QuoteIn 2018, the world's largest health insurance scheme 'Ayushman Bharat' was launched, every village of the country got electricity: PM Modi #MannKiBaat
QuoteOur festivals represent 'Unity in Diversity' and 'Ek Bharat, Shreshtha Bharat': PM Modi during #MannKiBaat
QuoteThe global importance that Kumbh holds is very well exemplified from the fact that UNESCO has described it as ‘Intangible Cultural Heritage of Humanity': PM during #MannKiBaat
QuoteKumbh in itself is grand in nature. It is divine as well as beautiful: PM Modi during #MannKiBaat
QuoteThis time, every devotee will be able to offer prayers at Akshay Vat after the holy bath in the Sangam: Prime Minister Modi during #MannKiBaat
QuotePujya Bapu’s connect with South Africa is unbreakable. It was in South Africa, where Mohan became the 'Mahatma': Prime Minister Modi #MannKiBaat
QuoteMahatma Gandhi had started his first Satyagraha in South Africa and he stood against the discrimination based on the colour of one's skin: PM #MannKiBaat
QuoteSardar Patel dedicated his entire life towards uniting India. He devoted every moment of his life to protect the nation's integrity: PM Modi during #MannKiBaat
QuoteGuru Gobind Singh Ji was born in Patna, His karmabhoomi was North India and He sacrificed His life in Maharashtra’s Nanded: PM during #MannKiBaat
QuoteGuru Gobind Singh Ji calm but whenever, an attempt was made to suppress the voice of the poor and the weak, then Guru Gobind Singh Ji raised his voice and stood firmly with the poor: PM #MannKiBaat
QuoteGuru Gobind Singh Ji always used to say that strength cannot be demonstrated by fighting weak sections: PM Modi #MannKiBaat

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. वर्ष 2018 संपणार आहे. आपण 2019 मध्ये प्रवेश करणार आहोत. अशा वेळी स्वाभाविकपणे गेल्या वर्षात घडलेल्या घटनांची चर्चा केली जाते,तसेच येणाऱ्या वर्षासाठीच्या संकल्पांची देखील चर्चा होते. व्यक्तीचे जीवन असो, समाजाचे जीवन असो, राष्ट्राचे जीवन असो, प्रत्येकाला सिंहावलोकन करतानाच, भविष्यात शक्य तितकं दूरवर बघण्याचा प्रयत्न देखील करायचा असतो. आणि तेंव्हाच अनुभवांचा फायदा होतो, आणि निवड करण्याचा आत्मविश्वास देखील निर्माण होतो. आपण असं काय करू शकतो, ज्यामुळे आपल्या जीवनात बदल घडवून येईल, त्यासोबतच समाज आणि देश पुढे नेण्यात आले योगदान देता येईल. आपणा सर्वांना 2019च्या अनेक शुभेच्छा. 2018च्या कुठल्या आठवणी सोबत ठेवायच्या हे आपणा सर्वांनी ठरवलंच असेल. 2018 हे वर्ष भारत एक देश म्हणून, आपल्या एकशे तीस कोटी जनतेची ताकद म्हणून कसं लक्षात ठेवलं जाईल हे देखील महत्वाचे आहे. आणि आम्हा सर्वांचा ऊर अभिमानाने भरून टाकणारे देखील आहे.

