसके उदाहरण आपको हर सेक्टर में मिलेंगे। जैसे हमारी मोबाइल फोन इंडस्ट्री है। 2014-15 में हमारा एक्सपोर्ट, वन बिलियन डॉलर तक भी नहीं था। लेकिन एक दशक में, हम ट्वेंटी बिलियन डॉलर के फिगर से भी आगे निकल चुके हैं। आज भारत ग्लोबल टेलिकॉम और नेटवर्किंग इंडस्ट्री का एक पावर सेंटर बनता जा रहा है। Automotive Sector की Success से भी आप अच्छी तरह परिचित हैं। इससे जुड़े Components के एक्सपोर्ट में भी भारत एक नई पहचान बना रहा है। पहले हम बहुत बड़ी मात्रा में मोटर-साइकल पार्ट्स इंपोर्ट करते थे। लेकिन आज भारत में बने पार्ट्स UAE और जर्मनी जैसे अनेक देशों तक पहुंच रहे हैं। सोलर एनर्जी सेक्टर ने भी सफलता के नए आयाम गढ़े हैं। हमारे सोलर सेल्स, सोलर मॉड्यूल का इंपोर्ट कम हो रहा है और एक्सपोर्ट्स 23 गुना तक बढ़ गए हैं। बीते एक दशक में हमारा डिफेंस एक्सपोर्ट भी 21 गुना बढ़ा है। ये सारी अचीवमेंट्स, देश की मैन्युफैक्चरिंग इकोनॉमी की ताकत को दिखाती है। ये दिखाती है कि भारत में कैसे हर सेक्टर में नई जॉब्स भी क्रिएट हो रही हैं।

साथियों,

TV9 की इस समिट में, विस्तार से चर्चा होगी, अनेक विषयों पर मंथन होगा। आज हम जो भी सोचेंगे, जिस भी विजन पर आगे बढ़ेंगे, वो हमारे आने वाले कल को, देश के भविष्य को डिजाइन करेगा। पिछली शताब्दी के इसी दशक में, भारत ने एक नई ऊर्जा के साथ आजादी के लिए नई यात्रा शुरू की थी। और हमने 1947 में आजादी हासिल करके भी दिखाई। अब इस दशक में हम विकसित भारत के लक्ष्य के लिए चल रहे हैं। और हमें 2047 तक विकसित भारत का सपना जरूर पूरा करना है। और जैसा मैंने लाल किले से कहा है, इसमें सबका प्रयास आवश्यक है। इस समिट का आयोजन कर, TV9 ने भी अपनी तरफ से एक positive initiative लिया है। एक बार फिर आप सभी को इस समिट की सफलता के लिए मेरी ढेर सारी शुभकामनाएं हैं।

मैं TV9 को विशेष रूप से बधाई दूंगा, क्योंकि पहले भी मीडिया हाउस समिट करते रहे हैं, लेकिन ज्यादातर एक छोटे से फाइव स्टार होटल के कमरे में, वो समिट होती थी और बोलने वाले भी वही, सुनने वाले भी वही, कमरा भी वही। TV9 ने इस परंपरा को तोड़ा और ये जो मॉडल प्लेस किया है, 2 साल के भीतर-भीतर देख लेना, सभी मीडिया हाउस को यही करना पड़ेगा। यानी TV9 Thinks Today वो बाकियों के लिए रास्ता खोल देगा। मैं इस प्रयास के लिए बहुत-बहुत अभिनंदन करता हूं, आपकी पूरी टीम को, और सबसे बड़ी खुशी की बात है कि आपने इस इवेंट को एक मीडिया हाउस की भलाई के लिए नहीं, देश की भलाई के लिए आपने उसकी रचना की। 50,000 से ज्यादा नौजवानों के साथ एक मिशन मोड में बातचीत करना, उनको जोड़ना, उनको मिशन के साथ जोड़ना और उसमें से जो बच्चे सिलेक्ट होकर के आए, उनकी आगे की ट्रेनिंग की चिंता करना, ये अपने आप में बहुत अद्भुत काम है। मैं आपको बहुत बधाई देता हूं। जिन नौजवानों से मुझे यहां फोटो निकलवाने का मौका मिला है, मुझे भी खुशी हुई कि देश के होनहार लोगों के साथ, मैं अपनी फोटो निकलवा पाया। मैं इसे अपना सौभाग्य मानता हूं दोस्तों कि आपके साथ मेरी फोटो आज निकली है। और मुझे पक्का विश्वास है कि सारी युवा पीढ़ी, जो मुझे दिख रही है, 2047 में जब देश विकसित भारत बनेगा, सबसे ज्यादा बेनिफिशियरी आप लोग हैं, क्योंकि आप उम्र के उस पड़ाव पर होंगे, जब भारत विकसित होगा, आपके लिए मौज ही मौज है। आपको बहुत-बहुत शुभकामनाएं।

धन्यवाद।