तुमच्या (पीएम मोदी) नेतृत्वाखाली भारताने जगाला मदतीचा हात दिला आहे. तुम्ही सहृदयतेने आणि सदिच्छेने राबविलेला लस उपक्रम हे परोपकारीपणाचे अजोड उदाहरण आहे. चार वर्षांपूर्वी, सारे जग कोविड-19 च्या महासाथीच्या संकटाला तोंड देत असताना, इतर काही देश वैद्यकीय साहित्याची साठेबाजी करण्याच्या मागे होते. तेव्हा तुम्ही, त्रिनिदाद आणि टोबॅगोसह इतर अगदी लहान देशांनाही लस आणि इतर आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध होईल याची काळजी घेतली. तुमच्या उदारतेमुळे भयाचे वातावरण जाऊन आशा आणि शांतता आली. मी पुन्हा म्हणते, ती गोष्ट मुत्सद्देगिरीच्या पलीकडची होती.ती नाती जपणारी कृती होती. ते सामायिक मानवतेचे कृत्य होते.
पंतप्रधान मोदी, आपण भारताचा कारभार अधिक चांगला करणारी आणि तुमच्या देशाला प्रमुख आणि प्रबळ जागतिक सत्ता म्हणून स्थान मिळवून देणारी परिवर्तनवादी शक्ती आहात. तुमच्या दूरदर्शी आणि भविष्यवेधी उपक्रमांद्वारे तुम्ही भारतीय अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण केले आहे. तुम्ही एक अब्जाहून अधिक नागरिकांना सशक्त केले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जगभरातील सर्व भारतीयांच्या मनात अभिमानाची भावना निर्माण केली आहेत.
आम्हाला येथे (भारत) उद्योजकता घडत असल्याचे दिसत आहे. तसेच आम्हाला येथून जगभर व्यवसाय करण्याची मुभा मिळते त्याशिवाय एवढी मोठी अर्थव्यवस्था (भारत) इतक्या वेगाने विकसित होत आहे आणि अनेकांसाठी इतक्या संधी निर्माण करत आहे, ही दुर्मिळ गोष्ट आहे. नवोन्मेषाची, त्वरीत हालचाल करण्याची, अधिकाधिक ग्राहकांना सेवा देण्याची, विक्रेते विकसित करण्याची, ई-कॉमर्स मार्केटप्लेस व्यवसाय उभी करण्याच्या क्षमतेमुळे त्याचे भविष्य खरोखर उज्ज्वल आहे आणि प्रत्येकासाठी मोठ्या प्रमाणात संधी निर्माण करण्याची संधी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऊर्जा, त्यांची धडाडी आणि त्यांची इतर देशांशी संबंध राखण्याची इच्छा ही जागतिक स्तरावरची भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे, परंतु त्यांना त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. "ऑपरेशन सिंदूर" नंतर त्यामागील भूमिका राजनयिक पातळीवरून पोहोचवणे हा राष्ट्रीय संकल्प आणि प्रभावी संवादाचा क्षण होता. यामुळे भारत जेव्हा एकजुटीने पुढे येतो तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपला आवाज स्पष्टपणे आणि विश्वासाने मांडू शकतो, हे स्पष्ट झाले.
आज, भारत जागतिक प्रगतीमध्ये आघाडीवर असून या प्रगतीला विकास, शाश्वतता आणि तांत्रिक नवोन्मेषासाठीची धाडसी आणि सर्वसमावेशक दृष्टीचे मार्गदर्शन आहे. तुमच्या (पंतप्रधान मोदींच्या) गतिशील नेतृत्वाखाली, भारत ग्लोबल साउथचा एक खंदा समर्थक आणि आंतरराष्ट्रीय मंचावर एक शक्तिशाली आवाज म्हणून पुढे आला आहे. 2023 च्या G20 शिखर परिषदेचे तुम्ही केलेले यशस्वी आयोजन, तसेच पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरील आगामी जागतिक शिखर परिषद ही या जागतिक नेतृत्वाची चमकदार उदाहरणे आहेत.