2018 मध्ये जगातील सर्वात मोठ्या ‘आयुष्यमान भारत’ ह्या आरोग्य विमा योजनेचा शुभारंभ झाला. देशाच्या प्रत्येक खेड्यात वीज पोहोचली. जगातील प्रतिष्ठित संस्थांनी मान्य केलं की भारत विक्रमी वेगाने गरिबी निर्मूलनाचे काम करत आहे. देशवासीयांच्या अटळ संकल्पाने स्वच्छतेची व्याप्ती 95%च्या पुढे नेण्याच्या दिशेने अग्रेसर होत आहे.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आझाद हिंद सरकारच्या 75व्या स्थापना दिवशी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला गेला. देशाला एकतेच्या धाग्यात ओवणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या सन्मानार्थ जगातील सर्वात उंच पुतळा ‘Staute of Unity’ देशाला मिळाला. जगात देशाचे नाव उंचावले गेले. संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार ‘Champion of the Earth’ देशाला देण्यात आला. सौर उर्जा आणि वातावरण बदलासाठी केलेल्या भारताच्या प्रयत्नांना जगात स्थान मिळालं. ‘जागतिक सौर आघाडी’ची पहिली बैठक भारतात झाली. आपल्या सामुहिक प्रयत्नांमुळेच भारताच्या व्यापार सुलभतेच्या क्रमवारीत अभूतपूर्व वाढ झाली. देशाची संरक्षणसज्जता अधिक मजबूत झाली. ह्याच वर्षी आपल्या देशाने आण्विक त्रिकोण यशस्वीपणे पूर्ण केला. म्हणजे आता आपण लष्कर,नौदल आणि वायुदल या तिन्ही क्षेत्रांत अण्वस्त्र सज्ज झालो आहोत. देशाच्या कन्यांनी सागर परीक्रमेद्वारे विश्व भ्रमण केले आणि देशाचा ऊर अभिमानाने भरून आला. वाराणसीमध्ये भारताच्या पहिल्या जलवाहतुकीची सुरवात झाली. ह्यामुळे जलमार्ग क्षेत्रात क्रांतीची सुरवात झाली आहे. देशातल्या सर्वात लांब रेल्वे-रस्ता पुलाचे उद्घाटन झाले. सिक्कीमच्या पहिल्या आणि देशातल्या 100व्या पाक्योंग विमानतळाचे उद्घाटन झाले. 19 वर्षांखालील क्रिकेटचा विश्वचषक, अंध क्रिकेट विश्वचषक देखील भारताने जिंकला. ह्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने मोठ्या संख्येने पदकांची कमाई केली. पॅरा आशियाई स्पर्धेत देखील भारताने चांगली कामगिरी केली. जर मी प्रत्येक भारतीयाच्या पुरुषार्थ आपल्या सामुहिक प्रयत्नांविषयी बोलत राहिलो तर आपली ‘मन की बात’ इतकी लांबेल कि 2019 उजाडेल. हे सगळं 130 कोटी देशबांधवांच्या अथक प्रयत्नांनीच शक्य झालं आहे. मला आशा आहे कि, 2019 मध्ये देखील भारताची प्रगती आणि उन्नती अशीच सुरु राहील आणि आपला देश अधिक ताकदीने यशाची नवी शिखरं सर करेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, ह्या डिसेंबरमध्ये आपण काही असामान्य भारतीयांना मुकलो आहोत. 19 डिसेंबरला चेन्नईमध्ये डॉक्टर जयाचंद्रन याचं निधन झालं. डॉक्टर जयाचंद्रन यांना लोक प्रेमाने ‘मक्कल मारुथुवर’ म्हणत असत. कारण लोकांनी त्यांना आपल्या मनात स्थान दिलं होतं. डॉक्टर जयाचंद्रन गरिबांना सगळ्यात स्वस्त उपचार देणारे म्हणून ओळखले जात. लोक सांगतात कि रुग्णसेवेसाठी ते सैद्यव तत्पर असत. त्यांच्याकडे येणाऱ्या वयस्क रुग्णांना तर ते येण्याजाण्याचा खर्च देखील देत असत. www.thebetterindia.com ह्या संकेतस्थळावर मी त्यांच्या समाजाला प्रेरक अशा कार्याविषयी अनेक लेख वाचले आहेत.

त्याचप्रमाणे, 25 डिसेंबरला कर्नाटकातील सुलागिट्टीनरसम्मा यांचे निधन झाले. सुलागिट्टी नरसम्मा ह्या सुईण होत्या. कर्नाटकातील दुर्गम भागातील माता भगिनींना त्या प्रसूतीमध्ये मदत करत असत. ह्याच वर्षीच्या सुरवातीला त्यांना ‘पद्मश्री’ ने सन्मानित करण्यात आलं होतं. डॉ. जयचंद्रन आणि सुलागिट्टी नरसम्मा यांच्यासारख्या अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी समाजाच्या भल्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. आपण आरोग्य सेवेविषयी बोलत आहोत, तर, उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील डॉक्टरांनी सुरु केलेल्या सामाजिक प्रयत्नांविषयी वोलायला मला आवडेल. अलीकडेच आमच्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं कि शहरातले काही तरुण डॉक्टर शिबिरं आयोजित करून गरीब रुग्णांना मोफत उपचार देतात. इथल्या हार्ट लंग क्रिटिकल केअर तर्फे दर महिन्यात असे शिबीर घेतले जाते. ह्या शिबिरांत अनेक प्रकारच्या रोगांवर मोफत इलाज करण्याची सोय असते. आज दर महिन्यात शेकडो गरीब रुग्ण ह्या शिबिरांचा लाभ घेतात. निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा करत असलेल्या ह्या तरुण डॉक्टरांचा उत्साह खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. आज मला हे सांगताना अभिमान वाटतो कि सामुहिक प्रयत्नामुळेच ‘स्वच्छ भारत अभियान ’ यशस्वी झालं आहे. मला काही लोकांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये जवळपास तीन लाखाहून जास्त लोकांनी स्वच्छता मोहीम राबविली. स्वच्छतेच्या ह्या महायज्ञात नगर पालिका, स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालये, जबलपूरचे जनता जनार्दन, सगळ्या लोकांनी मोठ्या हिरीरीने भाग घेतला. मी आत्ताच thebetterindia.com चा उल्लेख केला. जिथे मी डॉ. जयचंद्रन यांच्याविषयी वाचलं. शक्य असेल तेंव्हा मी कटाक्षाने thebetterindia.com ह्या संकेतस्थळावर जाऊन अशा प्रेरक गोष्टी वाचण्याचा प्रयत्न करतो. मला आनंद आहे, आजकालच्या काळात असे संकेतस्थळ आहे जे अशा विलक्षण लोकांच्या प्रेरणादायी गोष्टींशी समाजाचा परिचय करून देत आहे. ज्याप्रमाणे thepositiveindia.comसमाजात सकारात्मकता पसरविण्याचे आणि समाजाला अधिक संवेदनशील बनविण्याचे काम करत आहे, त्याच प्रमाणे yourstory.com युवा संशोधक आणि उद्योजकांच्या यशोगाथा मोठ्या कौशल्याने समाजाला सांगत आहे. त्याच प्रमाणे samskritabharati.in च्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या, सहजतेने संस्कृत भाषा शिकू शकता. आपण एक काम करू शकतो का, अशा अशा संकेतस्थळांची माहिती एकमेकांना देऊन समाजात सकारात्मकता पसरवूया. मला खात्री आहे, कि ह्यामुळे समाजात परिवर्तन घडवून आणणाऱ्या आमच्या नायाकांविषयी अधिकाधिक लोकांना माहिती मिळेल. नकारात्मकता पसरविणे सोपे असते. पण, समाजात आपल्या आजूबाजूला अनेक चांगली कामे होत आहेत. आणि हे सगळं 130 कोटी भारतीयांच्या सामुहिक प्रयत्नांनी होत आहे.