प्रिय नरेंद्र, परिवर्तन म्हणजे काय हे तुम्हाला खूप चांगले माहीत आहे. तेच तुमचे जीवन आणि तोच तुमचा श्वास आहे. याचे नेमके कारण म्हणजे तुम्ही भारतासाठी उल्लेखनीय परिवर्तनाची शक्ती - परिवर्तन घडवून आणणारे नेते ठरत आहात.
मी म्हणेन की या 11 वर्षांत मी जे काही पाहिले आहे आणि तुम्हीही पाहिले आहे, मग ते पायाभूत सुविधांच्या स्तरावर असो, तंत्रज्ञानाच्या स्तरावर असो, संरक्षणाच्या स्तरावर असो किंवा इतर कोणत्याही स्तरावर असो, दर 3-4 वर्षांनी तुम्हाला वाढ झाल्याचे दिसते. तुम्ही एक शक्तिशाली सरकार पाहात आहात. तुम्ही असे सरकार पाहत आहात ज्याचे व्हिजन 5 वर्षांचे नाही तर 2047 चे आहे. ज्या सरकारकडे दूरदृष्टी आहे, ते अशाच पद्धतीने काम करू शकते. ंआज आपले राष्ट्रीय चारित्र्य देशभक्तासारखे झाले आहे याचे मला खूप समाधान वाटत आहे.
गेल्या तिमाहीत भारत खरोखर चांगली कामगिरी करत आहे, त्याने 7.5% च्या अपेक्षेपेक्षाही अधिक वाढ साध्य केली. हे असेच चालू राहिल्यास, भारत ही 5 ट्रिलियन यूएस डॉलर्सची जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, कदाचित या वर्षाच्या सुरुवातीलाच ती जपानकडून तिसरे स्थान आपल्याकडे घेईल.
ही (भारताची) आर्थिक वाढ प्रायोगिक नसून संरचनात्मक असून तिला भक्कम देशांतर्गत उपभोग, अर्थव्यवस्थेचे जलद औपचारिकीकरण, व्यापक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि जागतिक स्तरावरील सर्वात तरुण - सरासरी केवळ 28 वर्षे वय असलेली तरुण, महत्त्वाकांक्षी लोकसंख्या - या सर्व घटकांची एकत्रितपणे चालना मिळत आहे.
काही वेळा भारतीय असणे अर्थ भूमिका घेणे आणि आपल्यावरील अन्याय संपवणे असा सुद्धा असतो हे दाखवून दिल्याबद्दल श्री नरेंद्र मोदी यांचे आभार. त्यामागचा उद्देश असा की अशा त्वेषाने आपल्या लोकांचे रक्षण करणे जेणेकरून कोणीही आपल्या बंधू-भगिनींवर दहशत बसवून आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करण्याचा कोणी विचारही करू शकणार नाही.
मी माझ्या क्रीडा जीवनात अनेक एकत्रित संघटना पाहिल्या आहेत, परंतु आपल्या सर्वोत्कृष्ट सैन्य दलांच्या नेतृत्वाखाली आणि G.O.A.T. नरेंद्र मोदी जी आणि त्यांचे सरकार कर्णधार असलेला 1.5 अब्जचा दमदार भारतीय संघ एकजुटीने मैदानात उतरताना मी प्रथमच पाहात आहे,
मला वाटते की हा सरकारी उपक्रम (WAVES), पंतप्रधानांचा हा उपक्रम, म्हणजे सर्जनशीलतेचा विकास, प्रमाण आणि त्याच्या पैलूंचा एवढा सांगोपांग उपयोगावर एवढे लक्ष दिले जात असल्याचे माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवात प्रथमच पाहिले आहे. त्यामुळे हा एक अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे आणि त्याचे परिणाम पुढील अनेक वर्षे दिसून येत राहतील.