प्रत्येक समाजात खेळांचं एक महत्व आहे. जेंव्हा खेळ खेळले जातात तेंव्हा ते बघणाऱ्यांच्या मनात देखील उर्जा निर्माण होते. खेळाडूंची प्रसिद्धी, ओळख, मान-सन्मान अशा अनेक गोष्टी आपण बघत असतो. पण अनेकदा यांच्यामागे अनेक अशा गोष्टी असतात ज्या क्रीडा विश्वापेक्षा कितीतरी अधिक असतात, मोठ्या असतात. काश्मीरची कन्या हनाया निसारबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे. तिने कोरियात झालेल्या कराटे अजिंक्य स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. हनाया 12 वर्षांची आहे आणि काश्मीरच्या अनंतनाग येथे राहते. हनायाने मेहनत आणि चिकाटीने कराटेचा अभ्यास आणि सराव केला. त्यातले बारकावे शिकली आणि स्वतःला सिद्ध केलं. मी सर्व देशवासीयांतर्फे तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो. हनायाला अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद. त्याचप्रमाणे 16 वर्षांच्या रजनी ह्या मुलीविषयी माध्यमांमध्ये खूप चर्चा झाली. आपण नक्कीच वाचलं असेल, रजनीने कनिष्ठ गटात मुष्ठीयुध्द स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर ती लगेच जवळच्या दुधाच्या एका छोट्या दुकानात गेली आणि एक प्याला दुध प्यायली. त्यानंतर रजनीने ते पदक कापडात गुंडाळलं आणि आपल्या बॅगमध्ये ठेवून दिलं. आपण विचार करत असाल, कि रजनी एक प्याला दुध का प्यायली? तिने ते आपले पिता जसमेर सिंग यांच्यासाठी केलं. ते पानिपत येथे एका छोट्या दुकानात लस्सी विकतात. रजनीने सांगितलं, कि इथवर पोहोचण्यासाठी तिच्या वडिलांनी खूप त्याग केला आहे, खूप कष्ट केले आहेत. जसमेर सिंग रोज सकाळी रजनी आणि तिची भावंड उठण्यापूर्वी कामावर निघून जायचे. रजनीने जेंव्हा मुष्टियुद्ध शिकण्याची इच्छा व्यक्त केली, तेंव्हा वडिलांनी शक्य ती सर्व साधने गोळा केली आणि तिचा उत्साह वाढविला. रजनीला मुष्टीयुद्धाचा सराव करण्यासाठी जुने gloves वापरावे लागले कारण तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची होती. इतके सगळे अडथळे असूनही रजनी खचून न जाता मुष्टीयुध्द शिकत राहिली. तिने सर्बियामध्ये देखील एक पदक जिंकले आहे. मी रजनीला शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो आणि रजनीला मदत करण्यास आणि तिचा उत्साह वाढविण्यासाठी तिचे माता-पिता जसमेर सिंगजी आणि उषा राणी यांचे अभिनंदन करतो. ह्याच महिन्यात पुण्याच्या एका 20 वर्षीय कन्या, वेदांगी कुलकर्णी सायकलने जगप्रवास करणारी सर्वात वेगवान आशियाई बनली आहे. ती 159 दिवस रोज जवळजवळ 300 किलोमीटर सायकल चालवत होती. तुम्ही कल्पना करा रोज 300 किलोमीटर cycling ! सायकल चालविण्याची तिची जिद्द खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. असे यश, अशा कामगिरीबद्दल ऐकून आपल्याला प्रेरणा मिळते की नाही. विशेषकरून माझे युवा मित्र जेंव्हा अश्या घटनांबद्दल ऐकतात, तेंव्हा त्यांना देखील अडथळे पार करून काहीतरी करून दाखविण्याची प्रेरणा मिळते. जर दृढनिश्चय केला, संकल्पात शक्ती असेल तर सगळ्या समस्या आपोआप गळून पडतात. कुठलीच समस्या अडथळा बनू शकत नाही. जेंव्हा अशा उदाहरणाविषयी आपण ऐकतो, तेंव्हा आपल्याला देखील आयुष्याच्या प्रत्येक क्षणी एक प्रेरणा मिळत असते.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, जानेवारीत उत्साह आणि आनंदाचे लोहडी, पोंगल, मकर संक्रांत, उत्तरायण, माघ बिहू, माघी, यासारखे अनेक सण येणार आहेत. ह्या सर्व सणांच्या निमित्ताने सानौर्ण देशात कुठे पारंपारिक नृत्यांचा रंग दिसेल, तर कुठे सुगीच्या आनंदात लोहडी दहन केलं जाईल. कुठे आकाशात रंगी बेरंगी पतंग उडवले जातील. तर कुठे जत्रेचा आनंद असेल, तर कुठे खेळांच्या स्पर्धा होतील, तर कुठे एकमेकांना तीळ गुळ दिला जाईल. लोक एकमेकांना म्हणतील, ‘तीळ गुळ घ्या गोड गोड बोला.’ ह्या सगळ्या सणांची नवे भलेही वेगवेगळी असतील पण सर्वांमागची भावना एकाच आहे. हे सण कुठे ना कुठे पिक आणि शेतीशी संबंधित आहेत. शेतकऱ्यांशी संबंधित आहेत, खेड्यांशी संबंधित आहेत. शेती वाडीशी संबंधित आहेत. याच काळात सूर्याचे उत्तरायण होऊन तो मकर राशीत प्रवेश करतो. ह्यानंतर दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो आणि हिवाळ्यातील सुगीचा हंगाम सुरु होतो. आमचे अन्नदाते असलेल्या शेतकरी बांधवांना देखील अनेकानेक अनेक शुभेच्छा. आपले सण विविधतेत एकता – एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना आपल्या सणांमध्ये सामावलेली आहे. आपण बघू शकतो, आपले उत्सव निसर्गाशी किती एकरूप झालेले आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये समाज आणि निसर्ग हे वेगवेगळे नाहीत. येथे व्यक्ती आणि समष्टि एकच आहे. निसर्गाशी असलेल्या आपल्या जवळच्या संबंधांचे उत्तम उदाहरण म्हणजे – सणांवर आधारित कॅलेंडर. ह्यात वर्षभरातील सण तर असताच, त्यासोबतच ग्रह – नक्षत्रांची माहिती देखील असते. ह्या पारंपरिक कॅलेंडरमधून नैसर्गिक आणि खगोलिय घटनांशी आपला संबंध किती जुना आहे याची माहिती मिळते. चंद्र आणि सूर्याच्या गतीनुसार चंद्र आणि सूर्य कॅलेंडरनुसार सणांची तिथी निश्चित केली जाते. जो ज्या कॅलेंडरनुसार कालगणना करतो त्यावर हे अवलंबून असते.अनेक भागात नक्षत्रांच्या स्थितीनुसार देखील सण साजरे केले जातात. गुढी पाडवा, चेटीचंड, उगादि हे सर्व चंद्र कॅलेंडरनुसार साजरे केले जातात, तर तमिळ पुथांडु, विषु, वैशाख, बैसाखी, पोइला बैसाख, बिहु – हे सर्व सण पर्व सूर्य कॅलेंडरनुसार साजरे केले जातात. आपल्या अनेक सणांमध्ये नदी आणि जल संवर्धनाला विशेष महत्व आहे. छठ हा सण नद्या, तलावांमध्ये सूर्याची उपासना करण्याचा सण आहे. मकर संक्रांतीला देखील लाखो-करोडो लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. आमचे सण आम्हाला सामाजिक मुल्यांची देखील शिकवण देतात. एकीकडे यांचे पौराणिक महत्व आहे, तर दुसरीकडे प्रत्येक सण सहजतेने सामाजिक बंधुभावाची प्रेरणा देऊन जातो. मी आपणा सर्वांना 2019 च्या अनेकानेक शुभेच्छा देतो आणि येणारे सण आपल्याला भरपूर आनंद देतील अशी इच्छा व्यक्त करतो. ह्या सणांना काढलेले फोटो सर्वांसोबत शेयर करा. म्हणजे मग भारताची विविधता आणि भारतीय संस्कृतीचे सौंदर्य प्रत्येक जण बघू शकेल.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या संस्कृतीत अशा अनेक गोष्टी आहेत,ज्यांचा आपण अभिमान बाळगू शकतो आणि सगळ्या जगाला अभिमानाने दाखवू शकतो. आणि अशा गोष्टींपैकीच एक आहे आपला कुंभमेळा! तुम्ही कुंभमेळ्याविषयी बरंच काही ऐकलं असेल. चित्रपटांमधून त्याची भव्यता आणि विशाल आकार याविषयी बरंच काही पाहिलंही असेल, आणि ते खरंही आहे.

कुंभमेळ्याचं स्वरुप विशाल असतं-जितके दिव्य तितकेच भव्य ! देशविदेशातून लोक तिथे येतात आणि कुंभमेळ्याशी कायमचे जोडले जातात. कुंभमेळ्यात आस्था आणि श्रद्धेचा जनसागर लोटलेला असतो. एकाच जागी, देशविदेशातील कोट्यवधी लोक एकत्र आले असतात. कुंभमेळ्याची परंपरा आपल्या महान सांस्कृतिक वारशातून साकारलेली आणि फुललेली आहे. यावर्षी 15 जानेवारीपासून प्रयागराज येथे जगप्रसिद्ध कुंभमेळा आयोजित होत आहे, ज्याची कदाचित तुम्ही सगळेही उत्सुकतेने वाट बघत असाल. कुंभ मेळ्यासाठी आतापासूनच संत-महात्मे प्रयागराज ला पोहचू लागले आहेत. गेल्या वर्षी युनेस्कोने कुंभमेळ्याला मानवतेच्या अद्भुत सांस्कृतिक परंपरांच्या यादीत स्थान दिलं आहे, यावरुन आपल्याला त्याच्या जागतिक महत्तेची कल्पना येऊ शकते. काही दिवसांपूर्वी अनेक देशांचे राजदूत कुंभमेळ्याची तयारी बघायला आले होते. त्यावेळी तिथे एकाच वेळी अनेक देशांचे राष्ट्रध्वज फडकवले गेले. प्रयागराज मध्ये आयोजित होत असलेल्या या कुंभमेळ्यात 150 पेक्षा अधिक देशांमधील लोक येण्याची शक्यता आहे. कुंभाच्या दिव्यतेतून भारताची भव्यता संपूर्ण जगात आपल्या विविधरंगी खुणा उमटवेल.कुंभमेळा स्वतःचा शोध घेण्याचं प्रभावी माध्यम आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी अनुभूती होत असते. संसारतल्या व्यावहारिक गोष्टींकडे आपण आध्यात्मिक दृष्टीने बघतो-जाणून घेतो. विशेषतः युवकांसाठी हा एक खूप मोठा शैक्षणिक अनुभवच असतो. मी स्वतः काही दिवसांपूर्वीच प्रयागराजला गेलो होतो. मी तिथे पाहिलं की कुंभमेळ्याची तयारी अगदी जोमाने सुरु आहे. प्रयागराजचे लोकही कुंभमेळ्याविषयी अत्यंत उत्साहात आहेत. मी तिथे एकीकृत निर्देश आणि नियंत्रण केंद्राचे लोकार्पण केले. भाविकांना या केंद्रामुळे मोठ्या सुविधा मिळणार आहेत. यावर्षी कुंभमेळ्यात स्वच्छतेवर देखील भर दिला जात आहे. कुंभाच्या आयोजनात स्वच्छतेसोबतच साफसफाईकडे लक्ष दिलं गेलं, तर त्याचा चांगला संदेश दूरपर्यत पोहोचेल.यावर्षी भाविक त्रिवेणी संगमातल्या पवित्र स्नानानंतर अक्षयवटाचे पुण्यदर्शन देखील करु शकेल. भाविकांच्या आस्थेचं प्रतीक असलेला हा अक्षयवट कित्येक वर्षांपासून एका किल्यात बंद होता, त्यामुळे इच्छा असूनही भाविक त्याचे दर्शन घेऊ शकत नव्हते. मात्र आता, या अक्षयवटाच्या किल्याची दारं सर्वांसाठी खुली करण्यात आली आहेत. मी तुम्हाला आग्रह करेन की जेव्हा तुम्ही कुंभमेळ्याला जाल, तेव्हा कुंभमेळ्याचे विविध पैलू आणि रंग दाखवणारे काही फोटो सोशल मिडियावर नक्की अपलोड करा, ते फोटो बघून अधिकाधिक लोकांना या कुंभमेळ्याला जायची प्रेरणा मिळेल.

अध्यात्माचा हा कुंभ भारतीयांसाठी भारतात दर्शनांचा महाकुंभ बनो.

आस्थेचा हा कुंभ राष्ट्रीयतेचाही महाकुंभ बनो.

राष्ट्रीय एकतेचाही महाकुंभ बनो.

भाविकांचा हा कुंभ जगभरातील पर्यटकांचाही महाकुंभ बनो.

कलात्मकतेचा हा कुंभ, सृजन शक्तींचाही महाकुंभ बनो.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, 26 जानेवारीच्या गणराज्य दिनाच्या कार्यक्रमाविषयी आपल्या सर्व देशबांधवांच्या मनात खूप उत्सुकता असते. त्यादिवशी आपण आपल्याला संविधानाची भेट देणाऱ्या देशातील महान विभूतींचं स्मरण करतो.

या वर्षी आपण पूज्य बापूंची 150 वी जयंती साजरी करतो आहोत.आपल्यासाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती श्री सिरील रामाफोसा, यावर्षी गणराज्य दिवसाचे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. पूज्य बापू आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एक अतूट नातं आहे. दक्षिण आफ्रिकेतूनच’मोहन’, ‘महात्मा’ बनून आले. दक्षिण आफ्रिकेतच महात्मा गांधी यांनी आपला पहिला सत्याग्रह सुरु केला आणि वर्णभेदाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिलेत. त्यांनीच फिनिक्स आणि टॉलस्टॉय फार्म्सचीही स्थापना केली, तिथूनच संपूर्ण जगात शांती आणि न्यायासाठी आवाज उठवला गेला. 2018 हे वर्ष, नेल्सन मंडेला यांचेही जनशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यांना ‘मडीबा’ या नावानेही ओळखले जाते.

नेल्सन मंडेला, हे संपूर्ण जगात वर्णभेदाविरुद्धच्या लढ्यातील एक आदर्श मानले जातात, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. आणि मंडेला यांचे प्रेरणास्रोत कोण होते ? त्यांना इतकी वर्षे तुरुंगवास सोसण्याची सहनशक्ती आणि प्रेरणा, आदरणीय बापूंकडून मिळाली होती. मंडेला यांनी बापूंबद्दल बोलताना म्हटले होते, “महात्मा गांधी हे आमच्या इतिहासाचे अविभाज्य घटक आहेत. कारण याच ठिकाणी त्यांनी सत्याचा पहिला प्रयोग केला होता, याच ठिकाणी त्यांनी न्यायाप्रति आपला विलक्षण आग्रह सिद्ध केला होता, याच ठिकाणी त्यांनी आपल्या सत्याग्रहाचे दर्शन आणि संघर्षाच्या पद्धती विकसित केल्या.” ते बापूंना आपला आदर्श मानत होते. बापू आणि मंडेला, दोघेही संपूर्ण जगासाठी केवळ प्रेरणास्रोत नाहीत, तर त्यांचे आदर्श, आपल्याला प्रेम आणि करुणेने परिपूर्ण अशा समाजाच्या निर्मितीसाठी सदैव प्रोत्साहित करतात.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये नर्मदातटावर केवडिया येथे डीजीपी परिषद झाली. तेथे जगातील सर्वात उंच पुतळा अर्थात ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आहे. त्या ठिकाणी देशातील सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्यांसोबत साधक-बाधक चर्चा झाली.देश आणि देशवासीयांची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी कशा प्रकारची पावले उचलली जावीत, याबाबत सविस्तर विचार-विनिमय करण्यात आला. त्याच दरम्यान मी राष्ट्रीय एकतेसाठी सरदार पटेल पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली. कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय एकतेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. सरदार पटेल यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या एकतेसाठी समर्पित केले होते. ते नेहमीच भारताची अखंडता अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील राहिले. येथील विविधतेमध्येच भारताची खरी ताकद एकवटली आहे, असे सरदार पटेल मानत असत. त्यांच्या त्या भावनेचा आदर करत, एकतेच्या या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, 13 जानेवारी हा गुरु गोबिंद सिंह जी यांच्या जयंतीचा पवित्र दिवस आहे. गुरु गोबिंद सिंह जी यांचा जन्म पाटणा येथे झाला होता, आयुष्यातील बराच काळ उत्तर भारत ही त्यांची कर्मभूमी होती आणि महाराष्ट्रात नांदेड येथे त्यांनी अखेर प्राणत्याग केला. जन्मभूमी पाटणा, कर्मभूमी उत्तर भारत आणि जीवनाची अखेर नांदेडमध्ये. अशा प्रकारे एका अर्थाने संपूर्ण भारतवर्षाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला. त्यांच्या आयुष्यावर नजर टाकली तर त्यात संपूर्ण भारताचे प्रतिबिंब पाहायला मिळते. पिता श्री गुरू तेग बहादुर जी शहीद झाल्यानंतर गुरु गोबिंद सिंह जीं नी नऊ वर्षांच्या अल्पायुष्यात गुरुचे पद प्राप्त केले. न्यायासाठी लढा देण्याचे साहस गुरू गोविंद सिंगजी यांना गुरूंकडून वारसाच्या रूपातच मिळाले. त्यांचे व्यक्तिमत्व शांत आणि सरळ होते. मात्र जेव्हा जेव्हा गरीब आणि दुर्बलांची मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न झाले, त्यांच्यावर जेव्हा जेव्हा अन्याय झाला, त्या प्रत्येक वेळी गुरुगोविंद सिंग यांनी गरीब आणि दुर्बलांसाठी प्रखर लढा दिला आणि म्हणूनच म्हटले जाते की…

“सवा लाख से एक लड़ाऊँ,

चिड़ियों सों मैं बाज तुड़ाऊँ,

तबे गोबिंदसिंह नाम कहाऊँ |

ते म्हणत असत की दुर्बलांविरुद्ध लढाई करून आपल्या शक्तीचे प्रदर्शन करणे योग्य नाही. मानवाची दुःखे दूर करणे, ही सर्वात मोठी सेवा आहे, असे श्री गुरु गोबिंद सिंह जी मानत असत. साहस, शौर्य, त्याग आणि धर्मपरायणतेने परिपूर्ण, असे ते एक दिव्य पुरुष होते, ज्यांना शस्त्र आणि शास्त्र दोन्हींचे पुरेपूर ज्ञान होते. ते एक उत्तम तिरंदाज होते, त्याचबरोबर गुरुमुखी, संस्कृत, फारशी, हिंदी आणि उर्दूसह इतर अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. मी पुन्हा एकदा श्री गुरु गोबिंद सिंग यांना वंदन करतो.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, देशात अशा अनेक चांगल्या गोष्टी होत असतात ज्यांची व्यापक स्तरावर चर्चा होत नाही. असाच एक उपक्रम F.S.S.A.I अर्थात भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण राबवत आहे. महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच मालिकेचा एक भाग म्हणून F.S.S.A.I तर्फे आहाराच्या सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण सवयींना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. “Eat Right India” मोहिमेअंतर्गत, स्वस्थ भारत यात्रांचे आयोजन केले जात आहे. ही मोहीम 27 जानेवारीपर्यंत सुरू राहील. अनेकदा सरकारी संघटनांचा परिचय अतिशय साचेबद्ध पद्धतीने करून दिला जातो, मात्र त्यापुढे एक पाऊल टाकत F.S.S.A.I. जनजागृती बरोबरच लोकशिक्षणाचे काम करीत आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. जेव्हा भारत स्वच्छ असेल, आरोग्यपूर्ण असेल, तेव्हाच भारत समृद्ध होऊ शकेल. चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक भोजन ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. याच संदर्भात F.S.S.A.I. ने हाती घेतलेल्या या उपक्रमाबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असा आग्रह मी आपणाला करू इच्छितो. आपणही यात सहभागी व्हावे आणि विशेष करून मुलांना या गोष्टी नक्कीच दाखवा, असे मी सांगू इच्छितो. आहाराचे महत्त्व सांगणारे शिक्षण लहानपणापासूनच मिळणे आवश्यक असते.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, 2018 या वर्षातील हा शेवटचा कार्यक्रम आहे. 2019 या वर्षात आपण पुन्हा एकदा भेटू. पुन्हा एकदा मनातील गोष्टी बोलू. आयुष्य, मग ते व्यक्तीचे असो, राष्ट्राचे असो वा समाजाचे असो, प्रेरणा ही त्या आयुष्याच्या प्रगतीचा पाया असते. अशी नवी प्रेरणा, नवा उत्साह, नवा संकल्प, नवी सिद्धी आणि नवी उंची यांसह पुढे जाऊया, पुढे पाऊल टाकू या. स्वतःत बदल घडवू या आणि देशालाही बदलू या. अनेकानेक धन्यवाद!!!

 

  • Priya Satheesh January 15, 2025

    🐯
  • krishangopal sharma Bjp January 12, 2025

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌹🌷🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌹🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
  • krishangopal sharma Bjp January 12, 2025

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌹🌷🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌹🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
  • krishangopal sharma Bjp January 12, 2025

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌹🌷🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌹🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
  • ram Sagar pandey November 04, 2024

    🌹🌹🙏🙏🌹🌹जय श्रीकृष्णा राधे राधे 🌹🙏🏻🌹जय माता दी 🚩🙏🙏जय श्रीराम 🙏💐🌹
  • Pradhuman Singh Tomar July 25, 2024

    bjp
  • Pawan Jain April 17, 2024

    नमो नमो
  • rida rashid February 19, 2024

    Jay shree ram
  • Maruti Wagh February 16, 2024

    👍
  • Subhamay Sarkar February 09, 2024

    জয় শ্রী রাম
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
How 'Make In India' Is Driving Swift Growth Of Country's EV And Automobile Sector

Media Coverage

How 'Make In India' Is Driving Swift Growth Of Country's EV And Automobile Sector
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
The World This Week On India
March 26, 2025

India is making waves across different sectors, from defence and technology to global trade and diplomacy. This week, the country is strengthening its naval power, embracing futuristic transport, and building economic ties with global partners.

As New Zealand's Prime Minister Christopher Luxon put it, "I am a great admirer of [Narendra Modi's] extraordinary achievements as Prime Minister. [Narendra Modi has] lifted 250 million of your countrymen out of poverty and eliminated extreme poverty. Today, India is at the leading edge of technology with massive innovative potential." His words show how India's progress is catching the world's attention.

India and the U.S.: From Strategy to Prosperity

India's relationship with the United States is evolving beyond just strategic concerns. According to U.S. DNI Tulsi Gabbard, the two countries are setting the stage for a prosperous future together with deepening trade, defence collaborations, and joint technological ventures. This growing partnership shows India's increasing global influence and economic strength.

|

A Stronger Indian Navy: Agniveer and Women on Board
The Indian Navy is transforming with the Agniveer recruitment scheme and the inclusion of women in active service. With more opportunities for training and participation in international exercises, the Navy is becoming a more skilled and versatile force. This marks a big shift toward modernizing India's defence forces while embracing diversity and professionalism.

Sunita Williams' Homecoming: A Proud Moment for India

NASA astronaut Sunita Williams continues to inspire millions; her latest mission is another proud moment for India. Prime Minister Modi's heartfelt letter to India's 'illustrious daughter' shows the country's deep admiration and pride for her achievements in space exploration.

India Bets $1 Billion on the Creator Economy

With digital content booming, India is investing $1 billion to help creators improve their skills, enhance production quality, and expand globally. This push aims to position India as a major player in the global content industry, empowering individuals to turn creativity into economic success.

India's Hyperloop: Pushing the Boundaries of Transport

A 410-meter Hyperloop test tube at IIT Madras is now the longest of its kind in the world. This milestone brings India closer to next-gen transportation, potentially transforming how people and goods move in the future.

Philippines Wants India in Its Nickel Industry

The Philippines is looking at India as a key partner in its nickel sector, aiming to reduce reliance on China. This move could strengthen India's role in the global supply chain while opening new trade opportunities in critical minerals.

India and New Zealand: Free Trade Talks Back on Track

After a 10-year pause, India and New Zealand are reviving talks for a free trade agreement. This could lead to greater cooperation in agriculture, aerospace, and renewable energy, boosting economic ties between the two nations.

Georgia State Honors Indian-American Physician

The Georgia Senate has declared March 10 as "Dr. Indrakrishnan Day" to honour the Indian-American gastroenterologist's healthcare and community service contributions. This recognition shows the growing impact of the Indian diaspora worldwide.

From military advancements to cutting-edge technology and global trade partnerships, India is confidently shaping its future. Whether strengthening ties with major powers or making breakthroughs in transport and digital innovation, the country is proving itself. As the world watches, India continues to rise.